Tuesday, June 30, 2020

माजी प्राचार्य बापूसाहेब आणि मी

कितीही संकटे आली आणि पराभव पत्करावा लागला तरी हसत त्याचा स्वीकार करावा व पुन्हा उमेदीने संघर्ष चालू ठेवावा. हे मला प्रा. बापूसाहेब कानिटकरांनी शिकविले. त्यांचा तो उपदेश मला आयुष्यभर आनंदाने काम करीत राहण्यास साहाय्यभूत ठरत आहे.

प्राचार्य कै. बापूसाहेब कानिटकर

मी १९६६ साली कॉलेजवर असिस्टंट लेक्चरर म्हणून नोकरीस लागल्यापासून माझा प्राचार्य कानिटकर सरांशी नियमित संबंध येत असे. सुब्बाराव यांचेबरोबर मी नेहमी त्यांना भेटायला जाई. पुढे बीईच्या क्लासरूममध्ये पार्टिशन घालून आम्ही पब्लिक हेल्थ लॅब सुरू केली. शनिवारी, रविवारीही आम्ही तेथे काम करीत असू. सर्व कॉलेज बंद असले तरी कानिटकर सर एक फेरी टाकून कसे काय काम चालले आहे ते पहात. सल्लाही देत. त्यामुळे कामाला अधिक हुरूप येई.

मला पीएचडीला प्रवेश मिळाला तेव्हा त्यांना फार आनंद झाला. माझ्या आईवडिलांचे त्यांनी अभिनंदन केले. १९७५ साली मला कलकत्त्यातील कॉन्फरन्समध्ये पेपर प्रेझेंटेशनमध्ये पहिला क्रमांक मिळाला आणि डॉ. करणसिंग यांचे हस्ते दिल्लीत मला ते पारितोषिक मिळाले. तेंव्हा त्यांनी फोनवरून माझ्यासाठी पब्लिक हेल्थमध्ये असिस्टंट प्रोफेसरची जाहिरात काढली असल्याचे सांगितले. मला फार आनंद झाला. पण ती पोस्ट माझ्या नशिबात नव्हती.
 

आत्तापर्यंत कोणाकडेही न सांगता मनात ठेवलेली घटना मी आज उघड करीत आहे. त्यावेळी सुब्बाराव, संतपूर आणि जोगळेकर यांची खूप मैत्री होती. जोगळेकर माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि पब्लिक हेल्थ विषय शिकवत होते. मी कानपूरहून सांगलीस परत आल्यावर कळले की इंटरव्ह्यू होऊन प्रा. जोगळेकरांना ती पोस्ट मिळाली. मला फार वाईट वाटले. प्रा. ब्र्हमनाळकर आणि प्राचार्य कानिटकरांनी याबाबतीत काही करता न आल्याबद्दल खेद व आपली नाराजी व्यक्त केली होती व लवकरच पुन्हा संधी मिळेल असे सांगितले होते. १९७५ नंतर पुन्हा तशी पब्लिक हेत्थच्या नावाने पोस्ट निघाली नाही. बाकीच्या पीएचडी करणा-यांना दोन पगार वाढी मिळाच्या त्याही मला मिळाल्या नाहीत. माझी पीएचडी नेहमी उपेक्षितच राहिली. तशी संधी यायला मला पुढे २० वर्षे वाट पहावी लागली.

प्रत्यक्षात प्रा. संतपूर, प्रा. जोगळेकर इत्यादी प्राध्यापक इतर कॉलेजमध्ये गेले, मला वालचंद क़लेज सोडून दुसरीकडे कोठे जाण्याची कल्पनाच करवत नसे. कॉलेजमधील विद्यार्थी, माजी विद्यार्थी संधटला, मराठी विज्ञान प्रबोधिनी, डॉ. सुब्बाराव यांचेबरोबर कॉलेज व इपीआरएफच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रणाबाबत डिझाईन व सल्ला देणे. विविध काखान्यांना भेटी देणे आणि विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पात सहभागी होणे यातच मला आनंद होता. शिवाय प्रा, फडणीस सरांमुळे कॉम्प्युटरमध्ये प्रशिक्षण वर्ग चालविण्यास मिळत होते. यामुळे मला त्याबद्दल कधी वाईट वाटले नाही.

प्रा. जोगळेकर गमतीत मला पीएचडी म्हणजे काय वेगळे दिवे लावले म्हणून चिडवीत असत व आपली नेमणूक कशी योग्य होती हे सांगत. मीही त्यांच्या विनोदावर हसून वेळ मारून नेत असे. अर्थात जोगळेकर सरांना मनातून माझ्याबद्दल प्रेम होते. त्यांनी मला इपीआरएफ व मराठी विज्ञान प्रबोधिनीच्या स्थापनेसाठी खूप मदत केली. स्नेहदीपवरील फ्लॅटही हिकमती करून आम्हाला मिळवून दिला. साठेनिवासमध्ये मला क्वार्टर्स मिळवीन देण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. या सर्व गोष्टींमुळे आमचे संबंध नेहमीच चांगले राहिले. मीही त्यांच्या तालमीत तयार झालो,

प्रा कानिटकर सरांनी माझा भाऊ अरूण याला सांगली अर्बन बॅंकेत आणि धाकटा भाऊ उदय य़ाला आधी वालचंद कॉलेज व नंतर बुधगावच्या पीव्हीपीआयटी कॉलेजमध्ये नोकरी दिली. उदयच्या पत्नीलाही तेथे नोकरी मिळाली. आपल्या माणसांना पुढे आणण्यासाठी त्यांनी नेहमी स्वतःचे वजन खर्ची करून अनेक माझ्यालारख्या कुटुंबांना मानाचे स्थान मिळवून दिले. याबाबतीत त्यांच्याकडे कोणीही कॉलेजमधील कधी गेले तर नक्की उपयोग होई. असा वशिला लावण्यास ते कचरत नसत.

इतर ठिकाणी मात्र मला याबाबतीत फार कटू अनुभव आले.  सिटी हायस्कूल व विलिंग्डल कॉलेजमध्ये सर्व वरीष्ठ अधिकारी व्यक्ती अगदी परिचयाच्या असून देखील माझ्या मुलाला व नातेवाईकांना तेथे प्रवेश मिळू शकला नाही उलट वशिला चालत नाही. केवळ गुणवत्तेवर येथे प्रवेश दिला जातो म्हणून माझी बोळवण करण्यात आली. नंतर कमी गुणाचे विद्यार्थीही देणग्या घेऊन तेथे प्रवेश घेत होते हे माझ्या लक्षात आले. मी त्या माझ्या मित्रांना दोष देत नाही कारण त्यांचेही हात बांधलेले असत. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर बापूसाहेबांनी जो माझ्याबाबतीत आपलेपणा दाखविला व प्रसंगी स्वतःला दूषण लावून घेतले त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे.

 प्रा. श्री. कानिटकर यांच्यात बापूसाहेबांचेच गुण उतरले आहेत. कॉलेजबद्दल नितांत प्रेम, स्थानिक व कॉलेजातील लोकांना उच्च पदे मिळावीत स्थानिक लोकांचे आणि उद्योगांचे प्रश्न कॉलेजने सोडवावेत असे त्यांना वाटते. महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी व कॉलेजमधील वादात त्यांच्या भूमिकेबद्दल लोकांची मते भिन्न असू शकतील. मात्र कॉलेजच्या आणि सांगली परिसराच्या विकासासाठी व  अंतिम भल्यासाठीच त्यांचे प्रयत्न राहतूल याची मला खात्री आहे.

बापूसाहेबांनी माझ्या मनात कॉलेजबद्दल आंतरिक जिव्हाळा निर्माण केला त्यामुळेच मी वालचंद हेरिटेज प्रकल्पाचे काम अंगावर घेतले. माजी विद्यार्थी संघाचीही मोडलेली घडी परत बसविण्यासाठी सर्वांना एकत्र आणायचा प्रयत्न बापूसाहेबांच्याच उमेदीने आणि सर्वांबद्दल आदर ठेवून करण्याचे मी ठरविले आहे.
वालचंद कॉलेजचे नाव माझ्या दृष्टीने तरी कानिटकर कॉलेज असेच राहिले आहे.


Sunday, June 28, 2020

सांगलीतील ज्ञानदीप - कल्पवृक्ष - शं. ना. फाळके

          शं. ना. फाळके

सांगली संस्थानचा तो सुखद काळ

१९४० ते ४२ पर्यंत मी बालशिक्षण मंदिराच्या शाळेत इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत होतो. त्या काळात आमच्या शाळेत एक प्रार्थनागीत होते. ते संस्थानच्या राजकवी साधुदास यांनी लिहिले होते. `हेरंबा अति सदया, सती पार्वती तनया, पटवर्धन वरदसुता` अशी ती रचना होती. त्याची चाल पोलिसी बँडच्या तालावर वाजवता यावी अशी होती. संस्थानाधिपती आप्पासाहेब पटवर्धन यांच्या रसिकतेचे, सर्वगुणसंपन्नतेचे द्योतक ठरेल असे ते एक प्रार्थनागीत होते. ते एक अशा तऱ्हेने रचलेले आणि म्हटले जाणारे किंवा बँडवर वाजविले जाणारे होते की संस्थानचा सारा इतिहास प्रजाजनांच्या डोळयासमोर तरळून जायचा. हे संस्थान कसे निर्माण झाले, कोणामुळे निर्माण झाले, या सार्‍या गोष्टींची जाणीवपूर्वक उत्सुकता सर्व प्रजाजनांच्या मनात यामुळे निर्माण होत असे. खर्‍या अर्थाने ते सोपे पण संस्थानाबद्दल उत्सुकता आणि राजघराण्याबद्दल आदर निर्माण करणारे प्रार्थनागीत होते. सांगलीचे संस्थान केंव्हा निर्माण झाले? त्याचे पहिले अधिपती कोण? असे अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. संस्थानचे गुणविशेष सांगणारा सारा इतिहास डोळयापुढे तरळू लागायचा.

पटवर्धन घराण्याची आराध्यदेवता `श्रीगणेश`. त्या श्रीगणेशाचेच हे संस्थान. सार्‍या पटवर्धनांची संस्थानिक म्हणून प्रस्थापना करणार्‍या पेशवे घराण्याची श्रद्धा या सदाशिवपुत्रावर म्हणजेच या मंगलमूर्तीवर होती. पटवर्धन घराण्याचे हरभट हे गणेशाचे महान उपासक होते. ते इकडे आले ते कोकणातूनच. त्यांनी दुर्वांचा रस प्राशन करून श्रीगणेशाची उपासना केली. मोठ्या भक्तिभावाने केलेली त्यांची ही उपासना लवकरच सफल झाली.


हे पटवर्धन घराणे पेशव्यांचे पाईक बनून सैन्यात सामील झाले. आणि लवकरच पेशव्यांचे सरदार बनून या दक्षिण महाराष्ट्राचे संस्थानाधिपती बनले. सरदार पटवर्धनांची ही उज्वल परंपरा महाराष्ट्राच्या सैन्यबळाला जवळजवळ पन्नास वर्षे प्रेरणा देत राहिली. पुण्यात गोपाळराव पटवर्धनांपासून पुढे ही परंपरा परशुरामभाऊ पटवर्धनांच्या काळापर्यंत अधिकच उज्वल होत होती. ही परंपरा इतिहास संशोधकांचा अभिमानविषय ठरली आहे. मिरजेच्या वासुदेवशास्त्री खरे यांच्या इतिहास संशेधनात पटवर्धन घराण्याचा इतिहास हाही एक महत्वाचा विषय ठरलेला आहे.

कालक्रमानुसार मूळ संस्थान तासगाव येथे होते. ते परशुरामभाऊ पटवर्धनांनंतर मिरज, बुधगाव, जमखंडी, कुरुंदवाड अशा ठिकाणी विभागले गेले. ही सारी स्वतंत्र संस्थानेच बनली. सांगली हे संस्थान त्यानंतर निर्माण झाले.
कालौघात ही सारीच संस्थाने रेसिडेंटच्या हुकमतीत गेली. सांगलीचा शैक्षणिक विकास प्रामुख्याने त्यानंतरच झाला. वेदशाळेपासून इंजिनिअर कॉलेजपर्यंत शैक्षणिक विकास झाला तो प्रामुख्याने या काळात झाला.

अगदी आश्रमपद्धतीपासून महाविद्यालयांच्या बांधणीपर्यंतची कार्ये याच काळात झाली. त्याचप्रमाणे विलिनीकरण होण्याच्या काळातही संस्थानाधिपतींचे अमोल सहाय्य शैक्षणिक संस्थांना मिळाले आहे. सांगली हायस्कूलच्या बरोबरीने सिटी हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल या शाळा तसेच राणी सरस्वती कन्याशाळा यांची संवृद्धीही संस्थानाधिपतींनी केलेल्या अमोल साहाय्यानेच झालेली आहे. शैक्षणिकदृष्ट्या सांगलीचा उत्कर्ष याच काळात झालेला आहे.

सांगलीकरांचे ज्या शैक्षणिक संस्थांना सतत सहाय्य मिळाले त्या सर्वच संस्थातून सतत नामवंतांची निर्मिती होत गेली. उत्तम विद्यार्थी निर्माण होत होते त्याला कारण त्या सर्व संस्थातून उत्तम शिक्षकही लाभलेले होते. कै. पाटील गुरूजी, केशवराव दीक्षित, शंभुराव आपटे, कै.दतवाडकर गुरूजी असे नामवंत संस्कृत शिक्षक याच काळात आपापल्या संस्थातून काम करत होते.

याच काळात विलिंग्डन महाविद्यालय हेही सतत प्रगतीपथावर राहिले. त्यानंतर चिंतामणराव पटवर्धन कॉमर्स, वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजही याच काळात उभे राहिले. पुढे त्याच तोलामोलाचे शैक्षणिक कार्य कै. नामदार वसंतराव पाटील यांच्या अमोल साहाय्याने आजच्या शैक्षणिक संस्थांतून निर्माण झाले. त्यांच्यामुळेच खुद्द सांगलीत शांतीनिकेतन कॉलेज निर्माण झाले. सांगली हायस्कूल, कॉमर्स कॉलेज, आर्टस् सायन्स कॉलेज हे सर्व शैक्षणिक काम त्यांच्याच दिव्य प्रेरणेतून निर्माण झाले आहे. केवळ आर्थिकच नव्हे तर शिक्षण योजनेतूनही त्यांनी निर्माण केलेले हे काम अद्वितीय आहे.

याच्याबरोबरीनेच आरवाडे हायस्कूल तसेच सांगलीतील इतर काही शैक्षणिक संस्था या अलौकिक ठरल्या आहेत. विविध क्षेत्रातील प्रगती या सर्वश्रेष्ठ मार्गदर्शकाकडूनच झालेली आहे. या सर्व महान शिक्षकांचा त्या त्या क्षेत्रातील अद्वितीय वाटा उल्लेखनीय आहे.

व्यायाम क्षेत्रात रास्ते सर, नातू सर, शंभुराव आपटे, दामुआण्णा केळकर, जोगळेकर सर आरवाडे हायस्कूलचे संस्थापक दत्तोपंत आणि विनायकराव आपटे, सांगली हायस्कूलमधील काटे सर इत्यादि नामवंत शिक्षक अग्रभागी असायचे. त्यांच्यामुळे मल्लखांब, कुस्ती जिवंत होते. क्रीडामंडळे सजीव होती. कृष्णा नदी सजग असायची. पोहणारे अनेकजण पुराच्या काळात तेथेच हात मारत असायचे व पुलावरून उड्या मारून या काठावरून त्या काठावर पोहत असायचे. पोहणार्‍यांची ही प्रगती वरील सार्‍या शिक्षकांमुळेच झाली होती. या शिक्षकांच्या मार्गदर्शनातून हुतुतू, खोखो, लंगडी, रिंग टेनिस यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले आहे. क्रीडाक्षेत्र सार्‍या महाराष्ट्रभर गाजविले ते या सर्व गुरूवर्यांमुळेच.

इंग्रजीचे नामवंत अध्यापक म्हणून त्या काळातील कै. हणमंतराव गोखले, नानासाहेब फाळके, गोपाळराव करंदीकर, गोपाळराव रानडे हे त्या काळातील उल्लेखनीय शिक्षक होते. गोविंदराव मराठे, ताम्हनकर, के. जी. मराठे, हरिकाका सहस्रबुद्धे हे नामवंत गणित शिक्षक म्हणून सुप्रसिद्ध होते. पण यापैकी सर्वजणच अन्य क्षेत्रेही गाजवीत होते. कोणी नाट्यक्षेत्रात प्रवीण ठरले होते. तर कोणी बुद्धिबळ गाजविले होते. काहींनी संगीतक्षेत्र काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. अध्यात्मक्षेत्रात अधिकार मिळविलेल सुद्धा काही शिक्षक होते.

अशा तऱ्हेने शैक्षणिक क्षेत्रात केवळ शालेय पुस्तकी शिक्षण असे न राहता सर्वच संस्थांकडून विद्यार्थ्यांची जीवन विकासाची प्रगती होत होती. जुन्या काळापुरते बोलायचे झाले तर या सार्‍या शिक्षण क्षेत्रात केवळ तत्वज्ञानात्मक किंवा पुस्तकापुरत्या मर्यादित शिक्षणविचारचर्चा फारशा होत नसत पण सारे शिक्षणक्षेत्र जिवंत, रसरसलेले आणि कृतिशील असायचे. प्राथमिक शाळा यासुद्धा जिवंत असायच्या. तिरमारे गुरूजींसारखा महान शिक्षक हरिजनांसाठी शाळा चालवत असायचा.

प्रगतीच्या चारी वाटांवरून शैक्षणिक प्रगती या जुन्या काळात होत होती. सर्वांच्यावर सारखे प्रेम ही नामवंत मंडळी करत असत. तसेच शिक्षकांबद्दल सारखाच आदरभाव विद्यार्थ्यांत असायचा. कारण `सर्वांसी सुख लाभावे तशी आरोग्यसंपदा हे त्या काळात सर्वच शिक्षणसंस्थांचे ब्रीदवाक्य असायचे.

प्राचार्य बापूसाहेब कानिटकर - प्रा. मालतीबाई किर्लोस्कर


प्राचार्य बापूसाहेब कानिटकर

प्रा. मालतीबाई किर्लोस्कर यांच्या ’मधुघट’ या लेखसंग्रहातील लेख.(Ref: http://mysangli.com)

सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे भूतपूर्व प्राचार्य गो. चिं. उर्फ बापूसाहेब कानिटकर यांचा सात फेब्रुवारी हा पहिला स्मृतिदिन! पाहता पाहता त्यांना जाऊन एक वर्ष झाले. यावर माझा अजूनही विश्र्वास बसत नाही. कै. बापूसाहेबांची पत्नी ’शरयू’ ही माझी किर्लोस्करवाडीतली जीवाभावाची बालमैत्रीण! त्यामुळे कानिटकर कुटुंबाशी माझा अतिशय जिव्हाळ्याचा आणि जवळचा असा भावबंध! अर्धशतकापेक्षा अधिक काळाचा! त्यामुळेच आज हा लेख लिहिताना तीर्थरुप बापूसाहेबांच्या अनेक आठवणींनी मनात एकच गर्दी केली आहे!\

मागच्या वर्षी एक नोव्हेंबरला बापूसाहेबांना नव्वदाव्वे वर्ष लागले. त्या प्रीत्यर्थ त्यांचे अभिष्टचिंतन-अभिनंदन करावे म्हणून सकाळी जरा लवकरच मी त्यांच्या बंगल्यावर गेले. आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ मोठ्या भक्तिभावाने त्यांनी आपल्या बंगल्याचे नाव ’चंद्रमणी’ असे ठेवले होते. मी गेले तेव्हा ते नेहमीप्रमाणेच व्यवस्थित पोशाख घालून दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचीत बसले होते. मी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांच्या लख्ख, गोर्‍या आणि भव्य कपाळावर कुंकू लावले आणि दोन गुलाबाची सुंदर फुले आणि एक सुबकशी छोटी वस्तु भेट म्हणून त्यांच्या हातात दिली. त्यांनी प्रसन्नपणे हसून त्याचा स्वीकार केला.

नंतर मी त्यांना म्हटले, ’तुम्ही टेनिस खेळता हे मला माहिती आहे, क्रिकेटमध्येही खूप ’रन्स’ काढत होतात हे पण मी ऐकले आहे, आता जीवनाच्या खेळातले धावांचे शतक तुम्ही पूर्ण करणार, याबद्दल मला खात्री आहे. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा, मी आणि माझी कुटुंबीय मंडळी यांच्यातर्फे!’ त्यावर पुन्हा एकवार शांतपणे त्यांनी स्मित केलं आणि माझ्या मस्तकाला स्पर्श करुन मला आशीर्वाद दिला. पण नियतीला माझी ही प्रार्थना मान्य नसावी. कारण या घटनेला दोन महिने होतात न होतात तोच त्यांना देवाघरचे आमंत्रण आले ! तेही पहाटे पहाटेच !

समाजाला कै. बापूसाहेबांची ओळख आहे ती ते वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्रथम प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य म्हणून ! तेथून ते सेवानिवृत्त झाल्यावर बुधगावच्या वसंतदादा इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे ते प्राचार्य झाले. त्या संस्थेचा परिसर विस्तृत असा त्यांनी एकदा जातीने हिंडून आम्हा मंडळींना दाखवला होता, सर्व माहिती तपशीलवार सांगितली होती. जयसिंगपूरच्या डॊ. मगदूम इंजिनिअरिंग महाविद्यालयातही प्राचार्याचीच जबाबदारी त्यांच्यावर होती.

ते मेकॆनिकल आणि इलेक्ट्रिकल अशा दोन्ही शाखांचे उत्तम इंजिनिअर होते. बनारस, बेंगलोर अशा नामवंत शहरात राहून त्यांनी या पदव्या मिळविल्या होत्या. त्यांचे या इंजिनिअरिंग क्षेत्रातले योगदान महत्वपूर्ण व मोलाचे होते. त्यामुळे त्यांच्या सल्लामसलतीसाठी, मार्गदर्शनासाठी दूरदूरहून माणसे येत असत. बापूसाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी आलेले एक स्नेही म्हणाले, ’मालतीबाई, स्वर्गात गेल्यावरही बापूसाहेब स्वस्थ बसणार नाहीत. तिथेही ते एखादे इंजिनिअरिंग कॊलेज काढतील बघा!

बापूसाहेबांमधला जातीवंत शिक्षक सदैव जागा असायचा. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर विश्रामबागेत राहणार्‍या मुलांना (व अर्थात जवळपासच्या परिसरातल्या मुलांनाही) शिक्षणासाठी सांगली-मिरजेला जायला लागू नये, गोरगरीब मुलांची इथे जवळच सोय व्हावी म्हणून त्यांनी १९७३ च्या सुमारास काही सहकार्‍यांच्या मदतीने ’विश्रामबाग शिक्षण संस्थे’ची स्थापना केली. तिच्यामार्फत प्राथमिक-माध्यमिक शाळा सुरु केल्या. त्या शाळांतून आज पंचवीस वर्षांनंतर दोन हजारापेक्षा जास्त मुले-मुली शिकत आहेत.

भिन्न भिन्न विचारसरणीच्या तसेच स्वतंत्र मते असलेल्या लोकांना एकत्रित करुन आर्थिकदृष्ट्या अवघड असा उपक्रम राबविणे हे काम काय सोपे थोडेच असेल? पण ते त्यांनी यशस्वीरितीने पार पाडले. या संस्थेवर त्यांचे अपत्यनिर्विशेष प्रेम होते. ही शिक्षणसंस्था माझ्यामते कै. बापूसाहेबांचे चिरस्मरणीय आणि स्फूर्तिदायक असे स्मारकच म्हणायला हवे! एकूणच पाहता त्यांना शिक्षणप्रमाणेच विधायक आणि सर्जनशील अशा कामांत मनापासून रस होता.

सांगली अर्बन को-ऒप. बॆंकेचे ते संचालक होते. विविध संस्थांच्या सभांना ते न चुकता हजर राहात, चर्चेत भाग घेत, आवश्यक तेव्हा आणि आवश्यक तिथे सला देत, मार्गदर्शन करीत. आपल्या संपन्न आणि सुदीर्घकाळाच्या अनुभवांचा त्यांनी अखेरपर्यंत समाजाच्या कल्याणासाठी उपयोग केला. अशा कार्यमग्नतेमुळेच सेवानिवृत्तीनंतरचाही त्यांचा काळ समाधानात, आनंदात गेला.

            विश्रामबागेतील ज्येष्ठ नागरिकांची सभा बर्‍याचवेळा बापूसाहेबांच्या ’चंद्रमणी’ बंगल्यात भरत असे. त्या बंगल्यातल्या प्रशस्त, हवेशीर, देखण्या दिवाणखान्यात अनेक व्यवसायातील मंडळी जमून काव्यशास्त्र विनोदात रंगून जात. अशा सभांची गोडी आमच्या प्रिय शरयूने केलेल्या ओल्या नारळाच्या करंज्या, सुरळीच्या वड्या किंवा अशाच अन्य रुचकर पदार्थांनी आणखीनच वाढायची.

प्रिय शरयूप्रमाणेच (तिचे सासरचे नाव ’प्रतिभा’ आहे. पण मी तिच्या माहेरची! त्यामुळे मी तिला तिकडच्या नावानेच संबोधते) कै. बापूसाहेबांनी नियतीने देखणे, रुबाबदार व्यक्तिमत्व बहाल केले होते. त्यांची उंची बेताची व अंगलट काहीशी स्थूल होती. वर्णाने ते चांगले गोरेपान होते. भारतीय आणि पाश्चात्य दोन्हीही पोशाखात प्रथमदर्शनीच पाहणार्‍याच्या मनावर त्यांचा प्रभाव पडे. ते मितभाषी आणि शिस्तप्रिय होते. अधिकारपदस्थ माणसांना मग ते कुटुंबातले असोत की संस्थेतले असो, प्रसंगी कठोर वा उग्रही बनावे लागते. त्यामुळे त्यांचा थोडा धाक आणि दराराही वाटे. पण अंतर्यामी ते खूप हळवे होते, मृदु होते. गौरी, गुड्डू (ही मी त्यांच्या नातवंडांची ठेवलेली नावं) किंवा घरातले अन्य कोणी यांना दोन दिवस साधा थंडीवार्‍याचा ताप आला, तरी आतून ते फार अस्वस्थ असत. शरयूचे घर इंजिनिअरिंग कॊलेजात असताना तिथून परतायला मला उशीर झाला, तर ते जातीने मला घरी सोडायला येत.

मला काही लहान-मोठे वा मौल्यवन असे खरेदी करायचे असले की मी शरयूबरोबर जायची. पुष्कळदा बाजारहाट करुन यायला बराच उशीर व्हायचा. दुपारची जेवणाची वेळ टळून गेलेली असायची, तरीही बापूसाहेब शरयू आल्याशिवाय कधीही जेवायचे नाहीत. आमच्या उशिरा येण्याबद्दल ते कधी रागावलेलेही मला आठवत नाही. या गोष्टी वरवर पाहता छोट्या वा साध्या दिसतात, पण अशा छोट्याछोट्या आणि भावपूर्ण गोष्टींनीच पती-पत्नींच्या सहजीवनाचा प्रेममय, सुंदर गोफ विणला जात असतो. आयुष्यभर एकात्म मणाने, परस्परांचा आदर करीत, एकमेकांना समजावून घेत जीवन जगणारे शरयू-बापूसाहेब हे जोडपे सर्वांनाच आदरणीय वाटे. या उभयतांनी व त्यांच्या कुटुंबियांनी विश्रामबागेतल्या माझ्या ५० वर्षांच्या आयुष्यात माझ्या सर्व सुखदुःखात माझ्यावर मायेची शाल पांघरली.

जेव्हा जेव्हा आमची ’नन्नी’ (माझी आई) मला इथे भेटायला येई त्यावेळी शरयूच्या पाठीवर धप्पदिशी थाप मारुन तिला म्हणायची, ’तुम्ही दोघं, तुमचं घर इथे आहे म्हणून मालीची आम्हाला काळजी वाटत नाही हो.’

बापूसाहेबांचा दिनक्रम रेखीव असायचा! प्रातःकाळी उठून घराचे फाटक उघडून ते हौसेने दूध घेत, चहापाणी-स्नान आदी आन्हिक उरकले की नऊ-साडेनऊला व्यवस्थित नास्ता करीत, न चुकता भोजनापूर्वी नवनाथाची पोथी वाचीत व नंतर मोठ्या निगुतीने ती रेशमी रुमालात बांधून ठेवीत. देवावर त्यांची निस्सीम श्रध्दा होती. त्यांच्याकडे गणपती दीड दिवसाचा त्याची दुर्वा-सुपारी-कापूर, उदबत्ती, प्रसादापासून सर्व जय्यत तयारी शरयूने केली असली तरीही त्यांचे सर्वत्र बारीक लक्ष असे. कापर्‍या हातात पुजेचं तबक घेऊन सर्व आरती ते म्हणत. धार्मिक सणांना गडद-लाल कद नेसत. पूजाअर्चेनंतर भोजन-वामकुक्षी-चहा, शनिवारी उभयतांचा उपवास म्हणून साबुदाण्याची खिचडी खाऊन दूरदर्शनवर खेळ, बातम्या जे आवडेल ते दिवसभरात बराच वेळ पाहात. ’वालचंद’ला येण्यापूर्वी ते ’सरस्वती सिने टोन’ साऊंड इंजिनिअरचे काम पाहत. त्यामुळे व्ही. शांताराम, भालजी, सुलोचना बाई आणि अशीच कितीतरी चित्रपटसृष्टीतली मातब्बर मंडळी त्यांच्या चांगल्या परिचयाची ! त्यांचे चित्रपट, नाना आठवणी सांगत, ते आवर्जून पाहात असत.

संध्याकाळी येणार्‍या-जाणार्‍यांबरोबर माफक गप्पा, फार लांब चालवत नसे तेव्हा घरा शेजारच्या दुकानातून भाजी-ब्रेड आणणे, कधी मिरजेला शरयूसह आप्त मंडळींकडे फेरी मारणे, असा दिवस घालवून रात्री हलकेसे जेवण करुन ते झोपायचे. जेवणात ना कसली त्यांना खोड ना जीवनात कसलेही व्यसन! त्यामुळे दीर्घायुष्याचे वरदान त्यांना ईश्वराने दिले. वयोमानानुसार अधून-मधून काही तक्रारी उदभवत. पण त्यांन अतिशय सोशिकपणे व शांतपणाने ते विवेकाने तोंड देत.   

कै. बापूसाहेब-शरयू यांच्या व माझ्या घरात केवळ काही फुटांचेच अंतर आहे. त्या घरी मी कितींदा जायची. त्याला हिशेबच नाही. कारखान्याच्या डिपॊझिटचे काम असो की नारळ काढणार्‍याला किती रक्कम द्यायची हे ठरवायचे असो, बापूसाहेबांना मी सल्ला विचारत असे. कसलाही कंटाळा न करता ते मला सल्ला देत. आज ते आठवताना माझे मन त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेने भरुन येते आहे. एक-दोन दिवस माझी फेरी झाली नाही तर प्रकृती बघायला शरयूबरोबर तेही आस्थेवाईकपणे येऊन चौकशी करीत. म्हणून त्या उभयतांना विश्रामबागमधील माझे ’पालक’ असेच मी मानते.    

सुमारे वीस वर्षापूर्वीची गोष्ट! माझ्या ’पसायदान’ बंगलीचे काम अगदी शेवटच्या टप्प्यात आलेले! वास्तुशांतीची तारीख ठरुन संबंधितांना आमंत्रण पत्रे गेलेली आणि नेमक्या त्याचवेळी आमचे कॊन्ट्रॆक्टरसाहेब पूर्वसूचना न देता काश्मीरला की कुठे प्रवासाल गेलेले ! आता आली का पंचाईत! मी तरी पार गडबडून गेले. कामाचे आता काय होणार म्हणून ! त्यावेळी कै. बापूसाहेब आणि माझ्या घराचे डिझाईन करणारे सुप्रसिध्द स्टक्चरल आर्किटेक्ट आनंदराव साळुंखे माझ्या अंगणात खुर्च्या टाकून आपला बहुमोल वेळ खर्चून बसून राहिले व कामगारांकडून त्यांनी उर्वरित काम करुन घेतले. माझ्या वास्तुशांतीच्या यशात या दोघांचा वाटा सर्वात मोठा आहे, तो मी कधीच विसरणार नाही.

गरजू माणसांना मग तो नोकर असो, आप्त असो की अपरिचित निर्धन माणूस असो, बापूसाहेब आपला मदतीचा हात कसलाही गाजावाजा न करता त्यांच्यासाठी पुढे करीत. असे करताना आर्थिक फटका व कटु अनुभवाचे धनीही त्यांना कधीकधी व्हावे लागले, पण त्यामुळे त्यांनी आपले मन कडवट होऊ दिले नाही.

बापूसाहेबांच्या कर्तव्यनिष्ठेची आणि राष्टाबद्दलच्या प्रांजळ भक्तीची दोन उदाहरणे माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहेत. त्यांच्या एक वडील बहीण अविवाहित होत्या, अशक्त होत्या. त्या जन्मभर भावाजवळच राहिल्या. आठ-दहा वर्षांपुर्वीच त्या गेल्या. त्यावेळी बापूसाहेबांचे वय ऐंशीच्या घरात होते. म्हणून त्यांनी घरीच रहावे, अशी विनंती आप्तस्वकियांनी करुनही ते बहिणीच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले आणि पुढचे सर्व विधीही यथासांग केले. त्या गंगुताई अधून मधून माझ्या घरी आल्या म्हणजे म्हणायच्या, "मालूताई, माझा भाऊ कोहिनूर हिरा आहे.

" दुसरी आठवण आहे ती सुमारे ३५-४० वर्षांपुर्वीची ! सांगली-मिरज ही सर्वांना फार उपयोगी असलेली आगगाडी सरकारने तडकाफडकी बंद केली ! त्यामुळे विद्यार्थ्यांपासून व्यापार्‍यांपर्यंत सर्वांनाच फार गैरसोय सोसावी लागली. ती गाडी पुन्हा सुरु व्हावी म्हणून अनेक नामवंत प्रतिष्ठीत नागरिक खटपट करीत होते, पण सरकारच्या आडमुठेपणापुढे कुणाचे काय चालणार? ती खटपट करणार्‍या लोकांना काही महत्वाचे नकाशे तातडीने करुन हवे होते, हातात फार थोडा वेळ असूनही बापूसाहेबांनी ते नकाशाचे काम तत्परतेने करवून घेतले आणि संबंधितांकडे सर्व साहित्य पोहोचविले. एखाद्या कामाची आवश्यकता व निकड त्यांना पटली म्हणजे ते काम होईपर्यंत बापूसाहेबांना चैन पडत नसे. हा गुण आज एकूण दुर्मिळच झालाय.

बापूसाहेब तसे हौशीही होते. त्यांच्या इंजिनिअरिंग कॊलेजात नवीन कसले यंत्र की काय आणले होते. त्यावर छान आईस्क्रिम होई. एक दिवस त्यांच्या सांगण्यावरुन मी दूध+आंबा+साखर आदी मिश्रण करुन त्यांच्याकडे पाठवले तर काय गंमत! अर्ध्या-पाऊण तासांत रुचकर सुवासिक आईस्क्रिम घेऊन त्यांचा नोकर माझ्या दारात उभा! आनंदाची देवघेव करण्याची ही त्यांची वृत्ती मला खूपच काही शिकवून गेली.

बापूसाहेब हिंदू धर्म, संस्कृती, इतिहास, परंपरा यांचे गाढे अभिमानी होते. आपल्या पडत्या काळात ज्यांनी आपल्याला मदत केली, अशी आपली दिल्लीस राहणारी मोठी बहीण व मेहुणे यांना ते फार मानीत. नाशिक हे त्यांचे मूळ गाव. तिथल्या आठवणी ते खूप सांगत. देशाच्या सध्याच्या दुरवस्थेचे त्यांना अतिशय दुःख वाटे. पण आपण वयाच्या अशा टप्प्यात आहोत की ती स्थिती बदलण्याच्या दृष्टीने फारसे काही आपल्याला करता येत नाही, हे जाणून ते ती उद्विगता गिळून टाकत.

बापूसाहेबांच्या या जीवनचित्रांत प्रिय शरयूचे स्थान महत्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती सर्वार्थाने त्यांची नमुनेदार सहचारिणी होती. संसारात तिच्या वाट्याला आलेल्या सर्व जबाबदार्‍या तिने समर्थपणे पार पाडल्या. तीही मितभाषी, शांत, सोशिक आहे. कष्टाळू, समंजस आहे. अनेक खेळांत पटाईत आहे. तशीच हाडाची कलावंतही आहे. भाज्या आणि फळे यांचे सुंदर देखावे बनविण्याचे तिने महिला मंडळात सांगलीत एकदा सुरेख प्रात्यक्षिक करुन दाखविले होते. ते मला चांगले आठवते. नाटकांत ती छान काम करते. हिंदीच्या परीक्षाही तिने दिल्या आहेत, सुगरण तर ती आहेच, विणकाम-शिवणकाम म्हणजे तिचा जणू श्वासोच्छवासच आहे.

इंजिनिअरिंग कॊलेजच्या महिला मंडळात चैत्रागौरीच्या हळदीकुंकवाचा थाट मोठा बहारीचा असे. वर्तमानकालीन सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांवर एखादा शोभिवंत देखावा तिथल्या भगिनी उभा करीत. एकजुटीने व तळमळीने करीत. त्यात या प्रतिभाताई कानिटकरांचा सहभाग, सल्ला भरपूर असे. बापूसाहेबांना आपल्या कलावंत पत्नीच्या गुणांचे कौतुक होते. त्या देखाव्यासाठी लागणार्‍या लहानमोठ्या कितीतरी गोष्टी ते हौसेने कॊलेजमार्फत करुन देत. बापूसाहेबांच्या सुखी सहजीवनात शरयूचा वाटा मोठा आहे, असे मी म्हणते ते काय उगीच? संसाराची धुरा तिने जवळजवळ ६०-६५ वर्षे सांभाळल्याने बापूसाहेबांना इतर कामांसाठी वेळ मिळाला! त्यांच्या जाण्याने ती बरीच एकाकी झाली हे खरे, पण ते एकाकीपण आजही काहींना काही कामात, वाचनात, मन गुंतवून ती सह्य करुन घेते!

बापूसाहेबांनी कृतार्थ मनाने जीवनाचा निरोप घेतला, आपल्या कर्तृत्वाने शैक्षणिक जगात ते नामवंत झाले. सौ. प्रिय शरयूसारखी सद्गुणी, विवेकी पत्नी त्यांना लाभली. डॊ. सौ. शशिकला, इंजिनिअर सौ. नीलप्रभा, एम. ए. झालेली सौ. वासंती यांना अनुरुप सहचर लाभले. मुला-मुलींचे संसार बहरले-फुलले, नातवंडे-परतवंडे पाहिल्याने सोन्याची फुले उधळून घेण्याचे भाग्य त्यांना मिळाले.

धाकटा कुशाग्र बुध्दीचा सुपुत्र श्रीराम कानिटकर आज डिप्लोमा इंजिनिअरिंग कॊलेजाचा प्राचार्य झाला आहे. सून डॊ. सौ. संपदा कर्तबगार व कुशल दंतवैद्य म्हणून महाराष्ट्राबाहेरही गाजते आहे. मोठी सून डॊ. सौ. हेमा दामले समाजशास्त्राची डॊक्टर आहे, प्राध्यापिका आहे. नातवंडे-परतवंडे घराण्याच्या सत्किर्तीत खूप भर घालताहेत. या सार्‍यांचा लौकिक ऐकत, त्यांना आशीर्वाद देत, कुणाचीही सेवा न घेता बापूसाहेबांनी देवाघराकडचे प्रस्थान ठेवले. असे भाग्य कितीजणांच्या वाट्याला येते? या सुंदर जीवनचित्रावर नियतीने एक भलामोठा खिळा ठोकला होता तो बापूसाहेबांचा सर्वात हुशार इंजिनिअर मुलगा अरविंद याच्या अकाली मृत्युचा! पण हा वज्राघात बापूसाहेब-शरयूंनी फार विवेकाने-धीराने सोसला! असे त्या उभयतांबद्दल किती लिहावे !

 जगद्विख्यात नाटककार शेक्सपिअरनं जगाला रंगभूमीची यथोचित उपमा दिली आहे. कै. बापूसाहेबांनी आपल्या वाटयाला आलेल्या सर्व भूमिका सुविहीतपणे पार पाडल्या. त्यांना आज पुन्हा माझे एकवार नम्र अभिवादन !

सांगलीची तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती -इतिहास - प्रा. एच. यु. कुलकर्णी


सांगली हे छोटेसे संस्थान. पटवर्धन हे येथील राजे. पटवर्धन राजेसाहेबांनी संस्थानातील जनतेला सर्वतोपरी सहाय्य केले. संस्थानाची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून राजेसाहेबांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. १९०८ साली चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन हे अज्ञान असल्यामुळे इंग्रज सरकारने बर्क या युरोपियन अधिकार्‍या ला प्रशासक म्हणून नियुक्त केले. चिंतामणराव सज्ञान होईपर्यंत त्यांनी संस्थानचा कार्यभार सांभाळला.

बर्कसाहेब प्रशासक असताना राजेसाहेब हे राजवाड्यात रहात असत. त्यावेळी राजवाडयाची कमान नव्हती. सध्याचे जिल्हाधिकारी कार्यालय हे राजेसाहेबांच्या दिवाणांचे कार्यालय म्हणून वापरले जात होते. राजवाड्याची कमान, त्याला लागून असलेली कोर्टाची इमारत व दगडी बांधकामातील इमारती या बर्कसाहेबांच्या कारकीर्दीत झाल्या. त्यावेळी सांगलीमध्ये अभियंते नव्हते. पण कंत्राटी पध्दतीने काम करणारे बाबू शेट्टी वडर हे संस्थानातील मोठे कंत्राटदार होते. त्याचबरोबर नरसिंगराव माळी नावाचे आणखी एक कंत्राटदार काम करीत होते. त्यावेळी त्यांनी बांधलेल्या दगडी इमारती आजही त्याच डौलाने उभ्या आहेत.

या कंत्राटदारांना बांधकामासाठी जे मार्गदर्शन हवे असे, त्याठी राजेसाहेब मुंबईच्या गॅरिसन व बॅटली या दोन युरोपियन अभियंत्यांना बोलावीत असत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राजवाड्यासमोरील सांगली बँकेची इमारत कंत्राटदार साने यांनी बांधली. गणपती मंदिराचा सभामंडप मुंबईच्या मराठे, कुलकर्णी या वास्तुविशारदांच्या मार्गदर्शनाखाली झाला. गणपती मंदिराच्या महाद्वाराच्या डिझाईनसाठी दिल्लीचे प्रसिध्द वास्तुविशारद रानडे यांना बोलावले होते. त्यांचेच मार्गदर्शनाखाली महाद्वाराचे काम झाले.

१९३०-३५ च्या सुमारास श्री. भवरीलाल लड्डा यांनी बालाजी मिल सुरू केली. एक मजूर म्हणून काम करीत असलेल्या श्री. दादासाहेब वेलणकर यांनी त्याच सुमारास गजानन मिल सुरू केली आणि नावारुपास आणली. हजारो कामगारांना काम देणार्‍या या दादासाहेबांना लोक धनी वेलणकर या नांवाने संबोधू लागले.

१९१४ पूर्वी सांगली - मिरज कोल्हापूर अशी मीटर गेज रेल्वे सुरू होती. १९२२ च्या सुमारास पुण्याच्या व्ही. आर्. रानडे अँड सन्स या कंपनीने कृष्णा नदीवर पूल बांधला. या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी त्यावेळचे व्हॉइसरॉय आयर्विन हे आले होते. त्यांचेच नांव पुलाला देण्यात आले.

सांगलीला पाणी पुरवठ्यासाठी कृष्णा नदीच्या पात्रात जमिनीखाली पाच ते सहा फूट उंचीची व शंभर ते दीडशे फूट लांबीची गॅलरी बांधली होती व या गॅलरीला उतार होता. गॅलरीतील झिरपलेले पाणी नळावाटे एका विहिरीत जमा होई. हे पाणी साठविण्यासाठी दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाशेजारी एक मोठी लोखंडी टाकी बांधलेली आहे. या टाकीत हे पाणी चढवावे लागे. त्यावेळी बॉयलरचा उपयोग करुन त्याच्या वाफेने पंप सुरू करीत व टाकीतील पाणी नळाने सांगलीत पुरविले जाई.

कारखानदारीच्या क्षेत्रात कै. दादुकाका भिडे आणि त्यांचे बंधू रामभाऊ भिडे हे अग्रेसर होते. रामभाऊ भिडे, हे स्वत: इंजिनिअर नसले तरी त्यांना इंजिनिअरिंगचे उपजत ज्ञान होते. त्यांनी त्यावेळी एक रोडरोलर तयार केला होता. पण या रोडरोलरला त्यावेळच्या शासनाने परवानगी न दिल्याने, तो रोडरोलर रस्त्यावर येऊ शकला नाही. हाच कारखाना पुढे रघुनाथराव व त्यांचे चिरंजीव समर्थपणे चालवीत आहेत. सांगलीबरोबर पुणे येथेही कारखाना उभारून दैदिप्यमान प्रगती केली आहे. त्यावेळचे आणखी एक प्रमुख कररखानदार म्हणजे दांडेकर बंधू. कै. बाबुराव दांडेकर यांनी अविरत परिश्रमाने हा कारखाना पुढे आणला व आज त्यांचे चिरंजीव या कारखान्याची धुरा कुशलतेने सांभाळीत आहेत.


स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये कै. बाळासाहेब पालकर या पदवीधर अभियंत्याने १९३५ च्या सुमारास येथे कामाला सुरुवात केली. धोतर, कोट व काळी टोपी या पेहेरावातच ते बांधकाम कंत्राटदारांना मार्गदर्शन करीत. त्यांचे काम अगदी चोख असे. त्यांच्या ३५-४० वर्षांच्या कारकिर्दीबद्दल सांगलीकर जनता समाधानी होती व आजही त्यांचेबद्दल आदराने बोलले जाते.

१९४५ च्या सुमारास श्री. के. डी. नरगुंदे हे बडोद्याहून वास्तुविशारदाची पदविका घेऊन सांगलीला आले. त्यांचे वडील राजेसाहेबांचे दिवाण असल्याने नरगुंदे सांगलीला परिचित होतेच. त्यांनी आपल्या कौशल्याने पालकरांचेबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी व्यवसायात आपले स्थान निर्माण केले. १९४७ साली विश्रामबाग येथे न्यू इंजिंनिअरिंग कॉलेज ( आताचे वालचंद कॉलेज ऑफ इंजिंनिअरिंग ) स्थापन झाल्यावर वास्तुशास्त्रविशारद म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू लागले. सिटी हायस्कूल, पुरोहित कन्याशाळा, पुतळाबेन कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली जिल्हा नगरवाचनालय, अर्बन बँक अशा कितीतरी सार्वजनिक इमारती बांधण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.

१९४७ साली पुण्याच्या महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीने विश्रामबाग येथे \'न्यू इंजिंनिअरिंग कॉलेज \'सुरू केले. त्यावेळी फक्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखा होती व त्यांत प्रथम वर्षाला १७० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाई. १९५५ ला वालचंद ट्रस्टने देणगी दिली आणि या कॉलेजचे नाव वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असे झाले.

१९५५ पासून पदवीच्या यांत्रिकी व विद्युत अशा दोन शाखा सुरू झाल्या. अल्पावधीतच या महाविद्यालयाने नांव कमावले व सर्व शाखांतील उत्तमोत्तम अभियंते सांगलीला, महाराष्ट्राला आणि भारतालाही मिळवून दिले. काही अभियंत्यांनी सांगलीतच अभियांत्रिकी व्यवसायात पदार्पण केले. श्री. प्रवीणभाई परीख, एम्. पी. कोठारी (बाबा कोठारी), जगन्नाथ उपरे, सी. टी. साने हे त्यापैकी प्रमुख अभियंते होते. इतर काही स्थापत्य अभियंते वास्तुशास्त्रविशारद म्हणूनही काम करीत होते. वास्तुशास्त्रातील पदवी व पदविका घेऊन कांही तरुणांनी सांगलीत व्यवसाय करावयास सुरुवात केली. त्यानंतर वास्तुशास्त्रविशारद, स्थापत्य अभियंते, स्ट्र्क्चरल डिझायनर्स व कंत्राटदार अशा चारही क्षेत्रातील व्यक्तींनी अभियांत्रिकी कामाचा दर्जा उंचावला.


सांगलीस अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होऊन २५ वर्षे होऊन गेली व सर्व शाखांतील अनेक अभियंते व वास्तुविशारद सांगलीत काम करीत होते. या सर्वांना एकत्र आणून काही भरीव कार्य करावे या उद्देशाने ज्येष्ठ अभियंते कै. प्रवीणभाई परीख व कै. श्री. कोठारी यांच्या प्रयत्नांतून १९७८ साली \'इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट्स् असोसिएशन\' अशी संस्था सांगली जिल्ह्यासाठी स्थापन झाली. अल्पावधीतच या संस्थेने चाळीस हजार चौ. फूट जागेत चार हजार चौ. फुटांचा प्रशस्त हॉल बांधला. १९९३ पासून या हॉलमध्ये इंजिनिअरिंगवरची चर्चासत्रे होत आहेत.


सांगलीमध्ये बरेच वास्तुविशारद काम करीत असले तरीसुध्दा सांगलीच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित येऊन कांही सूचना करणे त्यांना आवश्यक वाटू लागले.


श्री. विवेक देशपांडे, श्रीकांत गोरे यांनी सर्व वास्तुशास्त्रविशारदांना एकत्र करून \'इंडियन इंन्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर\' या संस्थेची एक शाखा सांगलीत सुरू केली. १९९१ पासून पहिली चार वर्षे श्री विवेक देशपांडे हे अध्यक्ष होते. त्यानंतर श्री. श्रीकांत गोरे यांनी चार वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सध्या श्री. प्रमोद चौगुले हे उत्साही वास्तुशास्त्रविशारद अध्यक्ष आहेत. या संस्थेचे आज ३५ आजीव सदस्य असून त्यामध्ये श्री. विवेक देशपांडे, टी. डी. गाडगीळ, श्रीकांत गोरे, प्रमोद परीख, आनंद साळुंखे, रवी पटवर्धन, प्रकाश जगताप, श्रीराम कुलकर्णी, माणिक हिरेमठ, तायवाडे पाटील वगैरे प्रमुख मंडळी आहेत. या वास्तुविशारदांच्या मार्गदर्शनाखाली बांधलेल्या कांही प्रमुख इमारतींमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद कार्यालय, सांगली जिल्हा नगर वाचनालय, भूविकास बँक, खरे मंगल कार्यालय, कच्छी समाजसेवा कार्यालय, राजमती भवन, बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी, आर्किटेक्चर कॉलेज आदि आयुर्वेदिक कॉलेज यांचा समावेश करावा लागेल.

सांगली मिरज परिसरात १९९३-९४ च्या सुमारास इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्सची सांगली शाखा आणि पद्मभूषण वसंतदादा ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून आप्पासाहेब बिरनाळे आर्किटेक्चर कॉलेज सुरू झाले. सांगलीच्या सर्व वास्तुशास्त्र विशारदांनी या महाविद्यालयाला सर्वतोपरी सहकार्य दिले. श्री. राजेंद्र लाकुले हे पहिले प्राचार्य. त्यानंतर नंदिनी देशपांडे, माधव जोशी यांनी प्राचार्यपदाची धुरा सांभाळली. सध्या श्री. सांबरेकर हे प्राचार्यपदाचे काम पहात आहेत. या महाविद्यालयात प्रथमवर्षाला फक्त २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो.


सांगलीमध्ये सामान्य नागरिकांना प्लॉट घेऊन घर बांधणे अशक्य झाल्याने याठिकाणी ओनरशिप फ्लॅट सिस्टिम सुरू झाली आणि काही बिल्डर्स अशा प्रकारच्या इमारती बांधू लागले. नागरिकांचा प्रतिसाद पाहून आणखी काही काँट्न्क्टर्स या व्यवसायात उतरले. या सर्वांनी ऑल इंडिया बिल्डर्स असोसिएशन या संस्थेची एक शाखा १९८९ साली सांगलीमध्ये सुरू केली. आणि सर्व बिल्डर्स या संस्थेचे या संस्थेचे सभासद झाले. आज या संस्थेचे ११० सभासद आहेत. या सभासदांना त्यांच्या व्यवसायात काही सवलती शासनाकडून मिळतात. बिल्डर्स असोसिएशनची शाखा सांगलीमध्ये सुरू करण्यात श्री. एम्. डी. भाटे यांचा सिंहाचा वाटा होता. पहिली चार वर्षे ते या संस्थेचे अध्यक्ष होते. पुढे श्री. विकास कुलकर्णी, एस्. बी. पाटील, अनिल कोकितकर, कुमार मेहता, अनिल बाफना, मोहन अंबोळे, एस्. एफ्. चौगुले यांनी या संस्थेची धुरा सांभाळली.


या संस्थेने सांगली नगरपालिकेकडून २०००० चौ. फूट जागा घेऊन १९९५ साली त्यामध्ये २००० चौ. फूटाची इमारत बांधली आहे. सर्व बिल्डर्स व कंत्राटदार यांच्या सहकार्यातून ही इमारत उभी राहिली. काही प्रमुख बिल्डर्स व कंत्राटदार यांची नावे डोळयापुढे येतात, ती अशी ..


१) भाटे बिल्डर्स २) एस्. पी. कौलगुड ३) जिजा कंस्ट्रक्शन ४) वालचंद कंस्ट्रक्शन ५) मोहिते अँड सन्स ६) मोहन अंबोळे ७) मेहता असोशिएटस् ८) जे. बी. शिंदे कंस्ट्रक्शन ९) शहा कंस्ट्रक्शन.


केवळ बिल्डर्स असणार्‍यांमध्ये कोटिभास्कर अँड असोशिएटस्, कोकितकर ब्रदर्स, व्यंकटेश्वर कंस्ट्रक्शन व के. के. शहा कंस्ट्रक्शन यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील. कंत्राटदारांनी बांधलेल्या प्रमुख व भव्य इमारतींमध्ये भारती विद्यापीठ, टेलिफोन भवन, उद्योग भवन, सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल यांचा समावेश करावा लागेल.

---लेखक -  'प्रा. एच्. यु. कुलकर्णी'

प्रज्ञा प्रबोधिनीचे शिल्पकार गुरुवर्य नामजोशी सर

नामजोशी सरांचा जन्म २६ डिसेंबर १९१७ रोजी तासगावला झाला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही हे काही आप्तेष्टांच्या मदतीने मुंबई विद्यापीठाच्या तत्कालीन मॅट्रिक परीक्षेत १९३६ मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. घरच्या बिकट परिस्थितीमुळे उच्चशिक्षणाकडे पाठ वळवून नामजोशी सरांना नोकरी करावी लागली. त्यांनी शिकवण्या केल्या. नाईट स्कूलमध्ये शिकवले.

शालेय शिक्षणापासूनच त्यांना कुशाग्र, बुद्धिमत्ता यामुळे ते एक विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले. हे करीत असताना शिक्षकी पेशात कायम राहण्यासाठी ते एस्टीसी झाले. त्यांना पदवी घेण्याची इच्छा असूनही घरच्या जबाबदारीमचळे प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी १९६४ साल उजाडले. शिक्षकी पेशात आवश्यक असलेली बी.एड्. पदवी त्यांनी १९६६ मध्ये मिळवली. १९७५ साली सर सिटी हायस्कूल मधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले.

त्यांनी ३८ वर्षे शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केली. रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी सावरकर प्रतिष्ठानची स्थापना केली. सावरकर प्रतिष्ठानमध्ये १९८४ साली प्रथम बालवाडी सुरु केली. त्यानंतर एक एक इयत्ता वाढवीत १० वीची पहिली बॅच बाहेर पडली. पतंगराव कदम आणि सगरे यांच्या मदतीने हायस्कूलला परावानगी मिळवली. नामजोशी सरांनी राष्ट्रीय गुणवत्ता परीक्षेची तयारी करुन घेण्यासाठी १९८० मध्ये वर्ग सुरु केले.

१९८१ मध्ये दहा विद्यार्थ्यांची पहिली तुकडी परीक्षेस बसली. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने पास झाल्यामुळे मुलाखतीसाठी निमंत्रण आले. त्यातील दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. बारा वर्षात एकूण ३८ विद्यार्थी राष्ट्रीय गुणवत्ता मिळवू शकले. या ३८ विद्यार्थ्यात १० विद्यार्थी मागासवर्गीय आहेत.
नामजोशी सरांचे पुढील प्रमाणे गौरव केले गेले.
  • पटवर्धन हायस्कूल, तासगांव शाळेतर्फे सत्कार
  • दामुआण्णा केळकर समितीतर्फे सत्कार
  • सांगली शिक्षण संस्थेचे मान्यतापत्र
  • कृष्णा व्हॅलीतर्फे सत्कार
  • दक्षिण महाराष्ट्र दै. केसरीतर्फे सत्कार

नामजोशी सरांनी दोन पुस्तके लिहिली आहेत.
  • सुविचार संग्रह व सदाचार संहिता.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान संचलित प्रज्ञा प्रबोधिनी बालवाडी ते आय्. ए. एस्. शिक्षण संस्था विश्रामबाग, सांगली. राष्ट्रीय स्तराच्या व प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांसाठी मानवतायुक्त शैक्षणिक गुणवत्ता.
'

Saturday, June 27, 2020

श्री. गजानन वीव्हिंग मिल्स, सांगली - इतिहास


श्री. गजानन वीव्हिंग मिल्सची स्थापना १९०८ साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या प्रेरणेने झाली. लो. टिळकांनी सर्व राष्ट्नला स्वदेशीची हाक दिली. निदान अन्न व वस्त्र याबाबत तरी आपण स्वावलंबी झाले पाहिजे या हाकेला प्रतिसाद देऊन उद्योगरत्न धनी वि. रा. तथा दादासाहेब वेलणकर यांनी या मिलची स्थापना केली. दादासाहेब त्यावेळी ज्यु. इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होते. त्यांनी स्कूल सोडले व ते बडोद्याच्या कलाभुवनमध्ये हजर झाले. तेथील अभ्यासक्रम संपवून ते कलकत्त्याला गेले. तेथे त्यांनी वीव्हिंगची कला आत्मसात केली.

१९०८ साली लिंबाला स्वत:च्या राहत्या घरी त्यांनी हातमागाचा कारखाना सुरू केला. व्यापारी ज्ञानाच्या अभावामुळे त्यांचा हा कारखाना बुडाला. हातमागात आपण यशस्वी होणार नाही हे ओळखून, बाजाराची गरज लक्षात घेऊन १९०८ ते १९१२ सालापर्यंत त्यांनी यंत्रमागाचे सर्व शिक्षण आत्मसात केले. १९१२ मध्ये त्यांनी पुण्याला अॅग्र`ीकल्चरल कॉलेजजवळ श्री. भट यांच्या सोप्यात यंत्रमागाचा कारखाना सुरू केला. पण १९१४ साली पहिले महायुद्ध सुरू झाले. क्रेडिट स्प्मिमुळे भट सावकार पैसे परत मागू लागले. त्यावेळी मदतीसाठी ती. दादासाहेबांनी सांगलीच्या राजेसाहेबांकडे धाव घेतली. सांगलीला कारखाना आणायच्या अटीवर राजेसाहेबांनी मदत मान्य केली. अशाप्रकारे १९१४ साली या कारखान्याने सांगलीत पदार्पण केले.

 या कारखान्यात महाराष्ट्र पद्धतीच्या साड्या व लुगडी बनू लागली. डब्लिंगचे मर्सराइज्ड व जर्मन इंडार्थीन कलर वापरून रंगीत फॅशनेबल साड्या सांगलीत तयार होऊ लागल्या. उत्तम किनारी, भरदार पदर , व रास्ता, झेब्रा, चौकडा वगैरे अंगभरणीच्या साडया लोकप्रिय झाल्या. लांबी-रूंदीची खात्री, फॅशनेबल हलके सुंदर रंग व मनमोहक किनारी यामुळे बेंगलोरपासून इंदौरपर्यत या मालाला मागणी येऊ लागली. आंतरप्रांतीय कीर्ति मिळवून व प्रगतीचा हिमालय उभा करून हा सांगलीतील पहिला यशस्वी कारखाना सर्व भारतभर प्रसिद्ध झाला. श्री. गजानन मिल्सचे नाव सर्वतोमुखी झाले.

 तीन मागांचे तीनशे माग झाले. आठ हजार स्पिंडल्स सुरू झाल्या. १९४० पासून हा कारखाना सुताच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. ग्राहकांच्या कृपेमुळे हा एवढा मोठा प्रकल्प यशस्वी झाला.

ऑगस्ट १९३५ मध्ये दादासाहेब जपानला गेले. तेथून आर्टिफिेशयल सिल्क विणणारे माग व मागाच्या संदर्भातील यंत्रे आणून जोडली. १९३६ साली वल्कली (आर्टिफिेशयल सिल्क) कापडाचा कारखाना सुरू केला व परदेशातून आवक होणार्‍या कापडास प्रतिबंध करणयाचा प्रयत्न केला.

 या समाजाचे उपकार फेडावे या उद्देशाने १९ जानेवारी १९४७ या दिवशी उद्योगरत्न दादासाहेबांनी स्वत:ची सुवर्णतुला करून त्या सोन्याच्या रकमेचा दानधर्म केला. त्यातून तीन ट्न्स्ट निर्माण केले. या ट्न्स्टमधून दरसाल दोन लाख रूपयांचा दानधर्म होतो.

हा कारखाना १९४८ साली गांधीहत्येनंतर झालेल्या जनक्षोभाला बळी पडला. त्यात सर्वस्वाचे नुकसान झाले. संपत्ती, कीर्ति व तपश्चर्या या सर्वांची राख झाली. तथापि दादासाहेबांनी अलोट धैर्याने पुन्हा कामाला सुरूवात केली. अग्निप्रलयातून सावरून हा कारखाना लोकसेवेचे कार्य पुन्हा त्याच उमेदीने व जोमाने करू लागला.

७ नोव्हेंबर १९५३ रोजी श्री. गजानन मिलची संपूर्ण मालकी दादासाहेबांनी रामसाहेबांच्या ताब्यात दिली. १९५४ मध्ये पॉवरलुम्सच्या साड्यांच्या उत्पादनावर सरकारने बंदी घातली. त्यामुळे परिश्रमपूर्वक बसविलेले साड्यांचे उत्पादन बंद करावे लागले व साड्यांचे मार्केट सोडावे लागले. अशा अवघड परिस्थितीतून प्रयत्नांची पराकाष्ठा करून रामसाहेबांनी हळूहळू धोतरनिर्मितीच्या धंद्यात पदार्पण केले. अचूक व्यवस्थापन कौशल्य व दूरदृष्टी ठेवून केलेल्या नियोजनाने मा. रामसाहेबांनी मजबूत अशी व्यावसायिक व आर्थिक बळकटी आणली.

१९५३ पासून अत्यंत कठोर परिश्रमाने व जबरदस्त इच्छाशक्तीने आजच्या गजानन मिलचे टिकाऊ वस्त्र रामसाहेबांनी निर्माण केले. आजही या कारखान्याचे उत्पादन बाजारपेठेत नावाजले जाते.

अक्षरपत्रे - ज्ञानदीपचा नवा उपक्रम

स्वहस्ताक्षरात लिहिलेले पत्र आजकाळ दुर्मिळ झाले आहे. या पत्रात अक्षरांबरोबर चित्रेही काढता येतात व पत्र सजविता येते. अक्षर लेखनाचीही सवय होते. पण यापेक्षाही एक मोठा फायदा म्हणजे अशा स्वलिखित पत्रात मजकुराबरोबरच लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटलेला असतो. व त्यामुळे असे पत्र हा एक जतन करण्यासारखा ठेवा बनतो.



साध्या कार्डावर वा कागदावर लिहिलेली पत्रे स्कॅन करून प्रसिद्ध करण्याचे ज्ञानदीपने ठरविले आहे. त्यास वाचक प्रतिसाद देतील अशी आशा आहे. ज्यांना कॉम्प्युटरवर टाईप करण्यास येत नाही वा स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिण्याची सवय आहे अशा सर्वांसाठी आपले विचार व्यक्त करण्यासाठी हे सदर ज्ञानदीपच्या मायमराठी, मायमांगली, मायकोल्हापूर, विज्ञान, स्कूल फॉर ऑल, आणि संस्कृतदीपिका या वेबसाईटवर सुरू करण्यात येणार आहे.

आपल्या पत्रात मायना वगळून फक्त मजकूर शीर्षकासह द्यावा व आपले नाव लिहून पत्र पोष्टाने, प्रत्यक्ष वा स्कॅन करून ज्ञानदीपकडे पाठवावे. पत्राच्या मागल्या बाजूस आपली सही व पूर्ण पत्ता द्यावा. विषयानुसार व विषयाच्या व्याप्तीनुसार अशी पत्रे ज्ञानदीपच्या योग्य त्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येतील.

सूचना-
१. पत्राचा मजकूर जास्तीत जास्त वीस ओळी व एकाच पानावर एकाच बाजूस असावा. पत्रासाठी पोस्टकार्ड वा पांढरा कागद वापरावा
२. सुविचार, कथा, कविता, अभिप्राय, विधायक सूचना व माहितीपर पत्रांना प्रसिद्धीसाठी प्राधान्य दिले जाईल.
३. व्यक्तिगत टीका, प्रचार वा जाहिरातविषयक पत्रे प्रसिद्ध करण्यात येणार नाहीत. पत्रात लिहिलेल्या मजकुराच्या सत्यतेविषयी वा व्यक्त केलेल्या मताविषयी व यासंदर्भातील कोणत्याही कायदेशीर बाबीविषयी पत्रलेखक सर्वस्वी जबाबदार राहील व ज्ञानदीपचा त्यात काहीही संबंध नाही याची लेखकाने नोंद घ्यावी.
४. पत्र प्रसिद्ध करण्याचा वा त्याच्या प्रसिद्धी कालावधीचा अधिकार ज्ञानदीपकडे राहील.


आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण आणि भारतीय समाज

गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा काही घटना घडल्या की त्यामुळे भारतातील राजकीय व सामाजिक संस्था यांच्या भूमिका, नेत्यांचे बोलणे आणि करणे यांचा विलक्षण गोंधळ झाला.  कोरोनाचे सा-या जगावर आक्रमण, अमेरिकेतील वर्णद्वेषाची घटना, एच वन बी व्हिसा बंदी, चीनची सीमेवर घुसखोरी आणि आपल्या शूर सैनिकांचे बलिदान या एका पाठोपाठ येणा-या बातम्यांमुळे एरवी शांत सामंजस्याने व्यवहार करणारा भारतीय समाज खवळून उठला.

चीनवर बहिष्कार टाकून चिनी वस्तू वापरणे बंद करा, चीनचे भारतात चालणारे व येऊ घातलेले फार मोठ्या गुंतवणुकीचे प्रकल्प रद्द करा. अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्या व त्यांच्यामार्फत भारतात येणारी यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान व ग्राहकोपयोगी सामानाची आयात बंद करा अशी आग्रहाची मागणी सत्ताधारी व विरोधक दोन्ही पक्षांतील राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून शासनाकडे करण्यात आली.

मात्र भारताच्या केंद्र व राज्य सरकारांनी याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यास  स्पष्टपणे न सांगता चालढकल करण्याचे धोरण अवलंबले. सर्वसामान्य जनतेला या नाकर्तेपणाची मनस्वी चीड आली. आपल्याच पक्षाचे सरकार असूनही सत्ताधारी आपले ऐकत नाहीत अशी भावना निर्माण झाली.

मात्र शासनाने असे का केले याबाबत मात्र फारसे कोणी बोलले नाही वा त्यांच्या या धीमेपणाने गोष्टी हाताळण्याच्या मागील कारणपरंपरा जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.

भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक हितसंबंध गुंतलेले असतात. आयात बंद केली तर निर्यातीला धक्का पोहोचतो. प्रकल्प रद्द केले तर विकास थांबतोच शिवाय कमी खर्चात प्रकल्प करण्याऐवजी मोठ्या पर्यायी परदेय़ी प्रकल्पाची निवड करावी लागते व त्यात मोठा तोटा होतो. सत्तेचा समतोल आपल्या बाजूने राहण्यासाठी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने  कोणत्याही परकीय राष्ट्राबाबत एकाच वेळी शत्रू व मित्र असे दोन्ही संबंध ठेवावे लागतात.

अमेरिकेने स्थानिक लोकांचा निवडणुकीत पाठिंबा मिळविण्यासाठी घाईघाईने जे निर्णय घेतले त्याची जबर किंमत त्या देशाला भविष्यकाळात चुकवावी लागणार आहे.

मी आपले राज्य वा केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन करीत नाही. तर केवळ असे निर्णय घेण्याची कारणे, देशाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील स्थान, देशातील उद्योगांना लागणारी सुट्या मालाच्या आयातीची गरज आणि भविष्यातील आर्थिक लाभ व विकास गती कायम राखण्याची गरज यावर अवलंबून असतात. हे सर्वांनी समजून घ्यावे व समाजस्वास्थ्य नष्ट करण्याच्या वा दुही पाडण्याच्या आंदोनांपासून दूर रहावे यासाठी माझे हे विचार आपणापुढे मांडत आहे.

Friday, June 26, 2020

Dnyandeep Foundation - Free Forum for Indian Professionals

FREE FORUM FOR ALL

The idea of inviting professionals to join Dnyandeep Foundation is not intended to have supremacy over their expertise, experience or reputation. It is only a humble attempt to provide an open platform for interaction and information exchange to those, who are interested in forming collaborations and working with like minded people for education, research and consultancy activities with a goal to strengthen India.

There are many professional bodies and associations of professionals like Institution of Engineers, CII, ISTE which are speifically reserved for certain categories. There are international communication forums like LinkedIn, Facebook, Twitter and many mighty platforms providing all services from entertainment, education and business marketing. All these platforms are based on some business model with financial returns in some form to hosting organisation.

If you visit Dnyandeep Foundation Associations, you will find many top industrialists, Professors, Consultants have joined Dnyandeep Foundation. There is an additional facility to write blogs about your activities concerning to Dnyandeep Foundation objectives. Only restriction is that Free members have to send the articles by mail for publication. 

Paid Membership is Optional

Dnyandeep Foundation does have membership option to join the activities under the hood of Dnyandeep Foundation by taking advantage of priviledges to get portfolio support for needy but the free plan is for all to use without any obligation to link or report to Dnyandeep Foundation about their projects or activities.



Dnyandeep Foundation has a focus on developing educational resources in Marathi medium for schools and colleges and has launched many websites and developed Andrid and IPhone apps. It would welcome if any professional or organisation is willing to participate as member of the foundation.  They can use the site and post their blogs as author. However, it is totally optional.

Dnyandeep Foundation is working in close association with its parent company Dnyandeep Infotech Pvt. Ltd. which has expertise and experience in handling IT and Green Technology Consultancy Projects.

Why Open Forum?

Dnyandeep Foundation has ventured to open such platform feeling the need to provide a common, open and free platform for fresh graduates, individual professionals and Indian industries who need to spread word about their activities to society.

The focus is on India's development Dnyandeep Foundation does not encourage MNCs and foreign companies or professionals to use this platform. It is open to professionals working in such organisations to participate only in individual capacity for their future career development.

Make in India

Dnyandeep Foundation shall be bearing the financial burden for this platform and wish to contribute the development efforts for Make in India for World Movement started by the Indian Government in its own small way.

I hope that all professionals shall take advantage of this facility and provide a helping hand to this initiative of Dnyandeep Foundation.



Thursday, June 25, 2020

Opportunities for starting business in USA

This is a most appropriate time for Indian Business to start new business in USA and provide employment to US citizen of India origin.

The unemployment increase in USA has reached an alarming level and the recent ban on H1-B visa has worsened the situation for Indian community staying in USA.

USA government would welcome establishment of new businesses by Indians staying in USA as permanent residents with citizenship status.

Once you start a business you  can open bank accounts, enter contracts, hire employees, and obtain business licenses and permits with the name of company or business.

Due to high cost of living, most of the Indians are unable to invest money to start a business. However, if well established industries and investors from India join hands with them, they can expand their business here providing employment to those in search of job.

I have searched for the options available for starting business and would like to share with you the information.

Starting a business as Sole Proprietorship

It is simple to set up and puts you  in complete control of your business. You'll have to register the name of business under the state where you wish to establish business. However, in this case, you  are completely at risk. If the company gets sued, you are personally and financially liable. A partnership functions in much the same way, except you and someone else are owners together and equally liable.

Starting a business as LLC.

LLC means Limited Liability Company. That means,  your personal assets like bank deposits, home or car remain protected from your business loss or profit. You need not have board of directors or shareholders to run the business. Employee wages are considered operating expenses for the LLC and will be deducted from the LLC's profits.

Starting business as Corporation -

This option is for big business. You should have board of directors, officers, and shareholders. You require to maintain records of  annual meetings with corporate minutes. There is no personal liability in corporation. It also provides additional benefits and better access to capital.

Raising Capital

1. Use of own funds or from family or friend
2. Taking loan from bank
3. Raising funds through Crowd Funding campaign
4. Venture capital or angel investors with share of ownership

There are many resources and agencies which help in setting business from scratch with legal and financial advice. Banks also help in providing business credit cards for meeting expenses but their interest rates are high.

I found that very few Indians in USA venture for starting a business of their own except shops, hotels and private medical practitioners, IT  and legal service firms.

Since my visit to USA in 2001, I am having a dream of starting business in USA. But my relatives and friends have discarded that idea. As I am holding green card status, I can participate officially in such venture, if it suits my professional qualifications, age and experience.

 This is a wild thought. But I dream of such a company in USA of our own. Who can prevent me from enjoying such such distant dream?

विश्वरूप दर्शन

यशोदेला कृष्णाच्या तोंडात विश्वरूप दर्शन झाले अशी पौराणिक कथा आहे. नासाने असेच विश्वरूप दाखविण्यासाठी एक स्लाईड शो केला आहे त्यात विश्वापासून सूक्ष्मात सूक्ष्म ज्ञात कणापर्यंतचा प्रवास दाखविला आहे, मराठीत आकार व अंतरांची माहिती देऊन खालील चित्रफीत तयार केली आहे.


Wednesday, June 24, 2020

जागतिक व्यापाराबाबत प्रबोधन आवश्यक

कार्पोरेट गव्हर्नन्स या विषयावर ट्रेनिंगचा एक व्हिडिओ पाहिला. स्लाईड शो अगदी छान व आकर्षक केल्याने मला तो आवडला आणि तसा करायला शिकण्यालाठी मी तो डाऊनलोडही केला.



पण त्या पहिल्याच स्लाईड शोमध्ये सत्यम् कंपनीतील गैरव्यवहाराचे उदाहरण पाहून मनस्वी खेद वाटला. आपली जागतिक बाजारपेठेत पत निर्माण करायच्याऐवजी आपल्या उद्योजकांच्या चुका आणि गैरव्यवहार यांना जे जागतिक प्रचाराचे स्वरूप दिले जात आहे. त्याचा जागतिक गुंतवणूकदारांवर आणि भारतीय उद्योगजगताबाबत विपरीत परिणाम होत आहे असे मला वाटते.

अर्थात आपल्या प्रसारमाध्यमांना आणि राजकीय पक्षांना आवडणारी राजू, मल्या, मोदी, डीएसके इत्यादी उद्योजकांच्या गैरव्यवहारांची उदाहरणे आपल्याला  नियमितपणे वाचायला मिळतात. चांगल्या उद्योगांबाबत मात्र फारशी आपल्याला माहिती नसते.

परकीय कंपन्यांनी भारतातील बाजारपेठ काबीज केली हे पाहून भारतातील सामाजिक आणि राजकीय संघटना परदेशी मालावर बहिष्काराचे आवाहन करीत आहेत सत्तधा-यांना कोंडीत पकडण्यासाठी विदोधकांनाही एक आयते हत्यार मिळाले आहे. परदेशी वस्तूंची विक्री कमी होण्यात  याचा प्रत्यक्ष परिणाम फारच कमी होत असताना दिसत आहे. याचे कारण पर्यायी भारतीय वस्तू एकतर उपलब्ध नाहीत वा महाग व तेवढ्या गुणवत्तेच्या नाहीत. याचा अर्थ आपल्याकडे गुणवत्ता नाही असे नाही पण भारतीयांची निवड गुणवत्तेपेक्षा किंमतीवर अवलंबून असते. काटकसरीच्या दृष्टीने हे स्वाभाविकच आहे. शिवाय उत्तम गुणवत्तेच्या वस्तू बनविण्यासाठी लागणारी आधुनिक यंत्रसामुग्री, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि जबाबदेही व्यवस्थापन प्रणाली यांची सोय करणे भारतीय उद्योजकांना भांडवलाच्या कमतरतेमुळे शक्य होत नाही.

संपन्न परदेशात आपला माल विकला व प्रकल्प केले तरच भारतीय उद्योगाची खरी प्रगती होऊ शकेल. यासाठी कमी व्याज दराने बॅंकांकडून पतपुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र भारतात बॅंकांचे व्याजदर खूप जास्त आहेत. येथील ठेवीदारही कोणतीही जोखीम स्वीकारण्यास तयार होत नाहीत. व्याजावर व्याज वाढत जाऊन उद्योग फायद्याकडून तोट्याकडे वेगाने जात असतो. शेअरचे भाव मात्र इतर अनेक कारणांनी वरखाली होत अमतात. शेअरचा भाव कमी होण्यात परदेशी स्पर्धक कंपन्या आणि राजकीय विरोधही कारणीभूत ठरू शकतो. परदेशी अनेक कंपन्या कमी व्याजदराचे आमिष दाखवून भारतीय उद्योगांचा कबजा घेतात. राजकीय पक्ष उद्योगांकडे मिळकतीचे साधन म्हणून पाहतात. उद्योग सांभाळण्याच्या कसरतीत काही उद्योजक कायदेशीर पळवाटा, भ्रष्टाचार आणि जमाखर्चात हेराफेरीसारख्या अवैध मार्गांचा उपयोग करतात. पण त्याचे हे क़त्य लपून रहात नाही व सर्व उद्योगच विनाशाच्या खाईत लोटला जातो.

बहुतेक भारतीय उद्योगांची ही स्थिती होण्यास  सर्वसामान्यांच्या मनात उद्योजकांबाबत असणारा अविश्वास आणि उद्योगातील आर्थिक गणिताबद्दलचे अज्ञान कारणीभूत आहे असे मला वाटते. परदेशी कंपन्या भ्रष्टाचारमुक्त असल्याचे व भारतीय  उद्योजक यशस्वी झाला तर तो भ्रष्ट्राचारानेच असे त्यांना वाटते. त्यामुलेच असेल कदाचित. येथे स्वदेशी उद्योगांना जनतेचा वा शासनाचा आधार न मिळता त्यांची वाढ देशातच मर्यागित राहते.

परदेशी बहुराष्ट्रीय कंपम्यांचा सर्व कारभार लोरांच्या पैशावर चालसेला असतो. शेअर कोसळला तरी उद्योगाच्या क्रमुखाला लोरांच्या रोषाला सामोरो जावे लागत नाही अनेक इतर देश व गुंतवणूकदार त्यात पैसा गुंतवितात. उद्योगाचा प्रमुख दुस-या एखाद्या कंपनीत जॉईन होतो. एकूण हा सर्व व्यवहार एखाद्या जुगारी खेळासारखा असतो. यात भारतीय उद्योदकांना भाग घ्यायचा असेल तर त्यांच्यामागे भक्कम पैसा, शासकीय पाठिंबा आणि भारतीयांचा त्यांच्यावर असणारा विश्वास यांची गरज आहे.

आपल्याकडे परदेशात उद्योग काढण्याचा प्रयत्न करणारे बहुतेक सर्व अपराधी ठरले आहेत. त्यामुळे नवीन कोणी यासाठी पुढाकार घेत नाही. शासनाने भांडवलाची हमी घेऊन चांगल्या उद्योजकांना आपले पाठबळ दिले आणि चीनसारख्या विस्तारवादी तंत्राचा अवलंब केला तरच हे शक्य होईल. मग परदेशी सुटा माल घेऊन तयार वस्तू जास्त किंमतीत जगभर विकता येतील. परदेशातील कंपन्यांनी भारतीयांना नोकरी द्यावी असा प्रयत्न न करता परदेशात आपले उद्योग उभे करून तेथील लोकांना आपले कर्मचारी म्हणून नेमायची ताकत भारतीय कंपन्यांत तेव्हाच येऊ शकेल.


व्हिसा बॅन - आत्मनिर्भर भारतासाठी एक इष्टापत्ती

 अमेरिकेने एच वन - बी व्हिसावर बंदी घातल्याने भारतातील आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. परदेशात आपले बुद्धीमान लोक पाठवून त्यांच्या माध्यमातून प्रचंड पैसा मिळविण्याच्या त्याच्या व्यापाराला आता खीळ बसणार आहे. निदान आपले अस्तित्व टिकविण्यासाठी का होईना त्यांना आता इतर पर्याय शोधण्यावाचून गत्यंतर नाही.

परदेशात जाणा-या तरुणांनाही एक धक्का बसला आहे. परदेशात जाऊन ऐषारामात सुखी जीवन जगण्याचे स्वप्न भंग पावले आहे. परदेशात असणा-या लोकांनाही आपल्या नोकरीची शास्वती राहिलेली नाही.

 याचा परिणाम म्हणजे आता या कंपन्या वा व्यक्तींचे लक्ष आकाशातील स्वर्गसुखाच्या काल्पनिक विश्वातून सभोवतालच्या स्थानिक परिस्थितीकडे वळणार आहे. ही गोष्ट भारताच्या दृष्टीने भविष्यात अतिशय चांगली ठरेल यात शंका नाही.

सध्या स्थानिक जनतेचे असंख्य प्रश्न सोडविण्याकडे कोणाचेच लक्ष नाही. परदेशी कंपन्यांची चाकरी करून भारतातील  संपत्ती परदेशात नेणा-या त्यांच्या कार्यास हातभार लावण्यापेक्षा तेच व्यवस्थापन कौशल्य व तीच बुद्धीमत्ता भारतासाठी उपयोगात आली तर भारत आत्मनिर्भर व विश्वविजेता होऊ शकेल. मात्र यासाठी भारत सरकारनेही अशा भारतीय कंपन्यांना आपल्या प्रकल्पांची कामे अग्रहक्काने द्यावयास हवीत. त्यांच्या व्यवस्थापन मंडळांत आपले प्रतिनिधी ठेवून या क्षेत्रातील सर्वदूर पसरलेल्या आणि कामाअभावी कसेबसे अस्तित्व टिकवून ठेवणा-या छोट्या कंपन्यांना याचा वाटा कसा मिळेल याकडे लक्ष द्यावयास हवे.

महाराष्ट्रास समृद्धीच्या वाटेवर नेणा-या सहकारी उद्योगाचा वसा आयटी कंपन्यांत सक्तीने अंमलात आणला तरच हे शक्य होईल. माननीय माजी मुख्यमंत्री श्री वसंतराव दादा पाटील यांनी सहकारक्षेत्र उच्च शिक्षणालाठी खुले केले. मा. पतंगराव कदम यांना आयटी पार्कच्या माध्यमातून ते करायचे होते. या दोघांचा वारसा घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने याबाबतीत पहिले पाऊल टाकावे आणि सा-या भारताला समृद्धीचा नवा मार्ग दाखवावा असे मला मनापासून वाटते.

ज्ञानदीप इन्फोटेकच्या प्रत्यक्ष अनुभवातऊन आणि गेली चार वर्षे अमेरिकातील भारतीयांच्या जीवनाचे परिक्षण करूनच मी माझे हे मत मांडत आहे. परदेशात जाऊन गाहणा-यांना दिसायला पगार मोठा वाटला तरी त्यातील बहुतेक वाटा कर, विमा आणि घरभाडे यात खर्च करावा लागतो. नोकरीची शास्वती नसते. दुय्यम नागरिकत्वाची वागणूक मिळते. स्थानिक लोकांच्या रोषाला केव्हा सामोरे जावे लागेल, पोलिसांच्या क्रूरतेला,  कोणा माथेफिरूच्या गोळ्यांची शिकार व्हावे लागेल हे सांगता येत नाही.

त्यामळे तेथेही विस्थपित अवस्थेत आपल्या समूहातच आयुष्य घालविण्यापेक्षा भारतात गरिबीत का असेना पण मानाने आणि सर्वांच्या लोभस आपलेपणाचा अनुभव घेत एकमेकांना आपली सुखदुःखे वाटत आपल्या भारतासाठी व सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी काम करणे त्यांना नक्कीच आवडेल. अनेक भारतीय भाषांत आपले सारे ज्ञानभांडार विखुरलेल्या स्वरुपात आज उपयोगाविना पडून आहे. बुद्धीमान व अनुभवी लोकांचा आणि शिक्षित महिलांची फार मोठी संख्या योग्य संधी व प्रशिक्षण न मिळाल्याने या क्षेत्राचा लाभ घेण्यावाचून वंचित आहे. हे सारे अत्यावश्यक काम बेरोजगार शिक्षित तरुणांकडून करून घेता येणे सहज शक्य आहे.

मात्र त्यासाठी सरकार, जनता आणि राजकीय नेते यांनी तसे वातावरण निर्माण करावयास हवे. सुदैवाने आता इंटरनेटच्या माध्यमातून जगातील कोणत्याही प्रकल्पात सहभागी होण्याची व आपले बुद्धीचातुर्य दाखवून भारताकडे संपत्तीचा ओघ वळविण्याचे सामर्थ्य प्रप्त झाल्यामुळे हे सहज शक्य आहे.

आपल्या सर्व जनतेला माहिती तंत्रज्ञानाची संजीवनी शिकविणे हे एकमेव उद्दीष्ट जरी परदेशी वास्तव्य असणा-या लोकांनी आपल्यापवढे ठेवले तरी मोठा बदल घडून य़ेईल. सर्व समाज जागृत व ज्ञानी झाला तर तो कोणत्याही जागतिक संकटांचा गोवर्धन पर्वत उचलू शकेल.

ज्ञानदीप फौंडेशनने याबाबतीत सर्व भारतीय छोट्या संस्था आणि तज्ज्ञ व्यक्ती यांचे नेटवर्क करून माहिती तंत्रज्ञानात शिक्षण व संशोधनातून स्वदेशी उद्योगांचा विकास करण्याचे आणि बहुराष्ट्रीय परदेशी कंपन्यांना सशक्त पर्याय निर्माण करण्याचे उत्तुंग ध्येय आपल्या नजरेपुढे ठेवले आहे. http://dnyandeep.net या वेबसाईटवर असे व्यासपीठ तयार केले असून विविध शैक्षणिक व संशोधन संस्थांशी परस्पर सहकार्य करार करण्यास ज्ञानदीपने सुरुवात केली आहे..

यात यश मिळणे दुरापास्त आहे याची फौंडेशनला खात्री आहे पण म्हणून प्रयत्नच करायचे नाहीत हे पटत नाही. आपला खारीचा वाटाही पुढे कोणाला तरी ते उद्दीष्ट गाठण्यास प्रवृत्त कराल असा दुर्दम्य विश्वास वाळगूनच मी संघर्ष करीत राहणार आहे . - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.




 

Monday, June 22, 2020

Anusha Paintings

Anusha, my grand daughter is gifted with sensitive mind and liking for creative work. Since when she was in KG, she used to draw sketches, do painting and spend time in intricate paper work. She has decorated her desk with paitings from her own ideas.

Perhaps this interest in arts has come from his mom, who is also very choosy in designs, color combinations for clothes and furniture and is very keen in keeping the house clean and well arranged. She kept  Anusha busy with  Kathak dancing,  speakers club and  many skill development courses. Anusha is building these skills with interest. 

Anusha likes to prepare special home made presents for birthday parties and special days and likes to keep secrecy celebrate the event with surprise to guest.

After initial period of sketching with pencil and crayons, she started using watercolor paints. She could learn to do wall paiting frames by seeing videos. Her concentration and hard working attitude, keen observation and patience in painting made her exceptionally good painter at age of 9. She gave her paitings as gift to friends, and even elder people liked her paintings and framed them for display in their houses.

The following movie gives glimpses of her paintings.


Encouraged by the success, she joined pencil sketching class and mastered  the technic of cartoon drawings of soft toys. She conducted online class for kids for a week and taught 12 students to draw many sketches in a weeklong course.

Now a days, she is attracted to reading Harry Potter, Star wars and mystery books and I am sure this will help in visualising dynamic events and scenarios, which will make her drawings more meaningful.

Sunday, June 21, 2020

तुम्ही आम्ही आणि कोरोना - श्रीकांत पटवर्धन

ज्ञानदीप फौंडेशनच्या कार्यात सहयोगी असणारे सांगलीताील सहकार भारतीचे कार्यकर्ते आणि स्वाधीन उर्जा या संस्थेचे संचालक श्रीकांत पटवर्धन यानी कोरोनाचा भारतीय समाज व अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल आणि आपल्या जीवनशैलीत आपण काय बदल करणे आवश्यक आहे या विषयावर आपले विचार मांडले आहेत.


कोरोना नामक विषाणू किंवा भयाणुचा झालेला विश्व्यव्यापी प्रादुर्भाव आज आपण सारेच अनुभवत आहोत.


हे विश्वची माझे घर

इतका व्यापक विचार मांडण्याची मानसिकता आणि ताकद असणाऱ्या संस्कृतीचे वारसदार असणाऱ्या आपणा  सर्वांवर आज

हे घरची माझे विश्व म्हणून स्वत:ला घरातच कोंडून घेण्याची वेळ आली आहे.असो. यालाच इष्टापत्ती समजूनया कम्पल्सरी एकांताचा सदुपयोग करून  थोडेसे लाउड थिंकिंग करूया असा विचार मनात आला आणि म्हणूनच ही मांडणी....

सध्याच्या या GLOBAL LOCKDOWN ची व्यापकता,तीव्रता वर्तमानात महाप्रचंड,सर्वव्यापी आहेच पण त्याशिवाय भाविष्यातही या संकटाचा दीर्घकालीनचटकाविश्वाला बसणार आहे हे निश्चित.तो परिणाम इतका चिरस्मरणीय असू शकतो की यापुढे काळाची मांडणी BC म्हणजेचबिफोर करोनाआणि AC म्हणजेचआफ्टर करोनाअशी बहुधा होऊ शकते.एकूण जागतिक स्तरावर मानवी व्यवहारांच्या सर्व आयमांमध्ये अमुलाग्र बदल करण्याची ताकद या करोनासुरात’आहे असेच म्हणावे लागेल.


भाषणातील काही महत्वाचे मुद्दे -


आधुनिक मानवाला निसर्गाने ‘शहाणे’ होण्यासाठी दिलेली एक संधी..

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि
पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्

हा विचार प्रकट झाला तो काळ भारतीय संस्कृतीचा सुवर्णकाळ होता

आणि अश्यावेळी हा भाव भारतीयांनी प्रकट केला होता हे विशेष

आज संपूर्ण जगाला काही मुठभर विकसित राष्ट्रांनी वेठीस धरले आहे.


विकासाच्या पाश्चात्य संकल्पना सर्वांच्या माथी मारल्या आहेत

आणि त्या आधारे विकसित..विकसनशील..अविकसित अशी अपरिवर्तनीय कायमस्वरूपी मांडणी केली आहे.

इतिहासात सर्वार्थाने विकसित असणारा आपला देश खरेतर जन्मजात उद्योजक आहे.


वैयक्तिक दैनंदिन जीवनशैली परिवर्तन..

स्वच्छता/सामाजिक आरोग्य संकेत/आरोग्य कीट बाळगण्याची सवय 

वैयक्तिक आरोग्य संबंधी परिवर्तन...आयुर्वेद/योग

वैयक्तिक उद्योग निवड परिवर्तन

वैयक्तिक उद्योग/नोकरी....EXIT POLICY

आहार निवड परिवर्तन

समुपदेशन व्यवस्था

भविष्य निर्वाह योजना परिवर्तन (Short Term/Long Term)/आरोग्य विमा

भविष्यातील योजना निर्णय परिवर्तन

उदयोग व्यवस्था परिवर्तन..कारखाने/बँक/व्यापार/पर्यटन/रिअल इस्टेट

परिवहन व्यवस्था परिवर्तन...सार्वजनिक/खाजगी (प्रदूषण)

JUST IN TIME .....IN HOUSE PRODUCTION.....INVENTARY

आरोग्य व्यवस्था परिवर्तन ...खाजगी/सरकारी

सुरक्षा परिवर्तन....देशांतर्गत/अंतररार्ष्ट्रीय

सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने..NRC , चा आग्रह

ONLINE व्यवहार/व्यापार काळाची गरज

ONLINE शिक्षण व्यवस्था काळाची गरज

स्वयंपूर्ण छोट्यात छोटे SOCIAL युनिट निर्मितीचे ध्येय (बाराबलुतेदार) पंचक्रोशी

शेतीमाल वितरण व्यवस्था परिवर्तन

सर्वच बाबतीत विकेंद्रीकरण विचार

स्वदेशीचे पुनरागमन

नवीन उद्योग संधी

 

त्यांचे हे विचार खरोखरच भारतीयांना आपल्या स्वसामर्थ्याची जाणीव करून देणारे, आश्वासक आणि वैयक्तिक जीवनशैलीत काय बदल करणे आवश्यक आहे याचे मार्गदर्शन करणारे आहेत.

ज्ञानजीप फौंडेशनतर्फे मी त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांना धन्यवाद देतो.

Saturday, June 20, 2020

ज्ञानदीपमध्ये पायथॉन शिका.


Hospital Management

Hospital is an institution of health care. Generally many doctors of different specialties are associated with the hospital. The hospital has a large no. of sections which have to work in a synchronized manner for effective performance.

Advances in software technology and internet have provided a valuable tool for better management of hospital, which is a very complex organization. Even though the hospital has unique name and image many a times the patients are attracted to the hospital based on the expertise of the doctors. There is a close relationship and information exchange between doctors and patients. The test reports are studied by doctors and they prescribe the medicine after physical check up of the patients. The feedback of the treatment is very valuable in deciding efficiency of diagnosis and medicines.

I had an occasion to visit hospitals in Houston, and was very impressed by the infrastructural facilities, care and respect given to patients and methodic documentation and superb coordination in various activities. Hospital doesn't look like hospital but as a five star hotel.

Reception rooms are specious, sofas for seating arrangement, wall paintings, reading journals,books, toys and computers for children. The admission clerks work on computers connected by intranet for data entry and retrieval. There is minimal use of paper document, patients are provided with pagers to alert the appointment. Patients can fix up the appointments by phone, search and receive reports on net. All hospitals are interconnected for sharing and transferring data of analysis reports, diagnosis and medical advise. The patients have full right to question and probe the health service quality.

All this makes the cost of health care very high and health insurance companies provide the health cover.These health care insurance companies insist on detailed documentation of all the information so that they can access the medical bill payments to the patients. There is a dearth of manpower in hospitals in advanced countries for necessary documentation, which has given rise to medical transcription business in India.There is no constraint on finance availability for medical research but what they lack is the availability of factual data of symptoms and patient response to medication for variety of cases.

In India, private specialty hospitals, polyclinics have been established in large number. But the hospital management is still far from providing basic facilities and care of patients. There is heavy reliance on paper work and job of maintaining test reports is delegated to patients. There is no central intranet and knowlege store, data compilation is absent. The documentation is rarely done and generally restricted to bill payments and test reports. Even the test reports are generally given to the patients and no record is kept of medicines prescribed and diagnosis.

Individual doctors keep certain information recorded for their personal use but very few doctors use computers to manage patient records and rely on their experience. As such this information and knowlge asset remains with doctor and is not transferred to the hospital knowledge database. This creates a condition that the hospital depends totally on the current medical experts and staff appointed and suffers a loss if a good experience doctors leaves the hospital.

In many hospitals, there are junior doctors or medical students who do not have the expert knowledge or the experience to handle complex cases nor do they get information from the hospital about the case histories of similar patients.In civil hospitals, the well known doctors from the city often work on honorary basis but that information does not add any repute or knowledge database to the hospital as there is no compilation or processing of information.In an ideal hospital, software program shall include knowledge management aspect along with accounts, inventory, salaries, maintenance and other administrative activities.

The cost of developing such comprehensive software may seem to be high it is a must for any hospital. Indirectly this creates a very useful knowledge base for the medical profession and helps to retain and exchange the image of hospitals. Even the new doctors joining the hospital can get benefited by the information stored in the hospital database. Such a requirement is considered unnecessary and is neglected while planning the hospital project.

It should be remembered however, that such a software system shall work like a brain of the hospital. Developing all other organs but neglecting brain would result in unorganized, aimless and temporal functioning of the hospital. The software should have multi-user facility with computers of different sections being served from a central processor server with a responsible person as overall in charge of computer system. The website connected to the central processor of intranet but hosted on remote server shall be an added advantage as it would provide a showcase to the general public and there patients staying at distant places about the general facilities, expertise and administrative capabilities of the hospital. It could also help the doctors to give advice or study the test reports even remotely at any time. This would ensure availability of doctors certain even beyond hospital timings and for the outdoor patients.

If the knowledge database of the hospital is properly created processed and transformed in learning modules, it can serve as a practical guide to students studying medical courses. Suitable distance education programs can be developed by the hospital and it can issue certificates acting as an educational institute. This would give additional financial resources and enhance the image and prestige of the hospital.

The hospitals in India should transform themselves into responsible heath care facilities, proper development and compilation of medical data through use of intranet connected to central database and interactive website for communication with patients, experts and other hospitals. This will not only improve medical services, it could build a valuable asset of vast knowledge base as number of patients and variety of diseases handled by these hospitals is many times compared to advanced countries. Foreign manufacturers of medicines can sponsor research projects and provide substancial financial support for betterment of health services in India.