Friday, May 31, 2019

Dnyandeep for Digital India



Digital India Mission launched by government is a right decision for bringing India on fast track of development. Information technology is the key factor for growth in all sectors. It eliminates corruption by ensuring transparency, reduces cost and energy consumption  significantly and helps to preserve natural resources. Our young software engineers are playing an important role in management of multinational business houses and corporate industries world over. It is now necessary to build strong soft skill manpower force to handle major problems of India  like poverty, unemployment, need of improvement in agriculture, health and education sectors.

However, it is not enough to focus only on young generation for IT skill development, but IT education should percolate to all sections of the society. We are loosing great reserves of knowledge and experience of senior citizens, only due to their ignorance about use of new information technology. Majority of women in India , who are bound to home is an untapped potential of knowledge workers and they  can contribute a lot in knowledge sharing and education with financial returns.

It is observed that majority of people still consider use of computers to be too technical and complex job and fail to take advantage of the many cost and time saving utilities provided by computer. Still very few  industries, businesses and organizations have understood the benefits of their  presence on internet with their website.All out efforts are needed in educating the people about importance of getting acquainted with new information technology.

Dnyandeep Infotech Pvt. Ltd., since its inception in 2000 is striving to create such awareness by launching portal websites in regional languages. Dnyandeep Education & Research Foundation established in 2005 has launched many educational websites for providing learning material to students. The new project undertaken by Dnyandeep to start a webmaster course is big step in efforts to develop self employeed web designers who will become the agents for change in mindset of people and help them to become active participants in the mission of Digital India.










वेबसाईट जनजागृती अभियान

आज भारतात मोबाईल हे संदेश वहनाचे सर्वात प्रभावी व लोकप्रिय माध्यम बनले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत व गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, सर्वजण आपल्या दैनंदिन कामासाठी याचा वापर करीत आहेत. यामुळे प्रत्यक्ष भेटण्यासाठी लागणारा प्रवास, वेळ व पैसा यात बचत होऊन कार्यक्षमतेत वाढ झाली आहे. आजच्या युगात टेलिफोन/मोबाईलचे महत्व अनन्यसाधारण असले तरी त्यालाही मागे टाकण्याची किमया नजिकच्या भविष्यकाळात वेबसाईट (संकेतस्थळ) करणार आहे. कारण इंटरनेटवरून माहिती घेताना देणार्‍याशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याची आवश्यकता नसते. शिवाय वेबसाईटच्या माध्यमातून फोनपेक्षा दृक्‌श्राव्य तसेच लिखित स्वरुपाची माहिती सहजपणे मिळविता येते.

सध्याच्या काळात वेबसाईट हे जाहिरातीसाठी किफायतशीर व अत्यंत प्रभावी साधन आहे. उद्योग व्यवसायात कॉम्प्युटरचा वापर शक्यतो अकौंटस लिहिण्यासाठी, पगारपत्रके करण्यासाठी केला जातो. इंजिनिअरिंग व बांधकाम व्यवसायात ड्राईंगसाठीही याचा वापर होतो. मात्र आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी, नवे ग्राहक शोधण्यासाठी व जाहिरातीसाठी कॉम्प्युटरचा वापर अजून फारसा होत नाही. परदेशात इंटरनेट व वेबसाईट हे प्रत्येक व्यवसायाचे प्रमुख साधन असते. त्याचा वापर सर्व क्षेत्रातील व विविध आर्थिक स्तरावरील लोक करतात. अगदी साहित्य क्षेत्रातही प्रत्येक लेखकाची एक वेबसाईट असते. बरेच लोक आपली वेबसाईट स्वतःच बनवितात. वेबसाईटचा उपयोग आपल्या व्यवसायवृद्धीसाठी कसा करून घ्यायचा याची माहिती नसल्याने या प्रकाराकडे महाराष्ट्रातील व्यावसायिक फारसे वळत नाहीत. बॅनर, वर्तमानपत्रातील जाहिरात वा टी. व्ही.वर जाहिरातींसाठी वारेमाप खर्च करतात. मात्र वेबसाईटसाठी खर्च करायला ते राजी होत नाहीत.

आता हे चित्र थोडे थोडे बदलू लागले आहे. संपर्क, करमणूक व माहितीचा शोध घॆण्यासाठी इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे अनेक व्यवसायांच्या जाहिरातींची व त्यांच्या वेबसाईटची माहिती लोकांना होऊ लागली आहे. मराठी भाषेतील वेबसाईटही आता मोठ्या प्रमाणावर दिसू लागल्या आहेत व नजिकच्या भविष्यकाळात यात फार मोठी वाढ होणार आहे.
या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार सर्व व्यावसायिकांनी आवर्जून करावा व वेबसाईटबद्दलचा वापर वाढावा यासाठी ज्ञानदीप फौंडेशन एक जनजागृती अभियान सुरू करीत आहे.

आपली वेबसाईट स्वतःला बनविता येऊ शकते याचा आत्मविश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. जाहिरातीच्या बाबतीत वर्तमानपत्रे, बॅनर, टीव्ही यांची मक्तेदारी मोडून काढून सध्याच्या आधुनिक युगात अत्यंत किफायतशीर व प्रभावी जाहिराततंत्राचा पर्याय सर्वांसाठी उपलब्ध करून देणे हा यामागचा हेतू आहे. यासाठी विद्यार्थी, शिक्षक, महिला यांच्यासाठी वेबडिझाईनचे शिक्षण देणारे प्रबोधन वर्ग घेण्याचे ज्ञानदीप फौंडेशनने ठरविले आहे. यासाठी वेबसाईट तंत्रज्ञानाची माहिती असणार्‍या शिक्षकांचे व व्यावसायिकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. उद्योजकांसाठी वेबसाईटच्या उपयुक्ततेसंबंधी कार्यसत्रे आयोजित करण्याचा फौंडेशनचा मानस आहे. याबाबतीत अधिक माहितीसाठी वा असे कार्यसत्र आयोजित करू इच्छिणार्‍या व्यक्ती व संस्थांनी ज्ञानदीप फौंडेशनशी संपर्क (info@dnyandeep.net)साधावा.

Monday, May 27, 2019

शिक्षणक्षेत्राचे नेतृत्व शिक्षकानेच करावे


महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनामध्ये मोलाची कामगिरी बजावणारे प्रा. श्री, कानिटकर आणि प्राथमिक शिक्षणातील तज्ज्ञ श्री. प्रभाकर खाडिलकर यांचा समावेश सध्याच्या व्यवस्थापनात नाही हे ऐकून धक्का बसला. गेल्या वर्षी १ सप्टेंबरला पुण्यामध्ये संस्थेचा फौंडर्स डे साजरा झाला त्या वेळी माझ्या पत्नीच्या ( कै. सौ. शुभांगी रानडे) स्मरणार्थ संस्थेला एक लाख रुपयांची देणगी दिली होती व पुण्यात मराठी माध्यमातून संगणक प्रशिक्षणाचे कार्य सुरू केले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. प्रा. कानिटकर सरांनी त्याबाबत योजनाही आखली होती.


संस्थेचे संस्थापक स्व. धोंडुमामा साठे यांचे व्यावसायिक शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी डिप्लोमा कोर्सला  शासनमान्यता व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रा. कानिटकर यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.  वालचंद कॉलेजमधील कै. प्रा. मकरंद जोगळेकर, कै. डॉ. संतपूर यांच्या पाठिंब्याने आपल्या नोकरीची पर्वा न करता प्रदीर्घ काळ प्रशासनाशी संघर्ष करून संस्थेच्या आवारात मराठी माध्यमाची आदर्श प्राथमिक शाळा स्थापन केली तसेच उत्तम इमारत व सुविधा व व्यासंगी शिक्षकांची नेमणूक केली. मिरज विद्यामंदीरमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या माझ्या भावाला तसेच  प्राथमिक शिक्षणातील तज्ज्ञ श्री. प्रभाकर खाडिलकर यांना मार्गदर्शक नेमून संस्था नावारुपास आणली.


पुण्यातही याचप्रकारे मराठी माध्यमातून संगणक शिक्षणाचे कार्य त्यांच्याकडून होईल याची मला खात्री होती. मुमारे सहा महिने अमेरिकेत राहून परत आल्यावर मला प्रा, कानिटकर व खाडिलकर, दोघेही शालेय व्यवस्थापनात नाहीत तसेच पुण्यातही त्यांचा सहभाग नाही हे कळले.


मला संस्थेच्या राजकारणात अजिबात रस नाही. कोणाचे बरोबर व कोणाचे चूक याबाबतही मला काही देणे घेणे नाही. मात्र शिक्षण क्षेत्राचे नेतृत्व शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ कार्य करणा-याच्या हाती असावे असे मला वाटते.


सध्याच्या व्यवस्थापनाने याबाबतीत योग्य तो निर्णय घेऊन सांगलीतील शाळा तसेच पुण्यातीस संगणक प्रशिक्षणाच्या कार्यास चालना मिळेल यादृष्टीने पावले उचलावीत असे संस्थेचा आजीव सदस्य, हितचिंतक आणि देणगीदार या नात्याने सुचवावेसे वाटते. -डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

वालचंद माजी विद्यार्थी संघटनेचे समर्थ नेतृव - प्रा. हेमंत अभ्यंकर

वालचंद कॉलेजचे माजी विद्यार्थी व प्राध्यापक हेमंत अभ्यंकर यांचा माझा पहिल्यांदा  जो परिचय झाला तो आमच्या विभागातील माझ्या दृष्टीने ब्रह्मा, विष्णु, महेश असणा-या   डॉ. सुब्बाराव, कै. प्रा.. जोगळेकर आण कै. प्रा. संतपूर यांच्यामुळे. या तिघांचा वरदहत लाभलेले हेमंत अभ्यंकर हे कै.  प्राचार्य फाटक यांचे पट्टशिष्य. ब्रिज हा या सर्वांचा  जिव्हाळ्याचा विषय. मला ब्रिज येत नसल्याने त्यांच्या या परिवारात मी मिसळू शकलो नाही. पण एक  श्रोता म्हणून   ब-याच वेळेला त्यांच्या चर्चात सहभागी झालो. त्यावेळीच अभ्यंकरांचा उत्साह, कोणतेही अवघड काम अंगावर घेण्याची तयारी व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे त्यांचे कसब पाहून मी प्रभावित झालो होतो. कॉलेजच्या होस्टेलचे रेक्टर म्हणून काम करत असताना अनेक विद्यार्थ्यांशी त्यांनी आपलेपणाचे नाते निर्माण केले होते.
 मला आठवते त्याप्रमाणे १९८३-८४ या सुमारास प्राचार्य फाटक ज्या साठेनिवासमधील क्वार्टर्समध्ये रहात होते. तेथेच प्रा. अभ्यंकरही काही काळ होते  व ते वारणानगरला गेल्यानंतर याच क्वार्टर्समध्ये १९८४ पासून मी रहात होतो. हा एक योगायोग म्हणायचा. कॉलेज सोडून दुसरीकडे शैक्षणिक संस्थांत मानाची पदे भूषवित असतानादेखील वालचंद कॉलेजमधील प्राध्यापकांबद्दल त्यांना अपार आदर होता व आजही आहे.

 वालचंद माजी विद्यार्थी संघटनेच्या (Association of Past Students) कार्यात पहिल्यापासून मी सहसचिव म्हणून तसेच संघटनेच्या www.walchandalumni.com या वेबसाईट व्यवस्थापनाच्या कामातून सहभागी होतो आणि त्यावेळी माझा प्रा. अभ्यंकरांशी अधिक संपर्क आला व तेव्हा मला त्यांच्या  नेतृत्व गुणांची चांगली ओळख झाली.

  पुण्यात व्हीआयटीचे प्राचार्य म्हणून रुजू झाल्यानंतर पुण्यात त्यांचे स्थायी वास्तव्य सुरू झाले. पुण्यामध्ये वालचंद कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यांना एकत्र आणून एक सशक्त संघटना उभारण्याचे मोलाचे काम त्यांनी केले. मला आठवते की २००३ मध्ये वालचंद कॉलेज माजी विद्यार्थी संघटनेची पंचवार्षिक निवडणूक सभा मुंबईमध्ये झाली त्यावेळी पुण्यातील अनेक माजी विद्यार्थ्यांनी प्रा. अभ्यंकर यांना अध्यक्ष करावे असा अर्ज केला होता. प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याने त्यावेळी ते शक्य झाले नाही. ती जागा रिकामी ठेवून नंतर त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले. 
 तेव्हापासून व नंतर २००८ ते २०१३ या काळात ते अध्यक्ष असताना त्यांनी माजी विद्यार्थी संघटना सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य केले व अनेक उत्साही व महत्वाच्या पदांवरील व्यक्तींना संघटनेच्या कामात सहभागी करुन घेतले.

 कॉलेज फौंडर्स डे ( Founder;s day) व इतर तिमाही सभांना ते न चुकता हजर रहात व येताना पुण्यातील आपल्या सहका-यांनाही आणत. त्यावेळी पुण्यातील प्राचार्य भालेराव, अरविंद देशपांडे, सुरेश माळी, अविनाश बर्वे, कै. शंकर कलमाणी, मुंबईचे श्री. महेंद्र बर्डे, सुबावाला, सोलापूरचे श्री.  राठी, नागपूरचे वझलवार व अशा अनेक माजी विद्यार्थ्यांशी माझी ओळख झाली.

 Garlanding Shri. Dhondumama Sathe on Founder's Day,  2008 

 
अजूनही दर वर्षी  न चुकता पुण्यातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा प्रा. अभ्यंकर आयोजित करतात व त्यावेळी अनेक नवे-जुने वालचंदचे माजी विद्यार्थी एकमेकांना भेटतात. माजी प्राध्यापकांचाही सत्कार केला जातो.  मीही  अशा काही कार्यक्रमांना हजर होतो.

 
 Felicitation of Dr. P. A. Kulkarni at Pune Walchand Alumni Meeting 

कॉलेज, सोसायटी व प्रशासन यातील अंतर्गत वादात त्यांनी  नेहमी  कॉलेजच्या बाजूने फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड म्हणून काम केले पण त्याचवेळी  दोन्ही गटांतील सर्वांशी सलोख्याचे संबंध कायम राखले. मध्यंतरी कॉलेजच्या भवितव्याविषयी अनिश्चितता वाटत असताना पुण्यातील एका बैठकीत प्रशासन निरीक्षकांनाही माजी विद्यार्थी  संघटना कॉलेज विकत घेऊ शकते असे सांगून कॉलेजच्या सध्याच्या स्थितीत कोणताही बदल न करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यावेळी त्यांच्या कॉलेजबद्दलच्या कळकळीबरोबर त्यांच्या क्षमतेचीही जाणीव सर्व उपस्थितांना झाली. याची आठवण अजूनही माझ्या मनात ताजी आहे.  त्यांच्या कारकिर्दीचा हा काळ  संघटनेच्या दृष्टीने सुवर्णकाळ होता हे मला अभिमानाने नमूद करावेसे वाटते.

 वालचंद कॉलेजच्या शैक्षणिक थोर परंपरेची नव्या विद्यार्थ्यांना  व समाजाला माहिती व्हावी या हेतूने मी सर्व माजी प्राध्यापकांची माहिती गोळा करण्याचा एक प्रकल्प  सुरू केला त्यावेळी मी त्यांना त्यांचा बायोडाटा पाठवण्यास सांगितले तेव्हा त्यांनी अक्षरश चार ओळीत आपल्या विविध कार्यकक्षांची नोंद पाठविली यात कोठेही बढाई वा स्वस्तुतीचा भाग नव्हता. मात्र इतरांच्या छोट्या कार्याचेही   कौतुक करण्यात ते मागे रहात नाहीत. माझ्या एका ब्लॉगविषयी  वर्तमानपत्रात माहिती छापून आल्याचे त्यानीच व्हाट्सअॅपवरुन सर्ंवाना कळविले.

 त्यांच्या सत्तराव्या वाढदिवसासाठी त्यांचे अनेक विद्यार्थी आपण होऊन पुढे सरसावले ही त्यांच्या कार्याची व लोकप्रियतेची खरी पोचपावती आहे. वालचंद कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेला त्यांच्यासारख्या  सक्षम व खंबीर नेतृवाची कघी नव्हे इतकी गरज आहे.  माजी विद्यार्थी संघटना हे कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे एक महवाचे आणि हक्काचे असेट असते. हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे भविष्यात ही संघटना स्वयंपूर्ण व सामर्थ्यवान करण्याचे काम त्यांनी मनावर घ्यावे असे मला मनोमन वाटते. त्यांया नेतृवाखाली पुढील पाच वर्षात संघटनेला पूर्वीसारखे वैभव आणि महत्व प्राप्त होवो व त्यांची पंचाहत्तरी अधिक मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे भाग्य सर्व माजी विद्यार्थ्यांना लाभो अशी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच त्यांना पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य व उत्तरोत्तर अधिकाधिक यश लाभो अशी ईशचरणी प्रार्थना.
 — डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.       E mail - drsvranade@gmail.com

Friday, May 24, 2019

Get assimilated in the social fabric where you live


People having strong attachment to their native place often remain secluded from the surrounding society when they have to work and live at different place, city or country. This is understandable but not justifiable. Though your workplace is completely different in many ways than your native place, you must try to learn the nature and society around you taking extra efforts so that you will start feeling at home.


If, on the other hand, you remain aloof from society you will always have  a feeling of insecurity. More than your feelings, you also create similar feelings in the neighboring community about you, which is more dangerous as they are native and think that your stay is hampering their interests and social harmony.


Instead, if you participate in their social activities, understand their problems and aspirations and help them whole heartedly in common good, you will be accepted as necessary and useful component of the society.  Then they will support your views and will not object to your customs and linkages to your homeland.


Knowing geographical features and the history of development would create love and interest in your mind about the region.  Studying nature surrounding you like trees, birds and animals would give you pleasure of accomplishment at no cost. Learning infrastructural services provided by local administration and current issues will make you aware of the needs for future development.


With  these activities, you will feel yourself comfortable in the surrounding. You will take pride about your work place and love it as your native place.


This will erase your stamp of immigrant status and you will become inseparable part of the society where you are living and will be native place for your future generations.

All immigrants in the world are facing these challenges and pass through phases of hatred, out casting from local population to slowly getting accepted over a long time period when their children learn and assimilate the knowledge of surrounding environment, start loving the place  and adopt social customs. This could be accelerated by intentional education program and creating awareness about the situation.

With this broad objective in mind, Dnyandeep has decided to launch mysiliconvalley.net website which will help the immigrants in the bay area to achieve  native status in true sense. Though the exercise is restricted to small selected region, it may succeed in  evolving guidelines for solving immigrant assimilation issue on global scale.


स्थलांतर व नवनिर्मिती हा निसर्गाचा स्थायी भाव

 मुलगी लग्न करून सासरी जाते. त्यावेळी तिला नवे घर मिळते. नव्हे ती नव्या घराची मालकीण बनते. सासरच्या कुटुंबियांना ती आपले मानते नव्हे ती त्या कुटुंबाची सदस्य बनते. नवे नाते संबंध तयार होतात.  पण तरीही ती आपल्या माहेराला विसरत नाही. दोन घराणी एकत्र सांधण्याचा ती एक दुवा बनते.

दोन्ही घराण्यांचा वारसा एकत्र करून शारिरिक, मानसिक, रितीरिवाज व परंपरा यांच्या मिश्रणातून नवी स्थानिक परिसरास अनुकूल अशी पिढी तयार होण्याची प्रक्रिया हा सार्‍या सजीव सॄष्टीचा  एक अपरिहार्य आणि स्वाभाविक आविष्कार आहे.

याचप्रमाणॆ जन्मभूमी व कर्मभूमी या दोहोंबद्दल तेवढीच आत्मीयता प्रत्येकाला असावयास हवी.   कालानुरुप आपोआप घडणारी ही गोष्ट असली तरी त्यासाठी बराच कालावधी लागतो.


परगाव, परप्रांत व परदेश या तीनही बाबतीत असा अनुभव येत असला तरी या तीनही गोष्टी परस्परांहून भिन्न आहेत. त्यांचे  संदर्भ मोठ्या प्रमाणात विस्तॄत होत असल्याने व अनुकूलनातील अडचणी भोगोलिक,सामाजिक व राजकीय स्तरांवर कित्येक पटींनी वाढत असल्याने वाटते तेवढी ही सोपी गोष्ट नाही.


आपल्या हिंदू धर्मात विजयादशमीला सीमोल्लंघन करून नवीन प्रदेश पादाक्रांत करणे, व विजयी होणे याला अतिशय महत्वाचे स्थान दिले आहे.


वामन पंडितानी देशाटनाची महती खालील प्रमाणे वर्णिली आहे.

केल्याने देशाटन, पंडितमॆत्री सभेत संचार ।
शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार ॥

खेड्याकडून शहराकडे, शहराकडून दुसर्‍या प्रांतात, वा एका देशातून दुसर्‍या देशात असे स्थायी स्थलांतर होत असताना मानसिक व  सामाजिक ताणतणाव व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो. पूर्ण बदल होण्यासाठी लागणारा कालखंडही मोठा असतो.


पशु, पक्षी, फुलपाखरे, समुद्रातील मासे दरवर्षी स्थलांतर करतात. मानवनिर्मित सीमा त्यांना अटकाव करू शकत नाहीत. प्राणीच काय पण वनस्पतीदेखील आपल्या बीजांद्वारे स्थलांतर करत असतात. वृक्षांचा स्थलांतर वेग वर्षाला एक मॆल असतो असे मी वाचले आहे. मानवजातीचा पृथ्वीवर झालेला विस्तार अशा स्थलांतरातूनच झाला आहे.

अमेरिकेत तर जवळजवळ सर्व लोकसंख्या इतर देशातील लोकांच्या स्थलांतरातून तयार झाली आहे असे विधान नुकतेच कॅलिफोर्नियातील अमेरिकन सिनेटर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी केले आहे. त्या अमेरिकेतील २०२०च्या राष्ट्राध्यक्ष  निवडणुकीसाठी उमेदवार आहेत.
(Ref: Indian Express News Washington | Published: June 8, 2018 9:11:43 )
Ref:1. https://en.wikipedia.org/wiki/Exploration_of_North_America 2. http://daily-work.org/

अर्थात ’लग्न” या मानवनिर्मित संस्कारांनी ज्याप्रमाणे मुलीची मनोधारणा त्वरित बदलण्याच्या क्रियेस मदत मिळते. त्याचप्रमाणे स्थलांतर प्रक्रियेतील स्वाभाविक परिणाम व बदल  स्थलांतरिताने समजून घेतले  व नव्या स्थानातील समाजाच्या आशाआकांक्षांशी जुळवून घेतले तर सामाजिक समरसतेला गती येईल व संघर्षाऎवजी सहकार्याने असा बदल घडून येईल.


Saturday, May 18, 2019

Everything but love

I had read an interesting  Russian novel of above title  (by ) long back which imagined the future robotic world where there is no place for love. Unfortunately, I find that similar situation may arise in future, if we do not introspect our efforts and aspirations in life, care for others feelings and become more sensitive.

Only growth of intelligence suppresses feelings and emotions. Feeling is impression on mind. Emotion is response of mind. Blind pursuit of physical needs driven by only logic and intelligence leads to robotic behaviour. Advances in material technology are converting human being into intelligent animal without love. Families are splitting, Relations are getting broken. Human community is becoming atomised. Man, in pursuit of please and happiness is indirectly loosing essence of living. 

True artists, writers and philosophers are trying to keep and nurture the free mind which has become endangered species in onslaught of material wealth and consumable pleasure. Intelligence is using their efforts for growth of business by converting the creations and innovations into saleable items. This again enhances lust for material wealth. Common man has to depend on borrowed or purchased well crafted emotions and feelings from others for keeping his mind alive. He is loosing his inherent sensitivity.

Unless we start consciously to develop and retain human relations, understand others feelings, nurture emotional attachments, get pleasure from old memories, we shall loose the innate treasure of love and happiness forever.




इ - निवडणूक


 ( Election नावाच्या रशियन विज्ञानकथेवर आधारित विज्ञानकथा - - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली)


बाबा, उठा की. आठ वाजले.
छोटी लता बाबांना हलवून उठवीत होती. बाबा, उठा की. बाहेर पोलीस दिसताहेत. पोलिसांची गाडीही आहे
जगन्नाथ्ने  शेवटी हंम्हटले आणि डोळे चोळत मान उचलून पाहिले? ‘बघा ना बाबा. आपल्या गावातलाच कोणीतरी निवडला गेला असणार.

 लताच्या उत्साही चेहर्‍याकडे पाहताना जगन्ना्थच्या लक्षात आले. अरे.  आज  राष्ट्राध्यक्ष निवडणूक होणार आहे. तो झटकन्‌ उठला खिडकीतून बाहेर पाहिले. खरेच रस्त्यावर बरेच पोलीस हिंडताना दिसत होते. एक दोन पोलीस व्हॅनही कोपर्‍यावर उभ्या होत्या.

मी म्हटले नव्हते का? यावर्षी तरी आपल्या गावाला संधी मिळणार.सरला स्वयंपाकघरातून डोकावून म्हणाली. असं वाटतंय खरं ! पण सरला, पूर्वीच्या निवडणुकीतली गंमत या लॉटरीत काही येत नाही.

 ‘अहो, पण निवडणुकीत जो राजकारण आणि भ्रष्टाचार यांचा सावळागोंधळ चालायचा. तो तरी संपला की नाही. शिवाय सामान्य नागरिक राष्ट्राध्यक्ष होण्याची घटना अशा लॉटरी निवडीनेच शक्य झाली आहे हे खरे ना?’

ते खरे ग ! पण गणकयंत्राने राष्ट्राध्यक्ष ठरवला जात असताना सार्‍या लोकांच्या मनावर किती टेन्शन येते याचा विचार केलास का तू?’

 ‘ ते बाई खरं हं. कालपर्यंत तरी राजस्थानातील वा केरळमधील राष्ट्राध्यक्ष होणार असे टीव्ही्वर अंदाज केले जात होते. पण आज पहाटेपासूनच गावात पोलीस फिरताना पाहूनमला तर बाईआपल्याच गावातला राष्ट्राध्यक्ष असणार असे वाटू लागले आहे.

जाऊ दे. आपल्याला काय करायचंय? निवडणूक म्हणून सुट्टी नाही. ऑफिसात जायलाच हवे. संध्याकाळी कळेलच टीव्हीवर. एक फर्मास चहा ठेव. मी आलोच आवरून.जगन्नथ लगबगीने बाथरूममध्ये शिरला. तासभर झाला असेल नसेल तो दारावरची बेल वाजली. आत्ता या गडबडीच्या वेळी कोण उपटले असे पुटपुटत जगन्नाथने दार उघडले. बाहेर दोन पोलीस इन्स्पेक्टर उभे पाहून तो दचकला. कोण पाहिजे?’ त्याने विचारले.

जगन्नाथ जोशी आपणच का?’ ‘ होय. पण कां?’ ‘ वय ३२, पोष्टात असिस्टंट क्लार्क , पत्नी- सरला वय २८, एक मुलगी - लता वय ६बरोबर?" हातात्ल्या कागदावर खुणा करीत इन्स्पेक्टरनी सर्व माहिती तपासून पाहिली. क्षणात त्यांचे चेहरे बदलले. निर्विकार, गंभीर चेहर्‍यांची जागा आता आनंदी, नम्र व आतिथ्यशील चेहर्‍यांनी घेतली. दोघे खाली मान करून अदबीने म्हणाले महोदय, नव्या वर्षाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपणास अभिवादन.

जगन्नाथ भांबावला. सरला, अग मी राष्ट्राध्यक्ष झालो असे ओरडून त्याने शर्ट अंगात चढवला. पिठाच्या हातानी सरला तशीच धावत बाहेर आली. लता बाबा, तुम्ही निवडून आला असे म्हणून त्याला बिलगली.

 सरलाला काय करावे सुचेना.. पोलीस इन्स्पेक्टर अदबीने पुढे आले व म्हणाले. महोदय, आपणास लगेच राष्ट्रपती भवनात शपथविधीसाठी जायचे आहे.. गाडी व विमान तयार आहे.

माझे ऑफिस? जगन्नथ म्हणाला पण मध्येच थांबला. राष्ट्राध्यक्षाला कसले आले ऑफिस.

बाबा, मला मॉंटेसरीत कोण पोचविणार? मी तुमच्याबरोबर येणार. लताने बाबांना धरून ठेवले. सरला पुढे आली तिने लताला मागे ओढले. जगन्नाथच्या डोळ्यात पाणी आले. आनंद व दुःख . दोहोंचे मिश्रण होते त्यात. भरल्या डोळ्यांनी दोघींकडे पाहून जगन्नाथ निघाला.

 आता त्याच्या दोन्ही बाजूस सशस्त्र शरीररक्षक होते. तो रस्त्यात आला तो सैनिकांच्या गराड्यातच. बुलेटप्रुफ गाडीत बसल्याबरोबर गाडी भरधाव वेगाने निघाली.

 विमानतळावर स्वतंत्र कक्षात सेवकांनी जगन्नाथचा  सारा पेहराव बद्लून त्याला मान्यवर नेत्याचे रूप दिले. खास शाही विमान तयार होते. महाराष्ट्राचे राज्यपाल व सर्व प्रमुख व्यक्तींनी जगन्नाथचे अभिनंदन केले.

 विमान सुटले आणि विमानात जगन्नाथच्या शेजारी बसून तीनही लष्करप्रमुख हलक्या आवाजात देशाच्या संरक्षणव्यवस्थेविषयी जगन्नाथला माहिती देऊ लागले.

जगन्नाथला त्यातले काहीही उमगले नाही. विमानातून उतरल्यावर तर जगन्नाथ थक्कच झाला. राजधानीतील हजारो लोक त्याचे अभिनंदन करण्यासाठी हातात  पुष्पगुच्छ घेऊन उभे होते.

 गतवर्षीच्या राष्ट्राध्यक्षांनी जगन्नाथचे स्वागत केले. २१ तोफांची मानवंदना लष्कराकडुन त्याला देण्यात अली. नंतर खास उभारलेल्या शामियानात नूतन राष्ट्राध्यक्षांची ऎतिहासिक पत्रकार परिषद सुरू झाली. ....

जगन्नाथच्या चेहर्‍यावर सारख्रे फ्लॅशचे झोत पडत होते. तो बसला होता त्याच्या समोर २०/२५ मायक्रोफोन गर्दी करून लागले होते. दुरून टीव्ही कॅमेर्‍यासाठी टाकलेला प्रकाशझोत पुढे मागे रेंगाळत होता.. जगन्नाथला घाम फुटला.

 मुख्य निवडणूक अधिकारी प्रख्यात तंत्रवैज्ञानिक डॉ. शहाणे यांच्या निवेदनाने पत्रकार परिषद सुरू झाली.भारतातील तंत्रविज्ञानातील क्रांतीने खरी लोकशाही प्रस्थापित करून एका नव्या युगाची सुरुवात केली आहे.

पूर्वीच्या पक्षीय, भावनाप्रधान, खर्चिक व सदोष मतदान पद्धत रद्द करून खर्‍या अर्थाने वस्तुनिष्ट व पूर्वगृहविरहित अशी गणकयंत्राच्या पद्धतीने सर्व जनतेतून एक राष्ट्राध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पार पाडून  कोणत्याही व्यक्तीस  राष्ट्राध्यक्ष होण्याची पद्धत आपण विकसित केली आहे हे भारतास निश्चितच भूषणास्पद व आपल्या गौरवशाली परंपरेस साजेसे आहे.

 आजच्या निवडणुकीबाबत गेले कित्येक दिवस वृत्तपत्रे व इतर प्रसारमाध्यमे अंदाज व्यक्त करीत असताना त्या सर्व अंदाजांचा फोलपणा या निवडणुकीने सिद्ध केला आहे.

 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा गुंतागुंतीच्या प्रश्नांवर नूतन राष्ट्राध्यक्ष आता खर्‍या अर्थाने भारतातील सामान्य नागरिकाची प्रतिक्रिया व्यक्त करतील. सन्माननीय राष्ट्राध्यक्ष माननीय जगन्नाथ आता पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देतील जगन्नाथच्या चेहर्‍यावरील प्रकाश झोत वाढले.

 समोरच्या रांगातील एका भारदस्त पत्रकाराने प्रश्न विचारला युरोपमध्ये मध्यमप्रतीची अण्वस्त्रे ठेवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर आपले काय मत आहे?"

जगन्नाथला प्रश्नातले ओ की ठोकळले नाही. त्याने नुसती मान हलवली. डॉ. शहाणे म्हणाले माननीय राष्ट्राध्यक्षांनी या संवेदनशील प्रश्नावर मतप्रदर्शन करण्यास नकार दिला आहे.

भारताने अंतराळ संशोधनात आपले काय उद्दीष्ट ठेवले आहे?’ एका विदेशी पत्रकाराने विचारले.

शनी व मंगळाची धास्ती घेतलेल्या जगन्नाथ्ने सांगितले. शनी व मंगळ जिंकणे.

भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी आपण कोणते उपाय योजणार आहात?’

शेजार्‍याने वर्षाचे धान्य घेतल्याने तो सध्या आरामात आहे हे आठवून जगन्नाथ म्हणाला वर्षभर पुरेल एवढे धान्य साठविण्याची व्यवस्था करू.

टाळ्यांचा कडकडाट झाला.

त्या आवाजाने जगन्नाथने डोळे उघडले. लता कानाशी टाळ्या वाजवून त्याला उठवीत होती.  ‘ बाबा उठा की.

 ( Election नावाच्या रशियन विज्ञानकथेवर आधारित विज्ञानकथा - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली)


Thursday, May 16, 2019

Right path for Future of Indian culture


While criticizing the fearful robotic culture which considers human beings as mere pawns in the  corporate dominated society, I do not wish to indicate that present Indian culture is ideal for future growth and sustainability.

There are many drawbacks and distortions which have creeped in our age old noble culture and turned it into unjust, sluggish and incapable of facing future challenges. Unless we root out these weeds and foster rational thinking, we are going to be swept in the new wave of globalization.

According to me, the most urgent requirement is to create awareness about needs of the present times and acknowledge the power of science and technology to solve the problems rather than belief in god sent gifts through meditation and prayers.

Our faith in god should be rational and should not strangle our intuitiveness, creativity and hard work. We should redefine the traditional  methods of worship by engaging in constant pursuit of social harmony, enlightenment and upliftment. We should expose superstitions and refrain from inaction or blind belief.

Religious rituals have an important role in giving mental satisfaction, feeling of social togetherness but we should remember that those cannot solve the physical problems. In all religious stories the  Gods also had to use physical weapons to destroy evil forces. We must not underestimate or ignore the present day scientific knowledge, but use it for social welfare.

Thus we should evolve a new responsive culture which preserves symbolic rituals as a linkage to glorious past and strengthens love for  family and society, but empowers us to face future challenges in physical world.  Our belief in God should not make us inactive and   submissive but should strengthen the mind and intellect to resist the onslaught efforts of robotic culture to crush human values.

Wednesday, May 15, 2019

Robotic culture in USA


After staying for a long time in USA, I returned to India and experienced a huge contrast in social culture, where I felt at home with unpolished and talkative crowd expressing their individual responses and emotions in offices, market and social gatherings.

In contrast, I found sophisticated, well mannered and object oriented and confined talk by people at all places in America which was typically robotic with suppressed emotions to adhere with strict norms of good behavior. Whether you go in hospital, mall, hotel or even garden or any gathering the experience is monotonic, disciplined and respectful.

Somehow, I felt that the people living there are becoming aloof from society and are just being considered as consumers or customers with no attachment or belongingness with rest of the crowd. Big corporate and administration demands that the workers and citizen behave in carefully crafted rules and regulations and achieve desired goals anonymously. They are treated as replaceable items to give desired outcome.

I had read a Russian novel ‘Everything but love’ long back, where the man gets a robot as wife, well and carefully designed to suit his requirements in minutest details like shape, look, beauty, responses and even pre-build emotions. He feels happy and boasts his possession with his friends who had wives with lot of imperfections and unmanageable quarrels. However, soon he realizes that robotic wife cannot give him the true love with human soul.

I am afraid, that in our pursuit of perfection, efficiency and unbiased just responses, we are forcing the people to abandon their inherent distinctiveness and turning them into well managed perfect society.

Even if we succeed in it, robots are going to outperform humans and would enslave human beings as they are heterogeneous in composition and fail with repetitive work and stressful conditions.

We have to think seriously where we want to go. Whether to achieve great success and prosperity with robotic culture or preserve our relations, traditions, old beliefs and rituals and remain where we are, imperfect, diversified but full with sensations, emotions and memories of past which preserve and nurture our minds rather than glorify bodies with material wealth and behavior to suit the ideal norms of social interaction..

Tuesday, May 14, 2019

माय सिलिकॉन व्हॅली - प्रस्तावित नवी वेबसाईट


अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सिलिकॉन व्हॅली नावाच्या छोटा प्रदेशाचे  जगभरातील आयटी क्षेत्रातील युवकांना  आणि तरूण व्यवसाय उद्योजकांना जबरदस्त आकर्षण आहे. तेथे जाऊन नोकरी वा उद्योग उभा करण्याचे ते स्वप्न पहात असतात.परंतु त्यापैकी बहुतेकांना या ठिकाणाबद्दल फारच थोडी आणि त्रोटक माहिती असते. 

ऐतिहासिक काळात, कॅलिफोर्नियामध्ये नदीच्या पाण्यात सोने मिळत असे  आणि सोन्याच्या शोधात जगातील अनेक लोक स्थलांतर करून  आले होते. तो गोल्ड रश कालावधी संपला आहे. पण आता, कॅलिफोर्नियातील हा बेएरिया म्हणून ओळखला जाणारा  प्रदेश  माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अत्युच्च पदावर पोचल्याने कॉम्प्युटर चिपमधील सिलिकॉन वरून सिलिकॉन व्हॅली या नावाने प्रसिद्धीस आला असून याचे महत्व सोन्यापेक्षाही अनेक पटीने वाढले आहे.  


ज्ञानदीप फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सु. वि. रानडे हे सध्या याच ठिकाणी कायमच्या वास्तव्यास गेले आहेत. त्यामुळे तेथील सर्व माहिती व फोटो मिळणे शक्य असल्याने ज्ञानदीपच्या मायसांगली आणि मायकोल्हापूर या लोकप्रिय वेबसाईटच्या धर्तीवर माय सिलिक़ॉन व्हॅली या नावाची एक बहुभाषिक वेबसाईट (www.mysiliconvalley.net) तयार करण्याचे काम ज्ञानदीपने हाती घेतले असून लवकरच ती कार्यान्वित करण्यात येईल.


वेबयाईटच्या नावात "माय" म्हणून जो प्रत्यय जोडला आहे त्याला माझी हा एक विशेष अर्थ आहे.  ज्याप्रमाणे  स्थानिक रहिवाशांना आपल्या निवास स्थानाबद्दल किंवा क्षेत्राबद्दल अभिमान असतो. त्याप्रमाणे सिलीकॉनव्हॅलीमधील  सर्व रहिवाशांना  सिलिकॉन व्हॅलीविषयी आपलेपणाची व अभिमानाची जाणीव व्हावी या दृष्टीकोनातून वेबसाईटचे नाव निवडले आहे.


तेथे सध्या कार्यरत असणा-या बहुतेक वेबसाईट्स आयटी आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित आहेत. त्यांत व्यवसायांविषयी आणि उद्योग आस्थापनांबद्दल खूप माहिती आहे. काही साइट्स धार्मिक आणि सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य करणा-या आहेत व त्याही विशिष्ठ देशवासियांसाठी वा व्यवसायासाठी  आहेत. 


उद्देश - या वेबसाईटवर सहसा उपलब्ध नसणारी व बे एरिया म्हणून ओळखल्या जाणा-या प्रदेशाची भौगोलिक, ऐतिहासिक माहिती, तेथील निसर्गसंपदा, प्राणी व पक्षी, हवामान, वाहतुक तसेच प्रशासकीय आणि पायाभूत सुविधांची माहिती संकलित करणे व तेथे असणा-या वा जाऊ इच्छिणा-या परदेशी व्यक्तींसाठी मार्गदर्शन करणे असा महत्वाकांक्षी उद्देश या वेबसाईट निर्मितीमागे आहे. 


वेबसाइटचे प्रस्तावित मुख्य विभाग


 1. अमेरिका, कॅलिफोर्निया, बे एरिया आणि त्यातील सिलिकॉन व्हॅली यांचा इतिहास आणि भूगोल

2. भौगोलिक वैशिष्ट्ये, पाणी, माती, पर्यावरण आणि बदलते हवामान.

3. वनस्पती आणि झाडे, वन्य प्राणी

4. रस्ते व इमारती, वाहतूक व्यवस्था

5. देश आणि त्यांचे प्रशासन

6. पाणी पुरवठा, सांडपाणी विल्हेवाट, वीज

7. रुग्णालये, शाळा, ग्रंथालय, शासकीय कार्यालये, मनोरंजन केंद्र, दुकाने आणि मॉल

8. स्थानिक आणि प्रादेशिक समस्या.

9. अभिप्राय आणि अभ्यागत मंच


वरील मुद्द्यांबद्दल आम्ही काही मूलभूत माहिती संकलित केली आहे ती पुढील ब्लॉगमध्ये देणार आहे.परंतु प्रस्तावित वेबसाईटची व्याप्ती आणि उपयुक्ततेविषयी सूचना आणि माहिती यांचे स्वागत आहे.


आशा आहे की ही वेबसाइट ज्ञानदीप इन्फोटेक आणि ज्ञानदीप फाऊंडेशन यांच्या प्रगती आणि सहकार्याचे नवीन दालन उघडेल. अर्थात यासाठी आपणा सर्वांचे सक्रीय साहाय्य मिळाल्यासच हा प्रकल्प यशस्वी होऊ शकेल. याची आम्हाला जाणीव आहे.


आपण या उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करावे ही विनंती.

Monday, May 13, 2019

माझी देवपूजा


वरील नावाचा ब्लॉग पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल याची मला खात्री आहे. माझा देवावर विश्वास नाही हे मी याआधीच आपल्याला ठासून सांगितले होते. मग मी देवपूजा करतो हे काय गौडबंगाल आहेअसे तुम्हाला वाटणे साहजिक आहे. पण आता मी देवपूजा करायला लागलो याचे कारण अगदी वेगळे आहे


घरातला थोरला मुलगा म्हणून लहानपणी माझ्याकडा देवपुजेचे काम असे. पुढे शाळेत शिकताना मला पुस्तके वाचण्याचे प्रचंड वेड लागले. अशी पुस्तके वाचताना मला पाश्चात्य तत्वज्ञानाची ओळख झाली. निसर्गातील अतर्क्य गोष्टींचा कार्य कारण भावाने अन्वयार्थ लावणे अशक्य असल्याने  मनाला समाधान देण्यासाठी माणसाने देव या संकल्पनेची निर्मिती केली आहे असे लक्षात आल्याने त्याची पूजा करून काही साध्य होऊ शकत नाही व देवपूजा, धार्मिक रूढी व परंपरा यावरचा माझा विश्वास उडाला. माझी देवपूजाही थांबली माझा वर्गमित्र डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धानिर्मूलन चळवळीचा मी समर्थक होतो 


तरीदेखील घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या श्रद्धेला तडा जाऊ नये व लहान भावांच्या संवेदनशील मनांवर माझ्या नास्तिकतेचे सावट पडू नये म्हणून मी देवाला नमस्कार करणे, देवळात जाणे वा धार्मिक परंपरांचे पालन करणे मी कटाक्षाने करीत असे. बाहेर मित्रांशी वाद घालताना मात्र मी माझे विचार त्यांना पटवून देण्यात आघाढीवर असे.मात्र समाजमनाविरूद्ध संघर्ष करण्याचे धैर्य माझ्यात नव्हते.


१९७० साली माझे लग्न झाले. माझी पत्नी सौ. शुभांगी अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची होती. तरी तिने मला माझ्या निधार्मिकतेला कधी विरोध केला नाही. तिची रोजची देवपूजा अगदी साग्रसंगीत असे. देवपूजा, पोथीवाचन करण्यात तिला विलक्षण समाधान वाटत असे. माझ्यादृष्टीने  भ्रामक असणारे ते समाधान तिला दिवसभर प्रसन्न ठेवे. त्या  समाधानाला माझी बुद्धीच मला नाकारत होती.अर्थात तिच्या श्रद्धेसाठी मीही देवधर्म करीत होतो. मी जरी सांगितले की माझा विश्वास नाही हे देवाला माहीत असेलच मग माझ्या नमस्काराचा काय उपयोग. ती म्हणे असूदे माझ्या दृष्टीने तुम्ही नमस्कर केला तेवढे पुरेसे आहे.


मुलीकडे ती एकटी गेली होती तेव्हा तिची आठवण म्हणून मी तिच्यावतीने मी देवपूजा करीत असे. हे तिला कळल्यावर तिला झालेला आनंद माझ्या स्मरणात आहे. गेल्या काही वर्षांत आजारीपणामुळे पूजा करणे शक्य नसल्याने मी देवपूजा करत असे पण ती वरवरची असे.


ती गेल्यानंतर माझी देवपूजाही थांबली. अमेरिकेत मुलाकडे गेल्यावर लक्षात आले की तेथे धार्मिक संस्कार हे त्यांना आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचे वाटतात. माझी सून मधुरा म्हणाली बरे झाले आता तुम्ही व्यवस्ठित पूजा कराल. छोट्या दोन्ही मुलींनाही देवपूजेची आवड आहे व त्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार होतात हे माझ्या ध्यानात आले आणि मी पुन्हा देवपूजेला सुरुवात केली. नमस्कार करून नैवेद्याची साखर खाण्याचा आनंद मला त्यांच्या नजरेत दिसे.


अमेरिकेतून सांगलीत परत आल्यावर मी आमच्या देवघराकडे नजर टाकली व कोळीष्टकात विखुरलेले अनेक फोटो, मूर्ती व देवपुजेचे साहित्य पाहून कसेसे वाटले. सौ. शुभांगीसारखी साग्रसंगीत पूजा करण्यासही मन तयार होईना. मग मी निर्ण. घेतला. प्रतिकात्मक काही थोड्या मुर्तींची पूजा करायची


मी मग सर्व पसा-यातून चार देव मी निवडले ते असे


१.     
  देवी – सरस्वती, लक्ष्मी आणि आदि शक्तीचे प्रतीक असणारी देवीची मूर्ती


२.     
  गणपती – बुद्धीदेवता म्हणून नर्मदेतील लाल रंगाचा पाषाण


३.      
गोमाता व वासरू – मातृत्व आणि प्रेमाचे प्रतीक


४.     
  सिलिकॉन चिप – २००४ मध्ये अमेरिकेतील स्टॅन्फोर्ड विद्यापिठातील आवारातून भक्तीभावाने आणलेला तेथील दगड तेथील सिलिकॉन चिपचे प्रतिनिधीत्व करणारा. ( त्यावेळी ज्ञानदीपच्या सदस्यांना मी असे दगड आणि एक एक डॉलर दिले होते ) 


हे सर्व देव चिंचेने नीट घासून धुतल्यावर त्यांचे मूळ तेजस्वी रूप दिसू लागले. 


देवघराची स्वच्छता करून व सौ. शुभांगीचा फोटो लावून त्च्या साक्षीने मी देवपूजा केली.



आणि त्यावेळी मला तिच्या श्रद्धा व समाधानाचा मनोमन प्रत्यय आला.आता अशी पूजाच मला तिचे दर्शन व समाधान देईल अशी मला खात्री पटली.