Sunday, September 30, 2018

अशा शाळा, असे शिक्षक - ६

सांगली हायस्कूल


कृष्णा नदीच्या काठी एका उंचावटयावरील सहा गल्ली असलेलं गाव म्हणजे सांगली. १८०१ साली मूळ मिरज जहागिरीतून फुटून पहिल्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी वेगळं राज्य बनवलं तेव्हापासून या गावाचा खऱ्या अर्थांनं इतिहास सुरु झाला. शिक्षण हेच आर्थिक, सामाजिक, सांकृतिक विकासाचा पाया असल्याने शिक्षणाचे महत्व ओळखून श्रीमंत धुंडीराज उर्फ तात्यासाहेब पटवर्धन यांच्या काळात सांगली संस्थानात शिक्षणाला सुरुवात झाली.

१८६४ साली सांगली इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. सांगलीत इ.१८६४ मध्ये सुरु झालेल्या इंग्लिश स्कूललाच नंतर इंग्रजी माध्यमांचे स्वरुप आले असावे. तत्कालीन संस्थानाधिपती धुंडिराज तात्यासाहेब पटवर्धन यांच्या कारकिर्दीत सुरु झालेल्या या पहिल्या इंग्लिश स्कूलमध्ये इ.स. १८७८ पर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी होते. या शाळेच्या इ.स. १८८२ मध्ये झालेल्या पुर्नरचनेनंतर सहाव्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या शंभरावर पोहोचली त्यावेळी ही शाळा राजवाडयातील एका भागात भरत होती. क्रिकेट आणि गायनाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देणारी ही सांगलीतील पहिली शाळा म्हणता येईल. त्या काळात इंग्लिश स्कूल ही एकमेव सरकारी शाळा होती. याच शाळेची पुढे १८८४ साली 'सांगली हायस्कूल, सांगली' या नावाने शाळा सुरु झाली. हणमंतराव भोसले या प्रख्यात क्रीडाशिक्षकामुळे क्रिकेटपटू विजय हजारे, बॅडमिंटन पटू नंदू नाटेकर यांच्यासारखे क्रीडाक्षेत्रातील नामवंत या शाळेला देता आले. चित्रकला, गायन, तालीम, क्रिकेट अशा विषयांसाठी वेगवेगळा शिक्षक नेमण्याची प्रथा एकेकाळी या शाळेत होती.

स्वातंत्र्योत्तर काळात शासनाने ही शाळा १ एप्रिल १९५३ साली तंत्रशिक्षण सुरु करण्याच्या अटीवर लठ्ठे एज्युकेशन सोसायटीकडे हस्तांतरीत केली. शास्त्र शाखेचा उच्च माध्यमिक विभाग १९७५ मध्ये आणि १९८८ मध्ये व्यावसायिक शिक्षण (एम.सी.व्ही.सी.) विभाग सुरु झाला. लठ्ठेतंत्रनिकेतनची सुरवात या शाळेच्या आवारातच झाली. तंत्रशिक्षणासह या शाळेला आधुनिक स्वरुप देण्यात नेमगोंडा दादा पाटील, आमदार कळंत्रेआक्का, अ‍ॅड.केशवराव चौगुले, जी.के. पाटील, टी.के. पाटील, अ‍ॅड एस.एस. पाटील. बापूसाहेब कुंभोजकर आदी मंडळीचा मोठा सहभाग आहे.

सांगली हायस्कूल भूषण - माजी विद्यार्थी
प्रख्यात ज्ञानपीठ परितोषिक विजेते थोर साहित्यिक वि.स.खांडेकर, कविवर्य यशवंत, उदयोगपती आबासाहेब गरवारे, स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे, बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, साहित्यिक श्रीनिवास शिंदगी, स्व.आण्णासाहेब लठ्ठे, गुरुनाथ गोंविद तोरो, शीघ्र कवी गोपाळ गोविंद मुजुमदार उर्फ साधुदास, शास्त्रीय संगीताचे गाढे संगीतज्ञ प्रा.ग.ह.रानडे, केशवसुत संप्रदायाचे अध्वर्यु धोंडो वासुदेव गद्रे तथा कवि काव्यविहारी अशी या शाळेची माजी विद्यार्थ्यांची परंपरा आहे.

परदास्याची बेडी होती पायी तव जेधवा
पुत्र शहाणे तुझे दंगले संसारी तेधवा
काही वेडी तयाची भडकुनी गेली मने
क्रांती पूजा केली त्यांनी रुधिराच्या तर्पणे

राष्ट्रयोगिनी माजी आमदार कळंत्रेआक्का, स्वातंत्र्य आंदोलनात प्राणाची आहुती देणारे हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे, देशरक्षणार्थ देशाच्या सरहद्दीवर कर्तव्य बजावताना वीरमरण पावलेल्या हुतात्मा स्कॉड्न लिडर अनिल घाडगे, कवी गिरीश, प्रसिध्द कायदेतज्ञ केशवरावजी चौगुले, स्वातंत्र्य सैनिक स्व. आण्णासाहेब पाटील, सिंहगड एज्यु. संस्थेचे संस्थापक प्राचार्य श्री.एम.एन. नवले तसेच मुंबईचे प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ. महेंद्र परीख, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, प्रसिध्द ग्रंथतज्ञ डॉ. वसंतराव खाडीलकर, मा.खासदार प्रकाश बापू पाटील, माजी आमदार प्रा.शरद पाटील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विजय हजारे, प्रसिध्द बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, कबड्डीपटू शंकर गावडे, अर्जुन पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू राजू भावसार, वेटलिफ्टींग चॅम्पियन अनिल पाटील, राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू आसिफ मुल्ला यांच्या सारखे कीर्तिमान माजी विद्यार्थी याच हायस्कूलचे विद्यार्थी आहेत.

अशा शाळा, असे शिक्षक - ५

डॉ. देशपांडे स्मृतिमंदीरच्या डॉ. लता देशपांडे 

माजी नगराध्यक्ष कै. डॉ. जी. ए. देशपांडे यांच्या कन्या श्रीमती लता व अरूणा देशपांडे या भगिनी डॉ. देशपांडे स्मृतिमंदिराच्या माध्यमातून सांगली परिसरातील मुलामुलींसाठी व दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम चालवीत आहेत.
(श्रीमती लता देशपांडे)
        शिशुविकास मंडळ - जिजामाता बालमंदिराला जोडूनच सौ. पुष्पावती देशपांडे शिशुु संगोपन मंदीर हे पाळणाघर चालविले जाते. तसेच सांगलवाडीला ना. खाडिलकर बालमंदीरही चालविले जाते. सांगलीमध्ये डॉ. देशपांडे बाल विद्यामंदीर या नावाने एक प्राथमिक शाळाही काढण्यात आलेली आहे.
        डॉ. देशपांडे स्मृतिमंदीरातर्फे अनेक स्तुत्य उपक्रम हाती घेतलेले आहेत.
आरोग्य मंदीर - खरकटवाडी येथे डॉ. देशपांडे यांचा दवाखाना असून तेथे गोरगरिबांना मदत देण्यात येते.
अभ्यास मंदीर - गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा उपलब्ध करून देणे, मार्गदर्शन करणे व पुस्तक पेढी चालविणे. या योजनांचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होत आहे.
उद्योग मंदीर - लहान वयात स्वावलंबनाची सवय लागावी, स्वकष्टार्जित पैसा मिळविण्याचा आनंद लाभावा, कमवा व शिका योजना राबविता यावी हा या योजनेचा उद्देश.
संस्कार मंदीर - प्रत्येक रविवारी गीतापाठ, संस्कृत श्लोकपाठ याद्वारे किशोर किशोरींचा संस्कार वर्ग घेतला जातो.तसेच खरकटवाडी येथेही संस्कार केंद्र चालविले जाते.
कला मंदीर - होतकरू मुलांच्या चित्रकला, नाट्यकला गायन यासारख्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना जागा, साधने, साहित्य आणि मार्गदर्शन केले जाते.
क्रीडा मंदीर - विविध खेळांसाठी जागा व साधने उपलब्ध करून देणे, स्पर्धा घेणे.
विज्ञान मंदीर - विज्ञानाच्या या युगात मुलामुलींच्या बुद्धीला चालना देण्यासाठी प्रयोगशाळेची व खटपटघराची योजना आहे.   बालमंदीरांसाठी खेळणी व साधनांची बँक - सर्व बालवाड्यांना विविध प्रकारच्या खेळण्यांचा लाभ मिळावा हा यामागील उद्देश आहे.
  स्मृति मंदीर - कै. डॉ. जी.ए. देशपांडे यांच्या विविध स्वरूपातील दुर्मिळ स्मृतींचे जतन करणे.
      एक नाविन्यपूर्ण `बालभवन` उभारण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी श्रीमती लता व अरूणा देशपांडे या दोघीही अहोरात्र झटत आहेत.

स्त्रीशिक्षणाचे सांगलीतील अग्रगण्य शिल्पकार गुरुवर्य कै. य. द. लिमयेसर



 राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेचे मुख्याध्यापक श्री. य. द. लिमये यांच्याशी माझी पहिली ओळख झाली ती १९६८ मध्ये. मला विज्ञानाची आवड असल्याने मुंबईच्या मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक श्री. म. ना. गोगटे यांना आमच्या वालचंद कॉलेजमध्ये भाषण देण्यासाठी सांगलीस मी बोलाविले होते. त्यांनी सांगलीत मराठी विज्ञान परिषदेची स्थापना करण्याची कल्पना मांडली. श्री य. द. लिमये व आरवाडे हायस्कूलमधील भूगोल शिक्षक श्री. शंकरराव सोमण यांच्याबरोबर आमची बैठक होऊन श्री. य. द. लिमये यांच्या पुढाकाराने राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेतच अशी संस्था आम्ही सुरू केली.

त्यावेळी संस्थेच्या कामानिमित्त मी अनेकदा त्यांच्या घरी जात असे व आमचा चांगला स्नेह संबंध निर्माण झाला होता. श्री. य. द. लिमये ह्यांची प्रखर विज्ञाननिष्ठा व समाजवादी विचारसरणी यांचे संस्कार त्यावेळी माझ्या मनावर झाले. पुढे ३/४ वर्षातच काही कारणानी ती संस्था बंद पडली तेव्हा लिमये सरांनी माझ्याकडे स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.पुढे अनेक वर्षांनी म्हणजे १९८१ साली त्यांच्याच पेठभाग शाळेत ‘मराठी विज्ञान प्रबोधिनी’ या नावाने संस्था सुरू झाली ती आता नियमितपणे विज्ञान प्रसाराचे कार्य करीत आहे.

य. द. लिमये यांचा जन्म २२-१-१९२४ रोजी सांगलीत झाला. शालेय शिक्षण १९३४ पासून सिटी हायस्कूलमध्ये झाले. शाळेत मित्रमंडळ स्थापन करून चर्चा व वादविवाद मंडळ सुरू करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. शालेय शिक्षण झाल्यावर त्यांनी बी.ए.बीटी पदवी संपादन केली व ते राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेतच शिक्षक म्हणून रुजू झाले.

य. द. लिमये यांच्या पत्नी सौ. लीलाताई लिमये या बेळगावच्या प्रा. गोविंदराव केळकर यांच्या कन्या. त्याही याच शाळेत शिक्षिका होत्या. दोघांना शिक्षणाची व राष्ट्र सेवा दलाच्या कार्याची आवड असल्याने त्यांनी एकत्र येऊन आपले जीवन मुलींच्या शिक्षणासाठी व्यतीत करण्याचे ठरविले. त्या काळात रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन अत्यंत साधेपणाने लग्न करण्याचे धाडस त्यानी दाखविले.त्यांच्याशी एकदा गप्पा मारताना त्यांनी सहज आपल्या लग्नाची गोष्ट मला सांगितली. हार, एक पेढ्याचा पुडा व फुलाची वेणी एवढ्याच साहित्यानिशी रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी लग्न केले. येताना टांग्याने दोघे घरी आले. हाच त्यांचा लग्न समारंभ.

 त्यानंतर ३६ वर्षे शिक्षक व त्यातील १८ वर्षे मुख्याध्यापक व वुईमेन्स एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह म्हणून कार्य करून संस्था नावारुपाला आणण्यासाठी, तिला जनमानसात प्रतिष्ठा व प्रेमाचे स्थान मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले.विविध विषय शिकवणारे, व्यासंगी उत्तम शिक्षक व शिस्तप्रिय प्रशासक म्हणून त्यांनी नावलौकीक मिळविला.साधी राहणी, स्पष्टवक्तेपणा व शिस्तीचे भोक्ते असूनही ते सतत आनंदी व हसतमुख असायचे. मुलींच्यात सामाजिक जाणीव निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी भाऊबीजेला रिमांडहोममधील मुलांना फराळाचे नेऊन देण्याची प्रथा त्यानीच सुरू केली.

मुलींनी खासगी शिकवण्यांना जाऊ नये व गरीब मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून कोणतेही मानधन न घेता रोज दोन तीन तास शाळेत जादा शिकविणारे त्यांच्यासारखे शिक्षक विरळाच. मुख्याध्यापक म्हणून मिळणारे अधिक वेतन त्यानी कधीही स्वत:साठी घेतले नाही तर ते संस्थेस सुपूर्त केले. १२-९-१९८२ मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ग. प्र प्रधान यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कै. वि. द. घाटे या शिक्षण तज्ज्ञांचे हस्ते ’गुरुदेव’ सुवर्णपदक अर्पण करण्यात आले.

निवृत्तीनंतरही ते नियमितपणे संस्थेच्या कार्यात मदत करीत असत व अखंडपणे विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्याचे व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे त्यांचे कार्य चालू असे.

१४ फेब्रुवारी २००४ रोजी त्याचे दु:खद निधन झाले. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शास अनुसरून संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू आहे. आता त्यांची कन्या सौ. मेधा भागवत यांचे नेतृत्व संस्थेस लाभल्याने संस्थेचा अधिक गतीने सर्वांगीण उत्कर्ष होईल यात शंका नाही. संस्थेचा विस्तार आता खूपच मोठा झाला असून श्रीमती उषा कुलकर्णी कार्यवाह म्हणून ती जबाबदारी समर्थपणे सांभाळीत आहेत.




Friday, September 28, 2018

अशा शाळा, असे शिक्षक - ४

सांगली परिसरातील गेल्या पिढीतील  काही ध्येयवेड्या आदर्श शिक्षकांची माहिती खाली देत आहे.
१. कै. श्रीकांत विष्णू रानडे, B.Sc B.Ed
जन्मतारीख :- १३ जानेवारी १९४९  मृत्यु - १ फेब्रु. २०१६


माध्यमिक शिक्षण :- न्यू इंग्लिश स्कूल सातारा, सिटी हायस्कूल सांगली
महाविद्यालयीन शिक्षण :- विलिंग्डन कॉलेज, KWC कॉलेज सांगली, पुतळाबेन शहा कॉलेज ऑफ़ एज्युकेशन सांगली
शैक्षणिक अनुभव :- ४१ वर्षे - विदुयामंदीर प्रशाला, सध्या वा.रा.खवाटे हायस्कूल अंकली
१९७०-१९७७१ उपशिक्षक शे.रा.वि.गो.हायस्कूल माधवनगर
 ११९७१-२००७ उपशिक्षक पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक मुख्याध्यापक, प्राचार्य



शैक्षणिक कार्य 
(१) नवीन अभ्यासक्रमावर आधारीत गणित विज्ञान पर्यावरण प्रशिक्षण घेतले व तज्ञ मार्गदर्शक म्हणुन काम केले.
(२) पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती) व SSC Board प्रकाशीत शालेय पुस्तकांचे परीक्षण
(३) संशोधन प्रकल्प
 (१) वेळापत्रकाची पुर्नरचना - जिल्हास्तरीय पारितोषिक
 (२) शालेय दिनदर्शिका पुर्नरचना - जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक
 विस्तारसेवा केंद्र B.Ed  College संचलित
 (३) ग्रामीण निमशहरी, शहरी शाळांतील अभ्यासक्रम व अभ्यासेत्तर उपक्रम यांचा प्रकल्प - SSC Board - १०००० रूपये अनुदान
(१९९८-१९९९-२०००) तीन वर्षे संशोधित कार्य २००० साली
(४) इ.३री ते ८वी विज्ञान पाठ्यपुस्तकांचा अभ्यास व संशोधन प्रकल्प ५००० रू. अनुदान - पाठ्यपुस्तक मंडळ
 (५) SSC Board - गुणवत्ता यादीत ६० विद्यार्थ्यांचा सहभाग
 HSC Board - गुणवत्ता यादीत ४० विद्यार्थ्यांचा सहभाग
 १९९९ HSC Board राज्यात शाळेचा प्रथम क्रमांक
अभ्यासेतर उपक्रम -
 (१) डॉ.भाभा विज्ञान मंडळ - संचलन व मार्गदर्शन
 तालुका जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक बक्षीसे संचालक १० वर्षे,  नागपूर मुंबई बेंगलोर कलकत्ता विज्ञान प्रदर्शनात सहभाग
 (२) डॉ.बोस सृष्टीनिरीक्षक मंडळ(निसर्ग मंडळ) WWF संचलीत World Wild Fund of India जागतिक वन्य जीवन निधी संचालक १० वर्षे
 सामाजिक कार्य 
(१) मराठी विज्ञान प्रबोधिनी - आजीव सदस्य
(२) भारतीय शिक्षण मंडळ - आजीव सदस्य
(३) बालविज्ञान प्रबोधिनी - कार्यवाह
 (४) निसर्ग मित्र संस्था - कार्यवाह
(५) MTSE - महाराष्ट्र टॅलन्ट सर्च एक्झाम - समन्वयक गेली १२ वर्षे उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार - डॉ.आनंद कर्वे(शास्त्रज्ञ) व डॉ.रा.ग.जाधव - मराठी साहीत्य महामंडळ अध्यक्ष यांचे   हस्ते
(६) राष्ट्रीय बालविज्ञान परीषद नवी दिल्ली

जिल्हा समन्वयक १० वर्षे विभागीय समन्वयक ३ वर्षे
राष्ट्रीय स्तरावर प्रकल्पांना मार्गदर्शन सांगली सातारा कोल्हापूर
 (७) दैनिक लोकमत व Air India यांच्यातर्फे संयुक्तपणे दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार नागपूर येथे
(८) सहली निसर्ग शिबीरे चर्चासत्रे व्याख्याने परीसंवाद सहभाग गेली २० वर्षे
(९) आजी व सदस्य MTE Society - महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे

२. गुरुवर्य कै.  नागेश व्यं. धोलबा

सांगली शहर आणि जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रावर ज्या काही निवडक गुरुजनांचा ठसा उमटला आहे. जवळ जवळ गेली चार तपे या परिसरातील विध्यार्थ्यात अत्यंत आदराने ज्यांचा आवर्जून नामोल्लेख होतो आहे अशा आदरणीय आणि विद्यार्थीप्रिय बोटावर मोजता येतील अशापैकीच एक सकल कलागुण संपन्न, अत्यंत शिस्तबध्द करडे परंतु विद्यार्थ्यावर मायेची पाखर घालणारे, त्यांच्यावर पुत्रवेत प्रेम करुन त्यांना सुसंस्कारित करण्याकरिता निरनिराळ्या उपक्रमांची परिसीमा गाठणारे. वर्गात खडू-फळा, दृक्‌-श्राव्य शिक्षण साहित्य, प्रयोगशाळेतील उपकरणे, भूगोल, नकाशे, भाषाशास्त्र, विज्ञान विषयात तल्लीन होणारे, आणि आपल्याबरोबरच आपले विद्यार्थी आणि सहपाठी, सहकारी शिक्षक सर्वाना त्यांत एकरुप करुन घेणारे आणि तितकेच वर्गाबाहेर क्रीडा मैवानावर, लाठी, काठी, फरीगदगा, लेझीम, क्रिकेट, टेबलटेनिस, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, बास्केट्बॉल, वगैरे सारख्या देशी-विदेशी खेळात नुसते उत्कृष्ट खेळाडू म्हणूनच नव्हे तर, पहिल्या आशियाई सामन्यात १९५१ साली अथॅलेटिक्ससाठी एक पंच, मुं.शालेय सामन्यात संचालक, शिवाजी विद्य़ापिठाचे झोनल इंटर झोनल प्रमुख निवडसमिती सभासद, आफ्तर विद्यापीठ टे.टे. साठी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापक, कर्नाटक विद्यापीठ सामन्यात कप्तान. विज्ञान प्रदर्शने भरविणे पेपर सेटर परीक्षक, मॉडेटर, जवळ जवळ दोन तपात २२ शिक्षक मार्गदर्शक शिबिरे शास्त्र शिक्षक संघटन, एवढेच नव्हे तर शालेय आणि विद्यापिठिय रंगभूमिवर एक उत्कृष्ठ कलाकार दिग्दर्शक, अशा अनेक पैलू मधून आपल्या सर्वगुण संपन्न्तेचा लाभ शिक्षण संस्था आणि शिक्षण क्षेत्राला देणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व गुरुवर्य नागेश व्यं. धोलबा(सर).

 सांगली पासून ते पलूस, पुणे,अलिबाग पर्यत ज्यांचे विद्यार्थी नमवंत डॉक्टर्स म्हणून प्रसिध्द आहेत. शिक्षण क्षेत्रात ज्यांचे विद्यार्थी आज अनेक ठिकाणी मुख्याध्यापक, प्राध्यापक म्हणून ख्यातकीर्द आहेत. बॅंक्स, इलेक्ट्रोनिक्स, शिल्पशास्त्र, इंजिनिअरिंग, औषध उत्पादन, केमिकल इंजिनिअरिंग, कॉस्ट अकौंटन्सी आणि वकिली व्यवसायात अनेक ठिकाणी अनेक लोक आपल्या पद आणि पदवी इतकाच आमचे घोलबा सर म्हणून ज्यांचा आदर पूर्व उल्लेख करतात आणि सुधीर मोघ्यांसारखा कलाकार आपल्या कलांकार घडणीत घोलबासरांचा महत्वाचा वाटा आहे. म्हणून अभिमानाने सांगतो त्या नेरुरला जन्मलेल्या घोलबासरांनी शिक्षण कालांत वडिलांच्या रेल्वेतील फिरत्या नोकरीमुळे मद्रास, विजवाडा येथे ५ वी पर्यंत तेलगू भाषेत शिक्षण घेण्यात व्यतीत केले व बेळगांव येथे बी.एस्‌.सी. नंतर १० वी पर्यंत कानडी माध्यमातून अध्यापन केले. म्हणून सांगितले तर एखाध्याला खरेही वाटणार नाही. जरंतु तेलगू भाषेतून शिक्षणाची सुरुवात झालेली असतांना देखील  नंतर मराठी माध्यमातून त्यांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक, भौतिक विषय घेऊन बी.एस्‌.सी. पुढे शास्त्र शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रात असतांनाच डी.पी.एड्‌, बी.एड्‌ च्या पदव्याही वरच्या क्रमांकाने मिळवल्या. युनिव्हर्सिटी ग्रॅंट्स्‌ कमिशनच्या उन्हाळी वर्गात केमिस्ट्री उपमुख्यापकात पहिल्या पाचात नंबर मिळवला. निरनिराळ्या शिक्षण संस्थांतून अध्यापक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक पदे भूषविली. एवढेच नव्हेतर एस्‍.टी.सी. चे प्राचार्य पद, बी.एड्‌. कॉलेज मध्ये गणीत, शास्त्र, भूगोल, शा. शिक्षक. दृक-श्राव्य शिक्षणाच्या लेक्चरर पदाबरोबरच मेथड मास्टर म्हणूनही कारर्किर्द गाजविली. ८१ साली नोकरीतील नियमानुसार उपमुख्याध्यापक पदावरुन सेवानिवृत्ती स्विकारली. तरी शिक्षण क्षेत्र मात्र त्यांना पुन्हा साद घालीत असतेच                आणि शिक्षण क्षेत्रातला असामान्य असा ह गुरुवर्य भावी पिढीसाठी बहुमोल असे आपले शैक्षणिक योगदान पहिल्याच उमेदीने हसत मुखाने करीत आहे. त्यांचे सर्वक्षेत्रातील गेल्या चार तपातील शिष्य आपली भावी पिढीही घोलबासरांकडून घडावी म्हणून त्यांना साकडे घालीतच असते. आणि आपल्या आई-वडीलांच्या अत्यंत आवडत्या घोलबासरांकडे नवीन पिढी आदरणीय भावनेने धडे घेत असते. आपापल्या शिक्षण संस्थात प्राविण्य संपादित असते.
३. कै. गोविंद पांडुरंग कंटक - MA B.Ed
 निवृत्त उपमुख्याध्यापक विद्यामंदीर प्रशाला, मिरज
 गोविंद पांडुरंग कंटक यांचा सांगली जिल्ह्यातील एका खेड्यात जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची. वडील मिरजेच्या भारतभूषण शाळेत शिक्षक होते. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण F.Y B.Sc पर्यंत केल्यानंतर शिक्षक म्हणून कामास सुरवात. पूर्वी शिक्षक जून ते एप्रिल पर्यंत नोकरीस असत. एप्रिलला शिक्षकाची नोकरी खंडीत होत असे. पगार १० ते १२ रूपये होता. कोणत्याही प्रकारचे स्थैर्य नोकरीत नव्हते. स्वाभिमानी स्वभावामुळे संस्थाचालकाकडे नोकरीची लाचारी न केल्यामूळे ११ शाळात नोकरी करावी लागली. उत्तम अध्यापन, प्रचंड बुध्दीमत्ता व कल्पकता, सतत धडपडण्याची वॄत्ती परंतू स्वभाव थोडा तापट. यामुळे असंख्य अडचणीतून प्रवास. विद्यामंदीर प्रशाला, मिरज येथे नोकरीस आल्यानंतर संस्थेने त्यांची कायम पदावर नियुक्ती केली. उपशिक्षक, पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक म्हणून कार्य केले. नोकरीच्या काळात BA, MA मराठी ह्या पदव्यांचे शिक्षण बाहेरून केले व उच्च श्रेणी मिळवली. सांगलीच्या B.Ed कॉलेजमधून B.Ed कोर्स पूर्ण केला व प्रथम क्रमांकाने पास झाले. ह्या वेळेस देखील ते नोकरी करत होते. मराठी विषयाचे उत्तम अध्यापन करीत असत. परंतू खरी आवड विज्ञानाची.

 त्यामुळे सतत वाचन चिंतन मनन व प्रयोग करण्याची धडपड यांतूनच ते उत्तम विज्ञान शिक्षक बनले. दिवसातील १८ तास ते शाळेत रमत. प्रयोगशाळा हेच त्यांचे घर. ५ वी ते १२ वी पर्यंत सर्व वर्गांना आवडीने ते अध्यापन करीत असत. शाळेमध्ये डॉ. भाभा विज्ञान मंडळाची स्थापना केली व मंडळाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले. त्यांना विज्ञान संशोधक घडविले. तालुका, जिल्हा, राज्य राष्ट्रीय पातळीवर विज्ञान प्रदर्शनात अनेक पुरस्कार त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मिळवून दिले. त्यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे होते. शाळेतील शिक्षकांना ते विविध विषयाचे मार्गदर्शन करीत. शैक्षणिक संशोधन प्रकल्पांना मार्गदर्शन करीत. वेळापत्रकाची पुनर्रचना, शालेय दिनदर्शिका, गुणवत्ता प्रकल्प पाठ्यपुस्तकांचे परीक्षण, ९ वी भूमिती पाठ्यपुस्तकांचे परीक्षण, वैज्ञानिक प्रात्यक्षिकांच्या माध्यंमातून विज्ञानाचे अध्यापन अशा शिक्षकांनी सादर केलेल्या प्रबंधास त्यांनी मार्गदर्शन केले. हे प्रबंध राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत निवडले गेले व शिक्षकांना पुरस्कार मिळाले.

 विज्ञान कथा, वैज्ञानिक प्रयोग, वैज्ञानिक उपकरणे यासंबंधीचे मार्गदर्शन  महाराष्ट्रातील असंख्य शाळेत कंटक सरांनी केले. मिरजेत बालबिद्यार्थ्यांची आषाढी दिंडी काढण्यात त्यांचा मोठा वाटा होता. स्वाध्याय प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांना त्यांनी गुणवान बनविले. मराठी विज्ञान प्रबोधिनीचे ते अध्यक्ष होते. या संस्थेचा आदर्श वैज्ञानिक चा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. निवृत्तीनंतर सावरकर प्रतिष्ठान संचालीत प्रज्ञा प्रबोधिनी प्रशालेत त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम केले. स्कॉलरशिप MTS (महाराष्ट्र प्रज्ञाशोध) NTS (राष्ट्रीय प्रज्ञाशोध) या परीक्षांचे ते उत्तम मार्गदर्शक आहेत. विज्ञान प्रदर्शनाचे संयोजक व परीक्षक त्यांनी काम पाहिले. ते अविवाहीत होते.

४. प्रज्ञा प्रबोधिनीचे शिल्पकार गुरुवर्य कै. नामजोशी सर 

नामजोशी सरांचा जन्म २६ डिसेंबर १९१७ रोजी तासगावला झाला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही हे काही आप्तेष्टांच्या मदतीने मुंबई विद्यापीठाच्या तत्कालीन मॅट्रिक परीक्षेत १९३६ मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. घरच्या बिकट परिस्थितीमुळे उच्चशिक्षणाकडे पाठ वळवून नामजोशी सरांना नोकरी करावी लागली. त्यांनी शिकवण्या केल्या. नाईट स्कूलमध्ये शिकवले. शालेय शिक्षणापासूनच त्यांना कुशाग्र, बुद्धिमत्ता यामुळे ते एक विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले. हे करीत असताना शिक्षकी पेशात कायम राहण्यासाठी ते एस्टीसी झाले. त्यांना पदवी घेण्याची इच्छा असूनही घरच्या जबाबदारीमचळे प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी १९६४ साल उजाडले. शिक्षकी पेशात आवश्यक असलेली बी.एड्. पदवी त्यांनी १९६६ मध्ये मिळवली. १९७५ साली सर सिटी हायस्कूल मधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. त्यांनी ३८ वर्षे शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केली. रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी सावरकर प्रतिष्ठानची स्थापना केली. सावरकर प्रतिष्ठानमध्ये १९८४ साली प्रथम बालवाडी सुरु केली. त्यानंतर एक एक इयत्ता वाढवीत १० वीची पहिली बॅच बाहेर पडली. पतंगराव कदम आणि सगरे यांच्या मदतीने हायस्कूलला परावानगी मिळवली. नामजोशी सरांनी राष्ट्रीय गुणवत्ता परीक्षेची तयारी करुन घेण्यासाठी १९८० मध्ये वर्ग सुरु केले. १९८१ मध्ये दहा विद्यार्थ्यांची पहिली तुकडी परीक्षेस बसली. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने पास झाल्यामुळे मुलाखतीसाठी निमंत्रण आले. त्यातील दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. बारा वर्षात एकूण ३८ विद्यार्थी राष्ट्रीय गुणवत्ता मिळवू शकले. या ३८ विद्यार्थ्यात १० विद्यार्थी मागासवर्गीय आहेत.
नामजोशी सरांचे पुढील प्रमाणे गौरव केले गेले.

पटवर्धन हायस्कूल, तासगांव शाळेतर्फे सत्कार

दामुआण्णा केळकर समितीतर्फे सत्कार

सांगली शिक्षण संस्थेचे मान्यतापत्र

कृष्णा व्हॅलीतर्फे सत्कार

दक्षिण महाराष्ट्र दै. केसरीतर्फे सत्कार

नामजोशी सरांनी दोन पुस्तके लिहिली आहेत.

सुविचार संग्रह व सदाचार संहिता.


स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान संचलित प्रज्ञा प्रबोधिनी बालवाडी ते आय्. ए. एस्. शिक्षण संस्था विश्रामबाग, सांगली. राष्ट्रीय स्तराच्या व प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांसाठी मानवतायुक्त शैक्षणिक गुणवत्ता.

५. आदर्श समाजसेविका- श्रीमती सुमतीबाई फडके

(मी, श्रीमती सुमतीबाई फडके आणि त्यांच्या वहिनी)
सांगलीतील स्त्रीशिक्षण संस्था, मराठी विज्ञान प्रबोधिनी, निसर्ग प्रतिष्ठान या आणि अशाच सार्वजनिक संस्थांच्या जडणघडणीत ज्यांनी आपले सारे आयुष्य झोकून दिले त्या श्रीमती सुमतीबाई फडके यांचे जीवनचरीत्र सर्वानाच प्रेरणादायी ठरेल. आज आयुष्याची पंचाहत्तरी गाठूनही त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे.पुण्याच्या प्रतिष्ठित एस्. पी. कॉलेज आणि टिळक बी. एड. कॉलेज यांतून सन्मानपूर्वक पदवी घेतल्यानंतर सुमतीबाइंनी शिक्षण हेच आपले कार्यक्षेत्र निश्चित केले. प्राचार्य सोनोपंत दांडेकर, श्री. म. माटे, के. ना. वाटवे, पु. ग. सहस्त्रबुध्दे इत्यादी दिग्गज बुध्दीवंतांकडून मिळालेली शिकवण आणि प्रा. नरहर कुरुंदकर, ग. प्र. प्रधान, साने गुरुजी, एस्. एम्., नानासाहेब गोरे यांच्या सामाजिक विचारांनी भारून राष्ट्रदलाच्या सच्च्या सेविकेचे व्रत त्यांनी आयुष्यभर स्वत:हून स्वीकारले आहे. विवाहबंधनात न अडकता आईची सेवा, सामाजिक संस्थांचे कार्य आणि मुलांवर चांगले संस्कार हेच त्यांनी आपले सर्वस्व मानले.


साधेपणा, नीटनेटकेपणा, इंग्रजी वाचनाची प्रचंड आवड, भाषांतर तसेच संस्थांच्या कार्याची रेखीव टिपणे ही त्यांची खास वैशिष्ट्ये सांगता येतील. पहाटे पाचला उठल्यापासून विविध इयत्तांतील मुलांच्या अभ्यासातील शंका सोडविणे, घरकाम, बागकाम, वाचन, गीतादर्शन, विज्ञानविषयक लेखांची टिपणे काढणे, वसंत बापट, शांता शेळके, सरोजिनी बाबर यांच्या कविता व श्री. म. माटे यांचे लेख वाचणे यात दिवस कसा निघून जातो ते कळत नाही. या वयाच्या लोकांचा सहसा देवाधर्मात वेळ जातो. पण सुमतीबाइंर्ना देवधर्म संस्कारांत कधीच रस वाटला नाही. सूर्य हा एकच देव त्या मानतात व सर्वांना शक्ती व प्रकाश देणे हीच त्याची पूजा अशी त्यांची श्रध्दा आहे. समतेसाठी व न्यायासाठी आंदोलनात कार्यरत राहावे असे त्यांना वाटते.मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, सर्वांनी सामाजिक जाणीव ठेवून व आपली जबाबदारी ओळखून व्यवस्थितपणे काम करावे यावर त्यांचा कटाक्ष असतो.

त्यांचे जीवन म्हणजे सांगलीतील एक ज्ञानदीपच आहे. त्यांचे कार्य असेच चालू राहो आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नवे कार्यकर्ते तयार होवोत ही शुभेच्छा !

अशा शाळा, असे शिक्षक - ३

ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. ही संस्था सुरू केल्यानंतर आम्ही मराठीतून सांगलीची माहिती देणारी मायसांगली डॉट कॉम नावाची वेबसाईट सुरू केली. त्यात सांगलीतील शिक्षणपरंपरा या विषयावर सिटी हायस्कूलचे मुख्याध्यापक कै. शं. ना. फाळके यांनी एक सुंदर लेख लिहिला होता. तो येथे देत आहे.

सांगलीतील ज्ञानदीप - कल्पवृक्ष 
-   कै. शं. ना. फाळके

सांगली संस्थानचा तो सुखद काळ

१९४० ते ४२ पर्यंत मी बालशिक्षण मंदिराच्या शाळेत इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत होतो. त्या काळात आमच्या शाळेत एक प्रार्थनागीत होते. ते संस्थानच्या राजकवी साधुदास यांनी लिहिले होते. `हेरंबा अति सदया, सती पार्वती तनया, पटवर्धन वरदसुता` अशी ती रचना होती. त्याची चाल पोलिसी बँडच्या तालावर वाजवता यावी अशी होती. संस्थानाधिपती आप्पासाहेब पटवर्धन यांच्या रसिकतेचे, सर्वगुणसंपन्नतेचे द्योतक ठरेल असे ते एक प्रार्थनागीत होते. ते एक अशा तऱ्हेने रचलेले आणि म्हटले जाणारे किंवा बँडवर वाजविले जाणारे होते की संस्थानचा सारा इतिहास प्रजाजनांच्या डोळयासमोर तरळून जायचा. हे संस्थान कसे निर्माण झाले, कोणामुळे निर्माण झाले, या सार्‍या गोष्टींची जाणीवपूर्वक उत्सुकता सर्व प्रजाजनांच्या मनात यामुळे निर्माण होत असे. खर्‍या अर्थाने ते सोपे पण संस्थानाबद्दल उत्सुकता आणि राजघराण्याबद्दल आदर निर्माण करणारे प्रार्थनागीत होते. सांगलीचे संस्थान केंव्हा निर्माण झाले? त्याचे पहिले अधिपती कोण? असे अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. संस्थानचे गुणविशेष सांगणारा सारा इतिहास डोळयापुढे तरळू लागायचा.

पटवर्धन घराण्याची आराध्यदेवता `श्रीगणेश`. त्या श्रीगणेशाचेच हे संस्थान. सार्‍या पटवर्धनांची संस्थानिक म्हणून प्रस्थापना करणार्‍या पेशवे घराण्याची श्रद्धा या सदाशिवपुत्रावर म्हणजेच या मंगलमूर्तीवर होती. पटवर्धन घराण्याचे हरभट हे गणेशाचे महान उपासक होते. ते इकडे आले ते कोकणातूनच. त्यांनी दुर्वांचा रस प्राशन करून श्रीगणेशाची उपासना केली. मोठ्या भक्तिभावाने केलेली त्यांची ही उपासना लवकरच सफल झाली.

हे पटवर्धन घराणे पेशव्यांचे पाईक बनून सैन्यात सामील झाले. आणि लवकरच पेशव्यांचे सरदार बनून या दक्षिण महाराष्ट्राचे संस्थानाधिपती बनले. सरदार पटवर्धनांची ही उज्वल परंपरा महाराष्ट्राच्या सैन्यबळाला जवळजवळ पन्नास वर्षे प्रेरणा देत राहिली. पुण्यात गोपाळराव पटवर्धनांपासून पुढे ही परंपरा परशुरामभाऊ पटवर्धनांच्या काळापर्यंत अधिकच उज्वल होत होती. ही परंपरा इतिहास संशोधकांचा अभिमानविषय ठरली आहे. मिरजेच्या वासुदेवशास्त्री खरे यांच्या इतिहास संशेधनात पटवर्धन घराण्याचा इतिहास हाही एक महत्वाचा विषय ठरलेला आहे.

कालक्रमानुसार मूळ संस्थान तासगाव येथे होते. ते परशुरामभाऊ पटवर्धनांनंतर मिरज, बुधगाव, जमखंडी, कुरुंदवाड अशा ठिकाणी विभागले गेले. ही सारी स्वतंत्र संस्थानेच बनली. सांगली हे संस्थान त्यानंतर निर्माण झाले.

कालौघात ही सारीच संस्थाने रेसिडेंटच्या हुकमतीत गेली. सांगलीचा शैक्षणिक विकास प्रामुख्याने त्यानंतरच झाला. वेदशाळेपासून इंजिनिअर कॉलेजपर्यंत शैक्षणिक विकास झाला तो प्रामुख्याने या काळात झाला. अगदी आश्रमपद्धतीपासून महाविद्यालयांच्या बांधणीपर्यंतची कार्ये याच काळात झाली. त्याचप्रमाणे विलिनीकरण होण्याच्या काळातही संस्थानाधिपतींचे अमोल सहाय्य शैक्षणिक संस्थांना मिळाले आहे. सांगली हायस्कूलच्या बरोबरीने सिटी हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल या शाळा तसेच राणी सरस्वती कन्याशाळा यांची संवृद्धीही संस्थानाधिपतींनी केलेल्या अमोल साहाय्यानेच झालेली आहे. शैक्षणिकदृष्ट्या सांगलीचा उत्कर्ष याच काळात झालेला आहे.

सांगलीकरांचे ज्या शैक्षणिक संस्थांना सतत सहाय्य मिळाले त्या सर्वच संस्थातून सतत नामवंतांची निर्मिती होत गेली. उत्तम विद्यार्थी निर्माण होत होते त्याला कारण त्या सर्व संस्थातून उत्तम शिक्षकही लाभलेले होते. कै. पाटील गुरूजी, केशवराव दीक्षित, शंभुराव आपटे, कै.दतवाडकर गुरूजी असे नामवंत संस्कृत शिक्षक याच काळात आपापल्या संस्थातून काम करत होते.

याच काळात विलिंग्डन महाविद्यालय हेही सतत प्रगतीपथावर राहिले. त्यानंतर चिंतामणराव पटवर्धन कॉमर्स, वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजही याच काळात उभे राहिले. पुढे त्याच तोलामोलाचे शैक्षणिक कार्य कै. नामदार वसंतराव पाटील यांच्या अमोल साहाय्याने आजच्या शैक्षणिक संस्थांतून निर्माण झाले. त्यांच्यामुळेच खुद्द सांगलीत शांतीनिकेतन कॉलेज निर्माण झाले. सांगली हायस्कूल, कॉमर्स कॉलेज, आर्टस् सायन्स कॉलेज हे सर्व शैक्षणिक काम त्यांच्याच दिव्य प्रेरणेतून निर्माण झाले आहे. केवळ आर्थिकच नव्हे तर शिक्षण योजनेतूनही त्यांनी निर्माण केलेले हे काम अद्वितीय आहे.

याच्याबरोबरीनेच आरवाडे हायस्कूल तसेच सांगलीतील इतर काही शैक्षणिक संस्था या अलौकिक ठरल्या आहेत. विविध क्षेत्रातील प्रगती या सर्वश्रेष्ठ मार्गदर्शकाकडूनच झालेली आहे. या सर्व महान शिक्षकांचा त्या त्या क्षेत्रातील अद्वितीय वाटा उल्लेखनीय आहे.

व्यायाम क्षेत्रात रास्ते सर, नातू सर, शंभुराव आपटे, दामुआण्णा केळकर, जोगळेकर सर,  आरवाडे हायस्कूलचे संस्थापक दत्तोपंत आणि विनायकराव आपटे, सांगली हायस्कूलमधील काटे सर इत्यादि नामवंत शिक्षक अग्रभागी असायचे. त्यांच्यामुळे मल्लखांब, कुस्ती जिवंत होते. क्रीडामंडळे सजीव होती. कृष्णा नदी सजग असायची. पोहणारे अनेकजण पुराच्या काळात तेथेच हात मारत असायचे व पुलावरून उड्या मारून या काठावरून त्या काठावर पोहत असायचे. पोहणार्‍यांची ही प्रगती वरील सार्‍या शिक्षकांमुळेच झाली होती. या शिक्षकांच्या मार्गदर्शनातून हुतुतू, खोखो, लंगडी, रिंग टेनिस यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले आहे. क्रीडाक्षेत्र सार्‍या महाराष्ट्रभर गाजविले ते या सर्व गुरूवर्यांमुळेच.

इंग्रजीचे नामवंत अध्यापक म्हणून त्या काळातील कै. हणमंतराव गोखले, नानासाहेब फाळके, गोपाळराव करंदीकर, गोपाळराव रानडे हे त्या काळातील उल्लेखनीय शिक्षक होते. गोविंदराव मराठे, ताम्हनकर, के. जी. मराठे, हरिकाका सहस्रबुद्धे हे नामवंत गणित शिक्षक म्हणून सुप्रसिद्ध होते. पण यापैकी सर्वजणच अन्य क्षेत्रेही गाजवीत होते. कोणी नाट्यक्षेत्रात प्रवीण ठरले होते. तर कोणी बुद्धिबळ गाजविले होते. काहींनी संगीतक्षेत्र काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. अध्यात्मक्षेत्रात अधिकार मिळविलेल सुद्धा काही शिक्षक होते. अशा तऱ्हेने शैक्षणिक क्षेत्रात केवळ शालेय पुस्तकी शिक्षण असे न राहता सर्वच संस्थांकडून विद्यार्थ्यांची जीवन विकासाची प्रगती होत होती.

जुन्या काळापुरते बोलायचे झाले तर या सार्‍या शिक्षण क्षेत्रात केवळ तत्वज्ञानात्मक किंवा पुस्तकापुरत्या मर्यादित शिक्षणविचार चर्चा फारशा होत नसत पण सारे शिक्षणक्षेत्र जिवंत, रसरसलेले आणि कृतिशील असायचे. प्राथमिक शाळा यासुद्धा जिवंत असायच्या. 

तिरमारे गुरूजींसारखा महान शिक्षक हरिजनांसाठी शाळा चालवत असायचा. प्रगतीच्या चारी वाटांवरून शैक्षणिक प्रगती या जुन्या काळात होत होती. सर्वांच्यावर सारखे प्रेम ही नामवंत मंडळी करत असत. तसेच शिक्षकांबद्दल सारखाच आदरभाव विद्यार्थ्यांत असायचा. कारण `सर्वांसी सुख लाभावे तशी आरोग्यसंपदा हे त्या काळात सर्वच शिक्षणसंस्थांचे ब्रीदवाक्य असायचे.

Walchand Heritage - Inspiration for Innovation Movement

The last two years have been very important for me as I have remained engaged in revisiting old memories in my life.   After tracing the history of my life span since marriage  in a series of blogs titled Homage to my Life Partner, it occurred to me that Walchand College has been my premise for most of the time during this period and my biography will not be complete unless I recollect all those memories of learning, working with colleagues and interacting with students and past students.

I felt that similar aspirations may be there in the minds of retired teachers of the college and I expressed my desire in Silver Jubilee function of Retired Teachers Association and was greatly encouraged by senior teachers. and decided to compile the data on teaching and non-teaching staff of the college and their role in college development.

Many staff members sent me their biodata and I am thankful to them Notable among them are Prof. H. U. Kulkarni, Dr. S. S. Karandikar, Prof. L. G. Gole, Prof. Bhalba Kelkar, Dr. Anil Yardi, Dr. Aranke, Prof. R. R. Marathe, Dr. N. K. Sane, Dr. A. B. Kulkarni, Dr. Mohan Khire, Prof Bhide, Late Prof. Bahulekar, Late Dr. Madnaik.

I am sorry that I could not meet personally and request all others for the biodata. As I am not in Sangli, I request the retired teachers to take a lead and help me in compiling data of all teachers. I wish to publish it on www.walchandalumni.com ( A website of Association of Past Students, WCE, Sangli.)

I am happy to inform you that I could get lot of valuable data from the college magazines given by Prof. Bhalvankar.

Walchand Magazines

72-73, 75-76,76-77,77-78,78-79,83-84,85-86,88-89,89-90,90-91,91-92,,92-93,94-95, 95-96,96-97,97-98,2000-2001,03-04,2k6, If you have any magazines not in the list, please send the scanned pages of dept news. You may send the info at drsvranade@gmail.com.

I have to extract the data and publish it first as scanned pages. Then I shall sort it and develop the chronological history of teachers and their role in development of various departments. No doubt, it is an exhaustive task, but somebody has to do it and I am doing my role.

I have published following documents

Marathi Lekh

पोलादी चॊकट - प्रा. सतीश माधव
वालचंद कॉलेज - रम्य स्मृती - प्रा मु. रा. जोशी
राजगड ते रायगड - प्रा. स. मा. कुलकर्णी
आमचे क्रिकेट - अंजली टिकेकर
संपली कहाणी - प्रा. दिवाण
दुष्काळ - प्रा अशोक खांडेकर
श्री. बाबूरावजी पारखे - प्रा. भा. दा. केळकर
अश्वत्थामा - प्रा. वि.म. दिवाण
युगद्रष्टे श्री अरविंद - प्रा. स. मा. कुलकर्णी
विजयाची गॊरवगाथा - प्रा. सु, वि, रानडे

Research Papers

Late Prof. V. R. Marathe
Prof. K. T. Krishnaswamy
Prof V. M. Kulkarni - Analogue Clock
Prof. H. Y. Kolavale
Prof. N. D. Bapat
Prof. T. V. Sreenivsan
Prof. U. Gudaru
Prof. S. M. Kulkarni
Late Prof. S. G. Ranade
Prof M. R. Shiyekar
Late Prof. S. D. Patil
Prof. K. T. Krishnaswany
Prof. J. T. Ghunakikar
Prof. A. V. Deshingkar
Late Prof. P. B. Doiphode
Late Prof. D. P. Sakhadeo
Late Prof. R. T. Ranade
बहुरंगी करमणूक - पुस्तक परिचय
VMKulkarni - Sampark lipi
RRMarathe - Nickel-Iron-Alkaline_Battery
VMKulkarni _Angular Measurement
VMKulkarni - Common Script
RRMarathe-VEC Project

I could get some rare photos of Founders and Directors of  College and MTES and teaching staff in 1963-64 


WCE Staff 1967-68
In Chairs ( L to R) (Shri) C. V. Kunte, T. K. Talathi, R. T. Ranade, B. D. Kelkar, M. Y. Joshi, S. D. Phatak, B. Subbarao, P. A. Kulkarni, Mrs. Kanitkar, Mrs. Dandekar, N. Dandekar ( Chief Guest), Seth Lalchand Hirachand, Prin. G. C. Kanitkar, Vice Prin. R. S. Tilwalli, Dr. K. T. Krishnaswamy, V.V, Ketkar, S. S. Malu, S. S. Santpur, A. V. Risbud, P. B. Doifode, M. D. Bhate 

Standing 1st Row (L to R.) (Shri) H. U. Kulkarni, A. B. Kulkarni, S. G. Joshi, K. D. Nargunde, M. K. Shirhatti, R. R. Marathe, V. R. Marathe, M. B. sajanikar, S. V. Gharpure, M. R. Deodhar, S. D. Phadnis, M. R. Deodhar, M. P. Deval, N. D. Bapat, D. P. Sakhadeo, K. R. Patwardhan,N. K. Chitale, D. G. Pujari

Standing 2nd Row (L to R.) Miss H. V. Ketkar, Y. G. Kale, R. R. Tilwalli, V. V. Lokare, G. S. Shiralkar, M. R. Shiyekar, S. B. Phatak, S. G. Bam, P. S. Waikar, M. C. Dabir, V. B. Navangul, S. S. Karandikar, G. S. Tasgaonkar, Y. R. Atre, L. G. Gole, A. R. Kulkarni, M. R. Belsare 

Standing 3rd Row (L to R.)P. S. Bapat, A. D. Khire, S. V. Ranade, V. M. Diwan, V. R. Mainkar, A. M. Karmarkar, A. V. Deshingkar, A. P. Pednekar, M. V. Joglekar, C. G. joshi, S. M. Ainapure, C. E. Bedekar, G. M. Gavali, A. G. Potdar

Absent Members : ( Shri) M. A. Brahmanalkar, Dr. L. N. Sathe, V. G. Kulkarni, M. G. Bhat, A. A. Khandekar, R. B. Kulkarni, V. M. Kulkarni, N. S. Joshi, V. V. Barve, S. Rammurthy, M. D. Patwardhan, R. N. Aranake, K. A. Auti, K. V. Virkar, V. S. Panse, R. G. Miskin, J. V. Todkar, S. V. Mate, P. V. Kulkarni, H. P. Inamdar, R. K. Ainapure, R. G. Desai, V. K. Railkar, S. G. Ranade, S. D. Patil, Mrs. R. S. Patil, A. J. Ghorpade, N. K. Sane

Silver Jubilee Magazine gives brief history of New Engineering College and progress after college is renamed as Walchand College.

There is a lot of work necessary for compiling history of college development and I shall continue to compile and publish the material I can get through help of retired teachers.

The greatness of Walchand College of Engineering is built by tireless and dedicated work of teachers and non-teaching staff and if we decide we can create complete historical document for the new generations of students to take inspiration and feel pride in Walchand Heritage.

---------









Thursday, September 20, 2018

अशा शाळा, असे शिक्षक - २

सांगलीत आल्यानंतर प्रथमच  शिक्षणाविषयी शाळा, शिक्षक व पालक अतिशय जागृत असल्याचे जाणवले. पुण्याला विद्येचे माहेर समजले जायचे पण सांगलीदेखील या क्षेत्रात चांगलीच अग्रेसर होती.

माझे धाकटे भाऊ गावभागातील प्राथमिक शाळा, बापटबातमंदिर आणि सिटी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होते.शाळेत जवळजवळ सर्व शिक्षकच अभ्यासू व नावाजलेले होते. बीई होउन वालचंदमध्ये नोकरीस लागल्यानंतर शाळेशी माझा संबंध वाढला.

राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेचे मुख्याध्यापक श्री. य. द. लिमये व आरवाडे हायस्कूलचे श्री शंकरराव सोमण यांची साधी राहणी व विद्यार्थ्यांबद्दल त्यांना वाटणारी तळमळ पाहून मी प्रभावित झालो. त्यांच्या सहकार्याने मराठी विज्ञान परिषद मी उत्साहाने सुरू केली खरी. पण मी त्यात आरंभशूरच ठरलो. सोमण सर भूगोलाचे शिक्षक होते त्यांचे दोन खोल्यांचे घर नकाशांनी भरलेले असे. य. द. लिमये आपल्या मुलीलाही शाळेतल्या इतर मुलींप्रमाणे कडक शिस्तीत वागवत.संध्याकाळी शाळेत इंग्रजीचा जादा तास घेत. त्या शाळेतल्या फडके बाई आज नव्वदीच्या घरात असूनही सरांचे शिक्षणाचे व्रत  तेवढ्याच निष्ठेने पाळत आहेत.

१९७० मध्ये पुण्यातील सुमन शिंत्रेशी माझे लग्न झाले. लग्नाआधी ती हुजुरपागा शाळेत शिक्षिका होती. लग्नाआधीच तिचा सिटी हायस्कूलमध्ये इंटरव्ह्यू झाला व लग्नानंतर ती (आता शुभांगी रानडे या नावाने)लगेच शाळेत संस्कृतची  शिक्षिका म्हणून रुजू झाली.

माझा धाकटा भाऊ श्रीकांतही मिरजेला विज्ञानशिक्षक म्हणून नोकरीस लागला. म्हणजे रानडे घराण्यात शिक्षकपरंपरा सुरू झाली ती सांगलीतच.सिटी हायस्कूल हे सांगलीचे भूषण होते. तोच मान मिरजेतील विद्यामंदिर प्रशालेला होता. या दोन्ही ठिकाणच्या शिक्षकांचा समृद्ध वारसा आम्हास मिळाला.


१९७३ ते १९७६ या काळात मी सहकुटुंब आय.आय.टी. कानपूर येथे पीएचडीसाठी गेलो होतो. तेथे शुभांगीने हिंदी आत्मसात केले. तिथल्या मराठी विद्यार्थ्यांचे आमचे घर हे हक्काचे आपले घर बनले.  शुभांगीने त्यांच्या नाटकातही काम केले. त्या विद्यार्थ्यांशी आजही आमचे घनिष्ठ संबंध आहेत.

माझा भाऊ श्रीकांत हा मनमोकळ्या स्वभावाचा, उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षक होता. श्री तात्या साठे व गो. पां. कंटक यांच्या विज्ञानशिक्षणाच्या उपक्रमाला त्याने व्यापक रूप दिले.

निसर्गसहली, प्रदर्शने, निबंध स्पर्धा एक ना दोन. तो सतत या कार्यात मग्न असायचा. मुख्याध्यापक झाल्यावर तर बालविज्ञान चळवळीच्या माध्यमातून त्याने सांगली परिसरातील सर्व शाळांत विज्ञान चळवळ सुरू केली. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा व प्रदर्शने यात सांगलीची मुले यशस्वी होऊ लागली.

मला आठवते. अनेकवेळा तो सकाळी सकाळी आमच्या घरी येऊन निबंध वा प्रकल्पाविषयी संदर्भ मिळविण्यासाठी येई. सहलीत व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांसोबत जाई. त्याचा लोकसंग्रह दांडगा होता.शिक्षणाशी संबंध नसलेल्या सामान्य हिंदू मुस्लीम घरातील लहानथोर तसेच व्यापारी, डॉक्टर, वकील त्याचे जीवाभावाचे मित्र होते.

 कानपूरहून आल्यानंतर शुभांगीने राणी सरस्वती, आरवाडे हायस्कूल, मिरज विद्यामंदिर, पटवर्धन हायस्कूल  इत्यादी ठिकाणी रजेच्या मुदतीतील नोकर्या केल्या.विश्रामबाग येथे श्री नामजोशी या दृष्ट्या शिक्षकांनी सावरकर प्रतिष्ठान या शाळेच्या माध्यमातून प्रज्ञाशोध परिक्षेसाठी विशेष वर्ग घेतले जात होते.

१९८३-८४ चा काळ.वालचंद कॉलेजमध्ये संगणक शिक्षणास सुरवात झाली होती. शुभांगीने बेसिकचा कोर्स केला. आम्हीही घरात संगणक आणला.१९८५ मध्ये मे महिन्यात एक महिन्याचा मराठीतून संगणक प्रशिक्षणाचा कोर्स शुभांगीने घेतला. नंतर तिने सुहास खांबे, विजया कुलकर्णी यांच्या सहकार्याने विश्रामबाग येथे सुयश कॉंम्युटर्स या नावाने संगणक प्रशिक्षण वर्ग सुरू केले. अनेक व्यापारी, डॉक्टर, वकील यांनी तेथे संगणकाचे प्राथमिक धडे घेतले.

यातुनच पुढे ज्ञानदीपचा जन्म झाला.

अशा शाळा, असे शिक्षक - १

प्राथमिक शाळा
१९५०-५५ चा काळ. मी सातारच्या प्राथमिक शाळेत शिकत होतो. आमचे वर्गशिक्षक दुडेगुरुजी यांचा अक्षरलेखनावर फार कटाक्ष होता. वोरूपासून लेखणी कशी करायची, टाकाचे नीफ कसे धरायचे, अक्षराला गोलवा व डौलदारपणा कसा द्यायचा हे शिकविण्यासाठी ते आम्हा मुलांना सकाळी ६ वाजता त्यांच्या घरी बोलावत.तास दीड तास आमचेकडून लेखन करवून घेत. हे सर्व फुकट पण सर्वांना सक्तीचे असे.

माझ्या मावशीचे यजमान नाना गोडबोले सातार्याजवळ असणार्या धावडशी या गावी प्राथमिक शिक्षक होते.मी सुट्टीत त्यांच्याकडे रहायला जात असे. गावातील सर्व मुले आपापल्या वाकळी घेऊन रात्री शाळेत झोपायला येत. तेथे नाना त्यांना रोज रामायण महाभारतातील गोष्टी सांगत.त्यासाठी ते गोरखपूरहून प्रसिद्ध होणारे कल्याण मासिक मागवीत शाळेचे सानेगुरुजी वाचवालय होते त्यातील गोष्टींची पुस्तके मुलांना वाचायला देत. त्यांच्या घरच्यांची विचारपूस करीत.

या व अशा शिक्षकांमुळे मला शिक्षणाची गोडी लागली.शिक्षकांबद्दल आपुलकी आणि शाळेविषयी नवे भावबंध निर्माण झाले.

माध्यमिक शाळा


माझे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. दिवसाची सुरुवात ... प्रिय शालामाउली.. या प्रार्थनेने  होई. शाळेत गणपती बनविण्याची खुली स्पर्धा असे. ज्या विद्यार्थ्याचा गणपती सर्वात चांगता असे. त्याच्या घरापासून वाजत गाजत  मिरवणूकीने शाळेत तो गणपती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात येई.

आमचे वर्गशिक्षक श्री ना. ज. सोमण, त्यांच्या घरी दरवर्षी स्वखर्चाने वर्गाचे स्नेहसंमेलन भरवीत. वर्षाचा अहवाल लिहिण्याचे काम माझ्याकडे असे.वर्गातल्या मुली हस्तलिखित मासिक तयार करीत. त्यात प्रत्येक मुलाचा लेख, चित्र वा इतर सहभाग असे.

आमचे विज्ञानशिक्षक केळकर सर आदर्श शिक्षक होते. वर्गात आले की ते एखादा प्रश्न उपस्थित करीत व मुलांना त्याचे उत्तर शोदण्यास प्रवृत्त करीत. मग आम्हां मुलांत चढाओढ लागे. चुकीचे उत्तर असले तर ते फक्त मान हलवीत. आम्हाला उत्त्तर सापडले नाही तर प्रश्न तसाच दुसरे दिवसासाठी राखून ठेवीत. मग शाळा सुटल्यावर आम्ही पुस्तके धुंडाळू लागू. दुसरे दिवशी मी मी म्हणत उत्तर देण्यासाठी आटापीटा करत असू.विज्ञानाची खरी गोडी  तसेच अंधश्रद्धा व जुन्या चालिरीती चिकित्सक नजरेने तपासण्याची सवयही   त्यांच्यामुळेच लागली.

१९६० नंतर वडिलांच्बा बदलीमुळे आम्ही सातारा सोडून कायमचे सांगलीेस वास्तव्यास आलो. गेली दोन वर्षे जुन्या आठवणीत रमलेल्या मला अमेरिकेला येण्यापूर्वी त्या शाळांना भेट देण्याची अनिवार इच्छा झाली.

त्याप्रमाणे सातारला जाऊन  प्राथमिक शाळेचा शोध घेतला पण तिची जागा बदलली होती. न्यू इंग्लिश स्कूलची इमारत तीच असली तरी नव्या शिक्षकांत पूर्वीचा जिव्हाळा मला जाणवला नाही.शिक्षक आपल्या कामात व्यस्त होते. माझी थोडी निराशा झाली.

माझे नातेवाईक श्री नाना रहाळकर यांचेबरोबर मी एसटीने धावडशीला निघालो. पूर्वी हाच प्रवास बैलगाडीने करावा लागे.बस धावडशीच्या शीवेवरच थांबली. कारण रस्त्यावर शाळेची मोठी मिरवणूक चालू होती. आम्ही उत्सुकतेने खाली उतरलो व त्या मिरवणुकीत सामील झालो.

१५ जुलै हा शाळेचा पहिला दिवस असल्याने नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी गावकर्यांनी काढलेली ती मिरवणूक होती. ढोल ताशा वाजवत व सजविलेल्या बैलगाड्या घेऊन मुला-शिक्षकांसोबत नटून थटून गावकरी त्यात सामील झाले होते. आनंदाने माझे मन भरून आले.

पूर्वीची प्राथमिक शाळा तेथे नव्हती मात्र मुख्य देवळानजिक माध्यमिक शाळेची नवी इमारत मोठ्या डौलात उभी होती. भोवतालच्या पंचक्रोशीतील सुमारे ६०० ता ७०० मुले मुली या शाळेत आता शिकत होती. ग्रामीण भागात अजूनही शाळेबद्दल जी आपुलकी आढळून आली त्याचे कौतुक वाटसे. तेथील ग्रामस्थांशी बोलताना त्यांचे शाळेबद्दलचे प्रेम जाणवले मात्र शिक्षक बाहेरगावाहून येत असल्याने व बदलत असल्याने त्यांचेशी गावाचा पूर्वीसारखा संपर्क रहात नसल्याची खंत त्यांनी बोसून दाखवली.

Monday, September 17, 2018

School Education - Training ground for livestock

Modern Schools in India
Are well crafted training grounds for livestock
Be the birds, be the horses, be the buffelos or mighty elephants

Rules of training are strict.

 For birds

Learn to use your wings to do aerobatic drills,
Keep the cut short to give you smartness and ability to pass the exam rings of fire
Don't aloow them to grow else you will be tempted to fly out and high
Teachers are kept busy to monitor your growth with multitude of parameters except the ability to fly
They are given good administrative jobs so that they will not have time to think and react

It may happen that birds may try to jump high after school hours
Hence drill classes occupy rest of their time.
Parents  are lured to keep you busy all the time

Success in examination gives you status of delicious food
in the dinner plates of MNCs and big businesses.

 Don't worry you will be kept happy and comfortable even while they are eating your delicious brain
You may read the stories of mighty eagle, birds roaming in high sky
 But you are cautioned, they may fail of killed by predators
Hence do not try to come out of box
Be complesant and love happily with security  within the protected golden cages.

For Horses



Oh horses ! The descendants of brave carriers
Now you have to get trained to win the race
Not run at will eat wild grass or leaves
You will be given good house, good processed food
Doctors will keep your health, experts will massage you
But you must remain in stable and be ready for fastest speed.
Do you know? Lot of stakes are on your winning the race
 Never fail, otherwise you will be sold out cheap for load carrying

For Buffelows
You are strong and can run with dashing speed
But remember there is a lumber of wood put around your neck and it will become hindering obstacle in your movement
Hence be patient, and behave as planned by higherups for you


For Elephants


You are mighty and huge animal with enormous strength and witty brain
But you have to act as decoration piece in the procession
Their id heavy iron chain tied to your legs and there is sharp prickinf tool which will keep you to senses

Hence all school boys and girls of various kinds of schools in India

Remember that you are governed by a meticulous education system
Which ties you to make you perfect for the purpose
and gives high rank in examination
Which is what needed from you
By industrial and business giants

So never listen to talk of innovation, research, entrepreneurship
 Some old people are trying to turn the wheel of time
It is their publicity stunt Don't fall pray to what they profess
All that is humbug.
Now it is the brazen new imported education system specially made for India


Follow the strict discipline. Don't cross guidelines.

  • Keep 100 % attendence
  • Get 100% marks
  • Follow the books, guides and ready reckoners
  • Remain smart and tactful
  • Solve brainy questions
  • Play video games for entertainment
  •  Read Harry Potter and Star Wars to amuse you
  • Don't try to build something on your own. It will never be of high quality and durable. You will be taunted as scientists.
  • Don't go to nasty Search. You will be entangled by advertisers. Research is not child's play. Development requires huge money. Production is patented by big wigs.
  • Spend your leisure time by using face book and WhatsApp. Many friends are taking great pains to educate you with best to read, best to see and best to enjoy. Like, comment, forward postings to become famous in cyber media.


India is not for innovation

Gone are the days when we developed mathematics
Searched stars and build world known philosophy of living

 World is changing
Jobs with wealthy packages are waiting for you
 Now it is time to follow the rat race
 and aspire for a two bedroom flat in smart city
and weekend enjoyments in multiplexes and hotels.
 Who knows, if luck permits, you will be boarding plane to lineup in immigrant queue in developed countries.

But, it is not so easy as it looks. Qualified aspirants are many with addition of lots every year. the job givers are reducing in number every day. So, try to get entry in chosen few. Remember, your parents have spent lot of their hard earned money on your education. Do not make them suffer due to your unemploment. If you don't succeed try to sell or distribute foreign products. MNCs and businesses want to reach masses to sell their products and you can earn your bread with glamorous titles for your posts.

To end the story, you must have figured out who are birds, who are horses, who are buffalows and who are the elephants in the present prestigious education system

Saturday, September 15, 2018

Commitment to Donate and Work


The sudden and unexpected loss of my life partner two years back changed my life. Almost two years of stay in USA gave me the experience of innovative culture in Silicon Valley and I decided to work for creating such change in the present examination oriented education system in India. My memories of research and development work done in Walchand College during 1970-2000 gave me impetus to bring back that culture.

In my environmental field my guides Dr. B. Subbarao and Dr. G. D. Agarwal were ideal in this respect. However, real venture of starting industry taking help of teachers from all departments was done by Prof. Bhalba Kelkar. Unfortunately his company could not sustain the unhealthy competition and lacked strict financial control. I found that Prof. Bhalba Kelkar is still very active and has written books on Innovation and links between creativity and adhyatma in collaboration with world known scientist Dr. Vijay Bhatkar. After getting green card, I returned to India and contacted him.
Fortunately, there was a silver jubilee function of Retired Teachers Association initiated by my teacher and born innovator Prof. H. U. Kulkarni.

I took this opportunity to declare my desire to  compile the history of  Walchand College of Engineering highlighting the role of retired teachers and non-teaching staff. I wanted to publish the data on www.walchandalumni.com, a website of Association of Past Students of Walchand college which is managed by Dnyandeep Foundation.

Many senior professors like Dr. A. B. Kulkarni, Dr. S. S. Karandikar welcomed the idea. I appealed to all retired teachers to send their biodata via WCE Retired Teachers Whats App group. With persistant folloup, I am getting now the response from them.

For getting the history of Walchand College departments, I thought of searching the college magazines. Fortunately Prof. Bhalvankar gave me lot of magazines which covered major events during 1970-2000. I scanned department news portions from those magazines and publshed them on website under Walchand Heritage Innovation Centre.

To get more clues about how to proceed, we met industrialist Shri Arvind Deshpande who had been a very active president of Association of Past Students.He liked the idea but expressed fear that the past students are not ready to pay even Rs. 5000/ as one time donation and complained that what they would get in return.He commented can you ask for returns from your mother institute. You should give back a small part of what you got from this institute.


Dr. N. k. Sane, senior professor of Walchand College commented that we are unnecessarily getting lot of pension and it should be limited to Rs. 20000/- per month. If it is so, we can correct the mistake of Govt. by donating some amount for real cause.

I still remember the incident happened long back. I had taken a group of students to show Water Treatment Plant at Miraj.In the informal discussion with the staff after the visit, I found majority of people were complaining about the salary and work load. One elderly person, however, was complecent about the work and thanked the authorites giving him opportunity to offer services. I was curious. I asked his name. Mr. Bourges. He replied. I asked. how come you are not complaining? He said that as per their  religion, he is donating 10% of his monthly salary to poor in Miraj and was very happy to see sense of gratitude in their eyes. he said, If salary is increased my share of donation also will increase and it is good in that sense. I bowed to him.

Our meeting in Willingdon College expanded the scope of our proposed innovation project. Principal Dr. Bhaskar Tamhankar told that there are about 30 % of past students, who have started industry or business in Sangli area. We modified the scope to include all Past students and retired teachers from any school or college for building innovative culture in education at all levels.

When we approached established industrialists, they asked what is your contribution?

That thought triggered my consciousness. let us identify only people who are ready to donate Rs. 5000/- not once but commit for annual payment of same amount.

 I was damm sure that nobody would agree to this extravagant membership with no returns. However, to my surprise, I could collect a team of 20 people from different fields who agreed to my proposal.
 I am thinking of spitting the contributions citywise so that the contributors will have sufficient funds for innovative activites in their town / city. I donated Rs. 1 lakh to MTES Pune to take a lead to form a nodal centre for innovation in Maharashtra.

I hope we shall be successful in our efforts. Even though I will be staying in USA, I shall strive hard to make this movement successful.

This is my tribute to Sir Vishvesharayya on this Engineers Day. 

Friday, September 14, 2018

दिखाऊ संमेलनापेक्षा कार्यात सातत्य महत्वाचे

सांगलीच्या माजी जिल्हाधिकारी माननीय सौ. लीना मेहेंदळे सांगलीत आल्याचे कळल्याने वालचंद कॉलेजमध्ये आम्ही घेतलेल्या सेमिनारची माहिती देण्यासाठी त्यांची भेट घेण्याचे आम्ही ठरविले. सांगलीचे आयुक्त माननीय श्री. रविंद्र खेबुडकर यांचे निवासस्थानी त्या उतरल्या होत्या. श्री. अरविंद यादव, प्रा. भालबा केळकर, प्रा. रामचंद्रे व मी असे सर्वजण त्यांना भेटायला गेलो.


वालचंद कॉलेजमध्ये आम्ही घेतलेल्या सेमिनारबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र दिखाऊ संमेलनापेक्षा कार्यात सातत्य महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. लहानपणची एक गोष्ट त्यांवी सांगितली.


चार पाच वय असताना त्यांचे आजोबा करीत असलेल्या  अभिषेकाची त्यांना गंमत वाटली. आजोबांनी एक मोठी कळशी भरून पाणी अभिषेकासाठी आणले होते.

त्यातून एका तांब्यात, तांब्यातून भांड्यात, भांड्यातून पळीने ते अभिषेक करीत होते. भांडे रिकामे झाले की तांब्यातून भांड्यात पाणी घ्यायचे, तांब्या रिकामा झाला की कळशीतून तांब्यात पाणी घ्यायचे,असे कळशी संपेपर्यंत करायचे असा तो अभिषेक होता. या छोठ्या मुलीने विचारले यापेक्षा सबंध कळशीच का एकदम ओतत नाही. आजोबा हसले आणि म्हणाले मग तो अभिषेक होत नाही. एक एक पळीने अभिषेक करताना तुमच्या संयमाची परीक्षा होते. तुम्ही किती निष्ठावान आहात ते समजते.

 खरेच किती मौल्यवान विचार आहे. आज अनेक राजकीय, सामाजिक, शिक्षणक्षेत्रात संमेलन घेण्यापुरते त्यांचे कार्य मर्यादित राहते. साहजिकच त्याचा फारसा उपयोग होत नाही. महात्मा गांधी यांची असहकार चळवळ यशस्वी झाली कारण त्यात सातत्य होते.कॉंग्रेस व समाजवादी पक्षांचे राष्ट्रसेवादल असेच होते. आता ते लोप पावले आहे. आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दररोज शाखा भरते. कार्यात सातत्य असल्याने समाजाच्या तळागाळात त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपली पाळेमुळे रोवली आहेत.

नवनिर्मिती केंद्र उभे करण्यासाठी अशाच निष्ठावान कार्यकर्त्यांना जमवावे लागेल.मला काही मिळेल या अपेक्षेने येणार्या सदस्यांऐवजी मला  समाजाचे ऋण फेडायचे आहे, पुढच्या पिढीत नवनिर्मिती व उद्योजकतेची आवड निर्माण करण्यासाठी मीच पुढाकार घेतला पाहिजे  या भावनेने स्वार्थत्याग करून कार्यात सहभागी होणार्या व्यक्तींवरच या योजनेचे यश अवलंबून राहील.