Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Friday, April 4, 2025

सांगलीतील प्रसिद्ध छातीरोग तज्ज्ञ डॉ. मडके यांचे नवे पुस्तक - क्षयरोगावर मात

 सांगलीतील प्रसिद्ध छातीरोग तज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांनी आपल्या जनस्वास्थ्य मासिकातून गेली अनेक वर्षे मराठीतून आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे अभिनंदनीय कार्य केले आहे. विविध रोगांविषयी तज्ज्ञ डॉक्टरांना लेख लिहिण्यासाठी त्यानी आमंत्रित केले होते.  मासिकाच्या डिझाईन व संपादनात माधवनगरचे प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर उपळावीकर यांचे मोठे योगदान राहिलेले आहे.लक्षवेधी व कल्पक अशी मुखपत्रावरील त्यांची   चित्रे व मांडणी     हे मासिकाचे खास आकर्षण होते.  आता ते मासिक बंद पडले असले तरी मी अजूनही पूर्वीची सर्व मासिके जपून ठेवली आहेत.

दमा हा माझा जीवनभर साथी राहिल्याने डॉ. मडके यांचेशी पेशंट या नात्याने गेली चाळीस वर्षे संबंध आहे.  योगायोग म्हणजे १९८९साली मला अचानक फीट आली आणि त्याचे निदान पाचसहा वर्षांनी मेंदूतील क्षयरोग असल्याचे समजले. मधल्या काळात आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, अॅलोपॅथिक औषधे मी घेतली. मिरजेतील डॉ. करमरकर, डॉ.मेहता, न्यूरोलॉजिस्ट    डॉ. मोहिरे सांगलीतील डॉ. वसवाडे, डॉ.दिवेकर, डॉ.जावडेकर यांच्याकडे तपासण्या आणि औषधोपचार ट्रायल्स यात     तीन चार वर्षे गेली. केईएमला जाऊन मेंदूचे ऑपरेशन करण्याचेही ठरले होते, मात्र तेथील अनुभवी डॉ. कापरेकर यांच्या सल्ल्याने तो बेत रद्द केला.   शेवटी स्ट्रेप्टोमायसिनची दररोज एक ग्रॅम प्रमाणे याप्रमाणे ९० दिवस इंजेक्शन घेतल्यानंतरच या रोगापासून माझी पूर्णपणे सुटका झाली.  क्षयरोगाशी प्रत्यक्ष असा जीवघेणा संघर्ष केल्यामुळे मला डॉ. मडके  यांच्या क्षयरोगावर मात  या  पुस्तकाबाबत  मला त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते.

 २००८ मध्ये मी डॉ. मडके यांच्या दवाखान्यात  आयसीयूमध्ये अॅडमिट होतो. या काळात मला त्यांच्या दिलदार व अभ्यासू मनोवृत्तीची ओळख झाली होती. त्यांनी त्यावेळी मला त्यांचे दमा हे पुस्तक भेट दिले होते. 

ज्ञानदीपच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे वीस वर्षांपूर्वी आम्ही डॉ. मडके यांच्या दवाखान्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केले होते. त्यावेळी डॉ. मडके आणि डॉ. उपळावीकर यांचेशी आमची चर्चा होत असे. डॉ. उपळावीकरांचा इंजिनिअर मुलगा शैलेश ज्ञानदीपमध्ये डेव्हलपर म्हणून रुजू झाला व त्याच्या साहाय्याने आम्ही बरेच चांगले प्रॉजेक्ट्स यशस्वीरीत्या पूर्ण केले.

दिनांक २४ मार्च २०२५ रोजी माझी त्यांची पुन्हा भेट झाली आणि क्षयरोगावर मात हे बहुमोल माहितीचे पुस्तक माझ्या हाती पडले. 




या कार्यक्रमाचे सर्व रेकॉर्डिंग मी माझ्या मोबाईलवर केले व  ते व्हिडीओ सर्वांच्या माहितीसाठी युट्यूबवर प्रसिद्ध केले आहेत. 

डॉ. मडके यांचे या लोकोपयोगी कार्याबद्दल अभिनंदन व पुढील कार्याबद्दल शुभेच्छा.




Sunday, June 9, 2024

ज्ञान आणि व्यवसाय

 [ माझ्या शालेय जीवनानंतर केव्हातरी स्वानुभवावर लिहिलेले एक नाटक ]

[पडदा वर जातॊ तेव्हा स्टेजवर डॉक्टरच्या अद्ययावत कन्सल्टिंग रूमचा देखावा. एका बाजूस फिरत्या खुर्चीत रेलून बसलेलेचाळीशीतील डॉ. सुहास देशपांडे  सिगारेट शिलगावत आहेत. मागील बाजूस मेडिकलच्या पुस्तकांचे शेल्फ, शो केस, अक्वारियम, खोलीस फिकट निळा रंग, वर पंखा, टेबलावर केसपेपरचा गठ्ठा, पुढे दोन खुर्च्या. रिकाम्या दुसर्‍या बाजूस दार. त्यावरील पडदा बंद. पडदा उघडून एक समवयस्क पेशंट, कपडे अगदी साधे, चेहरा ओढलेला, येऊ लागतॊ.]

डॉक्टर - (त्रासिकपणे) - काय पाहिजे तुम्हाला ?
पेशंट - ‘डॉक्टर, माझ्या मुलीला दाखवायचे होते?’
डॉक्टर - ‘तुम्हाला बोलावले म्हणजे या. मी कामात आहे.’

 पेशंट नाखुशीने बाहेर जातो. डॉक्टर बेल वाजवितात. कंपौंडर आत येतो.

डॉक्टर - ‘ अरे कुठे गेला होतास? पेशंट सरळ आत घुसतायत.’
कंपौंडर - ‘ मी येथेच होतो. पण त्या गृहथांची मुलगी आजारी आहे म्हणून घाई त्यांची घाई चालली होती.
डॉक्टर घडाळ्याकडे पहात ‘ हे बघ. आता पाच वाजले आहेत. मला ५॥ वाजता एक महत्वाची अपॉइंट्मेंट आहे. तेव्हा उद्या सका्ळी ९ वाजता या म्हणून सांग सगळ्यांना.’

कंपौंडर जातो. डॉक्टर फोन लावतात. ‘कोण? नेने आर्किटेक्ट का. हां . जरा त्यांना फोन द्या. हॅलो विजय. अरे पाच वाजले. प्रिमीयर शोला जायचे विसरलास काय?’ ‘जरा कामात आहे. वेळ लागेल.’ ‘ अरे कटव त्या क्लायंटला. आपल्याला काही हे लोक आपले ताबेदार समजतात की काय ! जाने दो यार ! मार गोली कामाला. मी निघालोच. वेस्टएंड्ला भेटू अच्छा.’ डॉक्टर फोन खाली ठेवतात. टेबलवर एशट्रेत सिगरेट विझवतात. शीळ घालत उठतात.

 तेवढ्यात पडदा बाजूला होतो व पुन्हा तोच पेशंत आत येतो. डॉक्टर काही बोलणार तेवढ्यात तो अजिजीने म्हणतो.‘ डॉक्टर, तुम्ही मला ओळखलेले दिसत नाही. मी आणि तुम्ही सातार्‍याला एकाशाळेत च्व एका वर्गात होतो. मी गजानन पंडीत’

डॉक्टर - सॉरी हं. अरे मगाशीच नाही का सांगायचे. आता आठवले तू फडणीसांच्या वाड्यात रहात होतास.आमच्या बंगल्यावर आपण खेळायचोदेखील. आता सध्या कुठे असतोस? आणि काय झालंय मुलीला?’

गजानन - मी सातारलाच कापडाच्या दुकानात लिहिण्याचे काम करतो. माझी मुलगी शांता हार्ट पेशंट आहे. तू या विषयात तज्ज्ञ मह्णून सार्‍या पुण्यात  प्रसिद्ध आहेस असे मला कळले. म्हणून तिला घेऊन आलॊ आहे.

डॉक्टर- ‘तिला येथे आणले आहेस काय?’

गजानन - ‘नाही. पण येथे जवळच तिचा मामा रहातो. त्याच्याकडे तिला घेऊन आलो  आहे.’

डॉक्टर घडाळ्याकडे पहात - ‘ मला एक महत्वाचे काम आहे. म्हणून मला जाणेच भाग आहे. तू कोठे उतरला आहेस ते सांग मीच तेथे रात्री १०-१०॥ ला  येऊन बघतो. काही काळजी करू नकोस’
गजानन - मी वाट पहातो. आपली फार कृपा होईल.

 डॉक्टर - ‘ अरे असे काय बोलतोस.  त्याच्या पाठीवर थाप मारत ‘गजा रे गजा, तुझी काय मजा’म्हणून मी तुला चिडवायचो तुला आठवतंय का नाही. आणि हो. त्यावेळी तर शास्त्रात तू सगळ्यांचा दादा होतास. तुझे प्रयोगच आम्ही उतरवून नाही का काढायचो.! बरे झाले तुझी गाठ पडली अन मला पुन्हा आपल्या बालपणीची आठवण झाली बघ.’

 गजानन - उत्साहित होऊन ‘ आणि आपण एकदा आमच्या स्वयंपाकघरात साबण तयार केला होता. आठवतंय? चुलीवर ठेवलेल्या भांद्यातले तेल पेतले. आई वडिलांचा मार केवळ तुझ्यामुळेच वाचला होता.’
 डॉक्टर - ‘दोन मिनिटे बस. कशी काय वाटतेय माझी रूम. हे पडदे खास काश्मीरहून आणले आहेत. ही पेंटींग्ज तर जहांगीर आर्ट गॅलरीतच विकत घेतली आहेत.’

गजानन चौकसपणे खोलीत पहातो  आहे. त्याची नजर पुस्तकाच्या शोकेसवर स्थिरावते. न बसता तो तेथे जातो व पुस्तक काढून पहातो.

 गजानन- ‘तुमच्याकडे शास्त्रातली बरीच पुस्तके दिसताहेत. सर्व वाचायला वेळ तरी केव्हा मिळतो तुम्हाला?’
 डॉक्टर - ‘ अरे वेडा की काय? ही पुस्तके कोण वाचणार. अरे पेशंटवर इम्प्रेशन नको का पडायला. म्हणून आमच्या आर्किटेक्टने ही शोकेस लावली आहे.  मल वाचायचा किती कंटाळा तुला माहीत नाही का? पण तुला एवढी वाचनाची आवड होती मग तू कसा काय या खर्डेघाशीच्या लाईनवर गेलास?
 गजानन - आहो काय करणार ? मॅट्रीक पास झालो तरी लगेच  चांगली नोकरी मिळेना व घरचा भार उचलायला नोकरी करणे भाग्च होते.आता काय. दोन मुलांचा संसार करण्यातच सगळा वेल चालला आहे. नाही म्हटलम तरी मी आता फुरसतीच्या वेळी शाळेतल्या मुलांना काहीतरी शिकवीत बसतो.
 डॉक्टर - मी मात्र लकी ह>. त्यावएली मणिपालला पैसे भरून काहोईना वैद्यकीय शाखेला प्रवेश मिळाला म्हणून तर ही स्टेज आली. नाहीतर करावी लागली

असती कोठे तरी उमेदवारी. तुला आश्चर्य वाटेल मी मुंबईला हॉटेल मॅनेजमेंट्च्या कोर्ससाठी अर्ज देखील केला होता. तसे झाले असते तर तुझे स्वागत एखाद्या

पंचतारांकित हॉटेलमध्ये मी केले असते. (घडाळयकडे पहाताच चमकून ) अच्छा मला आता निघालेच पाहिजे. अर्जंट व्हिजिट कारयची आहे. मग काय. रात्री मी

येईनच . डोन्ट वरी.
 गजानन - बरं मी वाट पहातो. दोघेही बाहेर जातात व पडदा पडतो.
 दवाखान्याचा सीन. डॉक्टर गडबडीने प्रवेश करतात. कंपौंडर त्यांचे पाठोपाठ येतॊ. सर पेशंट तुमची वाट पहाताहेत त्यांना पा्ठवू का?
 डॉक्टर - ‘अरे काल सिनेमानंतर पार्टीला गेलो आणि घरी यायला उशीर झाला. अरे हो. त्या गजाननकडे जायचे विसरूनच गेलो. जरा फोन डायरी दे.’
‘ हॅलो, मी डॉ. देशपांडे बोलतोय आपल्याकडे गजानन पंडित आले आहेत ना. त्याम्ना जरा फोन द्या. हॅलो गजानन का? अरे मला काल नाही जमले यायला. मुलीची तब्बेत कशी काय आहे? काय? रात्री अटॅक आला होता? मग काय केले. ... थँक गॉड ! मसाजचा उपयोग झाला. छान. अरे पण कोणी मसाज केला. काय? तू केलास? कोठून षिकलास हे? माझ्या लेखावरून? कोणत्या?
 अच्छा तो होय. मी घरी गेल्यावर पाहीन. पण या स्टेजला आपल्याला सर्व काही देवाच्या हाती सोडावे लागते. नशीबाने साथ दिली तर खैर म्हणायचे. अच्छा ये की? मी दवाखान्यात आहेच.’
डॉक्टर फोन ठेवतात व  कंपौंडरला बोलावतात. ‘ अरे सकाळला आपण ह्रुदयविकारासंबंधी लेख दिला होता काय? जरा शोधून दे पाहू.’प्रतिथयश ह्रुदयरोग तज्ज्ञ डॉ. सुहास देशपांडे यांची हदयरोगावरील आकस्मिक उपचारांसंबंधी खास मुलाखत ’ हॅ हॅ. मुलाखत म्हणून आपणच पुस्तकातली माहिती देऊन फोटोसह जाहिरात देतो काय आणि त्याचा उपयोग गजाननला होतो काय. देवाची  लीला अगाध आहे.
अर्थात गजानन खरंच ग्रेट ह. आपल्य मुलीवर असा प्रसंग ओढवला असता तर आपल्याला करता आला असता का असा मसाज? 
दार वाजते. तंद्रीतून जागे होत
गजानन - येऊ का डॉक्टर ?
डॉक्टर - उभे राहून पुढे जात ‘ अरे ये ये. सॉरी हं. मी खरे म्हणजे कालच तुझ्याबरोबर यायला हवे होते. तुझ्यावर भलताच प्रसंग ओढवला. आपण जाऊ या का लगेच तुझ्या मुलीला पहायला?

Saturday, June 1, 2024

हॉस्पिटलसाठी ऑनलाईन अपॉइन्टमेंट सॉफ्टवेअर

भारतातील आरोग्यसेवा सर्व जगात उत्तम प्रतीची व कमी खर्चाची समजली जाते.भारतातील सर्व महत्वाच्या शहरांत अत्याधुनिक व सर्व सुविधांनी युक्त अशी अनेक हॉस्पिटल्स आहेत.तसेच त्यामध्ये विविध व्याधींवर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. यामुळे खेड्यापाड्यातून व दूरच्या गावातील रुग्ण अशा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. एवढेच नव्हे तर बाहेरच्या देशातील , विशेषकरून अरब राष्ट्रातील रुग्ण इंग्लंड अमेरिकेऎवजी भारतात उपचार करून घेणेच अधिक पसंत करतात.

हॉस्पिटल सेवा उत्तम प्रतीची असली तरी बाह्यरुग्ण विभागात दिसणारी रुग्णांची गर्दी पाहिली की या सेवेत फार मोठी उणीव राहिली असल्याचे जाणवते. प्रगत देशात प्रत्येक पेशंट आपली अपॉइन्टमेंट वेळ  नेटवरून आधीच  निश्चित करतो. त्यामुळे तेथे पेशंटनी गजबजलेला बाह्यरुग्ण विभाग असे  दृश्य क्वचितच दिसते. ठराविक वेळेस हॉस्पिटलमध्ये गेले की तेथील रिसेप्शनिस्ट आपला केस पेपर व एक इलेक्ट्रॉनिक डॉकेट आपल्याकडे देते. मग थोडावेळ आपणास तेथील फोटोगॅलरी, वाचनालय, कॉम्प्युटररूम वा  बागेत थाबता येते. आपला नंबर ( जास्तीत जास्त दहा पंधरा मिनिटात) आला की हातातील डॉकेटवरील लाल दिवा लागतो व आपल्याला भेटीची सूचना मिळते.या प्रक्रियेत दूरवरून येणा-या पेशंटनाही ठराविक वेळात भेटीची खात्री असते.

अनेक ग्रामीण भागातील  स्थानिक पातळीवरील डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी पेशंटना शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवितात. अशावेळी आपल्या भावी वेळापत्रकाचे नियोजन केले तर तज्ज्ञ डॉक्टरांना आपला वेळ अधिक उपयुक्तपणे वापरता येतो. डॉक्टरांची भेट घेऊ इच्छिणा-या पेशंट्सना मात्र असे नियोजन करता येत नाही. कारण अनेक रुग्ण आधीच बाह्यरुग्ण विभागात उपस्थित असल्याने त्याना आपला नंबर येईपर्यंत तेथेच वाट पहात थांबणे भाग पडते. प्रत्येक रुग्णाला किती वेळ लागेल  याची  काही खात्री नसल्याने एकूण लागणा-या वेळॆचा अंदाज त्यांना बांधता येत नाही.

ब-या च वेळेस आजारीपणामुळे रुग्णाला एका जागी जास्त वेळ बसता येत नाही. तसेच लहान मुले असतील तर त्यांना अशा बाबतीत अधिक त्रास होतो. लहान मुलांना जवळच्या इतर रुग्णांमार्फत सर्दी, खोकला यासारख्या संसर्गजन्य आजारांची लागण होऊ शकते. रुग्णाबरोबर येणा-या नातेवाईकांनाही आपला कामधंदा सोडून अशा प्रतिक्षा यादीत थांबावे लागते. काही वेळा प्रत्यक्ष आवश्यक ते तज्ज्ञ डॉक्टर बाहेरगावी वा अन्य कामासाठी गेल्याने त्यांची भेट घेता येत नाही. पेशंट परगावाहून आलेला असला तर त्याला अशी भेट घेण्यासाठी प्रवासाव्यतिरिक्त प्रसंगी राहण्याचीही सोय करावी लागते. मोठ्या शहरात यासाठी खर्चही जास्त होतो.

 अशा कारणांमुळे  रुग्ण आवश्यक त्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी दूरच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याऎवजी जवळपास उपलब्ध असणा-या हॉस्पिटलमध्येच उपचार घेणे पसंत करतात. यात रुग्णास योग्य औषधोपचार व सल्ला मिळेलच याची खात्री देता येत नाही.

मोठ्या हॉस्पिटलमध्ये सध्या फोनवरून वेळ ठरविण्याची सोय उपलब्ध असते मात्र हॉस्पिटलमधील प्रत्येक डॉक्टरच्या वेळापत्रकाविषयी सर्वसाधारण माहिती असली तरी रिसेप्शनिस्टला निश्चित माहिती नसते. शिवाय पेशंटने त्यासाठी आवश्यक ती फी भरलेली नसते. तसेच तो प्रत्यक्षात वेळेवर येईल याची खात्री नसते.  त्यामुळे अशा अपॉईंटमेंटचा फारसा उपयोग होत नाही.

 या सर्व अडचणींचा विचार केल्यावर ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या संस्थेने भारतातील प्रथितयश हॉस्पिटलमध्ये  उपयुक्त ठरेल असे ऑनलाईन अपॉइन्टमेंटचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. यात ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठीच्या पेशंट, डॉक्टर व व्यवस्थापक यांना लागणा-या सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. यासाठी स्वतंत्र वेबसाईट बनवून डॉक्टरांच्या उपलब्ध वेळापत्रकाची माहिती तेथे संकलित केली जाते. सर्व माहिती नेटच्या माध्यमातून कोणासही उपलब्ध होऊ शकते.

या सॉफ्टवेअरद्वारे पेशंटला वा त्याच्या नातेवाईकांना घरी बसून इंटरनेटद्वारे हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या वेळापत्रकावरून  त्यांची उपलब्धता पाहता येईल व आपल्या सोयीनुसार भेटीची वेळ ठरविता येईल. या सॉफ्टवेअरमध्ये नेट बॅंकिंग, क्रेडिट कार्ड वा डेबिट कार्ड वापरून  भेटीसाठी लागणारे शुल्क भरण्याची सोय असल्याने अशी भेट निश्चित होऊ शकेल.

ही माहिती भरण्याचे काम रुग्णाशिवाय इतर व्यक्तीसही( व्हिजिटर) करता येते व त्या व्यक्तीस एकापेक्षा अधिक व्यक्तींची(मेंबर) नोंद करण्याची सुविधा असल्याने  हे सॉफ्टवेअर अधिक सुलभ करण्यात आले आहे.
हॉस्पिटलमधील व्यवस्थापक सार्वजनिक सुट्ट्या, आठवड्यातील हॉस्पिटलचे कामाचे दिवस व तास यांची माहिती भरून कॅलेंडर तयार करू शकतील. तसेच नवीन डॉक्टरांचे नाव यादीत समाविष्ट करणे वा त्यात बदल करणे हेही त्यांना करता येईल. हॉस्पिटलमधील   डॉक्टरना आपली माहिती, फोटो, भावी काळातील त्यांच्या उपलब्धतेनुसार संभाव्य वेळापत्रक इत्यादी माहिती घालता येईल तसेच त्यात  आवश्यकतेनुसार केव्हाही बदल करता येतील.

 नेट बॅंकिंग, क्रेडिट कार्ड वा डेबिट कार्ड वापरत असताना  माहितीची गोपनीयता व सुरक्षितता सर्वात महत्वाची असते. त्यादृष्टीने या क्षेत्रातील भारतात अग्रगण्य असणार्यास सीसीअव्हेन्यू या संस्थेच्या पेमेंट गेट्वेशी हे सॉफ्टवेअर संलग्न केले असल्याने पेमेंटविषयक आवश्यक ते सुरक्षा कवच सीसीअव्हेन्यूच्या सिस्टीममध्येच अंतर्भूत असते.  अपॉइन्टमेंटविषयीची सर्व माहिती दूरस्थ सर्व्हरवरील डाटाबेसमध्ये साठविली जाते व व्हिजिटर व व्यवस्थापक यांना लॉगिन करूनच याची माहिती मिळविणे वा त्यात काही बदल करणे शक्य असते.

हॉस्पिटलच्या व्यवस्थापनासाठी लागणारे अपॉइन्टमेंटविषयीचे विविध प्रकारचे रिपोर्ट या सॉफ्ट्वेअरमधून मिळू शकतात. तसेच या रिपोर्टचे रुपांतर एक्सेलच्या तक्त्यात करता येऊ शकते.

सांगलीतील प्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. मिलिंद किल्लेदार यांच्या अनुराधा आय हॉस्पिटलमध्ये हे सॉफ्टवेअर तीन  वर्षे  यशस्वीपणे चालू होते. मात्र त्यात वापरले  जाणारे फ्लॅश तंत्रज्ञान कालबाह्य झाल्याने आता क्लाऊड बेस्ड मोबाईल फ्रेंडली सॉफ्टवेअर बनविण्यासाठी ज्ञानदीप इन्फोटेक कंपनीने त्यांच्या कडे पूर्वी काम करीत असलेल्या व पुण्यात मोठ्या कंपनीत नोकरी करणा-या माजी डेव्हलपरला सांगलीत पुन्हा बोलावून हे काम युद्धपाताळीवर करावयाचे ठरविले आहे. सुदैवाने ज्ञानदीपच्या व्यवस्थापनात आता सांगलीतील गणपती कॅंन्सर हऑस्पिटलमध्ये अनेक वर्षे अॅडमिनिस्ट्रेटर म्हणू काम केले.्या प्रा. डॉ. यशवंत तोरो यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याने थोड्याच अवधीत हे सऑफ्टवेअर सर्व डॉक्टर व पेशंट याच्या सेवेस उपलब्ध होईल.

ज्या हॉस्पिटल्स  वा डॉक्टर्सना या  संधीचा फायदा घ्यावयाचा असेल त्यांनी आपली माहिती व अपेक्षा कळवून सऑफ्टवेअरसाठी आपली मागणी नोंदवायची असेल त्यांनी डॉ. यशवंत तोरो यांचेशी संपर्क साधावा.
 

. डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि., सांगली.

Thursday, May 9, 2024

प्रा. भालबा केळकर - मराठी मुलांसाठी विज्ञान संशोधनाचा ज्ञानदीप

वालचंद कॉलेजचे ज्येष्ठ निवृ्त्त प्राध्यापक आणि विज्ञान संशोधन ही जीवननिष्ठा पाळणारे प्रा. भालबा केळकर आज वयाच्या ८६व्या वर्षीही  दिवसरात्र मुलांसाठी वैज्ञानिक खेळणी करण्यात मग्न आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात  उच्च पदे भूषवीत असून अनेक विद्यार्थी  यशस्वी उद्योजक म्हणून यशस्वी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय संशोधन व उद्योग क्षेत्रात आणि भारताच्या प्रगतीत या विद्यार्थ्यानी मोलाची भर घातली आहे.
काल त्यांच्या घरी म्हणजेच ज्ञानदीप फौंडेशनच्या नव्या शाखेत त्यांचेबरोबर चर्चा करताना मी स्पष्टपणे  त्यांच्यबद्दल लोकांत असणा-या काही गैरसमजुतींची त्यांना कल्पना दिली.

जग किती पुढे गेले आहे आणि भालबा केळकर हे अजून मुलांसाठी साधी खेळणी करण्यातच  निरर्थक वेळ घालवीत आहेत.

असे मत ऐकल्यानंतर ते हसले. म्हणाले 

"मला उद्याचे नवसंशोधक करायचे आहेत त्यासाठी लहान वयातच मुलांना संशोधनाची गोडी लावणे आवश्यक आहे. दुर्दैवाने याकडे कोणाचेच लक्ष नाही. इंग्रजी शाळेत परदेशी छानछोकी व स्मार्टनेस याला महत्व दिले जाते परंतु  मातृभाषेकडे दुर्लक्ष झाल्याने मुलांची ज्ञानग्रहणाची इच्छा णि कुवत कमी होते. मराठी शाळांतील मुलांना शिकण्याची हौस आणि इच्छा असली तरी महागडी उपकरणे व तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांच्यात एक प्रकारची निराशा व असूया निर्माण होते. यावर उपाय म्हणजे साध्या घरगुती वस्तूंचा वापर करून त्यांना विज्ञान तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आवश्यक आहे. उच्च विद्याविभूषित शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ प्रत्यक्ष संशोधन व विकास यात मग्न असल्याने त्यांना यासाठी वेळ नाही. शिवाय मराठीत काही लिहिणे वा शिकविणे आपल्या समाजात कमी दर्जाचे मानले जाते. त्यामुळे मराठीतून आणि लहान मुलांसाठी खेळणी करणे हे असा लोकांकडून पोरकटपणाचे लक्षण मानले जाणे स्वाभाविक आहे."

प्रा. भालबा केळकर हे जुन्या काळातले बीई मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल असे द्विपदवीधर आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील विविध शाखांत त्यानी उच्छ संशोधन आणि जवळजवळ तीस वर्षे प्रत्याक्ष उत्पादन व विक्री करण्याचा अनुभव घेतला आहे. असे असून ते मराठी मुलासाठी कमी खर्चाची  साधी वैज्ञानिक खेळणी करत आहेत. त्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून महाराष्ट्रभर ती उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मनोदय आहे. 

ज्ञानदीप इन्फोटेकचा आधुनिक तंत्रज्ञानावर भर असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली उत्पादने वितरित करण्याची योजना असल्याने मी त्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्ता असलेल्या एखाद्या उपकरणावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे. थ्री डी प्रिंटर, लेसर कटींग मशिन इत्यादी सोयींसाठी भांडवल उभे करण्याची ज्ञानदीपची इच्छा असून भालबा केळकरांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक नवी उपकरणे निर्माण करण्यात ज्ञानदीप यशस्वी होईल असा मला विश्वास वाटतो.
त्यांच्या एआरईच्या अस्तानंतर ज्ञानदीप आपल्या सर्व सहकारी मित्रांच्या मदतीने फिनिक्स पक्षाप्रमाणे गगनभरारी करण्यासाठी पंखांत नवी शक्ती देऊ शकेल असे मला वाटते. -  डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली संपर्क - drsvranade@gmail.com / +919422410520 /01(408) 338 7672

Saturday, March 30, 2024

मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी ज्ञानदीपचे आंदोलन


ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या वेबडिझाईन कंपनीने इ.स. २००० पासून मराठी माध्यमास आपल्या वेबसाईट, सॉफ्टवेअर व मोबाईल सुविधांमध्ये महत्वाचे स्थान दिले आहे.
 

 
महाराष्ट्रात आज बहुतेक शहरांच्या वेबसाईट इंग्रजीत असून सर्वसामान्य जनतेला त्याचा काही फायदा होत नाही. प्रसिद्ध मराठी वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर गुगलसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या जाहिराती देत असल्याने स्थानिक उद्योग व व्यावसायिकांना आपल्या वस्तू वा सेवा यांची जाहिरात या माध्यमातून करता येत नाही.महाराष्ट्र हे उद्योग
, तंत्रज्ञान तसेच विज्ञान संशोधनात आघाडीवर असणारे राज्य आहे. मात्र इंग्रजी भाषेच्या अडथळ्यामुळे हे ज्ञान सर्वसामान्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणण्यात अपयशी ठरलेले आहे. सध्या विज्ञान व उच्च तंत्रज्ञान फक्त इंग्रजी भाषेची मक्तेदारी झाल्याने मराठीत याविषयी काही लिहिणेही कमीपणाचे वाटू लागले आहे.
 
महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची आणि शिक्षणसंस्थेची मराठी माध्यमातील वेबसाईट  तसेच मोबाईल एप 
 बनवून त्यावर स्थानिक उद्योग व व्यावसायिकांच्या जाहिराती अगदी कमी खर्चात प्रसिद्ध करण्यासाठी मोठे कृतिशील आंदोलन उभारण्याची गरज आहे.
 
ज्ञानदीप महत्वाच्या शहरांमध्ये असे कार्यगट स्थापन करून अशा वेबसाईट बनविण्यास  व त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यास लागणारे त्यांना सर्व ते तंत्रज्ञानविषयक साहाय्य मोफत देणार आहे.
 
 एकटे ज्ञानदीप फौंडेशन हे सर्व काम करू शकणार नाही. मात्र मराठीवर प्रेम असणा-या सर्वांनी एक कर्तव्य म्हणून असे कार्य आरंभले तर हेही सहज होऊ शकेल. मग आंतरराष्ट्रीय मोठ्या आयटी कंपन्यांचे जाहिरातींवरील आणि शिक्षणावरील वर्चस्व संपुष्टात येईल. सर्वांन काम मिळेल आणि आपल्या स्वदेशी उद्योग आणि व्यवसायाला नवसंजीवनी मिळेल.
 
परभाषेतहि व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी
मायमराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका
भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे
गुलामभाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका
 
---
कवि कुसुमाग्रज ( स्वातंत्र्यदेवीची विनवणी ) 


मराठी विज्ञान परिषदेसारख्या संस्था गेली अनेक वर्षे मरा्ठीतून विज्ञानप्रसाराचे काम करीत आहेत. या उपक्र्मात मोठमोठे शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ सहभागी झाले आहेत. त्यांनी विज्ञान तंत्रज्ञानातील शब्दांना समर्पक मराठी शब्द शोधून त्यांचा वापर करून बरेच लिखाणही केले आहे. तरीही हे काम शालेय विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित राहिले. याचे कारण मराठीतील पर्यायी शब्द व प्रचलित इंग्रजी शब्द यांची सांगड घालून अर्थ समजावून घेण्याचा खटाटॊप करण्याएवढा वेळ देण्याची लोकांची तयारी नसते. साहजिकच अशा मराठी साहित्याकडे केवळ अभ्यासण्याजोगी मराठी कलाकृती या दृष्टीकोनातून पाहिले गेले.

मराठी असे आमुची मायबोली,
तिला राज्य का? विश्वभाषा करु
जगातील विद्या तशी सर्व शास्त्रे
तिच्यामाजि आणोन आम्ही भरु
 
- प्र. ग. सहस्त्रबुध्दे

शुद्ध मराठी पर्यायी शब्दांचा आग्रह धरल्याने मराठीतील असे बरेच साहित्य सर्वसामान्यांना दुर्बोध झाले आहे. कालांतराने हे मराठी शब्द रूढ होतीलही पण प्रगत विज्ञान व मराठीतील भाषांतरित ज्ञान यातील अंतर वाढतच राहील. भाषेचा मुख्य उद्देश ज्ञान संक्रमित करणे हा असल्याने नेहमीच्या वापरातील इग्रजी शब्दही मराठीत निःसंकोचपणे वापरून हे ज्ञान लवकरात लवकर विशेष प्रयास न करता सर्व सामान्य जनतेला कसे समजू शकेल याचा विचार दुर्दैवाने झाला नाही.

नको पप्पा - मम्मी, आई - बाबा म्हणा
वात्सल्याच्या खुणा शब्दोशब्दी
धन्यवाद म्हणा नको थँक्यू थँक्यू
थोडे थोडे रांगू मराठीत
 
---कवि किशोर पाठक - प्रकाशनविश्व २००१

माझ्याही बाबतीत असेच घडले. १९६८ मध्ये पर्यावरण विषयात एम. ई. करतानाच मराठीत हे ज्ञान यावे असे मला वाटले. मराठी साहित्य संस्कृती मंडळातर्फे जलशुद्धीकरणया विषयावरील जागतिक आरोग्य संघटनेचे चार्लस कॉक्स या लेखकाच्या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करण्याचे काम मी अंगावर घेतले. मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे श्री. बा. रं. सुंठणकर यांनी सांगलीत माझ्या घरी येऊन या माझ्या कामास प्रोत्साहन दिले. माझ्या या कामास मार्गदर्शक म्हणून निवृत्त सचिव व मुख्य अभियंता असणारे श्री. वि. ह. केळकर हे काम पहात होते. त्यांनी धरण व जलसिंचन विषयावरील पुस्तके भाषांतरित केली होती. जलशुद्धीकरणातील सेटलिंग व फिल्ट्रेशन या प्रक्रियांसाठी त्यानी अवसादन व निस्यंदन हे मराठी शब्द सुचविले. अशा पद्धतीच्या अनेक संस्कृतोद्भव नव्या शब्दांचा उपयोग करून जिद्दीने मी ते ३०० पानांचे पुस्तक भाषांतरित केले खरे. जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल करण्याविषयी अतिशय बहुमोल अशी माहिती यात असल्याने मी ते जलशुद्धीकरण केंद्रातील लोकांना वाचायला दिल्यावर पूर्ण वाचायचे कष्ट न घेता वरवर चाळून छान भाषांतर आहेएवढ्या अभिप्रायाने त्यांनी ते परत केले. या पुस्तकाचा प्रत्यक्ष व्यवहारात काहीही उपयोग होणार नाही हे कळून चुकल्याने जवळजवळ ६०० पानांचे ते हस्तलिखित प्रकाशित न करता मी तसेच ठेवून दिले.

गेल्या पन्नास वर्षात मराठीत अनेक नवे पर्यायी शब्द आता रुढ झाले आहेत मात्र त्यासाठी बराच काळ जावा लागला आज विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती ज्या वेगाने होत आहे त्याच्याशी तुलना करता भाषांतरित ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एवढ्या उशीरापर्यंत थांबणे परवडणारे नाही. इंग्रजी शब्दांचा बिनदिक्कतपणे वापर करून म्रराठीचा केवळ संपर्क भाषा म्हणून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शासनाने ठरविले असते तर विज्ञान तंत्रज्ञानातील नव्या मराठी शब्दांच्या वापराला निश्चितच बळ मिळाले असते. रशियाने सर्व इंग्रजी पुस्तकांचे व संशोधनपर लेखांचे रशियन भाषेत भाषांतर करण्याचे काम सक्तीने तेथील साहित्यिक व शास्त्रज्ञांकडून करवून घेतले होते. राष्ट्रीय अस्मिता जपण्याचा व वाढवण्याचा तो मार्ग त्यांनी अवलंबिला होता.

आजही शासकीय व्यवहार, कायदा, शेती, सहकार या क्षेत्रात शासनाच्या पुढाकारामुळे मराठीने चांगले पाय रोवले आहेत. मात्र विज्ञान तंत्रज्ञानाकडे शासन याबाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. उलट यासाठी इंग्रजी शिक्षणास प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित केले आहे. मुलांनी इंग्रजी शिकून मगच विज्ञान तंत्रज्ञानाच्या वाटेला जावे असे शासनाला वाटत असावे. त्यांचे हे मत विद्यार्थ्यांसा्ठी योग्य आहे असे मानले तरी शाळेबाहेर पडलेल्या वा शाळेतच न गेलेल्या बहुसंख्य मराठी लोकांचे काय? त्यांना हे ज्ञान मिळविण्याचा कोणता मार्ग उपलब्ध आहे.

मराठी ही फक्त साहित्यिकांची भाषा आहे अशा थाटात शासन त्याकडे पहात आहे. केवळ साहित्य संमेलनाला देणगी दिली की आपले मराठीविषयी दायित्व संपले अशी भावना शासनाची झाली आहे. मराठी शिकणे म्हणजे व्याकरण शिकणे व साहित्य वाचणे एवढाच अर्थ शिक्षण क्षेत्रातही रूढ आहे. त्यामुळे मराठी शिकविणारे प्राध्यापकही मराठी वाचतात पण लिहीत नाहीत. मराठी घेऊन बीए एमए होणार्‍यांना काही मान नाही व शिक्षण क्षेत्राशिवाय कोठे संधी नाही. भाषांतर हा मुख्य उद्देश मराठी शिकण्यासाठी ठेवला तर हा विषय व्यवसायाभिमुख होईल. मात्र त्यासाठी मराठीचा दुराग्रह न ठेवता किमान दोन भाषांचा अभ्यास करण्याची व भाषांतराची कृती सत्रे अत्यावश्यक थरविण्याची गरज आहे.

आज मराठी लिहिण्याबद्दल कमीपणाची भावना व विलक्षण उदासीनता शिक्षित वर्गात निर्माण झाली आहे. इंग्रजी वाचलेले कळत नाही व मराठीत साहित्य उपलब्ध नाही जे आहे ते प्रत्यक्ष वापरातील शब्द नसल्याने दुर्बोध आहे आजचा जिज्ञासू मराठी वाचक व विद्यार्थी अशा तिहेरी कात्रीत सापडला आहे.

प्रचलित इंग्रजी शब्दांचा वापर करून मराठीत असे साहित्य निर्माण करणेच या परिस्थितीत योग्य ठरेल. मराठीवर प्रभुत्व असणार्‍या लोकांनी नवे शब्द जरूर तयार करावेत पण त्याविना अडायचे कारण नाही. रशियासारखे महाराष्ट्रात होणार्‍या प्रत्येक संशोधनाचा गोषवारा मराठीत प्रसिद्ध करण्याचे बंधन शासन व शिक्षणसंस्था घालू शकतात. सर्वांनी या बाबतीत कर्तव्याच्या भावनेतून मराठीत लिहिण्याचे ठरविले तर मराठी ज्ञानभाषेचे स्थान पुन्हा मिळवू शकेल.

साय मी खातो । मराठीच्या दुधाची ।
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला ? ।।
 
- कवि सुरेश भट
 
मराठीला खरी ज्ञानभाषा बनविण्याविषयी साहित्यिक व राजकीय नेते काही खास उपाययोजना सुचवतील व त्या अमलात आणतील अशी आशा करूया. -  डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Monday, March 18, 2024

मुंबई पर्यावरण व संतुलित विकास

 ज्ञानदीपच्या मुंबई शाखेतर्फे ७ एप्रिल २०२४ रोजी नियोजित चर्चासत्र -

मुंबई पर्यावरण व संतुलित विकास

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. वेबसाईट व मोबाईल अॅपसाठी मराठी भाषेचा आवर्जून उपयोग करणा-या ज्ञानदीप फौंडेशनचे मुंबईत शाखा सुरू करण्याचे स्वप्न मुंबईचे निवृत्त मुख्य अभियंता श्री. सु. ना. पाटणकर यानी पूर्ण केले आहे. त्यांच्या मुलुंड येथील निवासस्थानी ज्ञानदीप फौंडेशनची मुंबई शाखा १५ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू झाली.

मुंबई चे पर्यावरण, विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्याची स्थानिक जनतेला माहिती व्हावी या उद्देशाने ज्ञानदीपने माय मुंबई डॉट नेट (https://mymumbai.net)या नावाची वेबसाईट सुरू केली आहे. त्याचे औपचारिक उदघाटन ७ एप्रिल २०२४ रोजी करण्यात येणार असून मुंबईचे पर्यावरण व संतुलित विकास या विषयावर तज्ज्ञांची व्याख्याने व मराठीतून नेटद्वारे प्रशिक्षण या संबंधी चर्चासत्र आयोजित करण्यात येत आहे.

श्री सुरेश ना. पाटणकर यानी इंडियन वाटर वर्क्स असोसिएशनच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली होती संस्थेला मुंबई महापालिकेत ऑफिससाठी जागा त्यांच्याच प्रयत्नातून उपलब्ध झाली. या संस्थेची पहिली वेबसाईट 2004 साली ज्ञानदीप इन्फोटेकला मिळण्यासही त्यानी पुढाकार घेतला. 2021 साली ही वेबसाईट उत्तरप्रदेशातील कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली. भारतीय भाषांतून या संस्थेच्या कार्याची प्रसारित करण्याची ज्ञानदीपची कल्पना फलद्रूप होऊ शकली नाही. या संस्थेच्या 2021च्या अधिवेशनात श्री. पाटणकर यांनी ज्ञानदीपसाठी आपल्या निवासस्थानी मोफत ऑफिस सुरू करण्याची सूचना मांडली. त्यातूनच मुंबई शाखेची निर्मिती झाली.



श्री. पाटणकर यांनी 'करू या पर्यावरणाचा विविधांगी विचार' नावाचे पुस्तक मराठी विज्ञान परिषदेमार्फत प्रसिद्ध केले असून निवृत्तीनंतरही त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कार्य सर्वानाच आदर्शवत आहे.

सकाळचे सत्र पर्यावरण तंत्रज्ञान व विकास या साठी तर दुपारचे सत्र मायमुंबई वेबसाईटच्या माध्यमातून जनजागृती व प्रशिक्षण यासाठी नियोजित केले असून  मुंबई शाखेच्या पुढील प्रगतीसाठी हे चर्चासत्र मार्गदर्शक ठरणार आहे.

या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी प्रतिव्यक्ती एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सदरचे चर्चासत्र श्री. सु. ना. पाटणकर यांनी आपल्या हॉलमध्ये घेण्यास अनुमती दिली आहे. सर्वसाधारणपणे पन्नास प्रतिनिधी येण्याचा अंदाजअसून प्रत्यक्ष नोंदणी नंतर कार्यक्रमाचे स्थळ व रूपरेषा ठरविण्यात येईल.

मराठी विज्ञान परिषद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इंडियन वाटर वर्क्स असोसिएशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच इतर पर्यावरण आणि मराठी शिक्षणक्षेत्रात कार्य करणा-या संस्थांनी आपले प्रतिनिधी पाठविले चर्चासत्राचे प्रायोजकत्व स्वीकारले तर ज्ञानदीपच्या मुंबई शाखेचे हे पहिलेच सेमिनार यशस्वी ठरेल आणि ज्ञानदीपच्या इतर अनेक त्रानप्रसार योजनेस बळ मिळेल असा मला विश्वास वाटतो.
संपर्क - ज्ञानदीप मुंबई शाखा
द्वारका, पुष्पधन्वा सोसायटी, पं. मालवीय रोड, मुलुंड ( पश्चिम)
मुंबई - 022-2567 9245
भ्रमणध्वनी - 9322272777
 - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
इ मेल - info@dnyandeep.net / +818422310520

Sunday, March 17, 2024

दूरदर्शन दूरच बरे

टीव्हीला इडियट बॉक्स म्हटले जाते ते खरेच आहे. आपण वेड्यासारखे टीव्हीवर जे दाखवितात ते अगतिकपणे पाहात राहतो. आपला किती वेळ गेला व नुकसान झाले याचा आपल्याला अंदाज येत नाही. तीच तीच बातमी वा तेच तेच दृश्य पुनःपुन्हा दाखविले तरी ते आपल्याला पहावे लागते. मालिकेतील पुढील भाग पाहण्यासाठी जाहिरातींवर जाहिरातीचे हल्ले आपल्याला निमूटपणे सहन करावे लागतात. थोड्क्यात दूरदर्शन आपला अमूल्य वेळ हक्काने आपल्या ताब्यात घेतो.

सध्या तर दूरदर्शन वा टीव्ही या प्रसार माध्यमाने बहुतेक सर्व घरांचा ताबा घेतला आहे. कोरोनामुळे घरात बसावे लागते. मग वेळ घालवायचा सगळ्यात सोपा आणि आनंददायी पर्याय म्हणून आपण टीव्ही पहात बसतो.

चित्तवेधक जाहिराती, गाणी,   जगभरात चाललेल्या दंगली, हिंसाचार, अपघात, भडक बातम्या दाखवून लोकांना आपल्या चॅनेलकडे खेचून आणण्याची स्पर्धा पराकोटीला गेली आहे. करमणुकीसाठी नाचगाणी, नटनट्या व खेळाडूंच्या रसभरीत कथा व ओढून ताणून बनविलेल्या कौटुंबिक संघर्ष मालिका यांनी दूरदर्शन व्यापून गेले आहे. त्यातच चैनीच्या वस्तूंच्या व सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिराती भर घालत आहेत. आता लॉटरीच्या धर्तीवर स्पर्धा मालिका लोकप्रिय होत आहेत. मुलांसाठी कार्टून मालिका तर युवकांसाठी सिनेसंगीत व मुव्हीज यांचाही जाहिरातींसाठी वापर होत आहे. फुकट करमणूक करण्याच्या व जगातील घडामोडींचे ज्ञान देण्याच्या बहाण्याने व्यावसायिक दूरदर्शन चॅनेलधारकानी या एरवी उपयुक्त व प्रभावी प्रसार माध्यमावर आपला बाजार मांडला आहे. दुर्दैवाने याविरुद्ध कोणीच तक्रार करीत नाही ही खेदाची गोष्ट आहे.

दूरदर्शनचा उपयोग शिक्षणासाठी व समाज प्रबोधनासाठी करण्याचे सरकारचे उद्दीष्ट असले तरी त्याची अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. व्यावसायिक चॅनेलना टक्कर देऊन समाजोपयोगी सरस व आकर्षक कार्यक्रम व विधायक संतुलित बातम्या देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. मात्र त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद न केल्याने या कार्यक्रमांकडे प्रेक्षक वळत नाहीत. परिणामी  दूरदर्शन हे प्रसारमाध्यम समाज उन्नतीऎवजी समाजाच्या अधोगतीस कारणीभूत होत आहे.

दूरदर्शन पाहण्यात लोक आपला किती वेळ घालवतात हे पाहिले तर धक्कादायक निष्कर्ष निघतील. दूरदर्शन पाहण्याचा नाद लागल्याने मुले वाचन व अभ्यासास कंटाळा करतात. मोठ्या माणसांना घरात बसून टी व्ही बघण्याची सवय लागल्याने महत्वाची बाहेरची कामे, समाजसेवा, सभा, व्याख्याने यांना उपस्थिती, भेटीगाठी यात चालढकल होते.  टीव्ही मालिकेतील ताणतणाव यानी विनाकारण मनात काहूर माजते. पुढे काय होणार हे पाहण्याची उत्सुकता व नंतर चटक लागते. दूरदर्शन मालिकावाले या अशा लोकांना हवे तसे ताटकळत ठेवतात व जाहिरातींचा मारा त्यांच्यावर करतात.

माझे एक मित्र टीव्हीच्या या दुरुपयोगाबद्दल फार जागरूक असल्याने त्यांनी आपल्या घरात टीव्ही घेतला नव्हता. त्यावेळी मीही त्यांच्या या वागण्यावर टीका करायचो. आता मला त्यांचे म्हणणे पटू लागले आहे. मात्र त्या मित्राच्या घरात बायको व मुलांच्या आग्रहाखातर टीव्हीने आपले बस्तान बसविले आहे.

आपण टीव्ही पाहतो तेव्हा आपला किती वेळ फुकट जातो याचा विचार करावयास हवा. तोच वेळ शिक्षण, व्यवसाय वा अन्य कामात घालविला तर किती फायदा होऊ शकेल हे लक्षात घेतले तर याची नीट  कल्पना येईल.

म्हणून दूरदर्शनचा वापर मर्यादित व जपून करा. कोणता कार्यक्रम पहायचा हे विचारपूर्वक ठरवा. आवश्यक माहिती मिळाली वा कार्यक्रम संपला की लगेच दृढ निश्चयाने तो बंद करा. मुलांपासून तर दूरदर्शन शक्यतो दूरच ठेवा. कारण तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकाल मात्र तुमच्या मुलांना याची चटक लागली की ती तुमचे काही ऎकणार नाहीत. मग त्यांच्या अभ्या्स व खेळात होणार्‍या हानीस टीव्हीऎवजी वा मुलांऎवजी तुम्ही स्वतःच जबाबदार ठराल.

Saturday, March 16, 2024

सामान्य माणूस


सामान्य माणूस कसा असतो याचे चित्रण आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांतून, चार्ली चॅप्लीन व लॉरेल हार्डी सारख्या सिनेमांतून प्रभावीपणे व्यक्त झाले आहे. मर्यादित स्वार्थ, पापभिरुपणा, उसने अवसान, बावळटपणा, घाबरटपणा व भाबडा स्वभाव ही सामान्य माणसाची वैशिष्ठ्ये सांगता येतील. टॉलस्टॉय, मार्क ट्वेन, चेकॉव्ह यांच्या गोष्टी, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी यांच्या लेखांतूनही त्याचे दर्शन घडते. दादा कोंडके, लक्ष्या व आता मकरंद अनासपुरे याचे चित्रपट सामान्य माणसाचीच कहाणी सांगतात.

सामान्य माणसाच्या भावभावनांशी आपण लगेच एकरूप होतो. मात्र आपण सामान्य माणूस आहोत हे मान्य करायला मात्र बहुतेकांना लाज वाटते. अर्थात आपण असामान्य नाही हेही त्यांना पुरेपूर ठाऊक असते.

माझ्याबाबतीत मात्र मला आपण सामान्य माणूस आहोत याची मनोमन खात्री पटली आहे.मोठेपणी आता समाजकारण व राजकारण याबाबतीत माझी काही मते निश्चित झाली असली तरी लहानपणी ती सतत बदलत असायची.

मला आठवते त्याप्रमाणे १९५० ते १९६० पर्यंतचा शालेय जीवनाचा काळ विविध रंगी संस्कारांनी अगदी भारून गेला होता. सातारला राजवाडा चौकात यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी, श्री. अ. डांगे, गॊळवलकर गुरुजी यासारख्या बर्‍याच नेत्यांची भाषणे मोठ्या भक्तीभावाने मी ऎकायचो. एकाचे भाषण ऎकले की मी त्यांच्या विचाराचा होऊन जाई. ते म्हणतात तेच खरे. बाकी सर्व चूक अशी माझी स्थिती होई. दुसरे वेगळ्या विचाराचे भाषण ऎकलॆ की माझ्या विचारांत पूर्ण बदल होई.

खेळाची फारशी आवड नसल्याने वा प्रकृतीही नाजुक असल्याने मी मैदानी खेळांच्या भानगडीत कधी पडलो नाही. त्यापेक्षा नगरवाचनालयातील पुस्तके वाचणे मला आवडे. त्यात आवड निवड नव्हती. कोणतेही पुस्तक मला चाले. सोव्हिएट देश मासिकातून मराठीत सुंदर लेख व गोष्टी येत. मी त्या वाचत असे. पुस्तक वाचनातून वैज्ञानिक व समाजवादी विचारसरणीचा माझ्यावर प्रभाव पडू लागला. एकदा मी शाळेतील मित्राला मार्क्स तत्वज्ञान काय आहे याची माहिती सांगितली. तो संघस्वयंसेवक असल्याने त्याला ते रुचले नाही. तो म्हणाला असले काही वाचत जाऊ नकोस. तुझा बुद्धीभेद होईल. तुला वाचायचेच असेल तर म्हाळगींचे मार्क्सवादावरील पुस्तक वाच.त्याला माझ्याबद्दल वाटणारी काळजी मला कळली पण मी त्याचा सल्ला मानला नाही. कारण मला कोणतेही बंधन नको वाटायचे. कधी मित्रांबरोबर शाखेत गेलो तर तेथील बौद्धीके ऎकून मला हिंदु धर्माचे भरते य़ेई. पण इतर धर्मांविषयी पुस्तके वाचली की त्यांची श्रद्धाही मला योग्य वाटू लागे.

अंधश्रद्धा, धर्म व विज्ञान या विषयांवर आमच्यात नेहमी वादविवाद होत असत. त्याबाबतीतही माझे मन सांगणार्‍याप्रमाणे हेलकावे खाई. देव आहे की नाही असे विचारले तर मला दोन्ही बाजूंनी वाद घालता येई. घरात देवाबद्दल अशी शंका घेण्याने घरातल्यांची मने दुखावतात हे पाहून मी तेथे धार्मिक रहात असे तर मित्रांत निरीश्वरवादी. रामायण महाभारतातील युद्धे, शिवाजी, राणाप्रताप यांचे पराक्रम, राणी लक्ष्मीबाई किवा सुभाषचंद्र बोस यांचा सशस्त्र संघर्ष या माहितीबरोबर महात्मा गांधींची अहिंसा व असहकाराचे स्वातंत्र्यासाठी योगदान पाहिले की मनात हिंसा-अहिंसा या मार्गांविषयी संभ्रम निर्माण होई.

आजही माझ्या स्वभावात फारसा काही फरक पडलेला नाही हे मला जाणवते. लांबची लढाई मला आवडते. पण प्रत्यक्ष लढाईला मी घाबरतो. विरुद्ध पक्षाचाही सहानुभूतीने व त्याच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची सवय जडल्याने माझी अर्जुनासारखी स्थिती होते. गरिबांचे दुःख मला अस्वस्थ करते मात्र आपल्या सुखासीन जीवनाचा त्याग करून त्यांच्या उद्धारासाठी जीव झोकून काम करण्याचे धाडस होत नाही. राजकारणात तर ‘कोणता मी झेंडा घेऊ हाती’ असा रास्त संभ्रम पडतो.

पर्यावरण रक्षण का विकास, व्यक्तीस्वातंत्र्य की स्वयंशिस्त, मराठी की इंग्रजी, समाजवाद की लोकशाही असे अनेक प्रश्न माझ्या मनात अनुत्तरित राहिलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही बाबतीत ठाम भूमिका घेणे मला जमत नाही.

थोडक्यात सांगायचे म्हणजे वार्‍याप्रमाणे गवताची पाने जशी त्या त्या दिशेने वाकतात तशीच सामान्य माणसाची स्थिती असते. पाने वाकली तरी मुळे भोवतालच्या समाजातील संस्कारात घट्ट रोवलेली व गुंतलेली असतात.वार्‍याला विरोध करणारी झाडे पडली तरी गवत तसेच राहते. कदाचित पाने खुडली गेली तरी मुळे शाबूत राहतात. समाज जीवनास हानी पोहोचत नाही. सत्यासाठी संघर्ष करणे आवश्यक असले तरी आपल्याला वाटणारे सत्य हॆ आपल्या आकलन शक्तीवर व पूर्वग्रहावर आधारित असते हे समजून घ्यावयास हवे. त्रयस्थपणाने खरे काय व खोटे काय याची शहानिशा करायला गेले की दोन्ही बाजूत काही तथ्य तर काही दोष आढळतात.त्यातील सत्य शोधून काढायला सामान्य माणसाला वेळ नसतो, धाडस नसते व त्याची ती कुवतही नसते.

सुदैवाने कबूल नाही केले तरी बहुतेक माणसे सामान्यच असतात. त्यांची निष्ठा, आशाआकांक्षा वैयक्तिकपणे बदलत्या असल्या तरी त्यांचा एकूण प्रभाव सत्य, अहिंसा, सर्वांभूती समभाव या चिरंतन गोष्टींचाच पाठपुरावा करतो. हेच लोकशाहीचे मुख्य यश आहे.

काळजी एवढीच वाटते की सत्ता, पैसा व अधिकारांचा वापर करून सामान्य जनसागरास आवश्यक त्या दिशेने वळविण्याचे व त्याच्य़ा प्रचंड ताकतीच्या लाटांनी हवे ते घडविण्याचे तंत्र मानवसमूहांनी विकसित केले आहे.हे मानवसमूह एखाद्या राजकीय पक्षाच्या स्वरुपात, सामाजिक चळवळीच्या स्वरुपा्त, बलाढ्य कार्पोरेट कंपनी वा सत्तापिपासू राष्ट्राच्या स्वरुपात कार्य करीत असतात. या सत्तासंघर्षात किती सामान्य माणसांचे जीवन व संसार उध्वस्त होतात याकडे कोणाचेच लक्ष जात नाही. इतर घटक सोडा पण त्यांच्यासारखी बाकी सर्व सामान्य माणसे अशा विध्वंसाकडॆ एक अपरिहार्य घटना म्हणून पाहतात व त्याची आपल्याला काही झळ बसत नाही ना याची काळजी घेतात.
प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे

या उक्तीप्रमाणे मला असे वाटते की माणसाने सामान्यच रहावे, सामान्यांविषयी आस्था ठेवावी. लोकशाही व कायदा दोहोंचे कसोशीने पालन करावे. असे झाले तर असामान्यांची समाजाला गरज उरणार नाही व पसायदानाचे उद्दीष्ट साध्य होईल.
सर्वे सुखिनः संतु ।
सर्वे संतु निरामयाः ॥
सर्वे भद्राणि पश्यंतु ।
मा कश्चित दुःखम्‌ आप्नुयात ॥
हे सर्व ठीक असले तरी काही वेळा अशा सामान्य माणसांतूनच परिस्थितीचे चटके बसल्याने, अन्याय असह्य झाल्याने वा सात्विक संताप आल्याने अथवा केवळ स्वार्थापोटी काही माणसे असामान्य कृती करतात. त्यातील काही नेते तर काही गुन्हेगार बनतात. एरवी संथ असणारा जनसागर मग यांच्यामुळे जागृत होतो. त्यात प्रचंड लाटा उसळतात. त्याचे बरे वाईट परिणाम मग सर्वांना भोगावे लागतात.
याचवेळी काही राजकीय व सामाजिक संघटित गट अशा व्यक्तीला पाठिंबा देऊन आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. एवढेच नव्हे तर प्रसिद्धीच्या प्रलोभनातून त्याला अतिरेकी पावले उचलायला प्रवृत्त करतात. यात त्याचा जीव गेला तरी त्याचे भांडवल करायला मिळते. तो यशस्वी झाला तर त्याला मांडलिक बनवून आपला कार्यभाग साधण्याकडे या शक्तींचा प्रयत्न असतो. नव्या सत्तासंघर्षात अशावेळी सामान्य वा अपक्ष राहणे धोकादायक ठरू शकते. मग पापभिरू माणसे सुरक्षेसाठी वा आपल्या फायद्यासाठी बलवान पक्षाच्या गटात सामील होतात.

Monday, March 11, 2024

एकच प्याला - व्यक्ती आणि समाज यांना अधोगतीला नेणारे मोहिनी अस्त्र

 प्रसिद्ध व विलक्षण प्रतिभावंत लेखक, कवी आणि नाटककार कै. राम गणेश गडकरी  यांचे एकच प्याला हे नाटक प्रत्यक्ष पाहिले नसले तरी मला पूर्वीपासून माहिती होते. पहिल्या मोहाला बळी पडल्याने सुधाकर  दारूच्या  व्यसनात कसा अडकत गेला आणि  सुधाकर व सिंधू यांच्या संसाराचाच कसा  सर्वनाश झाला याचा जीवनपटच नाटकाने प्रेक्षकांपुढे उभा केला आहे. जवळजवळ तशाच  पद्धतीने दुर्दशा माझ्या जवळच्या नातेवाईकांची आणि सहका-यांची झालेली मी प्रत्यक्ष अनुभवलेली असल्याने आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीमुळे  मी त्याबाबतीत अतिसंवेदनशील बनलो आहे. गरीबांना अन्न मिळण्याची भ्रांती असताना धान्यापासून दारू करण्याचे उद्योग सुरू होत आहेत याविरोधात   मी एक लेखही पूर्वी लिहिला होता.  

 राज्यसरकारच्या वाईन विक्रीसंबंधित धोरणावर समाजात व प्रसारमाध्यमात उलटसुलट चर्चा चालू असल्याने मला हे नाटक समाजापुढे पुन्हा परत आणण्याची गरज भासू लागली.  सुदैवाने मराठी विकीपीडीयाच्या विकीस्रोतमध्ये मला त्याची डिजिटल आवृत्ती मिळाली.

राम गणेश गडकरी यांनी  सुरुवातीच्या काळात पुण्यातील `ज्ञानप्रकाश` मध्ये उपसंपादक, `न्यू इंग्लिश स्कूल` मध्ये शिक्षक अशा नोकर्‍या केल्या. नंतर त्यांना किर्लोस्कर नाटक कंपनीत नाटयपदं लिहिण्याची संधी मिळाली व इथून त्यांची कारकीर्द सुरु झाली. नाटकांबरोबरच राम गणेश गडकरी काव्य आणि विनोदी लेखनांतही तितकेच लोकप्रिय ठरले. त्यांनी आपल्या कविता `गोविंदाग्रज` या टोपणनावाने लिहिल्या. त्या वाग्वैजयंती (1921) या संग्रहातून प्रसिध्द झाल्या.  आपलं विनोदी लेखन त्यांनी `बाळकराम` या नावाने केले. त्यांच्या साहित्यातून त्यांची अलौकिक प्रतिभा, सामाजिक व राजकीय परिस्थितीची जाण आणि प्रखर बुद्धीमत्ता यांचे दर्शन होते. त्यांचे मराठी साहित्यातील योगदान महत्वाचे आहे. व्यसन लागल्यानंतर त्यातून बाहेर पडणे कठीण असल्याने सुरवातीसच त्याचा मोह कटाक्षाने टाळावा असा महत्वाचा संदेश त्यानी एकच प्याला या आपल्या नाटकातून दिला आहे. आजच्या युवा पिढीला याची अत्यंत गरज आहे.  

नाटकातील मजकुराचे वाचन करताना जसजसे मी सर्व नाटक वाचत गेलो तसतशी  कट्यार काळजात घुसली या उक्तीप्रमाणे दारूच्या भीषण परिणामांचे दाहक सत्य मला जाणवू लागले.  व्यसनाधीनाची अगतिकता  सुधाकराच्या तोंडी घालून इतक्या उत्कटतेने मांडलेली पाहून मन बेचैन झाले व गडकरींच्या अलौकिक प्रतिभेची साक्ष पटली. 

नाटकाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील सुधारक आणि जहाल समाजगट, स्त्रियांची दयनीय अवस्था, देशी विदेशी औषधांतील परस्परविरोध, दारू पिणा-यांचे तत्वज्ञान आणि स्त्री-पुरुष संबंधातील भावनिक ताणतणाव यांचे सुंदर दर्शन घडविते. व्यसनाधीनता हा व्यक्ती आणि समाजाला अधोगतीला नेणारा कायमचा धोका आहे. हे नाटकाने  प्रभावीपणे समाजापुढे मांडले आहे. व्यसनाधीनता इी जागतिक समस्या असल्याने या नाटकाचे इतर भाषांत भाषांतर वा रुपांतर झाले पाहिजे असे मला वाटले.

हे काम प्रथम आपणच हाती घेतले तरच या नाटकातील पश्चातापदग्ध सुधाकराची आर्त विनवणी सर्वांपर्यंत पोहोचेल या कल्पनेने मी या नाटकाचे हिंदी व इंग्रजीत भाषांतर करावयास घेतले आणि पाहता पाहता दोन महिन्यात मी दोन्ही भाषांतरे पूर्ण केली. माझे हिंदी व इंग्रजीचे ज्ञान मर्यादित असल्याने त्यात सुधारणा व योग्य वाक्यरचना करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची गरज भासणार आहे. मी हे सर्व भाग मायमराठी वेबसाईटवर प्रसिद्ध केले असून त्याच्या संपादनासाठी वाचकांनी मदत करावी ही विनंती.




Tuesday, February 27, 2024

Sunday, February 18, 2024

डॉकरच्या पेटा-यात प्रोग्रॅम करा

 भारतात बहुतेक लोक मायक्रोसॉफ्ट विंडोज कार्यप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) असणारा कॉम्प्युटर वापरत असले तरी अमेरिका व इतर प्रगत देशात ॲपलचा एक्सकोड कार्यप्रणाली असणारा मॅक कॉम्पुटर वापरतात. या दोन्ही खाजगी कार्यप्रणालींऐवजी लिनक्स व युनिक्स ही मुक्त कार्यप्रणाली वापरण्याचे प्रमाण वाढले असून अनेक विशेष सॉफ्टवेअरसाठी विशिष्ठ  कार्यप्रणाली असणारा कॉम्युटर आवश्यक असतो. 

यामुळे आपल्या कॉम्पयुटरवर असणा-या कार्यप्रणालीपेक्षा वेगळी कार्यप्रणाली लागणा-या सॉफ्टवेअरचा वापर करता येत नाही.

यावर उपाय म्हणजे आभासी कार्यप्रणाली ( व्हीएमवेअर) स्थापित करून त्याच्या साहाय्याने  प्रोग्रॅमिंग करणे. मात्र या पद्धतीत वेगळी कार्यप्रणाली, त्यावर चालणारी प्रोग्रॅमिंग भाषा तसेच डाटाबेस ( माहितीकक्ष असे घटक जोडावे लागतात. 

याला एक उत्तम पर्याय डॉकरने उपलब्ध करून दिला आहे.  

आपल्या कॉम्प्युटरवर डॉकर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यावर  आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रोग्रॅम वा सॉफ्टवेअर प्रोजेक्ट कार्यान्वित करता येते. त्यासाठी आवश्यक असणारी कार्यप्रणाली, प्रोग्रॅमिंग भाषा, डाटाबेस इत्यादी सर्व घटक एकत्र करून त्याची एक इमेज (रेडीमिक्ससारखी मिसळ) केली जाते व ती कार्यान्वित करून उत्तर काढता येते. 



मोठी अवजड यंत्रसामुग्री वा अनेक परस्पर संबंधित वस्तू एकत्रपणे जहाजावरून पाठविताना भलेमोठे सीलबंद पेटारे वापरले जातात. त्यांना कंटेनर म्हणतात त्यांची वाहतूक करणा-या जहाजावरून डॉकर हे नाव या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण सॉफ्टवेअरला दिले आहे. 


डॉकरची ही कल्पना मला फार आवडली. डॉकरमध्ये सर्व क्रिया अगदी छोट्या प्रोग्रॅमने स्वयंचलितपणे आपोआप होत असल्याने मला डॉकर ही जादुची कुपीच वाटते.


आता कुपी  आणि पेटारा हे दोन शब्द लहान आणि मोठा कंटेनर दर्शवितात.  आपली मराठी भाषा शब्दसंपदेत समृद्ध आहे. अत्तराची कुपी ते शिवाजी महाराजांनी वापरलेला पेटारा या शब्दांचा विचार करताना डॉकरसाठी मला इतर अनेक शब्द सुचले.

कागदाची पुडी वा पुडा

पत्र्याची डबी व डबा

पेटी आणि पेटारा

कप्पा आणि कपाट

तिजोरी

पेटारा हा शब्द मला जास्त योग्य वाटला. पण अगदी कितीही मोठा प्रोग्रॅम असला तरी तो ठेवण्यासाठी अगदी लहाम चिप पुरेशी होते. मग डॉकरऐवजी कुपी म्हटले तरी चालण्यासारखे आहे. अर्थात याला जादूचा दिवा वा उडणारी चटई असेही नाव देता आले अलते. 

हे विषयांतर झाले. पण सांगायचा मुद्दा हा की डॉकर सॉफ्टवेअर आपल्याला कोणतेही सॉफ्टवेअर वापरण्याची  सुविधा प्रदान करते.

मी या डॉकरचा वापर करून वर्डप्रेस इन्स्टॉल करून पाहिले. आणि माझी याच्या उपयुक्ततेबद्दल खात्री पटली.

Friday, January 26, 2024

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला सहकारी चळवळीची आवश्यकता

महाराष्ट्रात प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे १९४८ साली पहिला साखरकारखाना काढला व सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.

त्यानंतर मा. यशवंतराव चव्हाण व अनेक ग्रामीण भागातील शेतकरी कुचुंबात ही सहकारी चळवळ पुढे नेणारे नवे नेते उदयास आले. आपली वाडवडिलार्जित विकून त्यांनी या नव्या सहकारी तत्वावर साखर कारखान्याबरोबर बॅंकींग व इतर क्षेत्रातही प्रगती केली आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाची सर्वांगीण प्रगती झाली. पाणीपुरवठा, शिक्षण, रस्ते, दवाखाने या सोयी झाल्या त्याचबरोबर छोटे कृषी उद्योग सुरू होऊन रोजगार उपलब्ध झाला.

तरीदेखील महाराष्ट्रात उच्च तंत्रज्ञान शिक्षण देणा-या सरकारी महाविद्यालयांची क्षमता फार कमी असल्याने फारच कमी विद्यार्थ्यांना य़ा आधुनिक तंत्रशिक्षणाचा लाभ घेता येत लव्हता. यावर उपाय म्हणून सांगलीचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री . पद्मश्री श्री वसंतराव दादा पाटील यांनी विनाअनुदान तत्वावर तंत्रशिक्षण महाविद्यालये सुरू करण्याचा क्रांतीकारक निर्णय घेतला व महाराष्ट्राच्या कानाकोप-यात अशी महाविद्यालये सुरू झाली. याचा फायदा उच्च वर्गातील श्रीमंत मुलांबरोबर मागास व आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबातील मुलांनाही झाला. एका दृष्ठीने हे सहकाराचेच नवे रूप होते.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे महाराष्ट्राची आर्थिक प्रगती झाली. नव्या संगणक व इंटरनेटच्या युगात मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या पुण्या-मुंहईसारख्या मोठ्या शहरात आल्या. इन्फोसिस, लिप्रो, कॉग्निजंट, परसिस्टन्स सारख्या भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्याही आपल्या आकर्षक पे पॅकेजच्या जोरावर बुद्धिमान तरूण वर्गाला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. यामुळे अशा शहरांतील राहणीमान वाढले. जास्त पगाराच्या अपेक्षेने खेड्याकडून शहराकडे वा परदेशात नोकरी करण्याकडे युवकांचा लोंढा वाहू लागला.

इंटरनेटच्या साहाय्याने जागतिक संस्थांनी भारतातील बाजारपेठ काबीज केली. नोक-या कमी आणि जास्त पगाराच्या नोकरीच्या शोधात असणारे असंख्य विद्यार्थी अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. संगणक क्षेत्रात एवढी प्रगती झाली तरी स्थानिक पातळीवरील छोट्या कामासाठी प्रसिद्ध असणा-या चांगल्या संस्थांची वाढ खुंटली कारण त्यात काम करणारे कर्मचारी मोठ्या कंपन्यात नोकरी मिळविण्यासाठीच धडपडत राहिले. सांगलीत इ. स. २००० मध्ये स्थापन झालेल्या ज्ञानदीप इन्फोटेक कंपनीची आणि इ. स.. २००५ मध्ये स्थापन झालेल्या ज्ञानदीप फौंडेशनची वाटचाल यानुळेच कायम बिकट राहिली. चांगले कर्मचारी येथे शिकून व अनुभव घेऊन मोठ्या कंपन्यात जात राहिले व ज्ञानदीपला एखाद्या शिक्षणसंस्थेचे रूप आले.

बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या संपत्तीच्या जोरावर छोटी शहरे व ग्रामीण भागातील कामेही गिळंकृत करण्यास सुरुवात केली व एका नव्या एकाधिकारशाहीचा विस्तार झाला व त्यातील लोकशाहीचा अस्त झाला. अशा संस्थांमध्ये कामाचा ताण व नोकरी जाण्याची भीती यांनी कर्मचा-यांचे मनस्वास्थ्य बिघडण्याच्या वा अचानक नोकरकपातीच्या घटना वार्ता येऊ लागल्या आहेत. या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कार्य जागतिक उलाढालींवर व आर्थिक पाठबळ शेअरमार्केटवर अवलंबून असल्याने या नोक-यात एक अनिश्चितता आली आहे.

या परिस्थितीत सहकारी तत्वावर सर्व छोट्या संगणक संस्था एकत्र आल्या आणि फ्री लान्स पद्धतीने सुशिक्षित बेरोजगारांना काम देऊन योग्य नियोजल आणि व्यवस्थापन केले तर बेभरवंशाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना एक सशक्त व स्थायी पर्याय देता येईल.

ज्ञानदीप फौंडेशनने याबाबतीत पुढाकार घेण्याचे ठरविले असून त्या दृष्टीने फौंडेशन विविध शिक्षण संस्थांशी परस्पर सहकार्याचा करार करून तेथील शिक्षक व विद्यार्थी यांना आपल्या कार्यात सहभागी करून घेणार आहे.

ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि, या कंपनीने ज्ञानदीप फौंडेशन प्रायोजित केले असल्याने देशातील वा परदेशातील कामे वा प्रकल्प मिळविण्याचे व ते काम ज्ञानदीप फौंडेशनच्या माध्यमातून सर्वांच्या सक्रीय सहभागातून करण्याचे योजिले आहे. जर असे संस्थात्मक सहकारी नेटवर्क करता आले तर शिक्षणसंस्था, विद्यार्थी व घरबसल्या काम करू इच्छिणारे इतर नागरीक यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकेल. या योजनेत सध्या ग्रामीण भागात कार्यरत असणा-या संगणक संस्थांनाही सहभागी करता येईल. विना सहकार नही उद्धार असे म्हणतात.

महाराष्ट्राच्या सहकारभूमीत या माझ्या कल्पनेला चोगला प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे.. – सु. वि. रानडे, ज्ञानदीप इन्फोटेक व ज्ञानदीप फौंडेशन, सांगली.

Thursday, January 25, 2024

शहर स्वच्छता अभियान - वेबसाईटवर वस्तुस्थितीची प्रसिद्धी आवश्यक

शहरातील मोकळ्या प्लॉट्मध्ये वाढणारी झाडे झुडपे व साठणारे कचर्याचे ढीग हे शहर स्वच्छता अभियानात  एक मोठी समस्या होऊन बसली आहे. प्लॉटच्या मालकावर स्वच्छतेचे कोणतेही कायदेशीर बंधन नसल्याने त्याच्याकडून प्लॉट स्वच्छतेबाबत टाळाटाळ केली जाते. बर्याच ठिकाणी अशा जमिनीचा मालक कोण हे कोणालाही माहीत नसते. यातील काही प्लॉट शहरविकासासाठी आरक्षित असतात त्यामुळे त्याची मालकी नगरपालिकेकडेच असते. त्यामुळे असे बेवारस प्लॉट कचरा, सांडपाणी व झाडेझुडपे यांनी व्यापलेले दिसतात.

विकसित देशात सार्वजनिक स्वच्छतेला फार महत्व दिले जाते. जुनी मोटार जरी रस्त्यावर बेवारस सापडली तरी त्याच्या मालकाला शोधून त्याला दंड केला जातो. एवढेच नव्हे तर पाळलेल्या कुत्र्याची विष्ठा देखील सार्वजनिक जागेत ( रस्ता, बाग वा क्रीडांगण) पडली तर त्याच्या मालकाला दंड होतो.

आपल्या येथे सार्वजनिक स्वच्छतेबाबत फारच उदासीनता दिसून येते. आपले घर वा प्लॉट स्वच्छ ठेवण्यात आपण कसूर करीत नाही. मात्र गोळा केलेला कचरा आपण जवळच्या सार्वजनिक जागेत वा मोकळ्या प्लॉटमध्ये बिनधास्तपणे टाकून देतो. घंटागाडी चालविणारे कर्मचारीदेखील अशा प्लॉटमधील कचरा उचलण्याची तसदी घेत नाहीत. अशा कचर्याचा उपद्रव सुरू झाला की आपण नगरपालिकेला दोष देतो.

 प्रत्येक रिकाम्या प्लॉट वा जागेची मालकी असणार्‍याचे नाव, फोन नंबर व पॅन नंबर लिहिलेली पाटी नगरपालिकेने  लावली ( वा मालकावर अशी सक्ती केली ) तर यावर काही ठोस उपाययोजना करणे शक्य होईल. अशा प्लॉटवरील झाडेझुडपे काढण्याचा खर्च प्लॉटमालकाकडून व  कचरा उचलण्याचा खर्च, असा कचरा टाकणार्‍या सभोवतालच्या प्लॉटधारकांकडून वसूल करण्यासाठी करण्यासाठी योजना आखली तर नगरपालिकेस असे प्लॉट स्वच्छ राखणे सहज शक्य होईल.  गृहनिर्माण सहकारी संस्था वा स्थानिक नगरसेवकांना याचे व्यवस्थापन व योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार दिले तर या कचरा समस्येवर कायमस्वरुपी तोडगा निघू शकेल. मोकळ्या प्लॉट वा सार्वजनिक जागांची स्वच्छता राखण्याची जबाबदारी भोवताली राहणारे लोक  आपोआपच घेतील व यामुळे आर्थिक बोजा न पडता शहर स्वच्छता  अभियान यशस्वी करणे नगपालिकेस शक्य होईल. 
स्थानिक माहिती मराठीत देणा-या वेबसाईटवर गुगलमॅपच्या माध्यमातून अशा रिकाम्या प्लॉटची नोंद शहर व महापालिकेने केली तर स्वच्छ शहर अभियानाला एक वस्तुस्थितीनिदर्शक सार्वजनिक आढावा प्रसिद्ध करता येईल. सध्या प्लॉट व फ्लॅट खरेदीविक्रीसाठी वेबसाईटवर जाहिराती केल्या जातात. मात्र शासनाने रिकामे प्लॉट, कच-याचे ढीग, रस्ते,गटारे, नदीची स्थिती, पाण्याची गळती व प्रदूषण यांची माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक केले तर शहर स्वच्छता  अभियान यशस्वी होऊ शकेल आणि स्वच्छ शहर बक्षिसासाठीची अनाठायी रंगरंगोटी बंद होईल. जनतालाही शहराची खरी स्थिती कळेल.
याच उद्देशाने ज्ञानदीप फौंडेशनने 
  • मायसांगली (https://mysangli.com), 
  • मायकोल्हापूर(https://mykolhapur.net), 
  • मायपुणे(https://mypune.net), 
  • मायसोलापूर(https://mysolapur.net), 
  • मायनाशिक(https://mynashik.net) व 
  • मायमुंबई (https://mymumbai.net)
या मराठी माध्यमातील वेबसाईट तयार केल्या आहेत.सध्या त्यात फक्त इतिहास, पर्यटनस्थळे, प्रसिद्ध व्यक्ती व संस्था यांची माहिती दिली आहे. शहर आणि जिल्ह्यातील तालुक्यांचे माहितीपूर्ण नकाशेही यात दिले जाणार आहेत. परंतु केवळ शैक्षणिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने माहिती देण्यापेक्षा पर्यावरणविषयक वस्तुस्थती अहवाल देण्याचा आमचा मनोदय आहे.

मात्र पर्यावरणविषयक माहिती नगरपरिषद वा माहापालिकेच्या अनुमतीशिवाय तेथे प्रसिद्ध करता यात नाही. त्यामुळे अशी माहिती जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. तसेच जनतेला त्यात माहिती समाविष्ट करण्यास अधिकार द्यावयास हवेत.



About Marathi Numbers



Marathi Numbers -    १               ५             ८      
Roman Numbers -  0   1    2  3    4    5     6    7     8      9


Marathi Numbers are slowly being replaced by roman numbers. One important reason for such change has been use of calculators and computers which facilitate arithmetic calculations. We should do special efforts to preserve and enhance their use by developing suitable programs for their machine computation capability. 

We cannot use Marathi numbers in place of Roman numbers However Marathi numbers need to be remembered as all Marathi literature uses these numbers.  Moreover, these numbers are easy to remember and give a grace and homogeneousness to Marathi writing.

Shapes of Marathi Numbers 

If you compare the numbers from ० to ९ you will find that number ८ does not have a knot and is easy to remember as a shape of  nose in human face.  
Number ० is just a shape of circle. 

Number १ has artistic shape  in typescript but while writing it is written in a simple style.  

Numbers  and  as well as ३ and  are mirror images of each other. 

Number ४ shape is identical to flying bird. 

Number २ matches with character . 

Number  is used in character  

Number ७ is used in character  

Character  cha is combination numbers ६ and ७. 

Shape of २ is used in इ  ई  and   characters.  

Shape ९ is used in  cha  Shape of ५ is used in characters  and क्ष.