Monday, May 20, 2024

Dnyandeep's appeal to Seniors to invest in Youth

 The corona lockout has stopped the economic growth of the world. In India, the unemployment problem has sky rocketed due to closure of industries and restrictions on travel. This may lead to anarchy and violent protests unless all work relentlessly and collectively to counter this impact on our economy and progress.



There is a more responsibility on seniors and retired people to come forward and support young youth to start business and earn livelihood. Investing in shares and bank deposits is not going to help in near future, as the economy is moving on downward path and chances are that you will loose money.

Instead if the seniors invest their money and employ the young workforce and guide them to build business, it will be benificial to both. You can build a sustainable small business in your field of expertise and knowledge and can find customers easily due to you contacts in local community.

In India, foreign MNCs are entering with huge funds and wish to capture Indian customers. In education field, they have made inroads and already established supremacy in online education.

It is possible that India will face intellectual slavery if we sell our intellect and experience to  further the interests of these MNCs.

On the other hand if professionals, small businesses come together and build a sustainable growth model, we can proect ourselves and move towards Atmanirbhar Bharat.

It is not possible for government to give jobs to all or provide help to start industries to youth without any financial backup and industrial experience oe ability to take financial risk. Our interest rates are very high and new industry and business cannot sustain that load when the profits seldom exceed 15 percent.  Only seniors can take such risk, as any way, they are taking risk in putting money in banks.

Dnyandeep Foundation has decided to motivate such start-ups having combination of senior-juniors and shall provide all necessary help in digital marketing and online training.


For IT sector, Dnyandeep Foundation can give portfolio of work to start with to members who can start free lance work and work through Dnyandeep Foundation, till they come out of initial hurdles and then can start on their own.

At personal level, I have decided to invest my money in this endevor and I am sure many young students will take advantage of this scheme.

I appeal to all seniors and retired persons to spend maximum time for inspiring, training and helping youth, who will build tomorrow's strong Bharat. --- Dr. S. V. Ranade, Dnyandeep Foundation, Sangli

Sunday, May 19, 2024

कार्पोरेट जगताची ऑक्टोपस संस्कृती -


अमेरिकेत मोठे मॉल आल्यावर छोटी द्काने नष्ट झाली. मोठ्या कार्पोरेट कंपन्या आल्यावर त्यांनी प्रचंड भांडवलाच्या जोरावर( शेअरच्या माध्यमातून लोकांकडूनच गोळा करून) छोट्या उद्योगधंद्यांना बाजारपेठेतून हद्दपार केले. भांडवलशाही देश म्हणून अमेरिका ओळखली जाऊ लागली. भारताने लोकशाही समाजवादाचा स्वीकार करून या भांडवलशाहीपासून स्वतःला दूर ठेवले होते. मात्र सध्या ज्या प्रकारे कार्पोरेट क्षेत्राची भलावण शासन करीत आहे. त्यावरून या कार्पोरेट ऑक्टोपसने शासनाला विळखा घालून भांडवलशाहीचा पाश आवळला आहे असे दिसते. राजकीय नेत्यांनी स्वतःच्या वा आपल्या पक्षाच्या स्वार्थासाठी कार्पोरेट संस्कृतीचा वापर करून लोकशाही समाजवादाच्या मूळ संकल्पनेला विकृत स्वरूप दिले आहे.



लोकशाहीनुसार सत्तेचे अधिकार खालच्या थरापर्यंत पोहोचविण्याचा शासनाने प्रयत्न केला. जिल्हा परिषदा, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या हातात प्रकल्प अधिकार आले. त्याठिकाणीही शासकीय विभागांकडे कामे न सोपविता ती कामे बीओटी तत्वावर कार्पोरेट कंपन्यांना देण्याचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे या कंपन्यांचे जाळे सर्वत्र पसरत चालले आहे. शासनाचा अडथळा दूर व्हावा व कामे त्वरित व्हावीत म्हणून या कंपन्यांनी धूर्तपणे उच्चपदस्थ शासकीय निवृत्त अधिकार्‍यांना भरपुर पगार देऊन आपल्या पदरी ठेवले आहे. टीव्ही व इतर सर्व प्रसारमाध्यमांचा वापर करून जनमानसाला आपल्याकडे आकृष्ट करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. मोबाईल, बॅंका, बांधकाम साहित्य, सौंदर्यप्रसाधने व औषध कंपन्या अशा अनेक मॊठ्या देशी परदेशी कंपन्या यात आघाडीवर आहेत.



बीओटी तत्वावर मोठे प्रकल्प चालवावयास देणे हे याचेच एक फसवे रूप आहे. पैसे नाहीत म्हणून बीओटी प्रकल्प करावे लागतात हे विधान साफ चुकीचे आहे. प्रकल्प करणारी कंपनीही स्वताःचे पैसे कधीच प्रकल्पासाठी गुंतवीत नाही. बॅंका त्यांना भांडवल पुरविते ते देखील शासनाच्या वा लोकनियुक्त संस्थेच्या हमीपत्रावरच देते. मग ती जबाबदारी शासकीय संस्थांनी का उचलू नये? शासनाची सर्व खाती (बांधकाम, नगररचना, पाणीपुरवठा व जल निस्सारण इत्यादी) केवळ प्रकल्प आखणे, मंजुरी व नियंत्रण एवढीच कामे करतात. बाकी प्रत्यक्ष प्रकल्पांची कामे कार्पोरेट कंपन्यांकडे सुपूर्त केली जातात. प्रत्यक्षात या सर्व खात्यांत तज्ज्ञ अधिकारीवर्ग असूनही त्यांना प्रकल्पाच्या बांधणीचे काम दिले जात नाही.



मध्यंतरी जिल्ह्यांतील सर्व शासकीय शाळांच्या इमारतींच्या सर्वेक्षणासाठी टेंडर निघाले होते. शाळेच्या इमारतीची सद्यस्थिती पाहून त्यात काय दुरुस्त्या कराव्या लागतील व त्याला अंदाजे किती खर्च येईल असे साधे काम होते. स्थानिक वा जवळपासच्या शहरातील आर्किटेक्ट वा इंजिनिअर यांनी हे काम केले असते तर ते कमी खर्चात झाले असतेच शिवाय स्थानिक पातळीवरील व्यवसाय वाढला असता. मात्र अनेक जिल्ह्यांचे काम एकत्र करून एकाच कामाचे टेंडर काढले गेले. या टेंडरच्या अटीही अशा ठेवल्या होत्या की फक्त मोठ्या कार्पोरेट कंपन्यानाच त्यात भाग घेता येईल. साहजिकच या कामासाठी कुशल तांत्रिक कर्मचारी नेमणे, त्यांचा प्रत्येक गावापर्यंत जाण्याचा व राहण्याचा खर्च व सर्व कामांचे नियोजनासाठी व्यवस्थापन अधिकारी वर्ग या सर्वांचा खर्च गृहीत धरता या टेंडरसाठी निविदांची रक्कमही अनेक पटींनी वाढणे स्वाभाविक होते.



इकोव्हिलेज डेव्हलपमेंट म्हणजे पर्यावरणपूरक हरित ग्राम निर्मिती ही लोकसहभागातून व्हावयास हवी. प्रत्येक गावाची परिस्थिती भौगोलिक स्थान, स्थानिक पर्यावरण, ग्रामस्थांची सामाजिक जाणीव व आर्थिक क्षमता यावर अवलंबून असते. अशा गावांचा विकास करावयाचा तर विकेंद्रित स्थानिक स्वरुपात अनेक सार्वजनिक संस्था आपापल्या कुवतीनुसार प्रयत्न करीत असतात त्यांना आर्थिक मदत देउन हे कार्य अधिक प्रभावी व चिरस्थायी झाले असते. पर्यावरण क्षेत्रात हे चांगले काम शासन करीत आहे या कल्पनेने मी सर्व पर्यावरण संस्थांना याची माहिती कळविली. प्रत्यक्ष टेंडर अटी पाहिल्यावर माझी निराशा झाली. कोणतीही सार्वजनिक पर्यावरणवादी संस्था या कामाच्या जवळपासही फिरकू नये या दृष्टीने ५० लाख रुपये वार्षिक उलाढालीची अट त्यात खुबीने घालण्यात आली होती. त्याचा मतितार्थ काय हे समजावून सांगण्याची वेगळी गरज नाही. या प्रकल्पाची परिणती म्हणजे एक देखणा पण कुचकामी प्रकल्प अहवाल तयार होण्यात झाली तर आश्चर्य वाटायला नको.



उर्जाबचतीसाठी केंद्रीय ऊर्जा विभागाकडून शाळांतील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा जाहीर करून ती बातमी टीव्हीवर देऊन स्वतःची प्रसिद्धी केली आहे. कार्पोरेटच्या पवनऊर्जा प्रकल्पांना लगेच मंजुरी मिळते मात्र ऊर्जाबचतीच्या सामान्य लोकांच्या उपकरण सवलतीसाठीच्या अर्जांच्या मंजुरीला वर्ष दोन वर्षे थांबावे लागते यावरून खरे सत्य लोकांना कळून चुकले आहे.



लोकनियुक्त नेत्यांच्या मागे अधिकारी, अधिकार्‍यांच्या मागे कंत्राटदार व कंत्राटदारांच्या मागे पुनः नेते असे दुष्ट चक्र निर्माण झाले आहे. यात सर्वसामान्य माणसाला, उद्योजकाला वा व्यावसायिकाला कोठेच स्थान नाही. दुर्दैवाने नव्या पिढीतील लोकांना या व्यवस्थेबद्दल काही गैर वाटत नाही. नेत्यांच्या मागे लागून सत्ता मिळवायची वा शासन ( अधिकार मिळविण्यासाठी) किंवा कंत्राटदाराकडे नोकरी (केवळ पैसे मिळविण्यासाठी) करायची एवढे दोनच पर्याय त्यांच्यापुढे आहेत. स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा कोणी प्रयत्न केलाच तर शासकीय यंत्रणा अनेकप्रकारे त्याची अडवणूक करते. त्यातूनही त्याने चिकाटीने प्रगती केली तर त्याला मोठ्या कार्पोरेट कंपन्या चिरडून टाकायचा प्रयत्न करतात. आमची ज्ञानदीप इन्फोटेक कंपनी २००० मध्ये स्थापन होऊनही अजून जीवन-मरणाच्या सीमारेषेवर कशीबशी तग धरून आहे. मात्र अमेरिकेतील कंपन्या आपल्याच योगदानाने अत्युच्च शिखरावर पोचल्या आहेत.


एकूणच आपण कोठे जात आहोत याचा सर्वांनी गांभिर्याने विचार करायची वेळ आली आहे. आपल्याही देशाला अमेरिकेसारखे भांडवलशाही देश म्हणून जगाने ओळखले म्हणजेच खरी प्रगती झाली असे जरी गृहीत धरले तरी आपली लोकसंख्या व गरिबी यामुळे प्रत्यक्षात कार्पोरेट हुकुमशाही येऊन त्याचे पर्यवसान निराशा, बेरोजगारी, आत्महत्या, गुन्हेगारी, असुरक्षितता व अस्वास्थ्य यात समाजाला आपण लोटणार आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. डॉ. सु. वि. रानडे

Thursday, May 9, 2024

प्रा. भालबा केळकर - मराठी मुलांसाठी विज्ञान संशोधनाचा ज्ञानदीप

वालचंद कॉलेजचे ज्येष्ठ निवृ्त्त प्राध्यापक आणि विज्ञान संशोधन ही जीवननिष्ठा पाळणारे प्रा. भालबा केळकर आज वयाच्या ८६व्या वर्षीही  दिवसरात्र मुलांसाठी वैज्ञानिक खेळणी करण्यात मग्न आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात  उच्च पदे भूषवीत असून अनेक विद्यार्थी  यशस्वी उद्योजक म्हणून यशस्वी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय संशोधन व उद्योग क्षेत्रात आणि भारताच्या प्रगतीत या विद्यार्थ्यानी मोलाची भर घातली आहे.
काल त्यांच्या घरी म्हणजेच ज्ञानदीप फौंडेशनच्या नव्या शाखेत त्यांचेबरोबर चर्चा करताना मी स्पष्टपणे  त्यांच्यबद्दल लोकांत असणा-या काही गैरसमजुतींची त्यांना कल्पना दिली.

जग किती पुढे गेले आहे आणि भालबा केळकर हे अजून मुलांसाठी साधी खेळणी करण्यातच  निरर्थक वेळ घालवीत आहेत.

असे मत ऐकल्यानंतर ते हसले. म्हणाले 

"मला उद्याचे नवसंशोधक करायचे आहेत त्यासाठी लहान वयातच मुलांना संशोधनाची गोडी लावणे आवश्यक आहे. दुर्दैवाने याकडे कोणाचेच लक्ष नाही. इंग्रजी शाळेत परदेशी छानछोकी व स्मार्टनेस याला महत्व दिले जाते परंतु  मातृभाषेकडे दुर्लक्ष झाल्याने मुलांची ज्ञानग्रहणाची इच्छा णि कुवत कमी होते. मराठी शाळांतील मुलांना शिकण्याची हौस आणि इच्छा असली तरी महागडी उपकरणे व तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांच्यात एक प्रकारची निराशा व असूया निर्माण होते. यावर उपाय म्हणजे साध्या घरगुती वस्तूंचा वापर करून त्यांना विज्ञान तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आवश्यक आहे. उच्च विद्याविभूषित शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ प्रत्यक्ष संशोधन व विकास यात मग्न असल्याने त्यांना यासाठी वेळ नाही. शिवाय मराठीत काही लिहिणे वा शिकविणे आपल्या समाजात कमी दर्जाचे मानले जाते. त्यामुळे मराठीतून आणि लहान मुलांसाठी खेळणी करणे हे असा लोकांकडून पोरकटपणाचे लक्षण मानले जाणे स्वाभाविक आहे."

प्रा. भालबा केळकर हे जुन्या काळातले बीई मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल असे द्विपदवीधर आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील विविध शाखांत त्यानी उच्छ संशोधन आणि जवळजवळ तीस वर्षे प्रत्याक्ष उत्पादन व विक्री करण्याचा अनुभव घेतला आहे. असे असून ते मराठी मुलासाठी कमी खर्चाची  साधी वैज्ञानिक खेळणी करत आहेत. त्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून महाराष्ट्रभर ती उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मनोदय आहे. 

ज्ञानदीप इन्फोटेकचा आधुनिक तंत्रज्ञानावर भर असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली उत्पादने वितरित करण्याची योजना असल्याने मी त्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्ता असलेल्या एखाद्या उपकरणावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे. थ्री डी प्रिंटर, लेसर कटींग मशिन इत्यादी सोयींसाठी भांडवल उभे करण्याची ज्ञानदीपची इच्छा असून भालबा केळकरांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक नवी उपकरणे निर्माण करण्यात ज्ञानदीप यशस्वी होईल असा मला विश्वास वाटतो.
त्यांच्या एआरईच्या अस्तानंतर ज्ञानदीप आपल्या सर्व सहकारी मित्रांच्या मदतीने फिनिक्स पक्षाप्रमाणे गगनभरारी करण्यासाठी पंखांत नवी शक्ती देऊ शकेल असे मला वाटते. -  डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली संपर्क - drsvranade@gmail.com / +919422410520 /01(408) 338 7672

Thursday, May 2, 2024

भारतीय भाषा आणि भाषांतर व्यवसायास नवसंजीवनी

 नव्या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण घेण्याची तसेच पुढील शिक्षणासाठीही मातृभाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्याची सोय सर्व शिक्षणसंस्थांना करावी लागणार आहे.

आत्मनिर्भर भारताच्या विकासासाठी आणि समाजाच्या तळागाळात शिक्षणाची गंगा पोहोचण्यासाठी मातृभाषेतील शिक्षण अपरिहार्य आहे. ज्ञानदीपने इ. स. २००० पासूनच यासाठी प्रयत्न सुरू केले. मराठी तसेच संस्कृत भाषेतील वेबसाईट, सॉफ्टवेअर  आणि मोबाईल सुविधा निर्माण केल्या. भाषा, स्थानिक माहिती याबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान यातही मराठीचा आवर्जून वापर केला.

मात्र अजूनही महाराष्ट्रात मराठीला शिक्षणक्षेत्रात गौण स्थान  राहिले आहे.मराठीत शिकलेल्या विद्यार्थ्यांना कमीपणाची वागणूक समाजाकडून दिली जाते. कोणत्याही शहराची वा गावाची सर्व माहिती मराठीत  उपलब्ध नाही ही खेदाची गोष्ट आहे.

मराठी भाषेत असलेले ज्ञानभांडार इतर भाषांत भाषांतर करून ते देशभरात व सर्व जगभर पोहोचविणे आणि इंग्रजी भाषेतील ज्ञान मराठीत आणणे या दोन्ही क्षेत्रात सरवसामान्य जनतेलाही घरबसल्या व्यवसायाची आणि पैसे मिळविण्याची फार मोठी संधी या धोरणामुळे निर्माण झाली आहे.

भाषांतराचा हा व्यवसाय भविष्यात फार मोठ्या प्रमाणावर वाढणार असून ज्ञानदीप फौंडेशन यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य करार करून याचा प्रसार करणार आहे.

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणसंस्थांनी यात पुढाकार घेऊन ज्ञानदीपच्या या अभियानात सक्रीय सहभागी व्हवे असे आवाहन मी करीत आहे. - सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.

Wednesday, May 1, 2024

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर - ज्ञानदीपच्या भावी कार्याची रूपरेषा

गेली वीसपंचवीस  वर्षे ज्ञानदीप फौंडेशन आणि ज्ञानदीप इन्फोटेक या संस्थांच्या माध्यमातून आम्ही पर्यावरण, शिक्षण, वेबसाईट व मोबाईल एप निर्मिती,रोबोटिक किट प्रशिक्षण असे विविध क्षेत्रातील कार्यक्रम सुरू केले.; एक ना धड, भाराभर चिंध्या' अशी प्रतिक्रिया अनेक तज्ज्ञ, व यशस्वी व्यक्तींकडून ऐकायला मिळाली. म्हातारपणी वेळ व पैसे घालवायचा उद्योग चालू असल्याचे पाहून अनेक नातेवाईक व हितचिंतकांनी  मला अधिक हिशोबी व जागरूक रहायचा सल्ला दिला. बहुतेकांच्या दृष्टीकोनातून  हा अव्यापारेषु व्यापार होता. कधी भेट झाली तर  आज काय नवे असे विचारणा होते.

सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनतेची अयी प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. त्यात त्यांचा काहीच  दोष नाही. कारण सध्या समाजात सार्वजनिक कामाबदद्ल कमालीची उदासिनता, स्वयंउद्योगाबदद्ल भीती आणि सद्य परिस्थितीचा दोष शासनावर टाकून फक्त आपल्यापुरते पाहण्याची वृत्ती बळावली आहे. करमणूक, राजकारण आणि अध्यात्म यांच्याकडे सुखवस्तू समाज ओढला जात आहे. पर्यावरण, शिक्षण वा रोजगार यासाठी आपण काही योगदान देऊ शकतो, नव्हे ते आपले सध्याच्या काळातले महत्वाचे उद्दीष्ट असले पाहिजे.  आपले ज्ञान व अनुभव यांचा भोवतालच्या समाजात नवरोजगार, संशोधक वृत्ती, प्रगतीच्या नव्या दिशा दाखविण्यासाठी उपयोग झाला तर समाजाला त्याचा फायदा होईलच पण आपलाही मर्यादित स्वार्थ साधला जाईल.'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ' असे सुवचन आहे आणि त्याच भावनेने ज्ञानदीप आपले कार्य करणार आहे.

वालचंद कॉलेजचे ज्येष्ठ प्राध्यापक भालबा केळकर हे आपले मोठेपण आणि प्राध्यापक दर्जा विसरून आजही लहान मुले आणि विद्यार्थ्यांत संशोधक वृत्ती निर्माण व्हावी म्हणून दिवसरात्र झटत आहेत. नेहमी मुलांच्या सहवासात राहिल्याने त्यांचे मन ताजेतवाने आणि तब्बेत उत्तम राहिली आहे. मराठीत आणि साध्यासुध्या वल्तूंचा वापर करून ते विज्ञान शिकवितात. याचाच पुढे मोठा व्यवसाय बनू शकेल असा त्यांना विश्वास  आहे.

अशा आदर्श व्यक्तींच्या कार्यास गती देणे, निवृत्त वृद्ध व्यक्तींच्या संचित ज्ञान व अनुभवाचा फायदा न्वया पिढीस कसा होईल आणि त्यातून या ज्येष्ठ व्यक्तींना आर्थिक लाभ किंवा नवउद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ज्ञानदीप आपल्या उपलब्धींचा वापर करणार आहे. सुदैवाने आज ज्ञानदीपकडे अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानातील कुशल व्यक्ती, अनेक क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींशी व्यक्तिगत संबंध आणि अमेरिकेतील परिचित यांचे पाठबळ आहे. या सर्वांनी एकत्र व निस्वार्थ भावनेने कार्य करायचे ठरविल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याचे शिवधनुष्य आपण पेलू शकू. निदान सध्याची समाजातील मरगळ जावून एक नवी चेतना निर्माण व्हावी अशी ज्ञानदीपची इच्छा आहे. त्याच भूमिकेतून सध्या बंद स्थितीत असणा-या अनेक सामाजिक संस्थांचे पालक्त्व ज्ञानदीपने स्वीकारले आहे. मराठी विज्ञान प्रबोधिनी, वालचंद कॉलेजची माजी विद्यार्थी संघटना, निसर्ग प्रतिष्ठान, एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फौंडेशन, इंटरनॅशनल स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट स्टडीज, बाल मित्र संघटना अशा सांगलीतील अनेक संस्थांचे कार्य आता ज्ञानदीप फौंडेशनच्या एकछत्राखाली सुरू ठेवण्यात येणार आहे.

ज्ञानदीपचे सध्याचे कार्य समजून घेण्यासाठी कृपया ज्ञानदीपच्या  https://dnyandeep.com आणि https://dnyandeep.net या वेबसाईट पहाव्यात.
महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात ज्ञानदीपची शाखा काढून मराठी वेबसाईटच्या माध्यमातून संगणक साक्षरता, प्रशिक्षण व लोकसहभाग हे ज्ञानदीपच्या भावी कार्याचे उद्दिष्ट आहे.
सर्वांच्या सक्रीय सहभागातून हे सहज शक्य होईल अशी माझी खात्री आहे.  - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
अधिक माहितीसाछी संपर्क - इमेल - drsvranade@gmail.com / फोन - +91 88305 95822 /+01(408)338 7672