Showing posts with label Personal. Show all posts
Showing posts with label Personal. Show all posts

Friday, April 4, 2025

सांगलीतील प्रसिद्ध छातीरोग तज्ज्ञ डॉ. मडके यांचे नवे पुस्तक - क्षयरोगावर मात

 सांगलीतील प्रसिद्ध छातीरोग तज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांनी आपल्या जनस्वास्थ्य मासिकातून गेली अनेक वर्षे मराठीतून आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे अभिनंदनीय कार्य केले आहे. विविध रोगांविषयी तज्ज्ञ डॉक्टरांना लेख लिहिण्यासाठी त्यानी आमंत्रित केले होते.  मासिकाच्या डिझाईन व संपादनात माधवनगरचे प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर उपळावीकर यांचे मोठे योगदान राहिलेले आहे.लक्षवेधी व कल्पक अशी मुखपत्रावरील त्यांची   चित्रे व मांडणी     हे मासिकाचे खास आकर्षण होते.  आता ते मासिक बंद पडले असले तरी मी अजूनही पूर्वीची सर्व मासिके जपून ठेवली आहेत.

दमा हा माझा जीवनभर साथी राहिल्याने डॉ. मडके यांचेशी पेशंट या नात्याने गेली चाळीस वर्षे संबंध आहे.  योगायोग म्हणजे १९८९साली मला अचानक फीट आली आणि त्याचे निदान पाचसहा वर्षांनी मेंदूतील क्षयरोग असल्याचे समजले. मधल्या काळात आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, अॅलोपॅथिक औषधे मी घेतली. मिरजेतील डॉ. करमरकर, डॉ.मेहता, न्यूरोलॉजिस्ट    डॉ. मोहिरे सांगलीतील डॉ. वसवाडे, डॉ.दिवेकर, डॉ.जावडेकर यांच्याकडे तपासण्या आणि औषधोपचार ट्रायल्स यात     तीन चार वर्षे गेली. केईएमला जाऊन मेंदूचे ऑपरेशन करण्याचेही ठरले होते, मात्र तेथील अनुभवी डॉ. कापरेकर यांच्या सल्ल्याने तो बेत रद्द केला.   शेवटी स्ट्रेप्टोमायसिनची दररोज एक ग्रॅम प्रमाणे याप्रमाणे ९० दिवस इंजेक्शन घेतल्यानंतरच या रोगापासून माझी पूर्णपणे सुटका झाली.  क्षयरोगाशी प्रत्यक्ष असा जीवघेणा संघर्ष केल्यामुळे मला डॉ. मडके  यांच्या क्षयरोगावर मात  या  पुस्तकाबाबत  मला त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते.

 २००८ मध्ये मी डॉ. मडके यांच्या दवाखान्यात  आयसीयूमध्ये अॅडमिट होतो. या काळात मला त्यांच्या दिलदार व अभ्यासू मनोवृत्तीची ओळख झाली होती. त्यांनी त्यावेळी मला त्यांचे दमा हे पुस्तक भेट दिले होते. 

ज्ञानदीपच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे वीस वर्षांपूर्वी आम्ही डॉ. मडके यांच्या दवाखान्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केले होते. त्यावेळी डॉ. मडके आणि डॉ. उपळावीकर यांचेशी आमची चर्चा होत असे. डॉ. उपळावीकरांचा इंजिनिअर मुलगा शैलेश ज्ञानदीपमध्ये डेव्हलपर म्हणून रुजू झाला व त्याच्या साहाय्याने आम्ही बरेच चांगले प्रॉजेक्ट्स यशस्वीरीत्या पूर्ण केले.

दिनांक २४ मार्च २०२५ रोजी माझी त्यांची पुन्हा भेट झाली आणि क्षयरोगावर मात हे बहुमोल माहितीचे पुस्तक माझ्या हाती पडले. 




या कार्यक्रमाचे सर्व रेकॉर्डिंग मी माझ्या मोबाईलवर केले व  ते व्हिडीओ सर्वांच्या माहितीसाठी युट्यूबवर प्रसिद्ध केले आहेत. 

डॉ. मडके यांचे या लोकोपयोगी कार्याबद्दल अभिनंदन व पुढील कार्याबद्दल शुभेच्छा.




Sunday, December 17, 2023

ज्ञानदीप इन्फोटेक - वीस वर्षांपूर्वीचा परिचय

मिलपिटास, कॅलिफोर्निया - आज शनिवार, 16 डिसेंबर 2023. कॉम्प्युटरवर जतन केलेल्या जुन्या फाईल वाचणे हा माझा रिकाम्या वेळचा छंद असतो. सध्या ज्ञानदीपच्या कार्याचे नियोजन मी दूरस्थपणे करीत असताना ज्ञानदीपच्या गेल्या कित्येक वर्षांचा इतिहासातील आशा-निराशा, यश-अपयश यांच्या घटना मनासमोर तरळून जातात. 

1973मध्ये कानपूर आयआयटीत असताना कॉंम्प्युटरच्या अद्भुत विश्वाने मला भुरळ घातली.  पर्यावरण अभियांत्रिकी माझा विषय असूनही संगणकाची कोणताही विषय आत्मसात करण्याची व गहन प्रश्न सोडविण्याच्या यांत्रिक कुशलतेमुळे मला याच विषयात आपण संशोधन करावे असे माझ्या मनाने घेतले.

1976 मध्ये पीएचडी पूर्ण करून मी जेव्हा माझ्या वालचंद कॉलेजमध्ये पुन्हा रुजू झालो त्यावेळी कॉलेजमधील इतर कॉम्प्युटरप्रेमी प्राध्यापकांशी माझे सूत जुळले. सुदैवाने इलेक्ट्रॉनिक्सचे प्रमुख प्रा. एन. आर. फडणीस  यानी मला प्रोत्साहन दिले. पुढे कॉलेजने घेतलेल्या ऑम्नी कॉम्प्युटरच्या प्रशिक्षणासाठी मला बंगलोरला जाण्याची संधी मिळाली. बेसिक आणि कोबोल प्रोग्रॅमिंगचे प्रशिक्षण वर्ग आम्ही घेतले. 

माझी पत्नी सौ. शुभांगी संस्कृत शिक्षिका होती तरी मी तिला संगणक प्रशिक्षम घेण्यास सांगितले. तिनेही हे आव्हान स्वीकारून बेसिक कोर्स केला आणि सावरकर प्रतिष्ठानच्या शाळेत मुलांसाठी महिन्याचा प्रशिक्षण कोर्स घेतला. माझा उत्साह यामुळे अधिकच द्विगुणित झाला. नंतर विश्रामबाग येथे सुयश कॉम्प्युटर्स या नावाने सुहास खांबे, वैजयंती कुलकर्णी आणि सौ शुभांगी यानी संगणक प्रशिक्षम आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काम सुरू केले. 

वालचंद कॉलेजतर्फे महाराष्ट्रातील अनेक शाळांत बीबीसी कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगचे  प्रशिक्षण देण्याची मला संधी मिळाली..

त्यानंतर ज्ञानदीप इन्फोटेकची स्थापना आम्ही इ. स. 2000 नोव्हेंबर मध्ये केली. आज मागे वळून पाहताना असे लक्षात येते की इतक्या वर्षांच्या प्रवासानंतरही ज्ञानदीपची स्थिती कायम बाल्यावस्थेची व नाजूक राहिली. काम खूप केले पण हाती काही राहिले नाही. याचे एक कारण म्हणजे माझा स्वभाव शिक्षकी पेशाचा असल्याने ज्ञानदीपमधून चांगले डेव्हलपर तयार करणे यावरच मी लक्ष केंद्रीत केले. फायदा तोट्याचे गणित त्यामुळे जमले नाही. शिकलेले विद्यार्थी दुस-या मोठ्या कंपन्यात गेले. 

हे असे होते ... विचार करू लागले की मन वहावत जाते व काय करायचे ते विसरले जाते. 

मी हा ब्लॉग लिहिण्याचे कारण म्हणजे 2003 मध्ये प्रसिद्ध केलेल्या ज्ञानदीपच्या परिचयाची फाईल मला हार्डडिस्कमध्ये सापडली. त्यावेळी आम्ही वापरत असलेल्या श्रीलिपीमध्ये असल्याने ती मला वाचता येईना. श्रीलिपी फॉंट इन्स्टॉल क्ल्यावर मला त्यावेळच्या  ज्ञानदीप कार्याची व भविष्यातील योजनांची माहिती कळली.  पीडीएफ करून मी त्याचे फोटो खाली देत आहे. 


 
आज 2023 डिसेंबर, वीस वर्षांपूर्वी केलेले कार्य आणि आजची ज्ञानदीपची स्थिती यांचा विचार केला तर एक लक्षात येते की ज्ञानदीपचे उद्दीष्ट बदललेले नाही. गेलेल्या प्रदीर्घ कालखंडाचा विचार करता कार्यविस्तार फारसा झालाच नाही. याला कारण बहुराष्ट्रीय कॉम्प्युटर कंपन्या आणि प्रसार माध्यमे यांनी सर्व स्थानिक ग्राहक-वर्ग गिळंकृत केला. आजही भारतातील बहुतेक समाजोपयोगी शिक्षणाचे व विकासाचे कार्य करणा-या स्थानिक स्वदेशी  संगणक संस्थांची अशीच बिकट अवस्था आहे. 
 
तरीदेखील नेटाने ज्ञानदीपचे कार्य असेच अखंड चालू रहावे यासाठी मी प्रयत्नशील आहे. पाहू कितपत यश येते आणि केव्हपर्यंत टिकते ते.


Sunday, August 14, 2022

शुभांगीची डायरी ऑक्टोंबर 2003- एक दृष्टिक्षेप.

1 ऑक्टोबर.
आजच्या सकाळ मध्ये सौ. शुभांगी रानडे नावाचा कोणाचा तरी लेख. ओठावर लिपस्टिकऐवजी स्मित लावले तर काही खर्च नपडता कामे लवकर होतात. करतात. लेखांबद्दल अभिनंदन म्हणून एस एम कुलकर्णी काकू आणि रिसबूड काकूंचा फोन पण मी ती मी नव्हेच असे खरे खरे सांगितले.
 पण आजपासून एक गोष्ट ठरवली. चार ओळी तरी रोज लिहायच्या.

 संध्याकाळी रस्त्याने गर्दीत जायला नको वाटते त्यापेक्षा मागील अंगणात फेऱ्या मारणे बरे दोन दिवसांपासून भांडीवाली -आठ दहा दिवसांसाठी तिची रजा. पोटरीला कसले तरी फोड? तिचे  म्हणणे देवीचा कोप.
वर्ड मध्ये कविता 95-100 पूर्ण केल्या काल रात्री बारा सव्वाबारापासून झोप आली नाही म्हणून कवितांचे काम.

 2 ऑक्टोबर.

आज मला 55 वर्षे पूर्ण होऊन छप्पन्नावे लागले. सकाळी सकाळीच 6वाजता सौ. गोळे काकूंनी  शुभेच्छा म्हणून दोन प्लास्टिकच्या जर्बेराच्या फुलांचा गुच्छ व एक स्वरचित सुंदर कविता दिली. कविता छानच त्यांचे आजी आजोबा,  आमचे पण, आमच्या आईचा वगैरे भावांचा उल्लेख. आणि माझ्याशी मैत्रीण वहिनी नव्हे तर बहिणीचे नाते जोडले आहे. सकाळी 9ला सौ. गौरीचा पुण्याहून फोन - शुभेच्छा. दुपारी घरी जेवायला पाकातल्या पुऱ्या. सकाळी 8:00 वाजता सौ. मराठे काकूंचा पण शुभेच्छापर फोन.  काल रात्रीच त्या मुंबईहून परत आल्या. गोळे व मराठे यांचेकडे पाकातल्या पु-या दिल्या.  संध्याकाळी गावात गणपतीला एकटीच. गोगटे यांचेकडे चष्मा दुरुस्त करून आजींना भेटले. शैलावहिनी पण नंतर भेटल्या त्याना व अश्विनीला रियाला घेऊन नवरात्रात एक दिवस घरी बोलावले. त्यांच्या कोप -यावरच जयंतीच्या सासूबाई सासरे भेटले. तब्येत ठीक. दोघेही नवरात्रात घरी येऊ म्हणाले, दिवे  सगळे गेलेले.घरी यायला रात्री नऊ वाजले. सौ. सुमेधाचा व सुशांत, ति. दादा, ती. सौ. ताईचा फोन. शुभेच्छा. केतन पोहणे व बुद्धिबळाच्या क्लासला आठवड्यातून एक दिवस जातो असे कळले. दुपारी 1:00 वाजता सोसायटीतील दिनकर पवार यांच्या नातवाचा वाढदिवस. तिथे जेवण.

 3 ऑक्टोबर.
सखदेव भाजी  दुकानातून कांदे बटाटे, रताळी, भोपळा, आले,अमितकडून उदबत्ती, गहू, हरबरा, डाळ, तूर, डाळ. देवल सामान किराणा 320. दारावरील उदबत्ती पुडा फ्लॉवर व्हॅली चांगला.
वर्डमध्ये 100 कविता पूर्ण केल्या.  साऊंड फाईल करण्याचा प्रयत्न, 

4 ऑक्टोबर.
शुभदाचा फोन. मंजिरी भेटली होती. औरंगाबादहून येथे परत. ती सध्या घरी एकटीच. म्हणून तिने बोलावले.तिच्याकडे मंगळवारी जाईन. 

5 ऑक्टोबर
बॅंक लॉकरचे काम सकाळी. दुपारी संस्कृत. संस्कृत श्री विभक्ती पूर्ण.  संधी.  दुरुस्ती सुरू. दुपारी 1:15 सौ. सुब्बाराव यांच्याकडे कॉलेज भिशी.  आभाळ पोकळी ही कविता वाचली. गोळे काकूंनीपण त्यांची वाचली. जाता येता आराणके यांची गाडी.
 सौ माधवीचे - मुंबई - पत्र. मसाला चांगला झाल्याचे कळवले.सुवर्णपट कविता आवडली. नवरात्रात कदाचित महाड व चेंबूरला एक दिवस. सुशांतचा रात्री फोन कदाचित दसऱ्याला येणार नाही त्याने वेबवरील सर्व कविता वाचल्या. आवडल्या. उद्याच्या नवरात्राची तयारी करणे 

6 ऑक्टोबर
भाजी 20 रु. बादली तपेली 25 रु. वीज उद्याची तयारी. रात्री वड्या केल्या.

7 ऑक्टोबर. आज घटस्थापना. पहाटे 2लाच उठले.तक्क्या व खुर्च्यांचे अभ्रे शिवले.  झाडझूड, कॉलेजला रजा पोट बरोबर नव्हते.पूजा मीच केली. पुरणपोळ्या सोडून सर्व सर्व स्वयंपाक तयार.पोळ्या सौ. शुभदाने केल्या. जेवणे झाल्यावर उरलेल्या मी केल्या. पुरणात गूळ कमी. ढायबेचीसवाल्यांसाठी का अशी विचारणा झाली. असो.
 संध्याकाळी 6:00 वाजता सर्वजण घरी परत गेले गावात. रात्री तुषार गोखलेच्या आईचा फोन. उद्या त्यांच्या  महिला मंडळात नवरात्रात मी पाहिलेली अमेरिका यावर भाषण करण्याबद्दल. माझा  होकार. 8 ऑक्टोबर
 भाषणाची तयारी. मंगळवार,बुधवार, गुरुवार समीर दुपारी 3:15 ते साडेचार घरी येतो. खाणे विश्रांती. मला चारला जायचे असल्याने त्याचे खाणे झाल्यावर गोळेकाकूंना त्याला उठवण्यास सांगितले.
भाषण चार ते साडेपाच पर्यंत चालले.  कॅलिफोर्नियाचे फोटो दाखवायला ठेवले.सोसायटी  हॉलमध्ये निर्मला कुलकर्णी यांची  अपंग पुनर्वसन संस्थेची माहिती सांगितली सांगलीत 1800 अपंग, 10 वर्षे  संस्था कार्य 400 अपंगांना उद्योगास प्रवृत्त.त्यांचेही भाषण चांगले झाले.

Sunday, July 24, 2022

Our Dandoba Trip

 We went to Dandoba hill near Sangli with our Dnyandeep team.


Mahesh Vaze, Sameer Ranade, Bharat Kare and Samadhan Chavan were in the team with me.

Following are some screenshots


 






We enjoyed the trip and the rainy season.



Monday, June 14, 2021

पुण्यातील एचसीसी प्रोजेक्टचे माझे अनुभव

 १९६८ मध्ये पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी सुरू केल्यानंतर लगेचच मी एमईसाठी प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी माझ्याबरोबर प्रा. दिवाण, पोतदार, घारपुरे होते. शिकविण्यासाठी प्रा. केतकर, एमवायजोशी, कुंटे, छापखाने होते. दुस-या वर्षी मी सेप्टीक टॅंकच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा विषय निवडला.

त्यावेळी कॉलेजच्या वॉटर सप्लायचे काम मेकॅनिकलचे प्रा. दिवाण यांचेकडे होते तर कॉलेज, होस्टेल व स्टाफ क्वार्टर्सच्या नव्या ड्रेनेज पाईप घालण्याचे काम आमच्याकडे आले. त्याआधी होस्टेलसाठी प्रा बर्वे यांनी सेप्टीक टॅंक बांधले होते मात्र मेसचे पाणी तसेच बाहेर सोडले जाई. हे सर्व पाणी एकत्र करून त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी परकोलेटिंग फिल्टरचा विषय मी एमईच्या प्रोजेक्टसाठी निवडला. सर्व्हे, ड्रेनेज पाईप, मॅनहोलसहीत सर्व ड्रेनेज व्यवस्था डिझाईनपासून बोँधकामापर्यंतचे काम मला करायला मिळाले.

त्यावेळी मी नवीन व पुस्तकी विद्वान होतो. प्रा. बर्वे, सखदेव, सर्व्हेचे सत्तू, कॉन्ट्रॅक्टर यशवंत कोलप, करंदीकर हे आमचे खरे गुरू होते.  फिल्टर आणि सेटलिंग टॅंक बांधून मला त्या विषयावर एमई करता आली. प्रा. सुब्बाराव हे सांडपाण्याच्या प्रक्रियेत तज्ज्ञ असल्याने मी जलशुद्धीकरणावर लक्ष केंद्रीत करावे असे सुब्बाराव यांनी मला सांगितले. जलशुद्धीकरण यंत्रणेचे डिझाईन आणि बांधणीचा अनुभव घेण्यासाठी १९७२च्या उन्हाळी सुट्टीत पुण्यातील पर्वती वाटरवर्क्सच्या एचसीसी प्रोजेक्टवर क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्रॅमखाली तीन महिने अनुभव घेण्याची संधी मला मिळाली.


माझे सासर पुण्यातच होते पण त्यांच्या एका खोलीतील संसारात पाच जण रहात असल्याने मला तेथे राहणे शक्य नव्हते. पुण्यात अलका टॉकिजजवळील एका हॉटेलमध्ये  व नंतर हत्ती गणपती जवळच्या होस्टेलमध्ये या काळात मी रहात होतो.

पर्वतीच्या पायथ्याशी शेल रूफ असणारे चार रॅपिड सॅंड फिल्टर आणि दोन सेटलिंग टॅंक बांधण्याचे काम एचसीसी ला मिळाले होते. त्यांचे इंजिनिअर आणि कर्मचारी तेथेच तट्ट्याच्या कॉलनीत रहात असत. फक्त मुख्य इंजिनिअर कुलकर्णी याना पक्के घर होते.

सकाळी ९ पासून संध्याकाळी ८ वाजेपर्यंत काम चाले. मी  डिझाईन ऑफिस व कन्स्ट्रक्शन साईट दोन्ही कडे जाऊन काम पहात असे. मी फिटींग कामातील प्रगती, सळई, सिमेंट बॅग, सिमेंट वाळूचे प्रमाण यांच्या नोंदी ठेवी.नोट्स काढून त्या कुलकर्णी इंजिनिअरना दाखवे. जर्मन फर्मच्या ड्राईंग्जवरून नवी ड्राईंग बनविली जात. मुंबईहून मदन नावाचे चीफ इंजिनिअर येऊन मार्गदर्शन करीत. डिझाईन आणि प्रत्यक्ष काम य़ात ब-याच वेळा अनेक बदल करावे लागत. तेथील अनुभवी मेकॅनिक व गवंडी यांना असे बदल करायला मुभा असे. त्यांचा काम करण्याचा झपाटा वाखाणण्यासारखा होता. अनेक वेळा त्यांनी डिझाईनमध्ये सुचविलेले बदल सुपरवायजरलाही मान्य करावे लागत.

म्युनिसिपालिटीचे इंजिनिअर येऊन कामाची पाहणी करून जात. कुलकर्णीसर अगत्याने माझी ओळख करून देत.   ते मला ब-याच गोष्टी कोदून खोदून विचारत. मीही माझ्या नोट्सवरून सर्वकाही त्यांना सांगत असे. यामुळे नियमावर बोट ठेवून एचसीसीच्या कामात चुका काढायला त्यांना संधी मिळे. एचसीसीच्या अधिका-यांनी मग मला मी त्यांच्याकडे ट्रेनिंग घेत आहे याची जाणीव करून दिली. त्यामुळे मला अशावेळी काय सांगायचे आणि काय नाही हे समजले.

त्यावेळी शेलरूफचे डिझाईन व उभारणी  अवघड आणि नाविन्यपूर्ण होती. अनेक लोक ते काम पहायला येत.  फिल्टरखालील पाईप जोडणी, वाळू चाळून थर करणे, सेटलिंग टॅंकमध्ये ग्राऊंडवाटर अपफ्लो प्रेशर कमी करण्यासाठी रिलीफ व्हाल्व, फ्लॉक्युलेटर व स्क्रॅपरची जोडणी, ओव्हरफ्लो वीअरसाठी व्ही नॉच पट्ट्या बसविणे अशा अनेक गोष्टी प्रत्यक्षात पहायला मिळाल्याने मला या ट्रेनिंगचा फार फायदा झाला. शिवाय कर्मचा-यांबरोबर दिवस घालविल्याने त्यांचे जीवन, अडचणी, आकांक्षा याचीही कल्पना आली. म्युनिसिपातलिटीचे फिल्टर ऑपरेटर आणि इंजिनिअर मला फार मान देत. त्यांच्याकडून मला इतर अनेक गोष्टींचे ज्ञान झाले.



फिल्टर प्लॅंट प्रत्यक्ष बांधणीचा एक समृद्ध अनुभव मला एचसीसीच्या या प्रोजेक्टमधून मिळाला. १९७३ ता १९७६ या काळात  आयआयटी कानपूरमध्ये पीएचडी साठी   कानपूर वाटरवर्क्समध्ये काम करताना  मला या अनुभवाचा फार फायदा झाला.

नीरी, नागपूरमधील माझे अनुभव

 

१९६६ साली सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीई सिव्हील पास झाल्यानंतर लगेच मी त्या कॉलेजमध्ये सिव्हील डिपार्टमेंटमध्ये नोकरीस प्रारंभ केला. माझ्या सुदैवाने त्याच वर्षी अमेरिकेतील ओक्लाहोमा युनिव्हर्सिटीतून एमएस झालेले सुब्बाराव वरिष्ठ प्राध्यापक म्हणून आमच्या डिपार्टमेंटमध्ये रुजू झाले. अमेरिकेतील त्यांचे पर्यावरणविषयक नवे ज्ञान आमच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याची मनीषा बाळगून मी त्यांचे शिष्यत्व पत्करले व त्यांच्या पर्यावरण अभियांत्रिकी विषयात एम.ई. करण्याचे ठरविले.


त्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये पब्लिक हेल्थ हा विषय शिकविला जात असला तरी त्याची प्रयोगशाळा नव्हती. नीरी, नागपूरमधील डायरेक्टर डॉ. जी. जे. मोहनराव हे सुब्बाराव यांच्या परिचयाचे होते. त्यांच्या ओळखीने नीरीत पर्यावरण प्रयोगशाळेत तीन महिने प्रशिक्षण घेण्याचे मी ठरविले. जागतिक संशोधकांच्या गोष्टी वाचल्या असल्याने भारतातील महत्वाच्या राष्ट्रीय संशोधन संस्थेत मला काम करायला मिळणार या कल्पनेने मी हुरळून गेलो. पण मला नागपूर नवखे होते आणि इतक्या दूर परक्या शहरात कसे रहायचे हा माझ्यापुढे प्रश्न पडला. पण माझे जेष्ठ सहकारी प्रा. श्रीधर करंदीकर नागपूरचे असल्याने त्यांनी आपल्या घरी माझ्या राहण्याची सोय केली. युजीसीची शिष्यवृत्ती मिळवून १९६७ साली मी नागपूरला गेलो. त्यांच्या तीन भाऊ व आईवडील असणा-या कुटुंबात त्यांनी आपलेपणाने मला सामावून घेतले. त्यांचे घर सीताबर्डीत होते. तेथून नीरी ३ किलोमीटर दूर होली. आमच्या घराशेजारी राहणारे देशमुख नीरीमध्ये काम करीत असल्याने त्यांचेबरोबर मी बसने नीरीत जाई.


तेथील प्रत्यक्ष पाणी, मलजल, घनकचरा, हवाप्रदूषण या वेगवेगळ्या विभागात प्रत्येकी १५ दिवस प्रत्यक्ष काम करण्याची संधी मला मिळाली. तेथील अनेक वरिष्ठ शास्त्रज्ञांची माझी ओळख झाली. डॉ. एस. एन. कौल, डॉ. अलगरस्वामी, डॉ. लक्ष्मीनारायण, डॉ. देशपांडे इत्यादींनी मला बहुमोल मार्गदर्शन केले.


 


त्यावेळी मी जरा धीट व स्पष्टवक्ता होतो. कोणाचीही तमा न बाळगता मी प्रश्न विचारत असे. माझे मतही मांडत असे. नीरीबद्दल माझ्या मनात असलेल्या कल्पनांना मात्र मोठा तडा गेला. तेथे घड्याळाच्या वेळेनुसार व नियमाप्रमाणे चाललेले काम मला आवडले नाही. कर्मचारी, अधिकारी यांच्या संघटना कायदेशीर बाबींचा अतिरेक, विभागाविभागातील दुरावा यामुळे माझे मन खिन्न झाले. संशोधन वा नवनिर्मितीसाठी भूक तहान विसरून व काळवेळाची पर्वा न करता धडपडणा-या शास्त्रज्ञांऐवजी मला चाकोरीबद्ध काम करणारे व पगार आणि बढती आणि अधिकार यात मशगुल असणा-या लोकांचेच तेथे प्राबल्य असल्याचे जाणवले. संशोधनासाठी सरकार कोट्यावधी रुपये खर्च करीत असूनदेखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन येथे का होत नाही असे मी डॉ. मोहनराव यांना विचारले. तेव्हा त्यांनी सरकारी निर्देशांप्रमाणे संशोधन प्राथमिकता बदलत राहिल्याने आणि व्यवस्थापनाला मर्यादित अधिकार असल्याचे कारण सांगितले आणि आपली हतबलता व्यक्त केली. अर्थात माझा हा अनुभव १९६८ सालातील आहे. आणि आता त्यात बरेच चांगले बदल झाले असतील असे मला वाटते.

नागपूरचा उन्हाळा, तेथील व-हाडी भाषा, लोकांची आदरातिथ्य व मदत करण्याची वृत्ती आणि करंदीकरांच्या घरातील खेळीमेळीचे प्रसंग आजही माझ्या मनात ताजे आहेत.

नागपूरला पर्यावरण अभियांत्रिकी प्रयोगशाळेत प्रदीर्घ काळ अनुभव घेतल्याने वालचंद कॉलेजमध्ये परतल्यानंतर आम्ही पब्लिक हेल्थ लॅब उभी करायचे मनावर घेतले. कॉलेजचे प्राचार्य श्री. कानिटकर यांनी यासाठी पूर्ण सहकार्य दिले. बीईच्या क्लासरूममध्येच लाकडी पार्टिशन घालून आम्ही प्रयोगशाळा उभारली. सुब्बाराव कॉलेज कॅंम्पसमध्येच रहात असल्याने कॉलेज सुटल्यानंतर रात्रीपर्यंत आणि शनिवारी रविवारी पूर्ण दिवस आम्ही प्रयोगशाळेत काम करीत असू. प्राचार्य कानिटकरही रविवारी प्रयाोगशाळेत येऊन आम्हाला प्रोत्साहन देत.
आज वालचंद कॉलेजमधील सुसज्ज प्रयोगशाळा बघताना नागपूरच्या नीरीमधून आणलेल्या बीजाचा वटवृक्ष झाल्याचे समाधान वाटते.


या जाणिवेतूनच नागपूरला ज्ञानदीपची शाखा काढण्याचे स्वप्न मी पाहू लागलो.


डॉ. एन. एस. रमण यांनी जेव्हा यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले तेव्हा मला मनस्वी आनंद झाला. ज्या नीरीत मी प्रयोगशाळेचे पहिले धडे गिरविले. त्याच नीरीतील अत्युच्च पदावर असणारी व्यक्ती ज्ञानदीपची पर्यावरण शाखा तयार झाली हे मी माझे परमभाग्य समजतो.

Friday, November 27, 2020

Social Engineering for Make in India

Science says that you cannot go back in time, but human brain has such a magic power of memory storage that one can re-live the old life in mind. Atleast for me, pondering in good old days, has become a regular habit and solace to troubled mind while living in present modern educated society, which has become over smart and selfish in preserving its own pride and prejudice.

My days in service career in Walchand College and Dnyandeep activitites for first few years were full of ambition and aspirations. We used to  follow the great leaders in education, social and political fields, work together, understand and respond to colleagues and other society with full sensitivity. We were not rich but were full of emotions of our own, giving us energy to move forward with sharing of joy and sorrow with others. We enjoyed living together, working for each other or collectively towards variety of  goals, driven either by individual, social or political forces.

For last four years, while staying in America I found sophisticated, well mannered and object oriented and confined talk by people at all places,  which was typically robotic with suppressed emotions to adhere with strict norms of good behavior. Whether you go in hospital, mall, hotel or even in a garden or any informal social gathering, the experience is monotonic, disciplined and respectful.

Somehow, I felt that the people living here are becoming aloof from society and are just trying to become or show ideal gentlemanship. This might be the effect of over training of good manners, strict administration and fear of legal actions. Big corporates and administration demands that the workers and citizen behave in carefully crafted rules and regulations and achieve desired goals anonymously. They are treated as replaceable items to give desired outcome.

I had read a Russian novel ‘Everything but love’ long back, where the man gets a robot as wife, well and carefully designed to suit his requirements in minutest details like shape, look, beauty, responses and even pre-build emotions. He feels happy and boasts his possession with his friends who had wives with lot of imperfections and unmanageable quarrels. However, soon he realizes that robotic wife cannot give him the true love with human soul.

I am afraid, that in our pursuit of perfection, efficiency and unbiased just responses, big clever social machines  are forcing the people to abandon their inherent distinctiveness and turning them into well managed perfect society.

Even if we succeed in it, robots are going to outperform humans and would enslave human beings as they are heterogeneous in composition and fail with repetitive work and stressful conditions.

We have to think seriously where we want to go. Whether to achieve great success and prosperity with robotic culture or preserve our relations, traditions, old beliefs and rituals and remain where we are, imperfect, diversified but full with sensations, emotions and memories of past which preserve and nurture our minds rather than glorify bodies with material wealth and behavior to suit the ideal norms of social interaction.

I have become more  desperate in my outspokenness as I am experiencing similar transformation of our educated middle class in India. When I expressed my anguish about cool response to Dnyandeep initiative of collective investment and promotion of small businesses in India, I got variety of responses, which need to be studied. Many  thought it is my  marketing tactic for personal benefit. When I explained them of collective venture they did not trust others.  

 Some thought, it is political move and branded it is communist divisive propaganda. When I gave examples of Savarkar, Vivekanand, Vinoba Bhave and Sant Gadgebaba, they blamed corruption, politics and government failure. Nobody considered that they have any obligation to improve the situation being most gifted in economic terms. Some said, they pay heavy double taxes and it is the government which has to do the needful. Leftists were happy with my frustration and said total revolution is the only answer for this. Democrats here had some what acceptable approach to help small individual businesses, which guarantees individual freedom and helps innovation and healthy competition.

Everybody respected great leaders, saints who considered society and nation above their family  and sacrifice of our soldiers in protecting our nation, but tried to hide behind their own shields of reasoning.

I am feeling happy to discover this crucial issue which has to be tackled scientifically if we have to bring back our lost strength and trust from the best brains in India and abroad. I wish all of you to express your opinions and views in this regard. If we succeed in finding an amicable solution, it will be a great breakthrough in present deadlock. - Dr. S. V. Ranade, Dnyandeep, Sangli

 

Tuesday, November 17, 2020

Dr. G. D. Agrawal, an icon of selfless devoted environmetalist Part -III

 A memorable story of my stay at IIT, Kanpur and research under his guidance -III

Dr. Agrawal used to come to  Kanpur Water Works any time and see my work,  discuss with the workers and  explain their difficulties like their colleague forgetting his professor status.

Although Dr. Agrawal did not like computers, his behavior was like computer basis of on(1) and off(0) ie yes or no. He  didn't believe in between adjustments. His opinions were strong. He thought that  Reward or Punishment only can change person’s behavior. Hence he did not hesitate to punish. His method of rewarding student was never known to student as he did it in praising the work to others but not in front of student. He used to say that I am a cunning trader but his trading was for the good of his students.

He was well acquainted with the engineers of UP Jal Nigam. He had deliberately invited Dr. R. C.  Singh of Delhi IIT who was famous at that time due to his nearness to Sanjay Gandhi and his work on synthetic coagulant aid (which was later criticized to have health effects) His visit gave publicity to my research in UP Jal Nigam. He also arranged visit of Prof. Hudson, an expert in water supply from USA to IIT and for training workshop for Jal Nigam engineers. He visited Kanpur water works and our dual media filter.  Hudson's workshop for Jal Nigam Engineers provided guidance on how to make low cost but effective improvements to the water purification system.

I prepared research paper describing augmentation of filters to dual media filters and put the authors names as Dr. Agrawal, Shri. Y. D. Misra and S. V. Ranade in our usual style that was being followed in Walchand College. Dr. Agrawal reversed the order and put my name first. We sent the paper for the First Convention of the Institution of Public Health Engineering to be held in Calcutta. We all went to Calcutta by train with our families. I wanted Shri Mishra to present paper as he was known to all. Shri Mishra had purchased a special suit for presenting the paper. He spent lot of time with me getting technical details. 

At the time of presentation he sat near me and started getting tips for presentation and marking in his notes. But when Agrawal learnt that he was going to give a presentation, he stopped him and asked me to go on stage. I wanted to plead for him but could not dare to speak. Silently I got up and went on stage. Everyone liked my presentation as our research topic was novel and with application potential. Luckily I got the first prize for presentation and also got an invitation to accept the award in Delhi next year. I felt sorry for Shri Mishra to loose this opportunity.(Later, of course, Shri Misra also got promotion to Delhi's Waterworks because of this research.)

In all these events, Dr. Agrawal never came to front and always gave credit to his students. He was not interested in self publicity but was particular that students get it. 

Let me tell you about my student colleagues and their research topics. My seniors were Shriramalu,  D.D. Oza and D. S. Bhargav whereas my batchmates were Manmohan Rao from Bangalore and Dr. Lazer John from Kerala. My friend Shri. Vinay Kane was Elect. Engineer but was doing PhD. in maths. My M. Tech friends from Sangli were D. D. Kutte, and G. N. Kulkarni from Sangli,Shri Madhav Joshi, Sanjay Dhande, Dabke and many others used to come to our house in the evening and for functions. There was Maharashtra mandal in Kanpur and Ranade and Natu families were active and known to us. In front of IIT there was Kanpur Sugar Institute and manr sugar factory technicians from Maharashtra were my friends there. In the last year Dr. Pramod Vitkar came as our neighbor.

There were get to gather functions in IIT Red Rose shopping complex but Dr. Agrawal came occasionally. Other professors were very friendly with students and we used to go for tea together. Naturally Agrawal being absent was the target of criticism, which I had to sustain.

Strike broke out against Director Dr. Muthana, and students started agitation demanding removal of Director. Dr. Agrawal was given the task of controlling the students. He became more unpopular in students due to his strict orders. He lacked negotiating techniques and was firm on his views.    

Next year, we went to New Delhi to receive the prize. I had invited my parents for that event in Delhi. 

 


Myself accepting award certificate from Hon'ble Karansingh
Myself with my parents in the conference hall

I introduced my parents to  Dr. Agrawal. To my surprise, he praised me for my work and my parents got delighted but were shy to speak freely with him. Dr. Agrawal then made them speak by his friendly gestures with respect. The award was given by   Union Minister Karan Singh and my parents felt very happy. After the function we completed trips to Delhi, Agra, Haridwar, Rishikesh, Allahabad, Kashi and Gaya. However, Agarwal could not meet us later at IIT as he was busy with work.

After completion of PhD I returned back to Sangli and joined college duties in August 1976.

Next year my Ph.D. Viva took place in IIT, Kanpur. Reports of external foreign examiners Pearson and Bauman were favorable. Hence viva was taken in presence of  local  external examiners Dr. A. G. Bhole from Nagpur  and Dr. Datar from Jabalpur. I was awarded PhD.

In 1977,  I received his letter before leaving IIT. For the first time, he expressed his sadness in a letter. He had written that associate professors had made it difficult for me to stay here and  he is resigning from IIT .

 


I felt very sad and helpless. I wrote to him not to take hasty step and continue the service as his guidance is required by students. However, I learnt that  he left IIT and went to Delhi.
 
However, he was offered a prestigious member secretary post in  Central Pollution Control Board . There he made important contributions to the formation of the necessary framework for effective legislation for pollution control.During his tenure, Air Pollution Act and the Environment Act 1986 were formulated and became laws.
 
To be continued - Dr. S. V. Ranade, Dnyandeep, Sangli

Dr. G. D. Agrawal, an icon of selfless devoted environmetalist Part -II

 A memorable story of my stay at IIT, Kanpur and research under his guidance -II

It was the period  political turmoil in India. Although Kanpur IIT was funded by the US, the students were dominated by the Left Communists in West Bengal. The magazines and newspapers that came to the library were from left parties. There were some RSS students and staff but their numbers were very small. Dr. Jayaprakash Narayan's agitation had started. Students were hypnotized by concept of total revolution. Dr. Subrahmanyam Swami Former Vice Chancellor of Shivaji University Dr.  Dhanagare were in the IIT at the same time. In our Environment department,Dr. Agrawal and Malay Chaudhary were Hindi speakers from Uttar Pradesh and Bangal, while Prabhakarrao, Venkobochar, Iyengar, Dayaratnam, etc. were English speakers from South India. Maharashtrian Bokil was the only Marathi professor and he wanted to get along with both the groups (later he committed suicide due to  promotion issue.) Agrawal was also kept away from other professors due to his strict nature. (I learned from his letter that this  was the reason for his leaving the directorship.)

 

 I had to live in the hostel for the first term. In the next tem I got shared quarters and we (with Shubhangi and two and a half year old Sumedha) started living with a Bengali family. Basu Roy was doing his PhD in Mechanical and was a staunch left communist. We had a kitchen and bedroom whereas  main hall and a room belonged to him. He had son as our Sumedha. Though our political views were extreme, we were at peace at home. There were movements against the student director. Their night meetings were a way to attract students to the communist student. Even my closest friend had become a communist by following his diet. Most of the disciplinary work in IITs had to be done by Agrawal. (Later he became the student dean) The students did not like his strict discipline. Some professors from the south seduce students.

In Kanpur at that time there were only two groups, the very poor and the very rich. Bullying and murder were commonplace. In our IIT campus also, there was obe incidence where one person was shot dead in a social outdoor gathering. The tempo by which we used to go to Kanpur (at a distance of 13 km) often had some passenger with gun. Nobody cared about life. At night, Hynas gang lift away the sleeping children from slum dwellers. I, too, had escaped once from the the hyna following my bicycle while going home from the library at night.

The banks of the Ganges were a crowded with  slums, uncleanliness and crime. Agrawal was trying to improve this situation with social agencies. Dr. Agarwal used to take us to the surrounding rural villages for participating in the cleaning and education programs of the schools and community centers there. IIT had adopted a village for development. English speaking professors from South India did not participate. The northern professors complained that they were ignored in promotions because of their lack of English and insistence on Hindi.

Although Dr. Agrawal had came from the US with a PhD, he did not like computers at all. He had given me such strong warning for not using computers. He was of the opinion that if one did the calculations himself, he would understand better than the computer answer.

I, however, had a strong fascination with computers there. My Marathi friends used to come to our house in the evening. Most of them worked on computers. With their help, I used to go to the computer lab at night. Our neighbor Mrs. Athavale was employed in a computer lab and I got admission there through her acquaintance. By punching the cards, one card for each sentence, a bundle of cards was given to the computer lab operator just as we give floor to grain mill After one or two days all the bundles of cards with output paper rolls were distributed. Wrong  cards had to be punched again. Some people deliberately made mistakes when they saw that they get blank papers. After realizing this, a programmer  was appointed to check the program before feeding to computer.

Dr. G. D. Agrawal did not like to do research in the laboratory or on theoretical subjects. Shri Jayant Kardile had constructed  Dual Media Filter at Nasik using crushed coconut shell. Dr. Agrawal suggested to use  crushed  apricot shells, which were  abundant in supply in Uttar Pradesh,. So I did research on experimental filters and published the paper. We knew that anthracite was used for dual media abroad but it was not available in India. Since low quality coal was being used in households in North India and was the cause of domestic  air pollution, our attention was drawn to the physical properties of this coal and the experiment proved that it would be suitable for filters.

Then Dr. Agrawal asked me to study process at Kanpur. As per his advice, I used to go to Kanpur Waterworks every morning with Tiffin box  and study all the systems there and test the water samples. In the afternoon, we used to take  lunch with the workers in the filter house. Keeping in touch with the workers, chemists and engineers throughout the day gave me a thorough understanding of all the technical as well as social conditions there. I have closely watched the plight of the workers. They used to have barley bread, onion and wet gram dal, onion  and chilli in the box. Engineers behaved very harshly with them.

The Chief Engineer Shri. Y. D. Mishra was very strict with subordinates. He used to go round all the plant with me every morning. He kept the plant equipment clean and in working condition. His house was in the plant area. All the household works  were done by waterworks staff. Mishra used to invite outside guests and took pride in introducing  me as IIT research scholar.


Dr. G. D. Agrawal – an icon of selfless devoted environmentalist- Part -I

 A memorable story of my stay at IIT, Kanpur and work under his guidance

 My guru,  Dr. G. D. Agrawal  lived a sage-like life, I consider it my privilege to have the opportunity to do a PhD with him. The influence of his personality became a constant source of inspiration in my later life.

Gurudas (his name), who was very intelligent and revolutionary from his childhood, did his B.Tech from Roorkee IIT. He was a loyal follower and main promoter of the Ganga Mahasabha Arya Samaj founded by Pandit Madan Mohan Malviya in 1905.


He then completed his MS and PhD from Berkeley University in the US in just four years and joined IIT Kanpur as a Professor. Even so, he always wore white kudta and pajamas. He was batchlor and cooked his food and ate alone at home without any servants even when he was Dean and Head of Dept in IIT, Kanpur.

When he came to our college in 1971 on the occasion of an examination, he met Dr. Subbarao and saw our field projects in sugar factory as well as our laboratory. Influenced by our work in laggon waste treatment he asked me to apply for PhD under QIP scheme.

Later when I went to IIT, Chennai for PhD interview with Prof. Bhalba Kelkar, he interviewed me. At that time, despite the hot weather, he  forbade the servant to put on fan. He said that no fan is required in India,when we sweat, our body gets cooled  cold.

Within two days after I took my admission to IIT, Kanpur, I was convinced of his courage and outspokenness. The director of IIT, Dr. Jagdish Lal welcomed the new students and stressed the importance of environmental protection. Then Agrawal stood up and said whatever the director said about environment was wrong, we were taken aback in surprise. He then pt forth his strong conviction about the meaning of environment preservation.

He dealt with his students harshly in old teaching pattern. We were afraid of him. He did not tolerate unpreparedness and indiscipline. He used to teach the subject of air pollution blended with his views with reference to Indian conditions. He did lab testing in lab himself. Even outside client water and wastewater samples he tested by himself without help of assistants. This was not so for other professors, who relied of testing by lab staff. Unlike other professors, he did not mix with the students at all, as he felt students should not have friend previleges.

Although I lived there with my family for three years, he never came to my house. Friendly behavior with students did not fit into his principle. Even then, we had a lot of respect for him as compared to other teachers due to his crarity of concepts and honesty. There was fear also about him. Hence while going to him, we had to prepare properly. He permitted students to meet him any time without prior permission, but scrutinized the student work with strict expectations.

I received harsh treatment  from him in the first year. I showed him my draft proposal for my thesis and when he saw the scratching of words in  in the first line, he got angry and threw away my paper. He told me why  you are writing  without thinking and then changing words. I returned scared and felt sorry. It was all new to me. At Walchand College, I was treated like friend by Dr. Subba Rao. Here, however, I had encountered Jamadagni. But then I got used to his nature and did not do such mistakes.

Knowing that he did a PhD on water purification, I wanted to do a PhD in that subject because our Sangli group lacked this branch. Hence, each time I took a proposal on water purification he would not approve and ask me to take other subject.His expectation was that I should do research on wastewater related to  the sugar industry as I had experience in that field and he wanted to use it in UP. But I also was adamant in choosing topic. Finally, he agreed to my water topic and sent  me to study water treatment projects of Dr. S. V. Patwardhan in   Roorkee University. Dr. Patwardhan had developed horizontal and multimedia filtration plants. I chose  dual media filtration as topic and Dr. Agrawal approved it suggesting to use Indian bituminous coal instead of imported anthracite coal as media.

Our respect for him grew more when we realized that he was praising us while talking to outsiders, despite his harsh treatment of me and his students. He was never satisfied ( or showed like that), expecting more work. Because of them, I got into the habit of constantly working.

To be continued ---


Saturday, October 10, 2020

निष्कलंक चारित्र्याचे असामान्य पर्यावरण तंत्रज्ञ - डॉ. जी. डी. अग्रवाल भाग - ४

 पीएचडी पूर्ण करून मी १९७६ ऑगस्टमध्ये सांगलीत परत आलो. नंतर  मला डॉ. जी.डी. आगरवालांचे एक पत्र आले.


त्यांचा विद्यार्थ्यांपासून दूर राहण्याचा निश्चय त्यांनाच त्रासदायक ठरला. इतर प्राध्यापक विद्यार्थ्यात मिसळत पार्ट्या करत. साहजिकच डॉ. आगरवालांविषयी मने कलुषित होत. आगरवाल कडक शिस्तीचे असल्याने काही विद्यार्थी व प्राध्यापकांना ते नकोनासे झाले. डायरेक्टरही विरोधी गेल्याने डॉ. आगरवाल हतबल झाले. माझे पीएचडी पूर्ण झाल्याने ते आता माझ्याशी मोकळेपणाने वागत होते. त्यांचे वरील पत्र त्यांच्या मनस्थितीचे द्योतक आहे.

डॉ. जी. डी. आगरवाल आय. आय.टी.तून राजिनामा देऊन बाहेर पडले. आणि दिल्लीमधील आपल्या घरी राहू लागले. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने त्यांची पहिले सदस्य सचिव म्हणून   नेमणूक केली. त्यांच्या कारकिर्दीत एन्व्हायर्नमेंट कायदा १९८६ ( Environment Act 1986 ) हा सर्वसमावेशक कायदा लागू झाला. त्याच्या संकल्पनेत डॉ. आगरवालांचे योगदान फार मोठे होते..

आपल्या एका विद्यार्थ्याने सुरू केलेल्या एनव्हायरोटेक इन्स्ट्रुमेंट्स या कंपनीत डायरेक्टर या नात्याने अनेक हवा प्रदूषण मापक यंत्रणांचे डिझाईन त्यांनी केले. तसेच अनेक ठिकाणी प्रात्यक्षिक व प्रशिक्षण वर्गही घेतले. सांगलीतही आमच्या इपीआरएफमध्ये त्यांनी असा एक वर्ग घेतला होता.

हे सर्व चालू असले तरी एकटेपणाचे त्यांचे दुःख त्यानाच माहीत होते. आपल्या एका नातेवाईकाच्या मुलाला त्यांनी दत्तक या नात्याने आपल्या घरी ठेवून घेतले होते. त्याचे सर्व शिक्षण आगरवालांनी केले. मात्र शिक्षण झालयावर तो मुलगा परत आपल्या आईवडिलांकडे निघून गेला. 

त्यांच्या मावशीला बरोबर घेऊन ते सांगलीस येत असत. गणपतीचे देऊळ, हरिपूर, साखर कारखाना यांना भेट देत येथील द्राक्षे त्यांना आवडत. 

असेच एकदा त्यांचे मला पत्र आले. त्यांच्या बहिणीच्या मुलीचे एका कुलकर्णी नावाच्या मुलावर प्रेम बसले आहे. पण तिचे आईवडील आंतरजातीय लग्नाला संमती देत नाहीत व त्या मुलीने त्यांना यात मदत करायला गळ घातली होती. मुलगी पुण्यात रहात होती आणि मुलगा मिडलइस्टमध्ये नोकरी करीत होता आणि त्याचे आईवडील कणकवलीस रहात होते. जी. डी. आगरवालांनी स्वतः ते लग्न लावण्याचे ठरविले होते. ते ब्रह्मचारी असल्याने लग्न लावण्यास पात्र नव्हते म्हणून त्यांनी आम्हाला यजमान म्हणून  सपत्निक कणकवलीला येण्याचे व लग्न लावण्यात मदत करण्याचे आवाहन केले होते.

त्यांच्या या समाजोपयोगी कार्यात आम्हाला सहभागी होता आल्याने आम्हाला आनंद झाला. आम्ही दोघेही कणकवलीला बसने गलो. स्टॅंडवर डॉ. आगरवाल आम्च्या स्वागतासाठी हजर होते. लग्नासाठी मुलीची आई व तिच्या मैत्रिणी तसेच आगरवालांचे बंङी आले होते. कार्यालयात आमच्या हस्ते मलीचे कन्यादान झाले. आगरवालांनी सासरकडच्या सर्वांचे मानपान व्यवस्थित केले. विशेष गोष्ट म्हणजे मुलीला सासरी पाठविण्यापर्यंत दोन दिवसांत आगरवालांनी पाणी देखील घेतले नाही. कडक उपास पाळत त्यांनी आम्हाला जेवताना जो आग्रह केला तो मी कधीच विसरणार नाही. आम्हाला परत बसमध्ये बसेपर्यंत स्टॅंडवर    असलेले आगरवाल अजून डोळ्यासमोर उभे राहतात. 

बाहेरून व स्वतःसाठी कठोर पण मनाने अत्यंत हळवा स्वभाव असलेले आगरवाल यांनी स्वार्थत्याग म्हणजे काय याचे स्वतःच्या कृतीतून जगाला दाखवून दिले आहे.

आधी समाजवादी संघटनेने पाठिंबा दिला. त्यांनी संन्यास स्वीकारल्यानंतर धार्मिक संघटनांनी पाठिंबा दिला. राजकीय पक्षांनी देखील प्संगानुरूप आपला पाठिंबा किंवा विरोध जाहीर केला. 

 खरे म्हणजे अशा माणसाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांना मानणा-या समाजाची असावयास हवी. मात्र याबाबतीत त्यांना बेमुदत उपोषणापासून परावृत्त न करता त्यांच्या समर्पणाचा लाभ मिळविण्याचा राजकीय आणि सामाजिक संघटनांचे वर्तन मतलबी स्वरूपाचे आहे असे म्हणावेसे वाटते. 


Monday, October 5, 2020

कै, ती. तात्यांच्या हस्ते नव्या एलआयसी इमारतीची वास्तुशांत

आम्ही कानपूरला असताना माझे वडील ती. तात्या एलआयसीतून रिटायर झाले. त्यांचे हस्ते एलआयसीच्या आत्ताच्या नव्या इमारतीच्या वास्तुशांतीचा समारंभ झाला. आम्ही तो पाहू शकलो नाही पण त्यावेळी आम्ही कानपूरहून लिहिलेली पत्रे खाली देत आहे.

 

 

 

Saturday, October 3, 2020

प्रसिद्ध जन्मदिवसांची वाटेकरी- कै. सौ. शुभांगी रानडे

 माझी प्रिय पत्नी आणि ज्ञानदीपची संस्थापक कै. सौ. शुभांगी हिचा जन्मदिवस २ ऑक्टोबर १९४७ असल्याने प्रत्येक भारतीय तो साजरा करतो. महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जन्मतारीख २ ऑक्टोबर तर भारताचा स्वातंत्र्यदिन १९४७ साली. या दोहोंचा हृद्य संगम शुभांगीच्या जन्मतारखेत आहे. हा मोठा योगायोग म्हणावा लागेल.



सौ. शुभांगीचे माहेरचे नाव सुमन दत्तात्रय शिंत्रे. सुमन आणि शुभांगी ही नावेही तनमनाची निदर्शक आहेत शेवटचे धन नसले तरी ज्ञानरूपी  मौलीक धन ती ज्ञानदीपच्या रूपाने जगाला चिरंतन देणार आहे.


तिने आपल्या आईवरील एका कवितेत म्हटले आहे की

तिच्या याच काव्याचा आधार घेत मी ज्ञानदीपच्या माध्यमातून तिला चिरंतन ज्ञानदायिनी करण्याचे व्रत आजपासून स्वीकारत आहे.

आजच्या तिच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने तिचा थोडक्यात परिचय खाली हेत आहे.

कै. सौ. शुभांगी सु. रानडे ( जन्म - २ ऑक्टोबर १९४७, निधन - २२ ऑगस्ट २०१६)

माहेरचे नाव - सुमन दत्तात्रय शिंत्रे


 

पुण्याच्या सदाशिव पेठेतील पेरुगेटजवळील पेंडसे चाळीत ( सध्याची सप्तश्रृंगी बिल्डिंग) तिस-या मजल्यावरील १० बाय १०च्या एका खोलीत सात माणसांच्या शिंत्रे कुटुंबात जन्म. वयाच्या पाचव्या वर्षीच वडिलांचे निधन. तीन भाऊ व एक बहीण असणारी सुमन सर्वात लहान. आई यशोदाबाई शिंत्रे यांनी नर्सची दोन पाळ्यात कामे करून मुलांची शिक्षणे केली. भाऊ बहीण यांचे दुस-या गावी संसार सुरू झाल्यावर दोन भाचे शिक्षणासाठी पुण्यात राहिले. आई कामावर गेल्यावर या भाच्यांची काळजी घेत नेटाने एमए संस्कृत, बीएड शिक्षण पूर्ण केले


 १३ जून १०७० साली लग्न झाल्यावर लगेच सांगलीत सिटी हायस्कूलमध्ये संस्कृत शिक्षिका म्हणून नोकरीस सुरुवात.

२५ मे १९७१ मध्ये सुमेधाचा जन्म. माझ्या पीएचडीसाठी १९७३ ते १९७६ या काळात आयआयटी कानपूर येथे वास्तव्य. नंतर वालचंद कॉलेजच्या स्टाफ क्वार्टर्समध्ये वास्तव्य

६ डिसेंबर १९७७ सुशांतचा जन्म

सिटी हायस्कूलची नोकरी सुटल्याने पुढे सांगली मिरजेतील अनेक शाळांत रजेच्या काळात संस्कृत गणित शिक्षिका म्हणून कार्य.

१९८५ मधये वालचंद कॉलेजमध्ये बेसिक प्रोग्रॅमिंगचा शिवाजी विद्यापिठाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण. सावरकर प्रज्ञा प्रशालेतीम मुलांसाठी कॉम्प्युटर प्रशिक्षणाचा एक महिन्याचा कोर्स घेतला.

१९८७मध्ये विजयनगर येथील ज्ञानदीप या स्वतःच्या घरात राहण्यास प्रारंभ.

विश्रामबाग येथे सुयश कॉम्प्युटर्स नावाचे क्लासेस सुहास खांबे आणि विजया कुलकर्णी यांच्या पार्टनरशिपमध्ये पाच वर्षे चालविले.

 

नोव्हेंबर २००० मध्ये ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. ची स्थापना व डायरेक्टर म्हणून कार्य सुरू.

मायमराठी, संस्कृतदीपिका विज्ञान या वेबसाईट तसेच संस्कृत व इतर व्यावसायिक सॉफ्टवेअर आणि वेबसाईट  विकसित करण्यात प्रत्यक्ष सहभाग.

काव्यदीप, सांगावा आणि सय हे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध.



 

मराठी साहित्यसंमेलन वेबसाईट निर्मिती

बॅंकॉक, दुबई येथील अभ्यास दौ-यात सहभागी व इतर ग्रीनटेक सेमिनार व वाचनालय तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग.

 

२००१ पासून अमेरिकेत पाच वेळा मुलांकडे दौरा

२०१२ पासून श्वसनाच्या व्याधीने त्रस्त. 


 

२२ ऑगस्ट २०१६ रोजी निधन. शेवटपर्यंत आनंदी आश्वासक व इतरांना मार्गदर्शन करण्यात व्यस्त 

निधनानंतर नेत्रदान

१ सप्टेंबर २०१८मध्ये शुभांगी कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्रासाठी पुण्याच्या महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीस एक लाख रुपयांची देणगी. ज्युनिअर कॉलेजच्या कॉम्प्युटर खोलीला तिचे नाव देण्याची ग्वाही.



 

Friday, October 2, 2020

निष्कलंक चारित्र्याचे असामान्य पर्यावरण तंत्रज्ञ - डॉ. जी. डी. अग्रवाल भाग -३

कानपूर वाटर वर्क्समध्ये आगरवाल आले की आपली प्रोफेसरशिप विसरून खुलेपणाने कामगारांशीही चर्चा करत. त्यांच्या अडचणी समजावून घेत. माझ्या कामाबद्दलही सूचना देत. रॅपिड सॅंडफिल्टरचा ( जलद गतीची वाळू गाळण टाकी ) एक हिस्सा रिकामा करून खालचे पाईप मोठे घालणे. बाजूच्या भिंतीत एक उभी खिडकी करून परस्पेक्स शीट बसवून नमुने घेण्यासाठी व हेडलॉस मोजण्यासाठी प्लॅस्टिकच्या नळ्या घालणे. ग्रॅव्हल, वाळू व कोळशाचे थर घालून ते धुवून घेणे  वेगवेगळ्या पद्धतीने फित्टर चालवून नोंदी व नमुने घेणे यात माझे अनेक दिवस गेले.  दिवसाचा वेळ माझा कानपूर वाटर वर्क्समध्ये  गेला तरी  रात्री मी आयआयटीच्या लॅबमध्ये काम करत असे. तेथे दोन ४इंची व्यासाचे पण ८फूट उंचीचे फिल्टर करून त्यात पाण्याचा गढूळपणा व प्रवाह यात नियंत्रित पद्धतीने बदल करीत रॅपिड सॅंड व ड्युएल मिडिया फिल्टरचा ( वाळूत गाळ पृष्ठभागावर गाळ न अडकता खोलवर जाण्यासाठी मोठ्या आकाराच्या कोळशाचा थर असणारी द्विथर गाळण टाकी)  तुलनात्मक अभ्यासही करावा लागला.   

डॉ. आगरवालना कॉम्प्युटर आवडत नसला तरी त्यांचे वागणे त्यावेळच्या ऑन ऑफ किंवा ०,  १ सारखे रोखठोक असे. फझी लॉजिकसारखे अधलेमधले, गुळमुणित वागणे त्यांना ठाऊक नव्हते. त्यांची मते कणखर असत. बक्षिस किंवा शिक्षा या दोनच गोषटी माणसात बदल घडवू शकतात. असे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळे शिक्षा करायला ते कचरत नसत. बक्षिस देताना मात्र बक्षिसाने शेफारून जाऊ नये म्हणून असेल कदाचित पण विद्यार्थ्याला प्रत्यक्ष काही न देता इतरांकडे त्याच्या हुषारीचे वा कामाचे कौतुक ते करत असत.    मी पक्का बनिया आहे असे ते म्हणायचे पण त्यांची बनियेगिरी आपल्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी असायची.

त्यांची उत्तरप्रदेश जलनिगममधील इंजिनिअरांशी चांगली ओळख होती. दिल्ली आयआयटीतील आरसी सिंग आणि अमेरिकेतील पाणीपुरवठा क्षेत्रातील तज्ज्ञ हडसन यांना त्यानी माझा ड्युएल मिडीया फिल्टर पहाण्यासाठी मुद्दाम निमंत्रित केले होते. हडसन यांचे कार्यसत्र जलनिगमच्या अधिका-यांसाठी घेण्यात आले त्यावेळी जलशुद्धीकरणाच्या यंत्रणेत कमी खर्चाच्या पण प्रभावी सुधारणा कशा करता येतील याचे मार्गदर्शन केले. 

कलकत्त्यात भरलेल्या इन्स्टिट्यूशन ऑफ पब्लीक हेल्थ इंजिनिअरिंगच्या पहिल्या अधिवेशनासाठी मी, मिश्रा व आगरवाल यांचा पेपर  पाठवताना माझे नाव पहिले घालण्याचा त्यांनी मिश्रांकडे आग्रह धरला. आम्ही सर्व आमच्या कुटुंबांसह  रेल्वेने कलकत्याला गेलो. कार्यक्रमात  मिश्राना पेपर सादर करायचा होता  यासाठी त्यांनी स्पेशल सूट घातला होता.  माझ्याबरोबर बसून त्यांनी खूप तयारी केली होती. कार्यक्रमावेळी नोट्स घेऊन ते  माझ्या शेजारी बसले होते. सारखे मला काही विचारत होते. आगरवालना जेव्हा ते भाषण देणार हे कळले तेव्हा आयत्यावेळी त्यांना थांबवून त्यांनी मला स्टेजवर जायला सांगितले. ते खट्टू झाले. मला पण त्यांचा विरस झालेला पाहवेना. पण आगरवालांपुढे मला बोलण्याचे धाडस झाले नाही. मुकाट्याने मी उठलो व स्टेजवर गेलो. आमचा विषय नवा असल्याने सर्वांना तो आवडला.   




सुदैवाने मला त्यात पहिले बक्षिस मिळाले व पुढील वर्षी दिल्लीमध्ये पारितोषिक स्वीकारण्यासाठी निमंत्रणही मिळाले. (नंतर अर्थात मिश्रांनाही या संशोधनामुळे दिल्लीच्या वाटरवर्क्समध्ये बढती मिळाली.) त्यादिवशी रात्री एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टीसाठी आम्हाला बोलावले गेले. अशा हॉटेलमध्ये जायची आमची पहिलीच वेळ होती. प्रथम अध्यक्ष डॉ. निलय चौधरी यांनी लाल चोटी पापा तुवा .. हे प्रसिद्ध  बंगाली गाणे हावभावासहित सादर केले. इतरही काही कार्यक्रम होत राहिले. आमच्या पुढे कॉफी आणि बनपाव आले. तेच जेवण समजून आम्ही ते अधाशासारखे खाल्ले. मग बटाटा चिप्स आल्या आम्ही पाहिले की इतर लोक फक्त एखादा तुकडा खात आहेत. ते सेव्हन कोर्सचे जेवण होते. शेवटी जेव्हा मुख्य जेवण आले तेव्हा आमचे पोट आधीच भरले असल्याने खाता आले नाही.

त्यावेळी सांगलीहून कानपूरला जाण्यासाठी दोन वेळा गाडी बदलावी लागे. प्रथम मिरज ते मुंबई, मुंबई ते झाशी आणि झाशी ते कानपूर. त्यापैकी झाशी ते कानपूर मार्ग चंबळच्या खो-यातून जात दरोडेखोरांच्या टोळ्यांमुळे धोकादायक होता.  दोन दिवसांचा हा प्रवास असे. १९७५ मध्ये दिल्लीत होणा-या कार्यक्रमासाठी मी माझ्या आई वडिलांना बोलाविले होते. त्यांचा हा पहिलाच प्रवास होता.  माझा मित्र बरोबर असल्याने त्यांनी यायचे धाडस केले. पम  सर्व काळजी घेऊनही रेल्वेत त्यांची बॅग मागल्या बाजूने फोडून कपडे चोरीस गेले. दिल्लीला मुख्य कार्यक्रमात आगरवाल आणि माझ्या आईवडिलांची ओळख झाली. त्या वेळी आगरवालनी नमस्कार करत माझी स्तुती केल्याने त्यांना धन्य वाटले. केंद्रीय मंत्री करणसिंग यांचे हस्ते बक्षिस स्वीकारताना त्याना पहावयास मिळाले नंतर दिल्ली आग्रा, हरिद्वार, ऋषिकेश, अलाहाबाद, काशी, गया अशी ट्रीपही आम्ही पूर्ण केली. मात्र आगरवाल कामात व्यग्र असल्याने आयआयटीत त्यांची भेट होऊ शकली नाही. नंतर सांगलीतच त्यांची पुन्हा भेट झाली.

आयआयटीतून परतल्यानंतर आगरवाल यांचे मला पोस्ट कार्डवर पत्र येई. त्यांनी कधीही मला फोन केला नाही. ते नेहमी दुस-या वर्गाच्या रेल्वेने प्रवास करीत. कहर म्हणजे रेल्वेच्या टायलेटमध्ये आंघोळही करीत. त्यांना त्याचे काहीच वाटत नसे. सर्वसामान्यांत मिसळून वागताना ते आयआयटीत प्रोफेसर आहेत हे कोणालाही लक्षात यायचे नाही.

सांगलीत येरळा नदीतील वाळूउपसा रोखण्यासाठी डॉ. भारत पाटणकर यांचेबरोबर इपीआरएफमध्ये सेमिनार घेताना ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांचेबरोबर उगार व इतर साखर कारखान्यांना आम्ही भेटी दिल्या होत्या.  अशा भेटीच्या वेळी त्यांची निरीक्षणे आणि मते फार मार्मिक व महत्वाची असायची.

आयआयटी सोडण्यापूर्वी मला त्यांचे पत्र आले. पहिल्यांदाच त्यांनी आपल्या मनातील खंत पत्रात व्यक्त केली. सहकारी प्राध्यापकांनी माझे येथे राहणे अवघड केले आहे असे त्यांनी लिहिले होते. असे अगतिक झालेले पाङून मला फार वाईट वाटले. त्यांनी राजिनामा देऊन दिल्लीस प्रयाण केले. मात्र सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने त्यांना सदस्यसचिवपदासाठी निमंत्रित केल्याने त्यांचे कार्य सुरू राहिले. तेथे प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी कायदा करण्यासाठी आवश्यक आधारभूत ढाचा तयार करण्यात त्यांनी महत्वाचे योगदान दिले. मात्र तेथेही सरकारी लालफितीच्या वेळकाढू कारभाराचा त्याना कंटाळा आला व ते त्यातूनही बाहेर पडले आणि त्यांच्या विद्यार्थ्याने स्थापन केलेल्या एनव्हायरोटेक इन्स्ट्रुमेंटस या कंपनीत डायरेक्टर झाले.


हवाप्रदूषण मोजण्याच्या यंत्रणात त्यांनी  नवे बदल करून परदेशी तोडीची यंत्रणा विकसित केली.

Thursday, October 1, 2020

निष्कलंक चारित्र्याचे असामान्य पर्यावरण तंत्रज्ञ - डॉ. जी. डी. अग्रवाल भाग - १

ऋषीतुल्य जीवन जगलेले माझे गुरू डॉ. जी. डी. अग्रवाल त्यांच्या कडे पीएचडी करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे परमभाग्य समजतो. कारण त्यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव माझ्या पुढील जीवनात कायम मार्गदर्शक ठरला.

लहानपणापासून अत्यंत हुषार व क्रांतीकारक स्वभावाच्या गुरुदास (त्यांचे नाव) यांनी रुरकी आयआयटीमधून बीटेक केले. पंडीत मदनमोहन मालवीय  यांनी १९०५ मध्ये स्थापन केलेल्या गंगा महासभा आर्यसमाजाचे ते  निष्ठावंत अनुयायी  व मुख्य प्रवर्तक होते.

 नंतर अमेरिकेतील बर्कले युनिव्हर्सिटीमधून एमएस आणि पीएचडी केवळ चार वर्षात पूर्ण करून आयआयटी कानपूर येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तरीही  त्यांचा पोशाख कायम पांढरा कुडता व पायजमा असाच असे. ते ब्रह्मचारी होते आणि घरात एकट्यानेच स्वतः स्वयंपाक करून जेवत. 


१९७१ मध्ये आमच्या कॉलेजमध्ये परिक्षेच्या निमित्ताने आले असताना त्यांनी डॉ. सुब्बाराव करीत असलेले आमचे काम तसेच आमची प्रयोगशाळा पाहिली. त्याचवेळी त्यांनी मला पीएचडीसाठी अर्ज करण्यास सांगितले.

पुढे मी आयआयटीचेन्नईला पीएचडी इंटरव्ह्यूसाठी प्रा भालबा केळकर यांचेबरोबर गेलो असताना त्यानीच माझा इंटरव्ह्यू घेतला. त्यावेळी प्रचंड उकाडा असूनही त्यांनी  ते तेथील सेवकाला पंखा लावण्यास मनाई केली. म्हणाले घाम आला की अंग गार होतेच. पंखा आवश्यकच नाही.

मी पीएचडीसाठी आयआयटीमध्ये दाखल झाल्यावर दोनच दिवसात मला त्यांच्या धाडसी व स्पष्टवक्तेपणाचा प्रत्यय आला. आयआयटीचे संचालक डॉ. जगदीशलाल यांनी आम्हा नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना पर्यावरणशास्त्राचे महत्व सांगितले. नंतर आगरवाल उभे राहिले आणि म्हणाले संचालकांनी जे काही सांगितले ते चुकीचे आहे, आम्ही सर्दच झालो. मग त्यांनी पर्यावरणावर आपले विचार मांडले.  

त्यांचे विद्यार्थ्यांबरोबरचे वागणे जुन्या पंतोजीप्रमाणे कडक होते. त्यांची आम्हाला भीती वाटे. त्यांची बुद्धीमत्ता प्रखर होती. हवाप्रदूषण विषय ते भारतातील संदर्भ देऊन अस्खलितपणे शिकवायचे. प्रयोगशाळेत स्वतः प्रयोग करून दाखवायचे. इतर प्राध्यापकांसारखे ते विद्यार्थ्यात अजिबात मिसळत नसत. बाहेरचे पाणी, हवा नमुन्याचे टेस्टींग ते स्वतः करीत.

मी फॅमिलीसह तेथे तीन वर्षे राहिलो तरी ते कधीही माझ्या घरी आले नाहीत. त्यांच्या तत्वात ते बसत नव्हते. इतके तुटक असले तरी आम्हाला त्यांच्याबद्दल अतिशय आदर होता. भीती तर होतीच. त्यामुळे त्यांचेकडे जायचे म्हणजे व्यवस्थित तयारी करून जावे लागे. पूर्वपरवानगी न घेता त्यांच्याकडे केव्हाही गेले तरी चालत असे. पीएचडी झाल्यानंतर मात्र ते  अनेक वेळा आपल्या मावशीला घेऊन सांगलीस येत व आमच्या कुटुंबातील सर्वांशी सलोख्याने वागत. माझ्या मुलाबरोबर क्रिकेट खेळत.

मला पहिल्या वर्षी त्यांच्याकडून कडक शिस्तीचीच वागणूक मिळाली. मी पहिल्यांदा माझे थिसिसबद्दल एक प्रपोजल घेऊन गेलो व त्यात पहिल्याच वाक्यात झालेली खाडाखोड पाहून  की ते संतापले व माझे कागद भिरकावून दिले. विचार न करता लिहितोसच कसे असे मला म्हणाले. मी सॉरी म्हणून घाबरून घरी आलो. मला हे सर्व नवीन होते. सांगलीत कॉलेजवर मला डॉ. सुब्बाराव मित्रासारखा मान देत. येथे मात्र माझी जमदग्नीशी गाठ पडली होती. मी पण मग हट्टाला पेटलो.

त्यांनी पाणी शुद्धीकरणावर पीएचडी केली हे माहीत असल्याने मला त्यांच्याकडून त्या विषयात पीएचडी करायची होती कारण सांगलीत त्याची गरज होती.  दरवेळी मी जलशुद्धीकरणावर प्रपोजल नेई. ते सारखे काही ना काही बदल सुचवायचे.  त्यांची अपेक्षा मी सांगलीतील साखर उद्योगातील सांडपाण्याविषयी संशोधन करावे अशी होती. व मला विषय बदलायला सांगायचे. पण मी माझा हेका कायम ठेवला. शेवटी त्यांनी मला त्यांनी रुरकीला प्रा. एस.व्ही. पटवर्धन यांचेकडे पाठविले. प्रा. पटवर्धन यांनी जलशुद्धीकरणावर बरेच संशोधन केले होते. तेथे जाऊन आल्यावर माझे ड्युएल मिडीया फिल्टरचे प्रपोजल त्यांनी मंजूर केले.

 माझ्याशी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांशी अत्यंत कडक वागत असूनही बाहेरच्या लोकांशी बोलताना तो आमची स्तुती करत हे लक्षात आल्यावर आमचा त्यांच्याविषयाचा आदर अधिकच वाढला. ते कधी संतुष्ट न होता अधिक कामाची अपेक्षा ठेवत. त्यांच्यामुळेच मला सतत कामाची सवय लागली.