Friday, December 18, 2020

थोडसं जुन्या सांगली हायस्कूल विषयी

थोडसं जुन्या सांगली हायस्कूल विषयी .......

कृष्णा नदीच्या काठी एका उंचावटयावरील सहा गल्ली असलेलं गाव म्हणजे सांगली. १८०१ साली मूळ मिरज जहागिरीतून फूटून पहिल्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी वेगळं राज्य बनवलं तेव्हापासून या गावाचा ख या अर्थांनं इतिहास सुरु झाला. शिक्षण हेच आर्थिक, सामाजिक, सांकृतिक विकासाचा पाया असल्याने शिक्षणाचे महत्व ओळखून श्रीमंत धुंडीराज उर्फ तात्यासाहेब पटवर्धन यांच्या काळात सांगली संस्थानात शिक्षणाला सुरवात झाली. १८६४ साली सांगली इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. सांगलीत इ.१८६४ मध्ये सुरु झालेल्या इंग्लिश स्कूललाच नंतर इंग्रजी माध्यमांचे स्वरुप आले असावे. तत्कालीन संस्थानाधिपदी धुंडिराज तात्यासाहेब पटवर्धन यांच्या कारर्किदीत सुरु झालेल्या या पहिल्या इंग्लिश स्कूलमध्ये इ.स. १८७८ पर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी होते. या शाळेच्या इ.स. १८८२ मध्ये झालेल्या पुर्नरचनेनंतर सहाव्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या शंभरावर पोहोचली त्यावेळी ही शाळा राजवाडयातील एका भागात भरत होती. क्रिकेट आणि गायनाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देणारी ही सांगलीतील पहिली शाळा म्हणता येईल. त्या काळात इंग्लिश स्कूल ही एकमेव सरकारी शाळा होती. याच शाळेची पुढे १८८४ साली सांगली हायस्कूल, सांगली या नावाने शाळा सुरु झाली. हणमंतराव भोसले या प्रख्यात क्रीडाशिक्षकामुळे क्रिकेटपटू विजय हजारे, बॅडमिंटन पटू नंदू नाटेकर यांच्यासारखे क्रीडाक्षेत्रातील नामवंत या शाळेला देता आले. ड्रॉईंग, गायन, तालिम, क्रिकेट अशा विषयांसाठी वेगवेगळा शिक्षक नेमण्याची प्रथा एकेकाळी या शाळेत होती. स्वातंत्र्योत्तर काळात शासनाने ही शाळा १ एप्रिल १९५३ साली तंत्रशिक्षण सुरु करण्याच्या अटीवर लठ्ठे एज्युकेशन सोसायटीकडे हस्तांतरीत झाली. शास्त्र शाखेचा उच्च माध्यमिक विभाग १९७५ मध्ये आणि १९८८ मध्ये व्यावसायिक शिक्षण (एम.सी.व्ही.सी.) विभाग सुरु झाला. लठ्ठेतंत्रनिकेतनची सुरवात या शाळेच्या आवारातच झाली. तंत्रशिक्षणासह या शाळेला आधुनिक स्वरुप देण्यात नेमगोंडा दादा पाटील, आमदार कळंत्रेआक्का, अड.केशवराव चौगुले, जी.के. पाटील, टी.के. पाटील, अड एस.एस. पाटील. बापूसाहेब कुंभोजकर आदी मंडळीचा मोठा सहभाग आहे.

वास्तूशिल्प कलेचा उत्कृष्ठ नमुना

सांगली हायस्कूलची भव्य इमारत ब्रिटीश कालीन असुन गोथीक वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. दुसरे चिंतामणराव पटवर्धन यांच्या काळात संस्थानचे प्रशासक कॅप्टन बर्क यांच्या कारकिर्दीत इ.स. १९०७-०८ मध्ये निसर्गसंुदर अशा आमराईच्या सान्निध्यात सांगली हायस्कूल बांधण्यात आले आणि सांगलीच्या ऐतिहासिक वैभवात भर पडली. सांगली हायस्कूलच्या इंग्रजी स् (एल) आकाराच्या इमारतीची रचना ब्रिटीश वास्तुशास्त्रानुसार आहे. क हाडचे मक्तेदार देवी यांच्या वतीने सांगलीतील ज्यून्या पिढीतील बांधकाम व्यावसायिक गोविंददास आणि केशवदास शेडजी या बंधुनी ती बांधली आहे. 


 


जुनी इमारत
इमारतीचे वैशिष्टय म्हणजे बांधकामासाठी अत्यंम चिवट अशा चुन्याचा वापर केलेला आहे. कात, गुळ, यांच्या मिश्रणातुन चुना आणि भाजीव विटांचा चुरा उत्तम दर्जाची चुनखडी यांचा उपयोग बांधकामासाठी केलेला आहे. भार (लोड) विभागणीसाठी कमान पध्दत वापरलेली आहे. चार खोल्यानंतर एक हॉल अशी रचना आहे. उंचवर्गखोल्या, नैसर्गिक वायूविजन, इमारतीच्या दर्शनी बाजुस एकशे दहाफूट उंचीची कमान, त्यावर लखलखता कळस, तर्फेवर चालणारे घडयाळ, पोर्चच्या माथ्यावर जाण्यासाठी दोन्ही बाजुंनी चक्राकार असे ओतीव बिडाचे जिने, इमारतीच्या दर्शनी भागावर ३२ पाकळयांचे कमळ, सिंहाची प्रतिकृती, व्हिक्टोरिया क्रॉस, नाजूक नक्षीकाम अशी वैशिष्टये. इमारतीसाठी संपुर्ण सागवानी लाकूड वापरलेले आहे. त्यावेळी नाईक यांनी ते लाकूड काम केले होते. या काळात गायन हॉल, व्यायामशाळा आणि क्रिकेटचे सुसज्य मैदान अशी खास सोय करण्यात आली होती.या इमारतीने नुकतीच आपली शताब्दी साजरी केली आहे. या शंभर वर्षात असंख्य राजकारणी, समाजकारणी, उद्योजक, साहित्यिक, नामवंत खेळाडू, तंत्रज्ञ असे कीर्तीमान, बुध्दीमान विद्यार्थी घडवले आहेत.

इमारतीचे नुतनीकरण



नवीन इमारत
 
 

 

नवीन इमारतमधील जिना
 


व्हिक्टोरिया राणीचे शिल्प
 

 
लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची सांगली हायस्कूल सांगली ही एक नामवंत शाखा. दक्षिण महाराष्ट्रात ज्या काही भव्य व देखण्या इमारती आहेत त्यापैकी ही एक  ऐतिहासिक इमारत आहे. सन २००७ या वर्षी या ऐतिहासिक इमारतीला १०० वर्षे पुर्ण झाली आहेत. नैसर्गीक घटकांच्या परिणामामुळे ही इमारत जीर्ण झाली होती. तिला नुतनीकरणाची गरज आहे. आपल्या सारख्याच येथून पुढे येणा या विद्यार्थ्यांची निरंतर सेवा करता यावी म्हणून लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. सुरेश पाटील (माजी महापौर) आणि संस्थेच्या सर्व पदाधिका यांनी या सुंदर आणि दुर्मिळ वास्तूच्या नुतनीकरणाचा निर्धार करुन ते पुर्णत्वास नेले.

१०० वर्षांचा साक्षीदार - ज्ञानवृक्ष



चिंचेचे झाड
सांगली हायस्कुल, सांगलीचे वैशिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना मायेची सावली देणारे, मित्रत्व फुलवणारे, चिंतनशीलता वाढविणारे आणि मागे वळून पहायला लावणारे हे चिंचेचे झाड. एखाद्या वृक्षाचे कमाल वय किती असते याचा विचार करायला लावणारा हा चिंचवृक्ष गेल्या १०० वर्षांत असंख्य विद्यार्थ्यांनी चिंचेसाठी, लपण्यासाठी, विद्यार्थ्यांनी त्याच्या खोडया काढल्या असल्या तरी जाणा या खोडसळ, प्रेमळ माजी विद्यार्थ्यांच्या स्मृती जपत आजही तो उंच आकाशी झेपावत सतत वाढत्या संख्येने येणा या विद्यार्थ्यांसाठी आपले पंख पसरतो आहे. प्रसिध्द थोर साहित्यिक वि.स.खांडेकर तसेच भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे यांच्या स्मृती या वृक्षाच्या छायेत लपलेल्या आहेत. या वृक्षाच्या छायेत वि.स. खांडेकर यांची हुशार विद्यार्थी आणि साहित्यिक म्हणून जडणघडण झाली असावी. ललित लेखनाला पोषक अशी सौंदर्यदृष्टी, चिंतनशीलता, निसर्गप्रेम त्यांना या परिसरातच मिळाले असावे. कारण २२ डिसेंबर १९१३ रोजी वि.स. खांडेकर सांगली हायस्कूलमधून मॅट्रीक पास होऊन मुंबई विश्वविद्यालयात त्यांचा आठवा नंबर आला होता. तेव्हाचे संस्कृत शिक्षक श्रीपादशास्त्री देवधर आणि मराठी शिक्षक शंकरशास्त्री केळकर यांच्या रसाळ वाणीने खांडेकरांना मराठी आणि संस्कृत वाचनाची गोडी लागली त्यांच्यातला लेखक फुलत गेला.

एक प्रेरणा - हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे

सांगली हायस्कूल म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रच होते. जेष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या जेल फोडो मोहिमेत हुतात्मा झालेले आण्णासाहेब पत्रावळे या शाळेचेच विद्यार्थी होते.

हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे

 
आण्णासाहेब पत्रावळे म्हणजे देशभक्तीचा धगधगता निखाराच होता. 'जेल फोडो' च्या आधीही ते एकदा तुरुंगात जाऊन आले होते. त्यामुळे त्यांची लढाऊ वृत्ती आणखी वाढली होती. 'तुरुंगातून सुटलास बुवा' असे त्यांचे मित्र त्यांना म्हणाले. त्यावर 'मी पुन्हा तुरुंगात जाईन आईएवढीच भारतमाता मोठी आहे. तिच्या मुक्तीसाठी मी मरणार आहे.' असे उत्तर पत्राावळे यांनी दिले होते.ड्रॉईंग हॉललगतच्या वर्गात ते शिकले जेल फोडो मोहिमेत ते हुतात्मा झाले ही बातमी सांगली हायस्कूल मध्ये पोहोचताच विद्यार्थ्यांमध्ये ब्रिटिशांबद्दल संतापाची लाट उसळलेली होती.

सांगली हायस्कूल भूषण - माजी विद्यार्थी

प्रख्यात ज्ञानपीठ परितोषिक विजेते थोर साहित्यिक वि.स.खांडेकर, कविवर्य यशवंत, उदयोगपती आबासाहेब गरवारे, स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, साहित्यिक श्रीनिवास शिंदगी स्व.आण्णासाहेब लठ्ठे गुरुनाथ गोंविद तोरो, शीघ्र कवी गोपाळ गोविंद मुजुमदार उर्फ साधुदास, शास्त्रीय संगीताचे गाढे संगीतज्ञ प्रा.ग.ह.रानडे, केशवसुत संप्रदायाचे अध्वर्यु धोंडो वासुदेव गद्रे तथा कवि काव्यविहारी अशी या शाळेची माजी विद्यार्थ्यांची परंपरा आहे.

परदास्याची बेडी होती पायी तव जेधवा
पुत्रं शहाणे तुझे दंगले संसारी तेधवा
काही वेडी तयाची भडकुनी गेली मने
क्रांती पूजा केली त्यांनी रुधिराच्या तर्पणे

राष्ट्रयोगिनी माजी आमदार कळंत्रेआक्का, स्वातंत्र्य आंदोलनात प्राणाची आहुती देणारे हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे, देशरक्षणांर्थ देशाच्या सदहद्दीवर कर्तव्य बजावताना वीरमरण पावलेल्या हुतात्मा स्कॉड्न लिडर अनिल घाडगे, कवी गिरीश, प्रसिध्द कायदेतज्ञ केशवरावजी चौगुले, स्वातंत्र्य सैनिक स्व. आण्णासाहेब पाटील सिंहगड एज्यु. संस्थेचे संस्थापक प्राचार्य श्री.एम.एन. नवले तसेच मुंबईचे प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ. महेंद्र परीख, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, प्रसिध्द ग्रंथीतज्ञ डॉ. वसंतराव खाडीलकर मा.खाजदार प्रकाश बापू पाटील, माजी आमदार प्रा.शरद पाटील आंतराष्ट्रीय क्रिकेटपटू विजय हजारे, प्रसिध्द बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, कबड्डीपटू शंकर गावडे, अर्जुन पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू राजू भावसार, वेटलिफ्टींग चॅम्पियन अनिल पाटील, राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू आसिफ मुल्ला यांच्या सारखे किर्तीमान माजी विद्यार्थी याचा हायस्कूलचे विद्यार्थी आहेत.

सांगली हायस्कूलला नामवंत मुख्याध्यापक/शिक्षकांची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांचे सहाध्यायी असलेले हरी गणेश करमरकर या शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते नाटयाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, राजकवी साधुदास, चित्रकार देवल, पाटीलशास्त्री, श्रीपादशास्त्री देवधर, शंकरशास्त्री केळकर, मुदगलकर असे नामवंत शिक्षक या संस्थेला जुन्या काळात लाभले. तालीम मास्तर लिमये यांनी मुलांकडून व्यायाम आणि गायन मास्तर गोडबोले यांनी संगीताची तालिम करुन घेतली. प्रख्यात क्रीडाशिक्षक हणमंतराव भोसले यांच्या तालमीतच विजय हजारे सारखे क्रिकेटपटु येथे तयार झाले.

Thursday, December 17, 2020

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे अलौकिक कार्य

 महाराष्ट्रातील ग्रामीण भागात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा कॉलेजचे जाळे विणून सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना श्रमाधारित शिक्षण देण्याचे अलोकिक कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले.


बालपणी  ( १९४३ ते १९६१) सातारला त्यांच्या घराशेजारी रहात असल्याने आणि शिवाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यामुळे मला त्यांच्या कार्याची जवळून माहिती आहे.

सातारला सोमवार पेठेत पंचपाळ्या हौदाजवळच्या फणसळकरांच्या कॉलनीत आम्ही रहात होतो. रोज सकाळी आणि संध्याकाळी पांढ-या शुभ्र दाढी असणारे भारदस्त भाऊराव हातात सोटासदृश काठी घेऊन जातायेताना दृष्टीस पडत व त्यांचेबद्दल आदरयुक्त भीती वाटे.


इयत्ता चोथीत असताना धनिणीच्या बागेत एका कार्यक्रमात मी झंप्याचे लग्न ही विनोदी नाट्यछटा त्यांच्या समोर सादर केली होती. तो प्रसंग अजूनही माझ्या मनात ताजा आहे. तसा माझा पेहरावही त्यावेळी झंप्यासारखाच बावळट होता.
 
मी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होतो आणि नरेंद्र दाभोळकर माझ्याच वर्गात पण दुस-या तुकडीत होता. कबड्डी खेळण्यात तो नावाजलेला होता. मला खेळता येत नसले तरी  शिवाजी उदय मंडळात त्याचे कबड्डीचे सामने पहायला मित्रांबरोबर मी जात असे. तेथे भाऊरावही येत आणि मार्गदर्शन करीत.   प्रतिस्पर्धी खेळाडूच्या अंगावरून उंच उडी मारून तो खेळाडूंना बाद करीत असे.  भाऊरावांचा नरेंद्रवर फार लोभ होता. त्याचे वडील कॉलेजमध्ये प्राध्यापक होते.

दहावी झाल्यानंतर शिवाजी कॉलेजमध्ये अकरावी आणि प्रीडिग्री शिकताना प्राचार्य पी. जी. पाटील, अकिवाटे व नसिराबादकर  यांचेकडून भाऊरावांच्या कार्याविषयी बरीच माहिती कळत असे. ते भाषणांतून ब्राह्मण समाजाच्या दोषांवर कडाडून टीका करायचे त्यामुळे  घरात आणि आमच्या नातेवाईकांमध्ये भाऊरावांबद्दल चांगले मत नव्हते. एकदा त्यांनी ब्राह्मणांच्या बायका मराठ्यांच्या घरी भांडी घासायला आल्या पाहिजेत असे सांगितले तेव्हा सातारच्या ब्राम्हण वर्गात संतापाची लाट उसळली. मलाही त्यावेळी त्यांचे भाषण प्रक्षोभक वाटले होते. आता मात्र त्यांचे विचार पटतात ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वाच्या अहंभावनेमुळे अजूनही दुसर्या घरी भांडी घासण्याचे काम आम्हा ब्राह्मणांना कमीपणाचे वाटते.

१९६० साली भाऊरावांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शिवाजी कॉलेजमध्ये मोठी सभा होणार होती. त्यावेळी आपण भाऊरावांच्या कार्याबद्दल भाषण करायचे असे मी आणि माझा जिवलग मित्र कै. भालचंद्र करंदीकर  याने ठरविले होते. प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाल्यावर प्राचार्यानी विद्यार्थ्यांपैकी कोणाला बोलायचे आहे का अशी विचारणा केली. मोठ्या भरगच्च हॉलमध्ये मी आणि भालू आम्ही दोघांनीच हात वर केले. आमची भाषणे झाल्यावर प्राचार्य पी. जी. पाटील यांनी ब्राह्मण असूनही आम्ही भाषण केल्याबद्दल आमचे कौतुक केले तर इतर सर्वांना याची जाणीव करून दिली.

बारावीत दुस-या सत्रातच वडिलांची बदली झाल्याने आम्ही सांगलीस आलो आणि मी विलिंग्डनमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी धनिणीच्या बागेत व कॉलेजात सुटीच्या वेळी बागकाम व इतर कामे करीत असणारे माझे मित्र पाहून मला त्यांचा हेवा वाटे मात्र स्वतः घरातही श्रमाचे काम करणे नको वाटे.    शिवाजी कॉलेजमधील त्यावेळी झालेले संस्कार पुढे नोकरीस लागल्यावर मात्र मला उपयोगी पडले आणि सतत काम करण्याची तसेच श्रम करणा-या सर्वांना मान देण्याची सवय लागली.

मध्यंतरी पुण्यात अनंतराव पवार कॉलेजवर गेलो असताना रयत शिक्षण संस्थेच्या आधुनिक इमारती व प्राध्यापक वर्ग यांची ओळख झाली. त्यांच्याबरोबर काम करावयास मिळणार म्हणून आनंदही झाला. मात्र काही कारणाने ते शक्य झाले नाही.

गेल्या महिन्यात इंटरनेटवर जुन्या पुस्तकांच्या शोधात असताना मला भाऊराव पाटील यांच्यावर महाराष्ठ्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेले १९८९ सालचे पुस्तक सापडले.

ते वाचल्यावर माझ्या बालपणीच्या सर्व स्मृती जाग्या झाल्या आणि भाऊरावांचे कष्टमय जीवन, त्यांनी केलेला संघर्ष आणि ग्रामीण भागातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी श्रमाधारित शिक्षणाची योजना यांची माहिती झाली. माझे त्यांच्याबद्दल असणारे आकस आणि गैरसमज गळून पडले आणि नकळत का होईना ज्ञानदीप फौंडेशनसाठी त्यांच्याच कल्पनेनुसार योजला आखल्याचे मानसिक समाधान वाटले. लेखकाने इतक्या सविस्तरपणे प्रसंगांचे वर्णन केले आहे आणि पाश्चात्य विद्वानांच्या विचारासह त्यांच्या कार्याचे महत्व पटवून दिले आहे की मला ते अतिशय मौलिक वाटले. सरकारीकरण झाल्याने पूर्वीच्या शैक्षणिक ध्येयवादी कार्याचा लोकांना विसर पडल्याचे त्यांनी व्यक्त केलेले शल्यही मनाला भावले.

मायमराठी वेबसाईटवर जुन्या पुस्तकांतील परिचय दर्शक काही पाने प्रसिद्ध करण्याच्या पद्धतीत मी बदल केला आणि भाऊरावांचे संपूर्ण चरित्र प्रसिद्ध करण्याचे व ते रयत शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे नवे कार्य मनाशी निश्चित केले.

पुढे हे चरित्र इंग्रजीत भाषांतरित करण्याचाही विचार आहे. मायमराठी वेबसाईटवर ही माहिती असणे हा एक गौरवाचा आणि अभिमानाचा विषय असून ज्ञानदीपसाठी तो सदैव प्रेरणादायी ठरेल असा मला विश्वास वाटतो. कै. भाऊरावांच्या शिक्षण क्षेत्रातील लोकोत्तर कार्यास माझे अभिवादन.
डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Friday, December 11, 2020

विज्ञानवादी सावरकर



सांगलीत २५ ऑगस्ट २०१३ रोजी निवृत्त अभियंता मंडळाच्या सांगली, कोल्हापूर व सातारा या संघटनांचे संयुक्त संमेलन झाले. त्यात एड्व्होकेट बाळासाहेब देशपांडे यांचे सावरकरांच्या कविता या विषयावर व्याख्यान ठेवले होते. त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविण्याची मला संधी मिळाली. सावरकरांविषयी मला हिंदु धर्माचे पुरस्कर्ते व स्वातंत्र्यासाठी आपल्या जिवाची वा कुटुंबाची तमा न बाळगता संघर्ष करणारे नेते यापलिकडे फारशी माहिती नव्हती.

बाळासाहेब देशपांडे यांनी सावरकरांच्या  काव्यरचनेचा प्रवास सांगताना त्यांचा सारा जीवनपटच उलगडून दाखविला व त्यांच्या  अलौकिक काव्यप्रतिभेचा प्रत्यय सर्व श्रोत्यांपर्यंत पोचविला. माझ्या भाषणात मी असे सुचविले की सावरकरांच्या या पैलूबरोबर त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन व धर्मसुधारणाविषयक कार्याचीही माहिती लोकांपर्यंत पोचण्याची आवश्यकता आहे. कारण सावरकरांना अभिप्रेत असणारा हिंदू धर्म, सध्याच्या  जनमानसात हिंदू धर्माविषयी असणार्‍या कल्पनेहून फार भिन्न व उच्च दर्जाचा होता.

प्रस्तुत भाषणामुळे सावरकरांच्या सर्व कविता वाचण्याची मला हुरहुर लागली होती. इंटरनेटवर शोध घेताना बुकगंगा या संकेतस्थळावर सावरकरांच्या कविता हे पुस्तक मोफत वाचायला उपलब्ध आहे हेपाहून मला आनंद झाला हे पुस्तक डाऊनलोड करतानाच अंधश्रद्धा निर्मूलन भाग १ व भाग २ ही पुस्तके संकेतस्थळावर दिसली. डॉ. नरेंद्र दाभॊळकरांचा विषय ताजा असल्याने मी ती लगेच डाऊनलोड केली. मात्र ही पुस्तके सावरकरांनी लिहिली आहेत हे मला माहीत नव्हते. या कथा वाचल्यावर सावरकर यांच्या अंधश्रद्धांवर त्यांनी किती कठोर टीका केली आहे हे लक्षात आले. अधिक माहिती मिळण्यासाठी विज्ञान व सावरकर हे शब्द टाकून इंटरनेटवर शोध घेतला तेव्हा विकिपिडियामध्ये सावरकरांच्या  सावरकरांचा  वैज्ञानिक दृष्टीकोन आणि हिंदु धर्मातील  चुकीच्या रूढी व जातीधर्मातील विषमता यांच्या विरुद्धही त्यानी कसे उघडपणे बंड पुकारले होते याची माहिती मिळाली. त्यात असणारी काही  माहिती खाली देत आहे.

अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६) . हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली.आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. स्वकीयातील जातीयतेवरपण निर्भीड टिका केली.

त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले.

जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.

सावरकरांनी चालवलेल्या जात्युच्छेदन चळवळीने अस्वस्थ झालेल्या ब्राह्मणांनी लोणी येथे झालेल्या सनातनी परिषदेत सावरकरांना 'धर्मद्रोही' ठरवून 'त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते' असा ठराव मांडला. सावरकरांनी त्यावर 'शिवशाहीत अथवा, पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत आमच्यासारख्या हिंदू संघटकांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव अधिक होता' असे सडेतोड उत्तर दिले.

पूजा, पाठ, गौरी, गणपती, सोयरसुतक, संक्रांत, दिवाळी, दसरा, द्वादशी या धार्मिक कार्यक्रमांना भटांना बोलावणे बंद करून 'भटशाही' संपवावी असे मत मांडले.त्यासोबतच काशीतील ब्राह्मण महासंमेलनाची तुलना त्यांनी माकडांशी केली. त्यात 'काशीत दोन महासंमेलने भरली - एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन. माकडे परिवर्तनीय तरी आहेत. पण सनातनी तर काळ, वेळ, परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत. अशा वागण्यामुळे निदान काशीच्या भाकड महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून तेथील माकडेच त्या पंडितांची विकसित श्रेणी आहे हे म्हणणे क्रमप्राप्त आहे' असे लिहित त्यांची विकेट घेतली.

वरील सर्व माहिती वाचल्यावर ही माहिती सध्याच्या हिंदू संघटना लोकांपर्यंत का नेत नाहीत असा मला प्रश्न पडला आहे.जर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनकार्याची खरी माहिती समाजातील खालच्या थरातील सर्व लोकांपर्यंत पोचली तर हिंदुत्वाचा व्यापक दृष्टीकोन समजून जातीपातींचे राजकारण करणा-या व चिनी समाजवादाची भलावण करणा-या पक्षांपेक्षा भारत देशावर व त्यातील सर्व समाजाला  हिंदू मानणा-या पक्षालाच जनता आपलेसे करील.

भारतातील लोकशाही अबाधित राखून आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता

-
शत्रूशी समोरासमोर लढण्यापेक्षा त्याच्या गोटात शिरून त्याला नामोहरम करणे सोपे असते. देश आणि धर्म या दोन्ही आघाड्यांवर एकाचवेळी लढण्याऐवजी देशासाठी दादाभाई नवरोजींनी धर्म बदलला. व्यापार हे त्यांचे शक्तीस्थळ आहे हेओळखून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्वदेशी असोसिएशन काढली आणि इंग्लंडमध्ये जाऊन स्वदेशी उद्योग आणि व्यापार वाढविणे कंपनीच्या आणि ब्रिटिशांच्या कसे फायद्याचे आहे हे त्यांना पटवून दिले. येथील संस्थानांचे प्रश्न सोडविले त्यांना उद्योगवाढीस प्रवृत्त केले आणि स्वदेशी उद्योगाचे जाळे निर्माण करून आर्थिक स्वावलंबनाद्वारे अप्रत्यक्षपणे येथील धर्मांचे रक्षण केले. चीन, रशियाच्या डाव्या विचारसरणीसही लगाम घातला. 


टिळक, आगरकर यांनी इंग्रजी शिक्षणाच्या शाळा आणि कॉलेजेस सुरू करून त्यांना इंग्रज अधिका-यांची नावे दिली. पण उद्देश हा स्वकियांना व स्वधर्माला सशक्त आणि राजकीय दृष्ट्या जागृत करण्याचा होता.


होमरूल लीग द्वारे हिंदू- मुस्लीम एकी करून  कॉंग्रेसची स्थापना केली आणि  मर्यादित स्वदेशी स्वायत्ततेची मागणी केली.  महात्मा गांधींनी सुरू केलेल्या असहकार आणि स्वातंत्र्यलढ्यास या पार्श्वभूमीचा फार उयोग झाला.


सध्याच्या काळातही साम्यवादाचे आणि भांडवलशाहीचे जागतिक आव्हान स्वीकारून आपला भारत आत्मनिर्भर व येथील लोकशाही सुदृढ करण्याचे कठीण काम शासनाला करावे लागणार आहे  गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित, धार्मिक- निधर्मी सर्वांना बरोबर घेऊन हे आपल्याला साध्य करायचे आहे. यासाठी सर्व जनतेची त्यास सक्रीय साथ मिळण्याची आवश्यकता आहे. 


ज्ञानदीप फौंडेशनने आपल्या सर्व कार्याचे हेच उद्दीष्ट ठेवले आहे. - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

पुढे धावताना मागे पडलेल्यांचा विचार करा


आपण आतापर्यंत वर पाहून चढण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र मागे वळून पाहिल्याशिवाय आणि पायाखाली काय तुडविले यात आहे हे पाहिल्याशिवाय आपली प्रगती स्थायी व धोकारहित होणार नाही. विज्ञानाची प्रगती, धर्मांतर किंवा कम्युनिझम क्रांती हे आपण आपल्या धर्मावर आक्रमण समजून त्याला विरोध केला. पण कारणांच्या मुळाशी जाऊन उपाय केले नाहीत. 

दलित व गरीब यांच्या सांपत्तिक हिताची काळजी घेऊन जर आपण पुढील वाटचाल केली तर आपल्या प्रगतीचा वेग मंदावेल पण तो अधिक स्थायी आणि सर्व समाजाला एकत्र बांधणारा ठरेल. या साठी शहरातील झोपडपट्टीत राहणारे व ग्रामीण भागात शेती व छोट्या धंद्यांवर आपला चरितार्थ चालविणारे यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्व राजकीय व सामाजिक संस्थांनी प्रयत्न केले पाहिजेत. 

आपल्या नवसंशोधनाची दिशाही पाश्चात्य आधुनिक कल्पनांपेक्षा भारतीय व श्रम आणि कौशल्यावर आधारित छोट्या उद्योग व व्यवसायांच्या आधुनिकाकरणासाठी असावी  तेथे आर्थिक गुंतवणूक कशी वाढेल. परदेशस्थ भारतीयांचे यासाठी योगदान कशाप्रकारे घेता येईल याचाही साकल्याने विचार व्हवयास हवा. निसर्ग संतुलनाच्या कार्यापेक्षाही समाज समरसतेचे आव्हाल आज आपल्यापुढे आहे आणि त्यासाठी शासनाच्या कार्यात आपण  सक्रीय सहभागी होणे जरूर आहे.  असे मला वाटते.- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Sunday, December 6, 2020

ज्ञानोदय (इ. स. १८४२ ते १९४१ ) लेखनसारसूची -प्रस्तावना

“ज्ञानोदय ' हे नियतकालिक शंभर वर्षांहून अधिक काळ चालू आहे. याचे जुने अंक अभ्यासकांना सर्वच ठिकाणी सहज उपलब्ध होण्यासारखे नाहीत. मूळ अंक आता इतक्या जीर्ण अवस्थेत आहेत को, ते हाताळणे म्हणजे ते पुढीळ संदर्भासाठी योग्य त्या अवस्थेत न ठेवणे, असा प्रकार आहे. म्हणून त्यांचे जतन वस्तुसंग्रहालयासारख्या पद्धतीनेच (म्युझियममध्ये) करता येणे शक्‍य आहे आणि आवश्यकही आहे. इतवया दीर्घकाळातील अंकांची छपाई करणे हे बरेच अवाढव्य काम आणि असे एखाद्याच ठिकाणी राष्ट्रीय प्रकल्पात उपलब्ष करणे शक्य आहे.

ही परिस्थिति लक्षात घेऊन या अंकांची शभर वर्षांची 'लेखनसारसूची' तयार करून प्रकाशित करण्याची कल्पना डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांच्या सूचनेद्वारा प्रथम नजरेसमोर आली. त्या अनुरोधाने डॉ. हिवाळे एज्यकेशन सोसायटी व अहमदनगर कॉलेज येथील अधिकारीवर्गाशी आणि अहमदनगर कॉलेजमधील मराठोवे प्राध्यापक व विभागप्रमुख, डॉ. गंगाधर मोरजे यांच्याशी विचारविनिमय करण्यात आला. महाराष्ट्र राज्य आणि संस्कृती मंडळाचे त्यावेळचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. या सर्व विचारविनिभयातून व चर्चेतून 'लेखनसारसूची'चा आराखडा
तयार होऊ लागला. इ. स. १८४२ ते १९४१ या कालावघीतील अंकांमधील सर्व लेख-कविता-इत्यादी साहित्याची ही सार-सूची सहा खंडांत तयार करण्याची योजना नक्‍की करून हा प्रकल्प संघटित केला. मदतीसाठी तो महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळापुढे ठेवला. सं प्रकारच्या सहकार्याची आणि उवंरित मदतीचो जवाबदारी डॉ. हिवाळे एज्युकेशन सोसायटी, अहमदनगर कॉलेज, यांनी स्वीकारली. साहित्य आणि संस्कृती मंडळानेही हा भार उचलण्यास आम्हांस मदत करून आश्वासित केले.

"ज्ञानोदय या नियतकालिकाचे महत्त्व ते शंभर वर्षांहून अधिक काळ चालले आहे, ख्रिस्ती मराठी मंडळींनी ते चालविले आहे, इतकेच नाही.ख्रिस्ती मराठो संस्कृतीचे ते प्रतीक तर आहेच, पण त्याशिवायही महाराष्ट्रातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, वाइमयीन, इत्यादी अनेक जीवनांगांमधील स्थित्यंतरे, विचारमंथने, वस्तुस्थिती, यांचे दप्तर म्हणूनही ते महत्त्वाचे आहे. या विषयांतील अभ्यासकाला व जिज्ञासूलाही या नियतकालिकातील हे लेखन अवकोकनार्थ आणि चिकित्सेसाठी मिळाले नाही, त्याचा उपयोग करून घेता आला नाही, तर त्याच्या अभ्यासात व ज्ञानात बरीच मोठी
उणीव राहिल्यासारखे होईल. म्हणून ही उणीव दूर करण्याचा प्रयत्न या लेखनसारसूचीद्वारे केला आहे. या सूचीमध्ये केवळ सारकथन केलेले नाही, तर मुळांतील शैली व भाषा यांची जाणोवही वाचकाला होऊ शकेल, अशा धोरणाने संशोधन-संपादन केलेले आहे.

मराठीतील कोणत्याही नियतकालिकाची अशी सारसूची केली गेलेली नाही. या दृष्टीने ही अशी पहिलीच सूची आहे. इतकेच नव्हे, तर कोणत्याही विषयाची जशी सारसूची मराठीत अजून तयार झालेली नाही. प्रस्तुत सूचीने आरंभ करून दिला आहे आणि धडा घालून दिला आहे, ही वस्तुस्थिती नमूद करण्यात आत्मस्तुती नाही. हा पहिलाच आणि अलौकीक असा प्रकल्प आहे. त्यामुळे तो चुकतमाकत झालेला असणे शक्‍य आहे. प्रयोग करीत आणि अनुभव घेत यातील उणीवा दूर होतील. इतर काही विषयांत असे प्रयत्न मुरू झाले की, या प्रकारच्या सूचीचे प्रारंभिक प्रवर्तनाचे कार्य
म्हणून “ज्ञानोदया'च्या या सूचीकडें बघावे लागेल. अशा प्रकारच्या कार्याचे “द्तोउवाच करण्याची संधी आलोचना प्रस्थानला डॉ. हिवाळे एज्युकेशन सोसायटी-अहमदनगर कॉलेज आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या बहुमोल साहाय्याने मिळाली आहे.

सारसूचीमध्ये प्रत्येक अंकातील मजकुराचे क्रमवार आणि कालानुक्रमाने सारकथन केलेले आहे. त्यांचे संदर्भही नमूद आहेत. विषयवार सूचीचीही जोड दिलेली आहे. उपयुक्तता, संदर्भ सहजतेने सापडणे आणि पद्धतशीर मांडणी, यांच्याकडे लक्ष देऊन सारसूचीची रचना केलेलो आहे. हे काम निव्वळ संकलनाचे जाही. शास्त्रीय संशोधनपद्धती नजरेसमोर ठेवून, सार करताना मुळातील विचार, अनुभव, , मांडणी, इत्यादींना धक्का लागणार नाही, काळजी घेत, भस्थासनोती पाळीत सारसूचीतील लेखन व त्याची मांडणी केलेली आहे. अभ्यासकांची सोय जाणि एका मराठी सांस्कृतिक ठेव्याचे मुळाशी संवादी राहून जतन, या दृष्टींनी वा सारसूचीची पूर्तता करण्यासाठी अवश्य ते संयोजन केलेले आहे. असे हे काम
करण्यांत सहभागी होण्याची संधी आलोचना प्रस्थानला मिळाली, याबद्दल संबंधित सर्वांचेच मनःपूर्वक आभार.

Monday, November 30, 2020

लोकहितवादी यांचे विचार

इंग्रजी सत्तेपासून आपल्या देशाला काही महत्त्वाचे लाभ आहेत, ह्याची स्पष्ट कल्पना जशी लोकहितवादींना होती, तशीच इंग्रजांच्या शोषक अर्थनीतीचीही होती. ज्यांना मूर्ख आणि टोणपे म्हणता येईल, असे इंग्रज अधिकारीही येथे हजारो रुपये पगार घेतात तसेच इंग्रजांच्या राज्यात ह्या देशातली संपत्ती देशाबाहेर जाते आणि ह्या देशाला दारिद्र्य येते, असे लोकहितवादींनी म्हटले आहे. ह्या देशावर मुसलमानांनीही राज्य केले परंतु मुस्लिम राज्यकर्त्यांनी कमावलेली संपत्ती ह्या देशाबाहेर गेली नाही कारण मुसलमान आले, ते इकडेच राहिले त्यांचा ‘परकी भाव’ गेला, असा एक महत्त्वाचा भेद इंग्रज आणि मुस्लिम राज्यकर्त्यांमध्ये लोकहितवादींनी दाखवून दिला.

इंग्रज राज्यकर्ते हिंदूस्थानातील लोकांना मोठी अधिकारपदे देत नाहीत, अशी तक्रार होती. मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकराण्याची पात्रता येथील लोकांत आली, की इंग्रज सरकार ह्या धोरणात निश्चितपणे बदल करील, अशी आशा लोकहितवादींना वाटत होती पण पुढे त्यांची ही धारणा बदलली. इंग्रजांच्या राज्याचा एक गंभीर दोष म्हणून ते त्या धोरणाकडे पाहू लागले. विद्यापीठांची स्थापना होऊन त्यांतून उच्चविद्याविभूषित तरूण बाहेर पडू लागल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली. तिच्या संदर्भात ह्या धोरणाचा विचार ते करीत असावेत. पण नुसत्या नोकऱ्यांच्याच मागे न लागता, आपल्या लोकांनी व्यापार-उद्योगातही मनःपूर्वक लक्ष घातले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. आळशीपणामुळे देश भिकारी झाला, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा एक भाग म्हणून येथे स्वदेशीची चळवळ झाली परदेशी मालावर बहिष्कार घालण्यात आला. परंतु स्वदेशीचा विचार लोकहितवादींनी त्यांच्या ‘शतपत्रां’त कितीतरी आधी मांडून ठेवलेला आढळतो. ‘… आपले लोक कापडे जाडी, वाईट करतात परंतु तीच नेसावी. इकडे छत्र्या करितात, त्याच घ्याव्या म्हणजे ह्या लोकांत व्यापार राहून इकडे सुख होईल परंतु हे लोक असे करीत नाहीत आणि थोडी किंमत म्हणून लोकांचा जिन्नस विकत घेतात’, असे त्यांनी म्हटले आहे. विलायतेत प्रचंड शक्तीची वाफेची एंजिने असल्यामुळे अत्यंत कमी खर्चात फार मोठ्या प्रमाणावर सूत आणि कापड निर्माण होते. इंग्लंडच्या ह्या यंत्रसामर्थ्याने आपल्यावर खरे आक्रमण केलेले आहे आणि आपण भिकारी होऊन लुटले गेलो आहोत शिकंदर, गझनीचा महमूद, तैमूरलंग आणि नादिरशही ह्यांची चढाई त्या मानाने काहीच नव्हे ह्या चढाईमुळे सर्व हिंदुस्थानची मजुरी विलायतेस गेल्यासारखी आहे, हे त्यांचे अचूक निरीक्षण होते.

एक जित, पराभूत समाजाच्या दारूण पराजयाची अत्यंत कठोर, चिकित्सक समीक्षा करण्यासाठी लोकहितवादी उभे ठाकले होते. आपल्याला गुलाम करून टाकणाऱ्या ह्या सत्तांतरामागे राजकीय कारणांबरोबरच आपल्या एकूण मनोवृत्तीतील काही आत्मघातक दोष, तसेच गंभीर सांस्कृतिक न्यूनेही आहेत, हे त्यांना स्पष्ट दिसत होते. इतिहासाचे भान ठेवून त्यांची चर्चा -चिकित्सा झाली, आत्मपरीक्षण झाले, तरच आपल्या प्रबोधनाचा आणि विकासाचा मार्ग खुला होईल, असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळेच ह्या पराभवाचा विचार केवळ राजकीय अंगाने न करता विद्या, धर्म, समाजकारण, अर्थकारण अशा विविध अंगांनी त्यांनी तो केला.

िद्या हा समाजपरिवर्तनाचा मूलाधार आहे, अशी लोकहितवादींची धारणा होती. तथापि येथे विद्येचे क्षेत्र मर्यादित ठेवले गेल्यामुळे विद्याप्रसार होऊ शकला नाही. विद्या वाढविलीही गेली नाही. ‘विद्या म्हणजे केवळ धर्माचे ज्ञान’ असा विद्येचा अर्थही काळाच्या ओघात संकुचित झाला. ही विद्याही ग्रंथार्थ समजून न घेता केवळ पाठांतराच्या आधारे रक्षिली गेली. ह्यामुळे धर्मविषयीचे अज्ञान आणि कर्मकांडांचे स्तोम अतोनात वाढले. प्राचीन ग्रंथांचे लेखक देव किंवा ऋषी होते, असा समज दृढ करण्यात आल्यामुळे नव्या ग्रंथरचनेला उत्तेजन मिळणे अवघड होऊन बसले. विद्येच्या क्षेत्रात साचलेपणा आला. ज्ञानसंपादनाच्या मार्गात इतरही काही अडचणी निर्माण करण्यात आल्या होत्या. परदेशगमन निषिद्ध मानल्यामुळे भूगोलाबद्दल व जगातील विविध स्थळांबद्दल अज्ञान निर्माण झाले. काळाची जाणीव ठेवून परंपरेची चिकित्सा करीत राहिल्याखेरीज नवी विद्या, नवे विचार आणि नव्या कल्पनांबाबत कोणताही समाज स्वागतशील राहात नाही परंतु येथे प्राचीन काळाची आणि परंपरांची चिकित्सा करणे हाच अधर्म मानला गेल्यामुळे स्थळाबरोबरच काळाचीही जाणीव नष्ट झाली. आपल्या देशात येऊन येथील ज्ञान मिळविण्यात, तसेच येथे व्यापार नोकरी करण्यात इंग्रजांना कोणतीच अडचण नव्हती. चुकीच्या निर्बंधांमुळे आपणाला मात्र त्यांच्या देशातही जाणे शक्य होत नाही

हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे ?’ ह्या शीर्षकाने त्यांनी इंदुप्रकाशात लिहिलेले (१८७६) आठ लेखनही महत्त्वाचे आहेत. भारताच्या दारिद्र्याची चिकित्सा लोकहितवादींनी त्यांच्या अन्य लेखनातूनही केली आहे. ब्रिटिशांनी ह्या देशाचे अर्थशोषण केले असले, तरी ‘द्रव्याचे ढीग हातांत, पायांत गळ्यात’ घालणारे श्रीमंतही उत्पादक कार्यासाठी संपत्ती खर्च करण्याचे मनात आणीत नाहीत, ह्याचा त्यांनी निषेध केला आहे. दागिने जमवत राहणे, ही ‘दुष्टपणाची व अधर्माची’ चाल आहे, असे ते म्हणतात. शेती, व्यापार, कारागिरी ह्यांत वाढ झाली पाहिजे तंत्रविद्या वाढवली पाहिजे, हे त्यांनी सांगितले. ‘आता लोक फार वृद्धिंगत जहाले, व त्यांस खावयास मिळत नाही…’ असे सांगून वाढत्या लोकसंख्येवरही त्यांनी बोट ठेवल्याचे दिसते. भारतातील दारिद्र्याची मीमांसा करताना दादाभाई नवरोजी ह्यांनी जो खंडणीचा सिद्धांत मांडला, त्याचे पूर्वसूचन त्यांच्या अर्थशास्त्रीय लेखनात फार पूर्वीच झालेले दिसते. संदर्भ - मराठी विश्वकोश

… ‘

Sunday, November 29, 2020

Saturday Club founder Madhavrao Bhide and MyMarathi Website

 Renowned bridge engineer Madhavrao Bhide built a strong bridge of friendship in Marathi entrepreneurship by establishing Saturday Club Global Trust to inculcate cooperation among Marathi entrepreneurs.

 He founded the Saturday Club in the year 2000 with an objective that  Marathi youth should dream of 'I will become a businessman, grow the industry, create wealth and help others.'

 Madhavrao Bhide's father Nanasaheb was  history school teacher and a staunch supporter of  Swatantryaveer Savarkar. Bhide published a collection of his father's letters in book form. When he had come to Sangli in 2002, he gave that book to me as a gift. Bhide passed Civil Engineer degree with  74% marks and later became   bridge engineer of international status and designed and constructed pre-stressed concrete bridges in the Railway Department.

After getting a job in the railways, he set up the 'Lalit Kala Mandal' to promote the artistic talents of railway employees and their families. Using his vacation, he traveled to important countries like England, USA, Canada, Switzerland, Sweden, Netherlands, Norway, France, China, Japan etc. and studied railway bridges at his own expense. He completed the Diva-Dombivali-Vasai railway project during his career. For the first time in railway history, a pre-stressed concrete’ bridge was built to extend the Bandra-Khar harbor line to Andheri.

While working in Gujarat, a Gujarati factory owner with an annual turnover of Rs. 200 crores, told him that In his factory clerks, accountant, chemist all are Marathi clever and smart people, but they can't compete with Gujarati in business. Bhide felt it as an insult to Marathi people and  decided to quit his job and become an entrepreneur and promote other Marathi people.

At the age of 58, he voluntarily retired from Indian Railways and founded Bhide Associates, which provides valuation and arbitration services for  buildings, bridges and factories. Within a few years, Bhide Associates had 15 branches across India. In 1989, he founded the Indian Institute of Bridge Engineers. He set up a platform for the exchange of knowledge and technology, imparting the experience of bridge building to Indian engineers from home and abroad through IIBE.

 Bhide founded the Saturn Day Club Global Trust in 2000. To unite Marathi entrepreneurs, Madhavrao took the whole of Maharashtra by storm with the new slogan 'Let's help each other, let's be rich'.

Dyandeep had taken the initiative to set up a branch in Sangli, Miraj in 2002. It was decided at that time to use Mymarathi.com  website for his club but I lost contact with him due to going abroad. 

 

After reading the news that Madhavrao Bhide passed away on July 7, 2018 at the age of 86, I gathered information about the Saturday Club. I found Saturday Club website http://scgt.org.in The names of the office bearers of the club are displayed on that website. However, it was noticed that the website is not up to date. 

Now Dnyandeep will build a bridge between Madhavrao Bhide's Saturday Club of Marathi Entrepreneurs and Marathi intellectuals working in education, literature and culture.

Saturday, November 28, 2020

मायमराठीला उद्योगप्रवण करणारे सॅटरडे क्लबचे माधवराव भिडे

 मराठी उद्योजकांमध्ये सहकाराची रुजवणूक करण्यासाठी सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट स्थापून प्रख्यात ब्रिज इंजिनिअर माधवराव भिडे यांनी मराठी उद्योजकतेत मैत्रीचा मजबूत पूल बांधला.

 ‘मी व्यावसायिक होईनच’ असे स्वप्न मराठी तरुणांनी पाहावे, उद्योग वाढवावा, संपत्ती निर्माण करावी आणि स्वत:बरोबरीने इतरांनाही मदतीचा हात देत मोठे करावे, अशा भूमिकेतून त्यांनी २००० सालात सॅटर्डे क्लबची स्थापना केली. 


 माधवराव भिडे यांचे वडील नानासाहेब हे पेशाने शिक्षक होते. ते इतिहासाचे जाणकार होते.  सावरकरांवर त्यांची अढळ निष्ठा होती. त्यांच्या पत्रांचा संग्रह भिडेनी पुस्तकरुपाने प्रसिद्ध केला. सांगलीस आले असताना त्यांनी ३०० रु. किमतीचे ते पुस्तक मला भेट दिले होते.  माधवरावांनी सिव्हील इंजिनियरिंगमध्ये ७४ टक्के गुण मिळवून यश संपादन केले एवढेच नव्हे तर  आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्रिज इंजिनिअर होऊन  रेल्वे खात्यामध्ये प्री स्ट्रेस्ड काँक्रीट पुलांचे डिझाईन व बांधकाम केले. 

रेल्वेमध्ये नोकरीला लागल्यानंतर त्यांनी रेल्वे कर्मचार्‍यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ’ललित कला मंडळा‘ची स्थापन केली. स्वखर्चाने आपल्या सुट्ट्यांचा वापर करुन  इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, स्वित्झर्लंड, स्वीड्न, नेदरलँड, नॉर्वे, फ्रान्स, चीन, जपान इत्यादी महत्त्वाच्या देशांचा  प्रवास करून  रेल्वे पुलांचा अभ्यास केला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत दिवा-डोंबिवली-वसई हा रेल्वे प्रकल्प पूर्ण केला. वान्द्रे-खार या हार्बर लाईनचा अंधेरीपर्यंत विस्तार करण्यासाठी ‘प्री स्ट्रेस्ड काँक्रीट’ पद्धतीचा पूल रेल्वे इतिहासात पहिल्यांदाच बांधला गेला. त्याचे जनक माधवराव होते.

गुजराथमध्ये नोकरीनिमित्त असताना वार्षिक २०० कोटी रुपयांची उलाढाल असणा-या एका  गुजराथी कारखानदाराने त्यांना सांगितले की आमच्याकडे क्लार्क, केमिस्ट, अकौंटंट ही सर्व मराठी मंडळी हुषार आहेत पण धंद्यामध्ये आमच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत. हे वाक्य ऐकल्यावर त्यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि त्या ईर्षेतून त्यांनी नोकरी सोडून उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. 

वयाच्या ५८ व्या वर्षी भारतीय रेल्वेतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन  इमारत, पूल, कारखाना यांचे मूल्यांकन करणार्‍या भिडे असोसिएट्सची स्थापना केली.  काही वर्षांतच संपूर्ण भारतात भिडे असोसिएट्सच्या १५ शाखा झाल्या. १९८९ साली  त्यांनी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ब्रीज इंजिनियर्स’ या संस्थेची स्थापना केली. ‘आयआयबीई’द्वारे पूलबांधणीचे अनुभव देश-विदेशांतून भारतीय अभियंत्यांना देणारे, ज्ञान-तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीचे व्यासपीठ त्यांनी उभे केले.

 भिडेंनी सन २००० साली ’सॅटर डे क्लब ग्लोबल ट्र्स्ट‘ या संस्थेची स्थापना केली.  मराठी उद्योजकांना एकत्र करण्यासाठी ‘एकमेका साह्य करु, अवघे होऊ श्रीमंत’ असे नवे घोषवाक्य  घेऊन माधवरावांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. 

२००२ साली सांगली, मिरजमध्ये शाखा काढण्यासाठी ज्ञानदीपने पुढाकार घेतला होता. त्याच्या क्लबसाठी मायमराठी वेबसाईटही वापरण्याचे त्यावेळी निश्चित झाले होते मात्र परदेशी गेल्यामुळे माझा त्याच् संपर्क तुटला. माधवराव भिडे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी ७ जुलै २०१८ रोजी निधन झाले हि बातमी वाचल्यावर मी स२टरडे क्लबबाबत माहिती गोळा केली त्यावेळी संस्थेच्या ४५ शाखा  सध्या कार्यरत असून  १७०० हून अधिक मराठी उद्योजक याचे सदस्य आहेत. हे मला कळले. 

सॅटरडे क्लबची वेबसाईट http://scgt.org.in क्लबमधील पदाधिका-यांची नावे समजली. मात्र वेबसाईट सध्या अद्ययावत नाही हे लक्षात आले. आता  माधवराव भिडें यांचा  मराठी उद्योजकांचा सॅटरडे क्लब आणि शिक्षण, साहित्य व संस्कृतीत रमलेले मराठी बुद्धीवंत यांच्यात नवा पूल बांधण्याचे काम ज्ञानदीप मायमराठीच्या माध्यमातून करणार आहे.


थोर समाजसुधारक आणि स्वदेशी उद्योगाचे पुरस्कर्ते न्या. महादेव गोविंद रानडे

 मराठी माणूस उद्योगापेक्षा साीहित्य संस्कृतीत जास्त रमतो. कारण नोकरी हेच त्याचे ध्येय असते. पण त्याने उद्योगात मनापासून लक्ष घातले तर तो महाराष्ट्राला समृद्धीच्या शिखरावर नेऊ शकेल. या संकल्पनेच्या पुष्टीकरता मी इतिहासाचा शोध घेतला तेव्हा न्या. म. गो. रानडे यांनी १५० वर्षांपूर्वी मांडलेल्या उद्योगविषयक  विचारांची माहिती झाली. त्या काळापासूनच आपण उद्योगाकडे  लक्ष द्यायला हवे होते असे वाटले. त्यांचे उद्योगविषयक विचार यांची आजही तसेच लागू पडतात.


 थोर नेमस्त समाजसुधारक आणि स्वदेशी उद्योगाचे पुरस्कर्ते


न्या. महादेव गोविंद रानडे

 (जन्म : १८ जानेवारी १८४२; मृत्यू : १६ जानेवारी १९०१),

 न्या. रानडे यांचा जन्म नाशिकमधील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय राहिले त्यांनी इतिहास हा विषय घेऊन एम. ए. केले. इ.स. १८६६ साली ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. १८८५ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले.हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक आणि अर्थशास्त्रज्ञ होते.

न्या.रानडे यांना आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी शिक्षण, समाजसेवा, राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले.

भारतीय समाज, भारतीय व पाश्चात्य परंपरा, भारतीय व पाश्चात्य ग्रंथ आणि भारतीय व पाश्चात्य तत्वज्ञान या सर्वांच्या सखोल अभ्यासातून त्यांच्या विचारांना खोली प्राप्त झाली होती. एकीकडे येथील संतपरंपरा आणि दुसरीकडे पाश्चात्य उदारमतवाद या दोन्हींचा समन्वय येथील सुधारणेसाठी त्यांनी योग्य मानला.

सार्वजनिक कार्य
ज्ञानप्रसारक सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, भारतीय सामाजिक परिषद इत्यादी विविध संस्था स्थापन करण्यात व त्यांचा विस्तार करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. ‘अनेक क्षेत्रांतील संस्था स्थापन करून त्यांनी भारतात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला,’ असे त्यांच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते. रानडे यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणांसाठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्गांचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘मवाळ’ प्रवाहाचे ते नेते होते. त्यांनी भारतीय राजकारणात अर्थशास्त्रीय विचार आणला. स्वदेशीच्या कल्पनेला त्यांनी शास्त्रशुद्ध व व्यावहारिक स्वरूप दिले. त्यांनी भारतातील दारिद्रयाच्या प्रश्नाचे मूलभूत विवेचन करून येथील दारिद्ऱ्याची कारणे व ते दूर करण्याचे उपाय यासंबंधी अभ्यासपूर्ण विचार मांडले.

मराठी भाषेसाठी प्रयत्न
ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांनी त्या त्या प्रांतातील शिक्षणाची व्यवस्था लावण्यासाठी १८४०मध्ये प्रांतनिहाय शिक्षणमंडळे (बोर्ड ऑफ एज्युकेशन) स्थापन केली.मराठी भाषा वगळता अन्य सर्व विषय मातृभाषेऐवजी इंग्लिशमधून शिकवण्यात येऊ लागले. १८५७ ह्या वर्षी मुंबई विद्यापीठ स्थापन झाले तेव्हा मराठी हा विषय मॅट्रिक ते एम. ए.पर्यंतच्या सर्व परीक्षांना वैकल्पिक म्हणून घेण्याची सोय होती. १८६३मध्ये मॅट्रिक ते एम. ए. ह्या सर्व स्तरावर मराठी भाषेचे अध्ययन-अध्यापन बंद झाले. १८७० ते १८८७ ह्या काळात मराठीला विद्यापीठात स्थान मिळावे ह्यासाठी रानडे ह्यांनी प्रयत्न केले.इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते. २९ जानेवारी १९०१ ह्या दिवशी (रानडे ह्यांच्या मृत्यूनंतरच्या १३ व्या दिवशी) सिनेटच्या बैठकीत मॅट्रिकप्रमाणे एम.ए.च्या परीक्षेतही मराठी हा विषय विकल्पाने उपलब्ध करून देण्यात आला. मात्र मराठीची प्रश्न पत्रिका इंग्लिशमधून काढण्यात येणार होती.

न्या. रानडेंच्या मते, समाज हा एखाद्या सजीवाप्रमाणे असतो. समाजाची धर्म, राजकारण, अर्थकारण ही विविध अंगे एकमेकांशी संलग्न असून, एकमेकांना पूरक असतात. एका शरीराचे काही अवयव दुबळे आणि काही शक्तीमान असे असू शकत नाहीत. तसेच मानवी समूहाचे काही भाग सुधारलेले आणि काही भाग मागासलेले असू शकत नाहीत. समाजातील विविध भागांची एकत्रित प्रगती होणे हे न्या. रानडेंनी आवश्यक मानले.

येथील समाजातील दोष - उदा. कुपमंडूक वृत्ती, तुटकपणा, ग्रंथप्रामाण्य, जातीभेद, चुकीच्या रुढी-परंपरांना चिकटून राहणे, दैववाद, इतिहासाबद्दलची अनास्था या सर्वांना दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी मांडले. कोणत्याही समाजामध्ये बदल सहजासहजी होत नाहीत, तसेच ते अचानकही होत नाहीत; यावर न्या. रानडेंचा विश्वास होता.

समाजात वेगवेगळ्या मनोवृत्तीचे लोक असतात आणि या सर्वांना बरोबर घेऊन सुधारणा करावयाची असल्याने सुधारणेचे तीन मार्ग त्यांनी सुचवले. समाजातील काही बदल परंपरेचा, धर्माचा आधार घेऊन केले पाहिजेत; काही बदल बुद्धीला पटेल अशा तर्कशुद्ध विवेचनाने घडवून आणले पाहिजेत; तर काही बदलांसाठी प्रसंगी कायद्याची मदत घेतली पाहिजे असे न्या. रानडे मानत.

समाजव्यवस्थेतील बदल ताबदतोब साध्य होणार नाहीत याची त्यांना कल्पना होती. सामाजिक सुधारणेसाठी विविध प्रवृत्तीच्या लोकांना आणि विविध संस्थांना एकत्र आणून सुधारणेस योग्य अशा वातावरण निर्मितीसाठी न्या. रानडेंनी प्रयत्न केले.

उद्योगीकरणाला प्रोत्साहन
ब्रिटिश राज्यकर्ते हिंदुस्थानामध्ये राहून राज्य करीत नसल्याने येथील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे वाहू लागला. महसूल, इतर कर, अधिकार्‍यांचे पगार, कर्जाचे व्याज इ. मार्फत हिंदुस्थानातील पैसा इंग्लंडमध्ये जात होता. याला न्या. रानडेंनी 'खंडणी' मानले. ब्रिटिश काळात व्यापाराच्या स्वरूपात बदल झाला. कच्च्या मालाची निर्यात आणि पक्क्या मालाची आयात वाढली. त्यामुळे येथे येणार्‍या पैशापेक्षा येथून बाहेर जाणार्‍या पैशामध्ये वाढ झाली. आकडेवारीच्या सहाय्याने न्या. रानडेंनी हे सिद्ध केले. येथील लोकांची बचत न करण्याची वृत्ती आणि उद्योगाप्रति असलेली उदासीनता यांमुळे येथील पैशाच्या वाढीला चालना मिळाली नाही, असे मत त्यांनी मांडले. येथील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकर्‍यांच्या प्रश्नात सरकारने लक्ष घालणे, उद्योगीकरणाला प्रोत्साहन देणे, उद्योग व शेतीवर सरकारचे नियंत्रण असणे, व्यापारात समतोल राखणे इ. मार्ग त्यांनी सुचवले. तत्कालीन विविध आर्थिक विचारप्रणालींच्या सखोल अभ्यासातून त्यांनी, 'हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिती आणि त्यावरचे उपाय' यावर विवेचन केले.

राजकीय संदर्भात विचार मांडताना कायद्याचे राज्य, कायद्याची अंमलबजावणी, जनतेचे हक्क आणि कर्तव्ये, समानता, संसदेतील प्रतिनिधित्व यांचे महत्व त्यांनी विशद केले. या सर्व गोष्टी प्राप्त करावयाच्या तर जनतेने आवश्यक तर सनदशीर मार्गांनी चळवळ उभी केली पाहिजे असे विचार त्यांनी मांडले. मात्र ही चळवळ टप्प्या-टप्प्याने केली पाहिजे असे मतही त्यांनी मांडले. 'स्वाभाविक विकासक्रमाच्या अनुषंगाने जे नजिकचे उद्दिष्ट्य आपल्या दृष्टिपंथात येईल त्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आणि औचित्य व व्यासबुद्धी यांच्याशी सुसंगत अशा तडजोडीच्या वृत्तीने ते प्राप्त करून घायचे' असे धोरण ठेवण्याकडे न्या. रानडेंचा कल होता. म्हणूनच, सार्वजनिक सभेच्या मार्फत लोकांना राजकीय शिक्षण देण्याचा त्यांचा मानस होता.

न्या. रानडे हे स्वभावाने नेमस्त व संयमी होते. कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश व अतिरेकीपणा हे त्यांच्या प्रकृतीमध्ये नव्हते, तसेच परंपरेचा धागाही त्यांनी तोडून टाकला नाही. न्या. रानडे यांच्यावरील पाश्चात्य उदारमतवादाचा प्रभाव, त्यांची समन्वयवादी वृत्ती आणि क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर त्यांचा असणारा विश्वास यांमुळे त्यांचे सुधारणेबाबतचे विचार आणि कृती ह्या नेमस्तवादी होत्या. कोणत्याही टोकाला न जाता, जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन, कोणालाही न दुखावणारे मार्ग त्यांनी स्वीकारले. लोकापवाद वा व्यक्ती दुखावल्या जाण्यापेक्षा वेळप्रसंगी आपल्या तत्वांना मुरड घालणे त्यांनी पसंत केले. कोणत्याही सुधारणेसाठी सक्तीपेक्षा संमतीलाच त्यांनी प्राधान्य दिले.

एकोणिसावे शतक सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारतीय इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे. मध्ययुगीन परंपरा ते आधुनिक मूल्ये यांच्यातील तो संक्रमणकाळ होता. एकीकडे ब्रिटिश राजवटीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशपूर्व परंपरेची ओढ आणि दुसरीकडे मध्ययुगीन जीवनपद्धतीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशकालीन मूल्यांची ओढ अशी दोलायमान स्थिती त्या काळात होती. ब्रिटिश राज्याचे दोष दिसत होते; पण त्यामार्फत येणार्‍या आधुनिक मूल्यांचा स्वीकार आवश्यक वाटत होता. अन परंपरेतील दोष दिसत होते; पण आपल्या स्वराज्याचा उच्चार-आचार आवश्यक वाटत होता. या दोन्हींचा योग्य समन्वय न्या. रानडेंनी आपल्या विचार व कार्यात साधला होता.

ब्रिटिश राज्यातली राजकीय धोरणे, आर्थिक धोरणे, शेतकर्‍यांवरील अन्याय, पाश्चात्य आर्थिक विचारप्रणाली यांविरुद्ध त्यांनी स्वच्छ आणि स्पष्ट मांडणी केली. आणि त्याच बरोबर पाश्चात्य उदारमतवाद, उद्योगशीलता, व्यक्तीवाद त्यांनी तितक्याच स्वच्छ आणि स्पष्टपणे उचलून धरला. येथील चुकीच्या रुढी-परंपरा, ग्रंथप्रामाण्य यांवर बोट ठेवले. आणि येथील मराठ्यांच्या इतिहासाचे अत्यंत संयमित असे परिशीलनही केले. पाश्चात्य संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्ये स्वीकारताना आपल्या संतपरंपरेचे श्रेष्ठत्वही त्यांनी अधोरेखित केले.

तत्कालिन समाजाची नस त्यांनी बरोब्बर ओळखली होती. त्यामुळे कोणताही बदल सुचवताना तो नवा आहे असे सांगण्यापेक्षा जुन्या परंपरेचे हे नवे रूप आहे असे सांगण्याचा प्रघात न्या. रानडेंनी पाडला. लोकांच्या श्रद्धा व विश्वास यांचा उपयोग त्यांच्या मतपरिवर्तनासाठी केला, तर समाजपरिवर्तनासाठी ते अत्यंत उपयोगी साधन ठरेल, असे ते मानत.

एकविसाव्या शतकात, आज भारतासमोर पुन्हा पूर्वीसारखी दुही उभी आहे. एकीकडे पाश्चात्यांचे आर्थिक वर्चस्व व त्यातून उदभवणारे तोटे दिसताहेत. परंतु त्यामार्फत येणार्‍या माहिती-तंत्रज्ञानाचा स्वीकार अपरिहार्य आहे. दुसरीकडे येथील 'विकसनशील' परिस्थितीतील अपूर्णता व दोष दिसताहेत. परंतु आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची ऊर्मीही आहे. या नव्या संक्रमणावस्थेत न्या. रानडेंचे समन्वयवादी, संयमित परंतु अचूक व नि:संदिग्ध विचार मार्गदर्शक ठरावेत. भारतीय संस्कृतीतील सातत्य आणि पाश्चात्य संस्कृतीतील बदल या दोन्हींचा मिलाफ आपण कसा साधू यावर आपला भावी इतिहास अवलंबून राहील.


Friday, November 27, 2020

Social Engineering for Make in India

Science says that you cannot go back in time, but human brain has such a magic power of memory storage that one can re-live the old life in mind. Atleast for me, pondering in good old days, has become a regular habit and solace to troubled mind while living in present modern educated society, which has become over smart and selfish in preserving its own pride and prejudice.

My days in service career in Walchand College and Dnyandeep activitites for first few years were full of ambition and aspirations. We used to  follow the great leaders in education, social and political fields, work together, understand and respond to colleagues and other society with full sensitivity. We were not rich but were full of emotions of our own, giving us energy to move forward with sharing of joy and sorrow with others. We enjoyed living together, working for each other or collectively towards variety of  goals, driven either by individual, social or political forces.

For last four years, while staying in America I found sophisticated, well mannered and object oriented and confined talk by people at all places,  which was typically robotic with suppressed emotions to adhere with strict norms of good behavior. Whether you go in hospital, mall, hotel or even in a garden or any informal social gathering, the experience is monotonic, disciplined and respectful.

Somehow, I felt that the people living here are becoming aloof from society and are just trying to become or show ideal gentlemanship. This might be the effect of over training of good manners, strict administration and fear of legal actions. Big corporates and administration demands that the workers and citizen behave in carefully crafted rules and regulations and achieve desired goals anonymously. They are treated as replaceable items to give desired outcome.

I had read a Russian novel ‘Everything but love’ long back, where the man gets a robot as wife, well and carefully designed to suit his requirements in minutest details like shape, look, beauty, responses and even pre-build emotions. He feels happy and boasts his possession with his friends who had wives with lot of imperfections and unmanageable quarrels. However, soon he realizes that robotic wife cannot give him the true love with human soul.

I am afraid, that in our pursuit of perfection, efficiency and unbiased just responses, big clever social machines  are forcing the people to abandon their inherent distinctiveness and turning them into well managed perfect society.

Even if we succeed in it, robots are going to outperform humans and would enslave human beings as they are heterogeneous in composition and fail with repetitive work and stressful conditions.

We have to think seriously where we want to go. Whether to achieve great success and prosperity with robotic culture or preserve our relations, traditions, old beliefs and rituals and remain where we are, imperfect, diversified but full with sensations, emotions and memories of past which preserve and nurture our minds rather than glorify bodies with material wealth and behavior to suit the ideal norms of social interaction.

I have become more  desperate in my outspokenness as I am experiencing similar transformation of our educated middle class in India. When I expressed my anguish about cool response to Dnyandeep initiative of collective investment and promotion of small businesses in India, I got variety of responses, which need to be studied. Many  thought it is my  marketing tactic for personal benefit. When I explained them of collective venture they did not trust others.  

 Some thought, it is political move and branded it is communist divisive propaganda. When I gave examples of Savarkar, Vivekanand, Vinoba Bhave and Sant Gadgebaba, they blamed corruption, politics and government failure. Nobody considered that they have any obligation to improve the situation being most gifted in economic terms. Some said, they pay heavy double taxes and it is the government which has to do the needful. Leftists were happy with my frustration and said total revolution is the only answer for this. Democrats here had some what acceptable approach to help small individual businesses, which guarantees individual freedom and helps innovation and healthy competition.

Everybody respected great leaders, saints who considered society and nation above their family  and sacrifice of our soldiers in protecting our nation, but tried to hide behind their own shields of reasoning.

I am feeling happy to discover this crucial issue which has to be tackled scientifically if we have to bring back our lost strength and trust from the best brains in India and abroad. I wish all of you to express your opinions and views in this regard. If we succeed in finding an amicable solution, it will be a great breakthrough in present deadlock. - Dr. S. V. Ranade, Dnyandeep, Sangli

 

Thursday, November 26, 2020

उद्योगरत्न वि. रा वेलणकर

सांगलीत उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणारे श्री गजानन मिल्सचे संस्थापक उद्योगरत्न वि. रा वेलणकर आणि त्यांची परंपरा तेवढ्याच हिमतीने चालविणारे सांगली भूषण श्री रामसाहेब वेलणकर यांच्या कार्याची ओळख व्हावी या हेतूने मी जानेवारी २०२० मध्ये श्री रामसाहेब व संचालिका श्रीमती अंजुताई वेलणकर यांची भेट घेतली आणि ज्ञानदीपतर्फे त्यांची वेबसाईट करण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यास त्यांनी आनंदाने मान्यता दिली.मात्र नंतर मी अमेरिकेला आल्याने आणि कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आम्हाला त्यांच्याकडून सर्व माहिती मिळण्यात व्यत्यय आला. 

तरी त्यांच्या कॅलेंडरवरून उपलब्ध झालेली काही माहिती खाली देत आहे.

सुदामपुरी
७ मार्च १९१४ रोजी दादासाहेब पुण्याहून माग घेऊन सांगलीच्या पटवर्धन सरकारांच्या मुळे त्यांच्या गणपतीमळ्यात आले. सांगलीत येण्याचा हा दिवस गुढी पाडव्याचा- वर्षप्रतिपदेचा दिवस होता. त्यामुळे सांगलीच्या नागरिकांनी गुढ्यातोरणे उभारली होती. दादासाहेबांनी ती आपल्यासाठीच असल्याचा शकुन मनाशी बाळगला. गणपती मळ्यातील सोपा, पाण्याने भरलेली विहीर, नारळीची बाग हे सारे पाहून दादासाहेबांना अत्यंत आनंद वाटला. पुढे या जागेतच त्यांनी आपला कारखाना सुरू केला. तीन मागांवर सुरू झालेला कारखाना पुढे १0 मागांचा झाला. प्रत्येक मागासाठी एक मागवाला लागायचा. हे मागवालेही दादासाहेबांनी स्वतःच्या तालमीत मोठ्या मेहनतीने तयार केले. १० मागाचे १८ माग झाले. राजेसाहेबांकडून घेतलेले ७००० रुपयांचे कर्ज दादासाहेबांनी मुदतीच्या वर्षभर आधीच फेडले होते. त्यामुळे १९२६ साली ते जेव्हा स्वत:च्या जागेत आले, तेव्हा त्यांना एका पैशाचेही कर्ज नव्हते.

गणपती मळ्यात गरज पडेल तसे दोन तीन सोपे बांधून झाले होते आणि आता पुढील वाढीस अनुलक्षून दुसरी जागा शोधणे क्रमप्राप्त होते कारण गणपती मळ्यातल्या कारखान्याला जागा अपुरी पडू लागली. १९२६ साली ही जागा तर खाली करून द्यावी लागणार होती. त्यामुळे स्वतःची जागा असावी असे त्यांच्या मनाने घेतले. त्याप्रमाणे त्यांनी जागा घेतली आणि म्हणूनच त्यांना मोठा पसारा मांडता आला.

जागा घ्यायची हे ठरले परंतु ती कुठे मिळणार आणि कशी मिळणार हे प्रश्न होते. तिच्यासाठी ठरलेले निकष कोणते? कोरडी जागा हा पहिला निकष आणि पाया कमी खणायला लागावा त्यामुळे खर्च कमी होईल हा दुसरा निकष. अशी जागा. कुठेतरी सांद्रीकोंद्रीत नसावी. १९२२ साली अशी जागा मिळाली. मग दादासाहेबांनी राजेसाहेबांना मोठ्या हिकमतीने राजी करून त्यांच्या संमतीने ही जागा जमीन मालकाकडून मिळवली. उत्तराभिमुख इमारत बांधण्यासाठी ती सोयीस्कर होती. कारखान्यासाठी घेतलेली सर्व जागा दादासाहेबांनी राजेसाहेबांकडून फॅक्टरी एरिया करून घेतली. ही त्यांची दूरदृष्टीच नव्हे का? नंतर पहिले काम कोणते केले असेल तर तिथे विहीर खणली. १९२३ साली या विहिरीला पाणी लागले तेव्हा ते बेताचेच होते, पण पुढे ते वाढत गेले. विहिरीला असलेल्या भरपूर पाण्यामुळे कारखान्याचे रंगखाते जोमाने कार्यरत राहू शकले. विहीर, पाण्याची टाकी, विहिरीच्या आत तळघरासारखे जलमंदिर व हवा खात बसावयाची गच्ची. या सर्वांना मिळून नाव मिळाले 'आनंद भवन”. तालमीचे काम पूर्ण होईपर्यंत दादासाहेब तिथेच रोजचा व्यायाम करायचे. 

श्री गजानन मिल्सच्या आकाशमंदिराची (टॉवरची) इमारत १९२५ च्या श्रावण महिन्यात पूर्ण झाली. १९२६ साली.गणपती मळ्यात १८ लूम होते. ते सगळे नवीन इमारतीत आणले.

कारखान्याची इमारत बांधायला गोकाकचा दगड मागवला. समोर उभे राहून, गवंडी हाताखाली घेऊन दादासाहेबांनी हा कारखाना बांधला. आतासारखे आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनिअर वगैरे कोणीही हाताशी नव्हते. विहिरीपासूनची इमारत, पोर्च, पाठीमागे मागासाठीची इमारत एवढा पसारा त्यांनी बांधून पूर्ण केला.

पोर्चसमोर रेल्वेलाईन असल्यामुळे कारखान्याची जाहिरात उत्तम प्रकारे .करता येत असे. दोही बाजूंना ऑफिस, मध्यभागी सायझिंग-वापिंग, मागे मागखाते असे इमारतीचे सर्वसाधारण स्वरूप होते गणपती मळ्यातले जुने घर जसेच्या तसे उकरून आणून इथे लावले. घर म्हणायचे त्याची इमारत म्हणजे कुडाच्या भिंती, कडेला लाकडी खांब आणि वर छप्पर. ही अशी!

कारखान्याची इमारत ही दादासाहेबांच्या आयुष्यातली पहिलीच इमारत पण अतिशय अभ्यास करून आणि हौसेने ती बांधलेली. एक सुंदर टॉवर, पोर्च यांचा समावेश असलेली १२० > ४० फुटांची ही सुंदर इमारत. त्यात मग १८ मागांचा कारखाना दिमाखात सुरू झाला. जवळूनच आगगाड्यांच्या येरझाऱ्यांमुळे उत्पादनाची जाहिरात करणे हेही आयतेच जमून गेले.

दादासाहेब जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्याच्या कृतार्थतेचा विचार करत तेव्हा सांगलीच्या राजेसाहेबांचे उपकार व प्रेम त्यांना आठवल्याखेरीज रा॒हूत नसे. पुराणकाळात कृष्णाच्या सुदाम्यावरील मित्रप्रेमाची आणि सुदाम्याच्या कृष्णावरील भक्तिप्रेमाची परिणती कशी झाली याची तुलना त्यांच्या मनात सुरू होई. आपल्या श्रमांचे सार्थक करण्यामध्ये राजेसाहेबांचा फार मोठा आधार होता

या वास्तविक समजामुळे राजेसाहेबांच्या विषयी दादासाहेबांच्या मनात आदर आणि प्रेमाचा भाव नेहमीच वसत असे. त्यातूनच स्वतःला सुदाम्याच्या जागी कल्पून त्यांनी आपल्या कारखान्याच्या लहानग्या वाडीला सुदामपुरी हे नाव देऊन टाकले. .

 रामभरोसे माग शेड
१९१४ साली दादासाहेब सांगलीत आले तेव्हा सांगलीत एकाही कोष्ट्याचे घर नव्हते. दादासाहेबांनी प्रयत्नांची शिकस्त करून तीन मागांच्या कारखान्याला सुरुवात केली. त्यावेळी यांत्रिक मागावर काम करणारी माणसे सांगलीत अजिबात नव्हती. प्रत्येक मागवाला ती. दादासाहेबांना प्रयत्नपूर्वक तयार करावा लागला. कारखान्यातला प्रत्येक प्रोसेसचा कारागीर त्यांना अगदी शून्यातून तयार करावा लागला. सांगलीत सुताशी संबंध आलाय असे दोनच समाज होते ते म्हणजे एक तर ब्राह्मण समाज- त्यांना जानव्याकरता आणि दुसरा भुई समाज- त्यांना मच्छी पकडण्यासाठी सुताचा वापर करायला लागायचा. यातील भुईगल्ली जवळ असल्याने त्यांना माग आणि इतर प्रोसेसिंगची कामे शिकवण्याचे काम ती. दादासाहेबांनी सुरू केले. असे तयार केलेले कामगार फोडणे आणि त्यांच्या साह्याने आपले माग चालवणे हा मार्ग स्पर्धकांना मोकळा होता. 

गजानन मिल्सच्या टॉवरची घंटा वाजू लागलेली घंटा ऐकून का कोण जाणे, पण एका उद्योजकाला विणकामाच्या धंद्यात शिरावे असे वाटू लागले. वेलणकरांशी स्पर्धा करू पाहणाऱ्या या माणसाने वेलणकरांच्या कारखान्यातील माणसे फोडून स्वतःचा कारखाना सुरू करण्याची योजना केली. त्यावेळी संस्थानातील अधिकाऱ्याला मुख्य पाहुणा म्हणून बोलवून या प्रतिस्पर्ध्याने त्याच्या उद्घाटन समारंभाला ती.दादासाहेबांनाही आमंत्रण केले, एवढेच नव्हे तर त्या आपल्या भाषणात ती.दादासाहेबांनाच आव्हान देणारी भाषा केली. ते जाहीररीत्या म्हणाले की, 'शेंडी तुटो की पारंबी तुटो मी थांबणार नाही.तुमच्याशी कडक स्पर्धा करायलाच मी हा कारखाना सुरू केलाय." असं म्हटल्यावर या लागट कुरापतीमुळे ती.दादासाहेबांच्या मनाला ही गोष्ट फार झोंबली. आपल्याशीच आणि भर समारंभात केलेली ही आव्हानाची भाषा ऐकून त्यांची झोप उडाली. पण त्यावर शाब्दिक प्रतिटोला मारण्याच्या भरीस न पडता रचनात्मक वृत्तीने ते आव्हान दादासाहेबांनी मनोमन स्वीकारले आणि कामाला लागले. दुसऱ्याच दिवशी रात्रीच्या गाडीने दादासाहेबांनी मुंबईला प्रस्थान ठेवले. मुंबईला जाऊन मुंबईच्या मुक्कामात ६0 मागांची खरेदी त्यांनी केली व ते ६० मागांचे खाते सुरू करण्याचे काम त्यांनी हातात घेतले.

या मागाच्या खात्याकरता इमारतीची गरज होती, ती इमारत दादासाहेबांनी बांधायला काढली आणि नवीन ९० » ६0 फुटांचे नवीन खाते उभे राहिले. एवढी मोठी गुंतवणूक, स्पर्धेला निकराने तोंड देण्याच्या ठाम निश्चयाने केली आणि त्यातील यशापयशाची गोष्ट त्यांनी श्री रामरायाच्या हवाली सोडली. यश-अपयश सगळे रामरायावर हवाला ठेवून त्यांनी या नव्या खात्याचे नामकरण 'रामभरोसे मागखाते' असेच केले.

कोणतीही गोष्ट करताना ती सकारात्मक विचारानेच करायची ही दादासाहेबांची वृत्ती या प्रसंगातून दिसून येते.

जपानी माग खाते

१९३५ मध्ये दादासाहेब जपानला गेले, तेव्हा इतरत्र जगभर ब्रिटिश साम्राज्य होते. त्यामुळे परदेशी जायचे म्हटले की लोकांचा ओढा इंग्लंड, अमेरिका, युरोप इकडे जाण्याचा होता. युरोपमध्ये निर्माण होणारे नवीन कारखाने फार मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणुकीचे असल्यामुळे त्यासाठी जास्त पैसे गुंतवावे लागतील, त्यापेक्षा लहान कारखाना घालायचा असेल तर जपानला जाऊन अशा प्रकारच्या कारखान्याचा अभ्यास घडला तर तो योग्य होईल असे वाटून दादासाहेबांनी जपानला जायचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय म्हणजे एक प्रकारे एक क्रांतीच होती.परंतु जपानला जायचे म्हटल्यावर त्यांच्या मार्गात काही अडचणी होत्या आणि उद्दिषटेही होती.

१) नवीन ज्ञान घ्यायचे म्हणजे मुख्य अडचण भाषेची होती. दादासाहेबांचे तर फक्त इंग्लिश पाचवीपर्यंतचे शिक्षण असल्याने त्यांना इंग्रजीही चांगले येत नव्हते. त्यात जपानी भाषा तर पूर्णपणे परकी होती.
२) आहे तोच धंदा वाढवायचा की नवीन धंदा घालायचा हा एक प्रश्‍न त्यांच्यासमोर होता.
३) तिथल्या धंद्यांचे स्वरूप अजमावून आपल्या चालू असलेल्या साड्या-लुगड्यांच्या धंद्यामध्ये जपानच्या कारखानदारांची आपल्याला काही स्पर्धा होईल काय, याबाबत अभ्यास करायचा होता.
४) जपानी भाषा शिकून त्यांना एक पुस्तक काढायचे होते, पण ते कसे साध्य करायचे ही एक अडचणच होती.
५) तिथले कारखाने जाऊन बघायचे कसे ?आपल्याला तेथे प्रवेश कसा मिळायचा? हाही मोठा प्रश्न होता.
१- पहिला प्रश्न त्यांनी सहजी सोडवला. ज्याचं इंग्रजी चांगलं आहे अशा आपल्या एका सहकारी मित्राला बरोबर घेऊन जायचे त्यांनी ठरवले.
२- दुसऱ्या प्रश्नाला त्यांनी उत्तर ठरवलं की, आहे तोच धंदा वाढवायचा.
३- आपल्याला तिथला कारखाना काही कॉम्पिटिशन करेल का हे पाहायला, ते इथून आपल्या कारखान्यातल्या साड्या बरोबर घेऊन गेले कन *असा माल तुम्ही पुरवू शकाल का?” याची चौकशी करून तेवढ्या व्हरायटीज ते काढू शकत नाहीत हे अजमावले.
४- जपानमध्ये त्यांनी एक दुभाषा नेमला. दिवसभरात जी जी वाक्ये अडतात, ती सहकारी मित्र श्री. विठ्ठल जोश्यांकडून इंग्रजीत लिहून घ्यायची आणि जेव्हा जपानी भाषेतील आदल्या दिवसांची वाक्ये घेऊन दुभाष्या यायचा तेव्हा ती नवीन वाक्ये त्याच्याकडे द्यायची.
५- तिथले कारखाने पाहण्यासाठी सहजच आत जायचे आणि कोणी अडवले तर 'मी परदेशी आहे, पाहायला आलो होतो” असे सांगून जेवढे बघता येईल तेवढे पाहायचे आणि बाहेर पडायचे असा क्रम त्यांनी ठरवला.
या अडचणीतून मार्ग काढणे तसे अवघड होते, पण दादासाहेबांनी ते केले.
येताना, आपल्या कारखान्यासाठी आवश्यक यंत्रे आणून ती कशी बसवायची हे योजून दादासाहेबांनी जपानला असतानाच इथे सांगलीत त्यासाठी गरजेच्या इमारतीचे काम चालू केले. त्यांची समज आणि दूरदृष्टी किती पल्लेदार होती हे यावरून लक्षात येते.

२२ डिसेंबर १९३५ ला ते भारतात आले. तिथून येताच ८0 मागांचा कारखाना स्वतःसाठी आणि विठ्ठुलराव जोशीसाठी रोप आणि टेपचा छोटा कारखाना ते घेऊन आले.

जपानी माग खात्याची उभारणी पूर्ण करून १ ऑगस्ट १९३६ ला त्यातून उत्पादन  केलेला माल त्यांनी मार्केटला टाकला. 'वल्कली कापड असे नाव त्याला देऊन पहिला   आर्टसिल्कचा कारखाना त्यांनी सुरूही केला या वल्कली कापडाचा कारखाना जपानमधून  आणणे हाच हेतू प्रामुख्याने डोळ्यांसमोर ठेवून दादासाहेबांनी जपानचा प्रवास केला असावा  असेच म्हटले पाहिजे.

 जपानहून येताना दादासाहेबांनी काही सुंदर सुंदर गोष्टीही इथे आणल्या. तिथून एक बोनसाय आणले. आणलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंत बारा माहितीपटांचा (फिल्मस्‌) समावेश त्यात होता. रणगाडा किंवा मशीनगन टँकर व्हेलची शिकार कशी काय करतो या माहितीपटाचाही त्यात समावेश होता. येताना सोन्याच्या मुलामा असलेल्या कपबश्या  त्यांनी आणल्या. मोती, विविध प्रकारचे पडदे, जाहिरातीसाठी पातळे नेसवायच्या  बाहुल्याही आणल्या होत्या. जे जे उत्तम, वेचक वाटले, त्या वस्तूंचा उपयोग करून  घेण्यासाठी त्यांनी त्या बरोबर आणल्या. इथे आल्यानंतर ज्ञानमंदिरात' या वस्तूंचे  प्रदर्शनही त्यांनी भरवले. ते प्रदर्शन पाहायला सांगलीतीलच काय पण बाहेरगावाहूनही  लोकांनी गर्दी केली. तीन-चार दिवस लोकांच्या झुंडी प्रदर्शन पाहायला लोटत होत्या.

 सांगलीच्या राणीसाहेबांना द्यायला सुंदर पार्टिशन्स आणली होती. इतरही अनेक मान्यवरांना त्यांनी सुंदर सुंदर वस्तू भेट म्हणून मोठ्या हौसेने दिल्या. जपानमधून निऑन साईन आणून श्री गजानन मिल्स या नावाचा ५0 फूट लांब आणि  ५ फूट उंचीचा बोर्ड उभा केला.

 एका जपानच्या प्रवासात अनेक गोष्टी त्यांनी साध्य केल्या. केवळ अशक्य  वाटतील अशा गोष्टी करून दाखवल्या. आमच्या कुटुंबासाठी तर हा चमत्कारच होता. 'जपानच्या प्रवासाची शिदोरी” हे माहितीपूर्ण पुस्तकही त्यांनी लिहिले आणि ते चांगले  वाचकप्रिय झाले.

 केवळ सातवी पास माणसाची कर्तृत्वाची झेप भव्यदिव्य दृष्टिकोन लक्षात घेतला तर शाळेबाहेर अनुभवाचीही एक शाळा असते आणि तिथले शिक्षण माणसाला उंचीवर नेते हे  पटल्याखेरीज रहात नाही.

Wednesday, November 25, 2020

Explore the secret of real happiness

 Today man is engrossed in material world composed of variety of amenities and resources which are directly and continuously affecting the senses to the extend that he has forgotten the purpose of his existence in the life.He has lost his own identity and the treasure of pure joy one can get just by imagination, curiosity and creativity.

Communication and entertainment media, service and financial tensions, marketing and social contacts have added to the complexity of sensual world and empowered the forces of instant pleasure and greed to influence the thought process of human being establishing new false concepts about happiness, success and achievement.

Even religions, who had inherent capacity to guide and control mind have become distributors of material pleasures and are used to build communities and tools for gains in physical world.

If one goes out of this  madding crowd, disconnecting all links of communication and spend some time in open natural world for himself, he would be able to see the present objective world in real perspective. He will also be able to evaluate the worth of material pleasures and compare them with the peace of mind and satisfaction one gets by blending his thoughts with the eternal beauty and simplicity of nature.

Try to comprehend the secret of happiness in the life of saints and scientists. They did not require any outside resource for inner mental pleasure. Probe into your mind to search the happiness rather than outside appliances.Man is an animal who thinks but we have either forgotten to think for ourself or do not find any time for it.

Help the needy without any discrimination, encourage curiosity and creativity in children, observe the nature and learn its simplicity, do anything with dedication and selfless motive, disseminate the knowledge and information to all who need it and you will find that you have achieved something which will be a source of joy forever. To train your mind progressively in this direction, always find some time for introspection and write down your thoughts regularly as writing creates a permanent store of your feelings and ideas and crystallizes your thoughts.

If you rise yourself above the material and virtual world, you will see a far reaching sea of happiness spread around your conscious mind.

Tuesday, November 24, 2020

छोट्या उद्योगांत परदेशस्थ भारतीयांचे योगदान

ज्ञानदीपच्या प्रगतीचा आलेख  इ. स. २००० पासून ते २०१३ पर्यंत धीम्या पण वाढत्या दिशेने होता. माझ्या पत्नीच्या आजारपणात त्याला उतरती कळा लागली. तिचे निधन झाल्यानंतर गेली चार वर्षे मी अमेरिकेत राहिल्यामुळे प्रगतीत अडथळा आला. तरी अमेरिकेत राहण्यास मिळाले ही संधी समजून मी ज्ञानदीपची परदेशस्थ भारतीयांच्या साहाय्याने पुन्हा उभारणी करण्याचे ठरविले. परदेशस्थ भारतीयांनी अगदी थोडी गुंतवणूक केली तरी त्याचा खूप फायदा होईल असे वाटून मी फ्री लान्स फोरमच्या सहकारी तत्वावर ज्ञानदीपच्या कार्याचा विस्तार करण्याचे ठरविले. मात्र अजूनतरी मला यात यश आलेले नाही.

परदेशात राहणा-या माझ्या संपर्कातील विद्यार्थी व इतर परिचितांना मी ज्यावेळी भारतात उद्योग उभारणीसाठी आर्थिक गुंतवणुकीचे आवाहन करतो. त्यावेळी मला भारतीयांच्यात गुणवत्ता नाही तसेच त्यांच्यावर भरवंसा टाकता येत नाही. बरेच लोक नोकरी सोडून जातात. आधुनिक व्यवस्थापन आणि कालमर्यादा पाळण्यात ते कमी पडतात अशी अनेक कारणे त्यांच्याकडून दिली जातात.
 
 स्पष्टपणे त्यांच्याशी युक्तीवाद करण्याचे माझ्या मनात खूपदा येते पण मी गप्प बसतो. कारण मला मान देण्यासाठी त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले तरी त्यांच्याकडून प्रत्यक्ष काही कृती घडेल याची मला खात्री देता येत नाही. अधिक मागे लागले तर ते विषय बदलतील वा माझ्याशी बोलण्याचेच टाळतील अशी मला भीती वाटते. मग मग मी त्यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक करतो व त्यांच्या गप्पागोष्टीत रंगून जातो. भारतातील राजकारण, भ्रष्टाचार, शेतकर्यांच्या आत्महत्या, बॉलीवुड, कला, कोशल्य आणि सण, समारंभ या विषयावर या गप्पा असतात. नक्षलवाद आणि जहाल डावे कम्युनिस्ट यांचेबद्दलदेखील काळजी आणि संताप येथे व्यक्त होतो. पण ही परिस्थती का उद्भवली व यावर आपण शासनाला काही योगदान देऊ शकतो याचा विचार देखील केला जात नाही.

हा अनुभव मला केवळ परदेशातच येतो असे नाही तर पुण्या-मुंबईत मोठ्या पदांवर काम करणा-या व्यक्तींकडून, अगदी माझ्या कंपनीत ज्यांनी प्राथमिक धडे गिरवले त्यांच्याकडूनही येतो तेव्हा मनस्वी खेद होतो.

चांगले जॉब प्लेसमेंट झाले की विद्यार्थ्याला 'ग 'ची बाधा होते. आपल्या अंगभूत हुशारीमुळेच आपल्याला हे यश मिळाले व इतरांच्यात ती कुवतच नव्हती असा सोयीस्कर समज ते करून घेतात.

 आता मात्र मी माझी मते स्पष्ट मांडण्याचे धाडस करीत आहे.

माझ्यामते प्रत्येक व्यक्ती बुद्धीमत्तेत जन्मतःच फारसा  फरक नसतो. प्रयत्नाने कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही उंचीपर्यंत जाता येते. मात्र यासाठी लागणारी भोवतालची परिस्थिती, आर्थिक पाठबळ, शिक्षण आणि त्याचे स्वतःचे प्रयत्न यांचाच प्रभाव त्याच्या कामगिरीवर पडत असतो.
ब-याच वेळा व्यक्तीच्या आवडीनुसार त्याची ज्ञान मिळविण्याची इच्छा आमि दिले जाणारे शिक्षण यांचा मेळ बसत नाही. कौटुंबिक जबाबदा-या अंगावर असल्याने आवश्यक तेवढा वेळ अभ्यासासाठी दिला जात नाही. परिक्षेतील यशच एकमेव कसोटी असल्याने ख-या बुद्धीमत्तेचे वा कुशलतेचे यथार्थ मोजमाप होत नाही.

साहजिकच विद्यार्थ्यांत हुषार,  साधारण व अपात्र असे गट पडतात. चांगल्या शिक्षणाची व नोकरीची ज्यांना संधी मिळते ते उच्चपदांवर विराजमान होतात. काही परदेशात जाऊन अत्युच्च पदावर जाण्यातही यशस्वी होतात. असे जाले तरी त्यांची विचार करण्याची क्षमता सर्वसाधारणपणे एकसारखीच असते.

उच्च पदांच्या जागा कमी आणि परदेशात जाण्याच्या संधी तर  अत्यल्प असल्याने बराच मोठा समाज हा स्थानिक पातळीवर मिळेल ती नोकरी वा व्यवसाय करून आपला चरितार्थ चालवितो.

उच्च पदावर काम करणा-या आपल्या सहका-यांबद्दल त्यांना, संस्थेला आणि सा-या समाजाला अभिमान असतो. परदेशात जाणा-या लोकांबद्दल तर अभिमानाबरोबर आदराचा भावना असते. अगदी माझे उदाहरण घेतले तरी मी अमेरिकेत राहतो हे ऐकल्यावर माझ्याबद्दल लोकांची माझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे हे मला जाणवते.  परदेशी भारतीय भारतात आले की त्यांचे सर्वत्र कौतुक केले जाते. त्यांचे शब्द मौलिक विचार असल्यासारखे सर्वांना वाटतात. मग या सा-या प्रशंसेने त्यांना आपण कोणी ग्रेट आहोत असे वाटायला लागते. मग त्यांच्या बोलण्याला उपदेशाची धार येते.
त्यांचा आपल्या स्वतःच्या विचारांवर जास्त विश्वास बसतो. मग इतरांच्या चुका त्यांना दिसू लागतात. इतरही त्यांच्या शब्दांना मान देतात.

आणि खरेच. अशा चुका सामान्य लोकांच्याकडून होत असतातच. कारण त्यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्यांच्याकडे सहायकांचा ताफा नसतो. मोठ्या कंपन्यात वा परदेशात काम करणा-या लोकांना मदत करण्यासाठी अनेक त्यांच्यासारखेच लोक त्यांच्या दिमतीस असतात. पैशासाठी इतर उद्योग त्यांना करावे लागत नाहीत. त्यांच्याकडील पैसाच त्यांना शेअर्सच्या माध्यमातून आणखीनच श्रीमंत करीत असतो.

पण अशा लोकांनी आपल्या पूर्वेतिहासाकडे पाहण्याची  ज्या समाजाने आपल्याला इतक्या उंचीवर चढविण्यास सहकार्य केले त्या समाजात केवळ नशिबाने कितपत पडलेल्या आपल्या सहका-यांना वा पुढील पिढीला वर आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण जेव्हा समाजाच्या तळागाळातील व्यक्तींच्या उन्नतीचा प्रयत्न होईल तेव्हाच सारा समाज एकसंध, सशक्त आणि राष्ट्रउभारणीस सज्ज होईल. अन्यथा समाजात भेदभाव, यादवी, गुन्हेगारी, परस्पर अविश्वास वाढत राहील.

आजच्या आपल्या   समाजपुरुषाचे वर्णन करायचे तर डोके ( मध्यम वर्ग) बुद्धी आणि कल्पकतेने युक्त, शरीर ( व्यापारी) धन दौलतीने सुदृढ तर पाय (गरीब ) रोगराईने त्रस्त असे करावे लागेल. या समाज पुरुषाने शिखराकडे धाव घेण्यासाठी आधी आपले जाय बळकट आणि निरोगी करण्याची गरज आहे.  आणि हे काम डोकेच करू शकते.  या डोक्यातील ब्रेनड्रेन होऊन परदेशात समृद्ध झालेल्या लोकांवर तर याची अधिकच जबाबदारी आहे.
ग्रामीण भागात शेतीवर गुजराण करणारे लोक, घरात स्वयंपाकपाण्यात आयुष्य काढणार्या महिला, झोपडपट्टीत हलाखीचे जीवन जगणारे लोक हे ती आपली संपत्ती आहे. त्यांना आयटीचा जादूचा दिवा  देण्याची व त्यांना आहे तेथेच सुदृढ, निरोगी, संपन्न व समाधानी करण्याची गरज आहे.

ज्ञानदीपचे कार्य याच हेतूने मी चालू ठेवले आहे. आज ना उद्या परदेशस्थ भारतीयांमध्ये असे दीप प्रज्वलित करण्यात मला यश येईल असे वाटते. - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली. 

New Slave Market

 There is a long history of struggle against slavery in different countries of world. Aggression, war, occupation, religious conversion, slavery was one part of cycle which was completed by reverse actions of fight against slavery, agitation and seeking freedom. History is full of many such cycles.

However, now it seems that rules of game have changed. People like slavery, occupation and ready to adopt  new life style and embrace new new philosophy and values.

It is a new forest where preys scramble to get killed and eaten up by wild animals. Fish try to get cought and harvested. This is not a fragment of imagination but what is actually happening in the global business world today.

MNCs are spreading their nets in developing countries to catch good fish. Fish aspire to become large tasty to get entry into net.

Small businesses and start-ups wish that MNCs will think them worth to gobble up. The entrepreneurs are ready to disown their innovations and become loyal servents of the MNCs which have destroyed their dream of owning the business.

Emotional stability, counseling, stress management have become lucrative businesses to soothen the worried and frustrated intellectuals.

Am I wrong in this perception?  

I only presume that it is half part of cycle and future will overturn this slavery back to self esteem and freedom. - Dr. S. V. Ranade, Dnyandeep, Sangli




 

Monday, November 23, 2020

क्लाऊड कॉम्प्युटिंग

 ज्ञानदीपचे ऑफिस सांगलीत असले तरी वेबडिझाईन,  एप डेव्हलपमेंट, व्यवस्थापन इत्यादी सर्व कामे सांगली, पुणे, नागपूर, कॅलिफोर्निया या सर्व ठिकाणांहून सुरळीतपणे चालते याचे कारण म्हणजे  आधुनिक क्लाऊड पद्धतीने इंटरनेटच्या सर्व सेवा देणा-या संस्थांचा उदय.

आता तर कोरोनाच्या बंधनांमुळे क्लाउड सेवांचे महत्व आणखीनच वाढले आहे. पण क्लाऊड म्हणजे काय हे सर्वसामान्यांना समजत नाही म्हणून हा लेखनप्रपंच.

क्लाऊड म्हणजे काय 


क्लाऊड म्हणजे ढग. ढगातून पाऊस पडतो. त्यासाठी आपल्याला काही करावे लागत नाही. याप्रमाणे कॉम्प्युटरचे सर्व काम दूरवर कोठेतरी होऊन आपल्याकडे इंटरनेटच्या माध्यमातून पोहोचविण्याची व्यवस्था म्हणजे क्लाऊड कॉम्प्युटिंग.  यात महत्वाचे म्हणजे सर्व माहिती व प्रोग्रॅम यांच्या प्रती हे विविध ठिकाणी असणा-या अनेक कॉम्प्युटरच्या स्मृतीकोषात साठविल्या जात असल्याने कोणताही कॉम्प्युटर बंद पडला तरी या सेवांत खंड न पडता कार्य अचूकपणे व व्यवस्थित चालू शकते.  रेडिओसाठी आपल्याकडे आकाशवाणी हा शब्द वापरला जातो. पुराण काळातील कथांमध्ये आकाशवाणी म्हणजे प्रत्यक्ष आकाशातून आवाज ऎकू यायचा. त्याच पद्धतीने  ‘मेघसेवा’ वा ‘आभाळमाया’ यासारखे नाव याला रूढ होऊ शकेल. स्वर्गामध्ये देवता राहतात व आपल्या सर्व संकटांचे त्या निवारण करतात. एवढेच नव्हे तर पृथ्वीलोकातील सर्व कार्य त्यांच्या इच्छेनुसार चालू असते असे आपण मानतो. त्याच धर्तीचे पण व्यवसायक्षेत्रातील काम आता क्लाऊड कॉम्प्युटिंगद्वारे होऊआहे.

सध्याच्या युगात संगणकाचा वापर प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत आहे. बँका, व्यावसायिक संस्था व उद्योग यांना आपले सर्व व्यवहार संगणकाद्वारे करण्यासाठी आतापर्यंत अनेक संगणक त्याचे नेटवर्किंग व अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर विकत घेऊन त्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक होते. आता क्लाऊड कॉम्प्युटिंगद्वारे हार्डवेअर व सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन या दोहोंचा वापर इंटरनेटवरून भाडेतत्वावर करण्याची सोय उपलब्ध  झाली आहे.

कॉम्प्युटर, नेटवर्कींग व सॉफ्टवेअर व त्या अनुषंगिक विद्युत उपकरणे व इन्व्हर्टर यांच्या खरेदीसाठी लागणार्‍या खर्चात बचत होणार आहे.  तसेच त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याचा खर्चही वाचणार आहे. अर्थात या क्षेत्रात काम करणार्‍या व्यावसायिकांना ही धोक्याची घंटा आहे.

इंटरनेटच्या क्रांतीमुळे माहिती व त्याचे संकलन व उपयोग यासाठी वेबसाईटचा वापर सुरू झाला. सर्व माहिती व सॉफ्टवेअर दूरवरच्या सर्व्हर कॉम्प्युटरवर ठेऊन आवश्यक ते रिपोर्ट व उपयुक्त माहिती वेबसाईटवरून मिळविणे सोयीचे झाले. डेस्कटॉपवरील सॉफ्टवेअरचे ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये रुपांतर होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये इंटरनेट सर्व्हीस देणार्‍या संस्थामध्ये आपले संगणक ठेवून वा त्यांचे संगणक वापरून वेबसाईटच्या माध्यमातून हे कार्य केले जाते. एखादा संगणक बंद पडला तर माहिती वा सॉफ्टवेअर यांची हानी होऊ नये म्हणून अशा संस्थांमध्ये ठराविक काळाने सर्व माहितीचा बॅक अप घेण्याची सोय केलेली असते. काही वेळेच दोन किंवा जास्त संगणकावर ह्या माहितीचा प्रती ठेवल्या जातात. मात्र संगणक व सॉफ्टवेअर यांचे व्यवस्थापन एकत्रितपणे केले जाते. ही माहिती वापरणार्‍यांच्या संख्येत अचानक वाढ झाली तर सर्व्हरवर या ताण पडून (बँण्डविड्थ मर्यादा) अशी सेवा खंडीत होऊ शकते.

आता क्लाऊड पद्धतीमध्ये संगणकाचा विभाग पूर्णपणे वेगळा करून अनेक संगणकांचा समूह अशा माहिती व सॉफ्टवेअरसाठी वापरला जातो.व त्याच्या  व्यवस्थापनाचे कार्य हार्डवेअर तज्ञ करतात. सर्व माहिती  विखुरलेल्या व अनेक प्रतींमध्ये व विखुरलेल्या स्वरुपात ठेवल्याने कोणताही संगणक बंद पडला तरी माहितीचे नुकसान होत नाही व सॉफ्टवेअर सेवा अबाधित राहते. माहितीचा एकूण साठा व सॉफ्टवेअरसाठी लागणार्‍या हार्डवेअरच्या सुविधा यांचा विचार करून आवश्यक तेवढी मेमरी व सुविधा आपोआप मिळू शकतील अशी योजना केलेली असते.

क्लाऊड मेमरी स्टोअरेज - सर्व माहिती (म्हणजे लेख चित्रे, ध्वनीफिती, चित्रपट इत्यादी) इंटरनेटद्वारे  क्लाऊडमध्ये साठविण्यासाठी (ऑनलाईन मेमरी स्टोअरेजसाठी) आता ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राईव्ह, सीएक्स डॉट कॉम अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. ठराविक मर्यादेपर्यंत वापरण्यासाठी  त्या मोफत उपलब्ध होऊ शकतात.


पत्रव्यवहारासाठी आपण इमेल सेवा वापरत आहोतच. त्यातील सर्व माहिती दूरस्थ सर्व्हर कॉम्प्युटरवर असायची त्यासाठी आता क्लाऊड सेवा वापरली जाते. फोटो व चित्रांसाठी पिकासा व फ्लिकर, संवादासाठी फेसबुक, व्हाट्सएप, स्काईप, याहू मेसेंजर, गुगल टॉक इत्यादी सुविधा इंटरनेटवर मिळू शकतात.

 डॉक्युमेंटस ( लेख, पत्रे इत्यादी मजकूर), स्प्रेडशीट वा एक्सेल शीट ( तक्ते वा कोष्टके) यासारखी अनेक अ‍ॅप्लीकेशन आता गुगलवर उपलब्ध आहेतच.  रेल्वे रिझर्व्हेशन,  इन्कमटॅक्स, ऑनलाईन शॉपिंग याची आपल्याला माहिती आहेच.मोठ्या बँकांचे कार्य आता पूर्णपणे ऑनलाईन झाले आहे. तरी अजून डेस्कटॉपवरील सॉफ्टवेअरचा वापर अनेक लहान मोठ्या संस्थांमध्ये चालू आहे त्यांना लवकरच असा बदल करावा लागणार आहे.

विंडोज, लिनक्स यासारखी वेगवेगळी अ‍ॅप्लीकेशन सॉफ्ट्वेअर आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून  देण्याचे कार्य दुसर्‍या स्वतंत्र विभागात केले जाते.  सिस्टिम सॉफ्टवेअर तज्ज्ञ त्याची देखभाल करतात.  त्यामुळे  त्यातील  नवीन सुधारणांचा व बदलांचा  शोध घेऊन ती अद्ययावत ठेवणे व त्यानुसार प्रत्यक्ष सॉफ्टवेअर प्रोग्रॅममध्ये आवश्यक ते बदल करणे सहज शक्य होते.

थोडक्यात सांगायचे म्हणजे इन्फ्रास्टृक्चर ( संगणक व अनुषंगिक इक्विपमेंट) सेवा, क्लाऊड  मेमरी स्टोअरेज, प्लॅटफॉर्म ( लिनक्स, विंडोज, इत्यादी)सेवा,  ( डाटाबेस, एम.एस ऑफिस, फ्होटोशॉप, जावा, पीएचपी, एसपी डॉट नेट, फ्लॅश, फ्लेक्स यासारखे अ‍ॅप्लिके्शन्स व लॅग्वेजेस व त्याचा उपयोग करून प्रत्यक्ष व्यवसायासाठी बनविलेले सॉफ्टवेअर यांची सेवा अशा सर्व सेवांचा एकत्रित आविष्कार म्हणजे क्लाऊड कॉम्प्युटिंग.

सध्या क्लाऊड सर्व्हीस देणार्‍या महत्वाच्या कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत. - अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हीसेस, रॅकस्पेस, सेंचुरी लिंक,व्हेरीझॉन- टेरेमार्क,जॉयंट,सायट्रिक्स, ब्ल्युलॉक,मायक्रोसॉफ्ट, व्हीएमवेअर

 पब्लीक क्लाऊड सर्व्हीस वापरण्याऎवजी  आपल्या कंपनीसाठी स्वतंत्र खाजगी क्लाऊडसर्व्हिसही विकत घेता येते.
 या सर्व सेवा भाडेतत्वावर असल्याने व्यावसायिकास वा वापरकर्त्या संस्थेस गरजेप्रमाणे हार्डवेअर व सॉफ्टवेअरमध्ये बदल वा वाढ करता येते.या सेवांचे भाडेही प्रत्यक्ष वापरावर अवलंबून असल्याने सुट्टीच्या दिवसात वा रात्री ही सेवा लागत नसल्यास बंद करून  खर्चात बचत करता येते

या सर्व  सोयींमुळे व्यावसायिक व उद्योजक संस्थांना आपल्या संगणक व्यवस्थेची वा त्याच्या नूतनीकरणाची काळजी करावी लागत नाही व तो वेळ, पैसा व मनुष्यबळ त्यांना आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी वापरता येतो. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे ही सेवा आपल्याला संगणक, लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल अशा कोणत्याही उपकरणाद्वारे कोठूनही व केव्हाही वापरता येते.

याचा एक महत्वाचा उपयोग फ्री लान्सिंग व्यवसाय वाढण्यास होणार आहे. ज्ञानदीपने यासाठीच घरातून संगणकावर काम करण्यासाठी मोठी योजना आखली आहे. जगातील कोणतीही संगणक क्षेत्रातील कामे आता क्लाऊड कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून . भारतातील ग्रामीण भागात राहणा-या महिला व सुशिक्षित युवकयुवतींना करता येतील. आपली शेती वा घरचा उद्योग सांभाळून यामे शिक्षम घेता येईल. परदेशात नोकरी करणा-यांप्रमाणे पैसैही मिळविता यातील.

गरज आहे ती ज्ञानदीपच्या या सहकारी तत्वावर सुरू केलेल्या उद्योगपर्वणीत सामील व्हायची. आपण https://dnyandeep.net या ज्ञानदीप फौंडेशनच्या वेबसाईटला भेट देऊन त्यांच्या फ्रीलान्स कार्यात सहभागी व्हावे आणि आधुनिक संगणक तंत्रज्ञान शिकावे, शिकवावे वा त्याच्या साहाय्याने आपला व्यवसाय घरबसल्या सर्वांच्या सहकार्यातून सुरू करावा असे मला वाटते. - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, कॅलिफौर्निया,(युएसए)

Sunday, November 22, 2020

मराठी उद्योगप्रेमी कै. माधवराव भिडे आणि मायमराठी

मायमराठीची जन्मकथा या माझ्या लेखात मायमराठी ओआरजी चे मायमराठी कॉम मध्ये रूपांतर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक कै. माधवराव भिडे यांच्यामुळे झाल्याचे म्हटले होते. मराठी माणसांनी उद्योग सुरू करावा यासाठी त्यांनी मोठी चळवळ सुरू केली होती. त्यांचे काम पाहून आम्ही  प्रभावित झालो होतो.

इ. स. २००२ मध्ये ते सांगलीस आमच्या घरी आले होते. सांगली कृष्णा क्लबचे सेक्रेटरी श्री हवालदार आणि मिरजेतील श्री हणमंतराव देवल यांच्या नेतृत्वाखाली सॅटरजे क्लब स्थापन करण्यात ज्ञानदीपने पुढाकार घेतला होता.

खरे पाहता सॅटरडे क्लब  पाश्चात्य पद्धतीच्या रोटरी किंवा लायन्स क्लब सारखे इंग्रजी नाव मराठी उद्योजकांसाठीसुरू केलेल्या मंडळासाठी वापरू नये आणि मायमराठी हे नाव वापरावे असे मी त्यांना सुचविले होते. शिवाय सॅटरडे क्लबच्या संकल्पनेत शनिवारी रात्री पार्टीसाठी सर्वांनी एकत्र जमायचे आणि उद्योगाविषयी चर्चा करायची ही कल्पना मराठी संस्कृतीशी पटणारी नसल्याने एकत्र जमण्यासाठी रविवारी दुपारी जेवण ठेवावे असेही माझे मत होते.


 माधवराव भिडे यांच्याबद्दल त्यावेळी वर्तमानपत्रांतून बरेच लेख आले होते.
 
 त्यांच्या क्लबचे नाव बदलावे हे माझे मत त्यांना  पटले नाही कारण ते स्वतः अनेक वर्षे गुजराथमध्ये रेल्वे खात्यात उच्च पदावर काम करीत असल्याने अधिकारी आणि उद्योजक यांच्या अशा क्लबचा त्यांना अनुभव होता. शिवाय परदेशात  सॅटरडे क्लबच लोकांना आवडेल आणि सोयीचा  ठरेल त्याना वाटले. तरी देखील मायमराठी नाव त्यांना आवडले. मात्र  साहित्य संस्कृती ऐवजी उद्योगशीलता याची त्यात माहिती द्यावी असे ते म्हणाले. 

 मग मी मायमराठी डॉट कॉम या नावाची वेगळी वेबसाईट फक्त सॅटरडे क्लबसाठी करण्याचे ठरविले आणि त्यांना त्यास संमती दिली. एक जाहिरातही वेबसाईटसाठी देऊ केली


मुलीकडे अमेरिकेला जाण्यासाठी आम्ही मुंबईला आलो तेव्हा मी त्याची घरी गाठ घेतली व सविस्तर चर्चा केली.तेथून तीन महिन्यांनी परत आल्यावर माझा त्यांचेशी संबंध तुटला. सॅटरडे क्लबही बंद पडले होते. मग मी आमच्या मायमराछी वेबसाईटचे नावच मायमराठी डॉट कॉम असे केले.

परवा फेसबुकवर सांगलीत २०१९ साली सॅटरडे क्लबची मीटींग झाल्याचे वाचले नि माझे कुतुहल जागे झाले. अधिक शोध घेता सॅटरडे क्लबची वेगळी वेबसाईट बनल्याचे माझ्या लक्षात आले. https://www.scgt.org.in

वेबसाईटवरील माहिती पाहिल्यावर मात्र ती वेबसाईट माधवराव भिडे २०१८ मध्ये कालवश झाल्यानंतर बंद स्थितात आढळून आली. अधिक शोध घेतल्यावर या सॅटरडे क्लबमधील महत्वाच्या अजित मराठे, हानरे इत्यादी मराठी उद्योजकांची  श्रद्धांजली भाषणे वाचायला मिळाली. पण प्रत्येकाचे उद्योग वेगळ्या नावाने असून सॅटरडे क्लबचे काम अधिकृतपणे कोण चालवितात याचा उलगडा झाला नाही.

कदाचित माधवराव भिडे यांच्याबरोबर सॅटरडे क्लबही मराठी उद्योजकांतून अस्तंगत झाला असेल. १०० कोटी रुपयांचा धनकुंभ  मराठी उद्योजकांसाठी उभा करण्याचा कै. माधवराव भिडे यांचा मनोदय मराठी उद्योजक पुरा करू शकतील का याची मला खात्री वाटत नाही.

ज्ञानदीप फौंडेशनने सर्वांना परवडेल अशा सहकारी तत्वावर भांडवल उभे करण्याच्या  प्रयत्नाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला हे आपल्या मराठी माणसांच्या सावध आणि साशंक मनोवृत्तीचे प्रतीक आहे. त्यातून बाहेर पडल्याखेरीज मराठी उद्योजक निर्माण होणार नाहीत.

तन, मन, धन यांची गुंतवणूक, धाडस व तोटा सहन करण्याची तयारी असल्याखेरीज कोणताही उद्योग उभा राहू शकत नाही. नवतरूणांना तर अनुभव नसल्याने व पैशाचे पाठबळ नसल्याने हे अधिकच बिकट व धोकादायक आहे.

यासाठीच सर्व सुखवस्तू ज्येष्ठ आमि परदेशी वास्तव्य करणारे बुद्धीमान तरूण यांना आपले धन आणि बुद्धी भारतातील उद्योगांच्या विकासासाठी वापरायचे आवाहन ज्ञानदीप करीत आहे. .  



 



Saturday, November 21, 2020

भारतातील आयटी कंपन्यांनी ग्रामीण भागात विकेंद्रीकरण करावे

भारतात तंत्रज्ञानाचा वेगाने विकास व्हावा या हेतूने सरकारने निवडक ठिकाणी आयआयटी स्थापन करूनत्यांना भरीव अरथसाहायाय केले. कल्पना अशी होती की तेथे विकसित होणारे ज्ञान भोवतालय्या विद्यापिठांतून सर्व महाविद्यालयांपर्यंत पोहोचेल. प्रत्यक्षात तेथे शिकणारे विद्यार्थी प्रामुख्याने भारतात न राहता परदेशात जात राहिले. देशातील हुषार विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यसाठी नवी प्रवेशद्वारे तयार झाली. 

उद्योगासाठी लागणा-या पायाभूत सुविधा निर्माण करून प्रदेशाचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने मोछ्या शहरांचे स्मार्ट सिटीत रुपांतर करण्यासाछी सरकारने असेच कोट्यावधी रुपये खर्च केले. मात्र याचा परिणाम नेमका उलटा झाला. भोवतालच्या प्रदेशातील हुषार विद्यार्थी आणि उद्योजक शहराकडे येऊन प्रदेश होता त्यपेक्षा भकास आणि दुर्लक्षित बनत गेला.

बीपीओ आणि केपीओ या नव्या व्यवस्थापनाचा उद्देश शक्य तेवढे काम बाहेरून करून घेण्याचा असल्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात आपले सर्वदूर जाळे विणले.

बीपीओ म्हणजे बिझिनेस प्रोसेस आउटसोर्सिंग ( उद्योग/व्यवसायातील कामे बाहेरून करून घेणे). प्रथम उत्पादन क्षेत्रातील कामांसाठी हे तंत्र वापरले गेले. ( कोका कोलाने हे तंत्र प्रथम वापरले.) नंतर कामगारआधारित कामे, जमाखर्चासारखी आर्थिक आकडेमोडीची कामे बाहेरच्या कंपन्यांकडून करून घेण्यास सुरुवात झाली. आता कामगार भरती, खरेदी, उत्पादन, विक्री, विक्रीनंतरची सेवा अशा उद्योगातील बहुतेक सर्व कामांसाठी बीपीओचा वापर केला जातो. बीपीओमुळे उद्योगास कामगार, वेळ व भांडवली खर्चात बचत करता येते व आपले उत्पादन बदलत्या परिस्थितीप्रमाणे बदलणे सहज शक्य होते.

परदेशातून काम करून घेतले तर त्याला ऑफशोअर आउटसोर्सिंग म्हणतात तर माहिती तंत्रज्ञानातील कामे बाहेरून करून घेतली तर त्याला नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग ( केपीओ) म्हणतात.

भारताचे परदेशातील कंपन्यांकडून आयटी क्षेत्रातील बीपीओमार्फत मिळालेले उत्पन्न मुख्यत्वे मोठ्या शहरांच्या विकासाकडे वापरले गेले. त्यामुळे ग्रामीण भागातून हुषार सुशिक्षित तरुणांचा कल एशा मोठ्या शहरात स्थलांतर करण्याकडे झाला. यामुळे घ्रमीण भागातील शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले. ग्रामीण भागात राहण्यास कोणीच तयार होईना. विवाहासाठी मुलीही शहरात राहण्याची अट घालू लागल्या. एकूणच या शहरीकरणामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. शहरातही प्रचंड लोकसंख्या वाढीमुळे अनेक नव्या समस्या निर्माण झाल्या. झोपडपट्टीची वाढ आणि पायाभूत सुविधांचा अपुरेपणा यामुळे तेथील जीवनही असुरक्षित, धकाधकीचे व प्रदूषणयुक्त झाले. महागाईत प्रचंड वाढ झाली. पगारही त्याप्रमाणे वाढावे लागले. उद्योगांचेही त्यामुळे नुकसानच झाले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या सर्व प्रश्नांना एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. घर्दीच्या शहरापासून दूर निसरिगाच्या सानिध्यात राहण्यातील सुख आणि सुरक्षितता आता सर्वांना पटू लागली आहे. सुदैवाने इंटरनेट आणि मोबाईल क्रातीमुळे कोठेही राहून आयटी क्षेत्रातील काम करणे आता सहज शक्य झाले आहे. जर आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी आपले सर्व काम ग्रामीण भागात करून घेण्यासाठी आवश्यक पावले उचलली आणि छोट्या संगणक कंपन्यांना सशक्त करून त्यांना घुणवत्तापूर्ण काम करण्याचे प्रशिक्षण दिले तर एक स्थायी स्वरुपाची सर्वंकष प्रगती साधमारी क्रांती भारतात घडू शकेल.

आज भारतात इंजिनिअरिंग उद्योगांमध्ये सुट्या भागांच्या उत्पादनाचे काम छोट्या उद्योगांकडून करून घेतले जाते. बहुतेक सर्व मोठॆ उद्योग बीपीओचा वापर करून आपल्या कामाचे विकेंद्रीकरण करतात. महाराष्ट्रात ग्रामीण भागात असणार्‍या औद्योगिक वसाहतीतील व एमआयडीसीतील बरेचसे उद्योग अशा सुट्या भागांच्या निर्मितीवर आधारलेले आहेत. उद्योगाची व त्याद्वारे राज्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी अशा बीपीओची फार गरज असते.

सध्या भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्या जागतिक मंदीमुळे अडचणीत आल्या आहेत. आतापर्यंत परदेशातून बीपीओच्या माध्यमातून मोठे प्रकल्प व प्रचंड पैसा मिळत असल्याने भरपूर पगार देऊन आयटी क्षेत्रातील पदवीधारकांची भली मोठी फौज आपल्या पदरी ठेवून या कंपन्यांनी बलाढ्य साम्राज्ये उभी केली व सर्व अर्थ व्यवस्थेला चांगली गती दिली. मात्र जागतिक मंदीमुळे ऑफशोअर आउटसोर्सिंग करणार्‍या देशातील उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढल्याने त्यांना असे प्रकल्प मिळणे कमी झाले व त्याचा फटका ना बसला. खर्चात काटकसर करायची तर पगार कपात वा नोकरकपात करावी लागणार. मात्र या उद्योगांचे शेअर भांडवल जनतेतील जनतेतील उद्योगाविषयी असणार्‍या प्रतिमेवर अवलंबून असल्याने काटकसरीचे उपाय न करता तोटा होत असूनही तो दडविण्याकडे व ‘सर्व आलबेल आहे’ असे दर्शविण्याचे प्रयत्न सुरू झाले. परदेशातील ‘ल्हेमन ब्रदर्स’ काय व इथले ‘सत्यम‌ कॉम्पुटर्स’ काय, दोन्हीकडे असे बलाढ्य उद्योग बंद पडले. आज भारतात सुस्थितीत दिसत असणार्‍या उद्योगांची खरी स्थिती काय आहे हे त्यांच्याशिवाय इतर कोणालाच माहीत नाही. मात्र नवीन नोकरभरतीत झालेली घट परिस्थिती बिकट असल्याचे दर्शविते.

यावर उपाय हा बीपीओच ठरू शकतो. या कंपन्यांनी आपले बहुतेक काम ग्रामीण व निमशहरी भागातील छोट्या कंपन्यांना आउटसोर्स केले तर बीपीओचे वर वर्णन केलेले सर्व फायदे या कंपन्यांना मिळू शकतील. निम्याहून कमी खर्चात प्रकल्प पूर्ण करता येतीलच याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामीण व निमशहरी भागातील छोट्या संगणक कंपन्यांना नवसंजीवनी मिळून अनेक सुशिक्षित संगणक तज्ज्ञांना आपल्या गावीच काम मिळेल. त्या भागाचा विकास होईल. शहरीकरण व त्यातून येणारी महागाई व प्रदूषण टळेल.

आतापर्यंत या आयटी कंपन्यांनी केवळ सेवा व मनुष्यबळ देण्याचे काम केले त्यांना आता सेवा व मनुष्यबळ छोट्या कंपन्यांकडून घेण्याचीही भूमिका पार पाडावी लागेल. याबाबतीत बीपीओविषयी छोट्या कंपन्यांना प्रशिक्षित करणे, त्यांना भांडवल पुरवणे, शैक्षणिक संस्थांमधून पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण व त्यांचा मानसिक कल बदलणे ही कामे करावी लागणार आहेत. परदेशातील उद्योगांना भारतात काम देताना जी ‘माहितीची गुप्तता राखणे’, ‘कामाचा दर्जा उत्तम ठेवणे’, ‘वेळेचे गणित पाळणे’ व ‘विश्वासार्हता’ या गोष्टींची काळजी वाटते तशीच काळजी भारतातील मोठ्या उद्योगांना वाटणे स्वाभाविक आहे. अशा उत्तम दर्जाच्या छोट्या संस्था तयार करणे हेही एक मोठे आव्हान आहे ते मोठ्या उद्योगांनी पेलायला हवे. ज्ञानदीप फौंडेशनच्या मते भारतातील शिक्षणसंस्था, छोटे उद्योग, मॊठे उद्योग अशी परस्परपूरक व परस्परावलंबी साखळी तयार करता आली तर या संगणक उद्योगाचा चिरस्थायी व विकेंद्रित विकास होऊ शकेल.

आयटी क्षेत्राच्या विकासात महिला पार मोठे योगदान देऊ शकतात. आजही मोठया आयटी कंपन्यांत महिलाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र त्यांना पुरुषांप्रमाणे दररोज १०/१२ तास काम करावे लागते व घरातील जबाबदार्‍या सांभाळाव्या लागतात त्यामुळे त्यांना मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागतो व लग्नानंतर तर परिस्थिती अधिकच बिकट .होते अनेक महिला नोकरी सोडतात. नोकरी न केल्यामुळे व आपल्या शिक्षणाचा काही उपयोग करता येत नाही अशा विचाराने निराश होणार्‍या अशा महिलांना काम देण्याची काहीतरी व्यवस्था करणे आवश्यक आहे. सुदैवाने माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे घरी बसून ऑफिसमधील काम करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. मोठ्या कंपन्यांनी अशा महिलांना अर्धवेळ वा घरी राहून काम करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तर महिलांचे फार मोठे मनुष्यबळ या कंपन्यांना कमी पगारात उपलब्ध होऊ शकेल. महिला सशक्तीकरणालाही यामुळे चालना मिळेल. आपल्या कुटुंबाला हातभार लावल्याचे समाधान महिलांना मिळेल.

मंदीमुळे नोकरी न मिळालेल्या वा नोकरी गमवावी लागलेल्या संगणकतज्ज्ञांचा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. महिलांचा व या कुशल मनुष्यबळाचा उपयोग छोट्या कपन्यांना करून घेता येईल. यासाठी बीपीओच्या कार्यपद्धतीचा सर्वांनी अभ्यास करणे व वापर करणे आवश्यक आहे.

ज्ञानदीप फौंडेशनशी संलग्न असणार्‍या ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. कंपनीने परदेशातील अनेक प्रकल्प बीपीओतर्फे यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. ज्ञानदीपचा अनेक शिक्षण संस्थांशीही निकटचा संबंध आहे. बीपीओचे महत्व लक्षात घेऊन ज्ञानदीप फौंडेशनने याबाबतीत जनजागृती करण्याचे ठरविले आहे. सर्व शिक्षण संस्था, महिला व घरी संगणकावरील काम करण्याची असणार्‍यांसाठी दूरस्थ शिक्षणाद्वारे प्रशिक्षण वर्ग घेण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करून शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ व्यक्तींना आपल्या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे. . परदेशात राहणार्‍या संगणकतज्ज्ञांनाही यात सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अधिक माहितीसाठी https://dnyandeep.net या फौंडेशनच्या वेबसाईटला भेट द्यावी तसेच या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मी आपणास करीत आहे.आपल्या या बाबतीत काही सूचना असतील तर त्यांचे स्वागत आहे. आपणासर्वांच्या सक्रीय सहयोगातूनच हा प्रकल्प काही थोडेफार यश मिळवू शकेल . - सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली..