Friday, September 28, 2018

अशा शाळा, असे शिक्षक - ४

सांगली परिसरातील गेल्या पिढीतील  काही ध्येयवेड्या आदर्श शिक्षकांची माहिती खाली देत आहे.
१. कै. श्रीकांत विष्णू रानडे, B.Sc B.Ed
जन्मतारीख :- १३ जानेवारी १९४९  मृत्यु - १ फेब्रु. २०१६


माध्यमिक शिक्षण :- न्यू इंग्लिश स्कूल सातारा, सिटी हायस्कूल सांगली
महाविद्यालयीन शिक्षण :- विलिंग्डन कॉलेज, KWC कॉलेज सांगली, पुतळाबेन शहा कॉलेज ऑफ़ एज्युकेशन सांगली
शैक्षणिक अनुभव :- ४१ वर्षे - विदुयामंदीर प्रशाला, सध्या वा.रा.खवाटे हायस्कूल अंकली
१९७०-१९७७१ उपशिक्षक शे.रा.वि.गो.हायस्कूल माधवनगर
 ११९७१-२००७ उपशिक्षक पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक मुख्याध्यापक, प्राचार्य



शैक्षणिक कार्य 
(१) नवीन अभ्यासक्रमावर आधारीत गणित विज्ञान पर्यावरण प्रशिक्षण घेतले व तज्ञ मार्गदर्शक म्हणुन काम केले.
(२) पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती) व SSC Board प्रकाशीत शालेय पुस्तकांचे परीक्षण
(३) संशोधन प्रकल्प
 (१) वेळापत्रकाची पुर्नरचना - जिल्हास्तरीय पारितोषिक
 (२) शालेय दिनदर्शिका पुर्नरचना - जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक
 विस्तारसेवा केंद्र B.Ed  College संचलित
 (३) ग्रामीण निमशहरी, शहरी शाळांतील अभ्यासक्रम व अभ्यासेत्तर उपक्रम यांचा प्रकल्प - SSC Board - १०००० रूपये अनुदान
(१९९८-१९९९-२०००) तीन वर्षे संशोधित कार्य २००० साली
(४) इ.३री ते ८वी विज्ञान पाठ्यपुस्तकांचा अभ्यास व संशोधन प्रकल्प ५००० रू. अनुदान - पाठ्यपुस्तक मंडळ
 (५) SSC Board - गुणवत्ता यादीत ६० विद्यार्थ्यांचा सहभाग
 HSC Board - गुणवत्ता यादीत ४० विद्यार्थ्यांचा सहभाग
 १९९९ HSC Board राज्यात शाळेचा प्रथम क्रमांक
अभ्यासेतर उपक्रम -
 (१) डॉ.भाभा विज्ञान मंडळ - संचलन व मार्गदर्शन
 तालुका जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक बक्षीसे संचालक १० वर्षे,  नागपूर मुंबई बेंगलोर कलकत्ता विज्ञान प्रदर्शनात सहभाग
 (२) डॉ.बोस सृष्टीनिरीक्षक मंडळ(निसर्ग मंडळ) WWF संचलीत World Wild Fund of India जागतिक वन्य जीवन निधी संचालक १० वर्षे
 सामाजिक कार्य 
(१) मराठी विज्ञान प्रबोधिनी - आजीव सदस्य
(२) भारतीय शिक्षण मंडळ - आजीव सदस्य
(३) बालविज्ञान प्रबोधिनी - कार्यवाह
 (४) निसर्ग मित्र संस्था - कार्यवाह
(५) MTSE - महाराष्ट्र टॅलन्ट सर्च एक्झाम - समन्वयक गेली १२ वर्षे उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार - डॉ.आनंद कर्वे(शास्त्रज्ञ) व डॉ.रा.ग.जाधव - मराठी साहीत्य महामंडळ अध्यक्ष यांचे   हस्ते
(६) राष्ट्रीय बालविज्ञान परीषद नवी दिल्ली

जिल्हा समन्वयक १० वर्षे विभागीय समन्वयक ३ वर्षे
राष्ट्रीय स्तरावर प्रकल्पांना मार्गदर्शन सांगली सातारा कोल्हापूर
 (७) दैनिक लोकमत व Air India यांच्यातर्फे संयुक्तपणे दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार नागपूर येथे
(८) सहली निसर्ग शिबीरे चर्चासत्रे व्याख्याने परीसंवाद सहभाग गेली २० वर्षे
(९) आजी व सदस्य MTE Society - महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे

२. गुरुवर्य कै.  नागेश व्यं. धोलबा

सांगली शहर आणि जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रावर ज्या काही निवडक गुरुजनांचा ठसा उमटला आहे. जवळ जवळ गेली चार तपे या परिसरातील विध्यार्थ्यात अत्यंत आदराने ज्यांचा आवर्जून नामोल्लेख होतो आहे अशा आदरणीय आणि विद्यार्थीप्रिय बोटावर मोजता येतील अशापैकीच एक सकल कलागुण संपन्न, अत्यंत शिस्तबध्द करडे परंतु विद्यार्थ्यावर मायेची पाखर घालणारे, त्यांच्यावर पुत्रवेत प्रेम करुन त्यांना सुसंस्कारित करण्याकरिता निरनिराळ्या उपक्रमांची परिसीमा गाठणारे. वर्गात खडू-फळा, दृक्‌-श्राव्य शिक्षण साहित्य, प्रयोगशाळेतील उपकरणे, भूगोल, नकाशे, भाषाशास्त्र, विज्ञान विषयात तल्लीन होणारे, आणि आपल्याबरोबरच आपले विद्यार्थी आणि सहपाठी, सहकारी शिक्षक सर्वाना त्यांत एकरुप करुन घेणारे आणि तितकेच वर्गाबाहेर क्रीडा मैवानावर, लाठी, काठी, फरीगदगा, लेझीम, क्रिकेट, टेबलटेनिस, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, बास्केट्बॉल, वगैरे सारख्या देशी-विदेशी खेळात नुसते उत्कृष्ट खेळाडू म्हणूनच नव्हे तर, पहिल्या आशियाई सामन्यात १९५१ साली अथॅलेटिक्ससाठी एक पंच, मुं.शालेय सामन्यात संचालक, शिवाजी विद्य़ापिठाचे झोनल इंटर झोनल प्रमुख निवडसमिती सभासद, आफ्तर विद्यापीठ टे.टे. साठी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापक, कर्नाटक विद्यापीठ सामन्यात कप्तान. विज्ञान प्रदर्शने भरविणे पेपर सेटर परीक्षक, मॉडेटर, जवळ जवळ दोन तपात २२ शिक्षक मार्गदर्शक शिबिरे शास्त्र शिक्षक संघटन, एवढेच नव्हे तर शालेय आणि विद्यापिठिय रंगभूमिवर एक उत्कृष्ठ कलाकार दिग्दर्शक, अशा अनेक पैलू मधून आपल्या सर्वगुण संपन्न्तेचा लाभ शिक्षण संस्था आणि शिक्षण क्षेत्राला देणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व गुरुवर्य नागेश व्यं. धोलबा(सर).

 सांगली पासून ते पलूस, पुणे,अलिबाग पर्यत ज्यांचे विद्यार्थी नमवंत डॉक्टर्स म्हणून प्रसिध्द आहेत. शिक्षण क्षेत्रात ज्यांचे विद्यार्थी आज अनेक ठिकाणी मुख्याध्यापक, प्राध्यापक म्हणून ख्यातकीर्द आहेत. बॅंक्स, इलेक्ट्रोनिक्स, शिल्पशास्त्र, इंजिनिअरिंग, औषध उत्पादन, केमिकल इंजिनिअरिंग, कॉस्ट अकौंटन्सी आणि वकिली व्यवसायात अनेक ठिकाणी अनेक लोक आपल्या पद आणि पदवी इतकाच आमचे घोलबा सर म्हणून ज्यांचा आदर पूर्व उल्लेख करतात आणि सुधीर मोघ्यांसारखा कलाकार आपल्या कलांकार घडणीत घोलबासरांचा महत्वाचा वाटा आहे. म्हणून अभिमानाने सांगतो त्या नेरुरला जन्मलेल्या घोलबासरांनी शिक्षण कालांत वडिलांच्या रेल्वेतील फिरत्या नोकरीमुळे मद्रास, विजवाडा येथे ५ वी पर्यंत तेलगू भाषेत शिक्षण घेण्यात व्यतीत केले व बेळगांव येथे बी.एस्‌.सी. नंतर १० वी पर्यंत कानडी माध्यमातून अध्यापन केले. म्हणून सांगितले तर एखाध्याला खरेही वाटणार नाही. जरंतु तेलगू भाषेतून शिक्षणाची सुरुवात झालेली असतांना देखील  नंतर मराठी माध्यमातून त्यांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक, भौतिक विषय घेऊन बी.एस्‌.सी. पुढे शास्त्र शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रात असतांनाच डी.पी.एड्‌, बी.एड्‌ च्या पदव्याही वरच्या क्रमांकाने मिळवल्या. युनिव्हर्सिटी ग्रॅंट्स्‌ कमिशनच्या उन्हाळी वर्गात केमिस्ट्री उपमुख्यापकात पहिल्या पाचात नंबर मिळवला. निरनिराळ्या शिक्षण संस्थांतून अध्यापक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक पदे भूषविली. एवढेच नव्हेतर एस्‍.टी.सी. चे प्राचार्य पद, बी.एड्‌. कॉलेज मध्ये गणीत, शास्त्र, भूगोल, शा. शिक्षक. दृक-श्राव्य शिक्षणाच्या लेक्चरर पदाबरोबरच मेथड मास्टर म्हणूनही कारर्किर्द गाजविली. ८१ साली नोकरीतील नियमानुसार उपमुख्याध्यापक पदावरुन सेवानिवृत्ती स्विकारली. तरी शिक्षण क्षेत्र मात्र त्यांना पुन्हा साद घालीत असतेच                आणि शिक्षण क्षेत्रातला असामान्य असा ह गुरुवर्य भावी पिढीसाठी बहुमोल असे आपले शैक्षणिक योगदान पहिल्याच उमेदीने हसत मुखाने करीत आहे. त्यांचे सर्वक्षेत्रातील गेल्या चार तपातील शिष्य आपली भावी पिढीही घोलबासरांकडून घडावी म्हणून त्यांना साकडे घालीतच असते. आणि आपल्या आई-वडीलांच्या अत्यंत आवडत्या घोलबासरांकडे नवीन पिढी आदरणीय भावनेने धडे घेत असते. आपापल्या शिक्षण संस्थात प्राविण्य संपादित असते.
३. कै. गोविंद पांडुरंग कंटक - MA B.Ed
 निवृत्त उपमुख्याध्यापक विद्यामंदीर प्रशाला, मिरज
 गोविंद पांडुरंग कंटक यांचा सांगली जिल्ह्यातील एका खेड्यात जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची. वडील मिरजेच्या भारतभूषण शाळेत शिक्षक होते. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण F.Y B.Sc पर्यंत केल्यानंतर शिक्षक म्हणून कामास सुरवात. पूर्वी शिक्षक जून ते एप्रिल पर्यंत नोकरीस असत. एप्रिलला शिक्षकाची नोकरी खंडीत होत असे. पगार १० ते १२ रूपये होता. कोणत्याही प्रकारचे स्थैर्य नोकरीत नव्हते. स्वाभिमानी स्वभावामुळे संस्थाचालकाकडे नोकरीची लाचारी न केल्यामूळे ११ शाळात नोकरी करावी लागली. उत्तम अध्यापन, प्रचंड बुध्दीमत्ता व कल्पकता, सतत धडपडण्याची वॄत्ती परंतू स्वभाव थोडा तापट. यामुळे असंख्य अडचणीतून प्रवास. विद्यामंदीर प्रशाला, मिरज येथे नोकरीस आल्यानंतर संस्थेने त्यांची कायम पदावर नियुक्ती केली. उपशिक्षक, पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक म्हणून कार्य केले. नोकरीच्या काळात BA, MA मराठी ह्या पदव्यांचे शिक्षण बाहेरून केले व उच्च श्रेणी मिळवली. सांगलीच्या B.Ed कॉलेजमधून B.Ed कोर्स पूर्ण केला व प्रथम क्रमांकाने पास झाले. ह्या वेळेस देखील ते नोकरी करत होते. मराठी विषयाचे उत्तम अध्यापन करीत असत. परंतू खरी आवड विज्ञानाची.

 त्यामुळे सतत वाचन चिंतन मनन व प्रयोग करण्याची धडपड यांतूनच ते उत्तम विज्ञान शिक्षक बनले. दिवसातील १८ तास ते शाळेत रमत. प्रयोगशाळा हेच त्यांचे घर. ५ वी ते १२ वी पर्यंत सर्व वर्गांना आवडीने ते अध्यापन करीत असत. शाळेमध्ये डॉ. भाभा विज्ञान मंडळाची स्थापना केली व मंडळाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले. त्यांना विज्ञान संशोधक घडविले. तालुका, जिल्हा, राज्य राष्ट्रीय पातळीवर विज्ञान प्रदर्शनात अनेक पुरस्कार त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मिळवून दिले. त्यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे होते. शाळेतील शिक्षकांना ते विविध विषयाचे मार्गदर्शन करीत. शैक्षणिक संशोधन प्रकल्पांना मार्गदर्शन करीत. वेळापत्रकाची पुनर्रचना, शालेय दिनदर्शिका, गुणवत्ता प्रकल्प पाठ्यपुस्तकांचे परीक्षण, ९ वी भूमिती पाठ्यपुस्तकांचे परीक्षण, वैज्ञानिक प्रात्यक्षिकांच्या माध्यंमातून विज्ञानाचे अध्यापन अशा शिक्षकांनी सादर केलेल्या प्रबंधास त्यांनी मार्गदर्शन केले. हे प्रबंध राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत निवडले गेले व शिक्षकांना पुरस्कार मिळाले.

 विज्ञान कथा, वैज्ञानिक प्रयोग, वैज्ञानिक उपकरणे यासंबंधीचे मार्गदर्शन  महाराष्ट्रातील असंख्य शाळेत कंटक सरांनी केले. मिरजेत बालबिद्यार्थ्यांची आषाढी दिंडी काढण्यात त्यांचा मोठा वाटा होता. स्वाध्याय प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांना त्यांनी गुणवान बनविले. मराठी विज्ञान प्रबोधिनीचे ते अध्यक्ष होते. या संस्थेचा आदर्श वैज्ञानिक चा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. निवृत्तीनंतर सावरकर प्रतिष्ठान संचालीत प्रज्ञा प्रबोधिनी प्रशालेत त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम केले. स्कॉलरशिप MTS (महाराष्ट्र प्रज्ञाशोध) NTS (राष्ट्रीय प्रज्ञाशोध) या परीक्षांचे ते उत्तम मार्गदर्शक आहेत. विज्ञान प्रदर्शनाचे संयोजक व परीक्षक त्यांनी काम पाहिले. ते अविवाहीत होते.

४. प्रज्ञा प्रबोधिनीचे शिल्पकार गुरुवर्य कै. नामजोशी सर 

नामजोशी सरांचा जन्म २६ डिसेंबर १९१७ रोजी तासगावला झाला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही हे काही आप्तेष्टांच्या मदतीने मुंबई विद्यापीठाच्या तत्कालीन मॅट्रिक परीक्षेत १९३६ मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. घरच्या बिकट परिस्थितीमुळे उच्चशिक्षणाकडे पाठ वळवून नामजोशी सरांना नोकरी करावी लागली. त्यांनी शिकवण्या केल्या. नाईट स्कूलमध्ये शिकवले. शालेय शिक्षणापासूनच त्यांना कुशाग्र, बुद्धिमत्ता यामुळे ते एक विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले. हे करीत असताना शिक्षकी पेशात कायम राहण्यासाठी ते एस्टीसी झाले. त्यांना पदवी घेण्याची इच्छा असूनही घरच्या जबाबदारीमचळे प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी १९६४ साल उजाडले. शिक्षकी पेशात आवश्यक असलेली बी.एड्. पदवी त्यांनी १९६६ मध्ये मिळवली. १९७५ साली सर सिटी हायस्कूल मधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. त्यांनी ३८ वर्षे शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केली. रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी सावरकर प्रतिष्ठानची स्थापना केली. सावरकर प्रतिष्ठानमध्ये १९८४ साली प्रथम बालवाडी सुरु केली. त्यानंतर एक एक इयत्ता वाढवीत १० वीची पहिली बॅच बाहेर पडली. पतंगराव कदम आणि सगरे यांच्या मदतीने हायस्कूलला परावानगी मिळवली. नामजोशी सरांनी राष्ट्रीय गुणवत्ता परीक्षेची तयारी करुन घेण्यासाठी १९८० मध्ये वर्ग सुरु केले. १९८१ मध्ये दहा विद्यार्थ्यांची पहिली तुकडी परीक्षेस बसली. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने पास झाल्यामुळे मुलाखतीसाठी निमंत्रण आले. त्यातील दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. बारा वर्षात एकूण ३८ विद्यार्थी राष्ट्रीय गुणवत्ता मिळवू शकले. या ३८ विद्यार्थ्यात १० विद्यार्थी मागासवर्गीय आहेत.
नामजोशी सरांचे पुढील प्रमाणे गौरव केले गेले.

पटवर्धन हायस्कूल, तासगांव शाळेतर्फे सत्कार

दामुआण्णा केळकर समितीतर्फे सत्कार

सांगली शिक्षण संस्थेचे मान्यतापत्र

कृष्णा व्हॅलीतर्फे सत्कार

दक्षिण महाराष्ट्र दै. केसरीतर्फे सत्कार

नामजोशी सरांनी दोन पुस्तके लिहिली आहेत.

सुविचार संग्रह व सदाचार संहिता.


स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान संचलित प्रज्ञा प्रबोधिनी बालवाडी ते आय्. ए. एस्. शिक्षण संस्था विश्रामबाग, सांगली. राष्ट्रीय स्तराच्या व प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांसाठी मानवतायुक्त शैक्षणिक गुणवत्ता.

५. आदर्श समाजसेविका- श्रीमती सुमतीबाई फडके

(मी, श्रीमती सुमतीबाई फडके आणि त्यांच्या वहिनी)
सांगलीतील स्त्रीशिक्षण संस्था, मराठी विज्ञान प्रबोधिनी, निसर्ग प्रतिष्ठान या आणि अशाच सार्वजनिक संस्थांच्या जडणघडणीत ज्यांनी आपले सारे आयुष्य झोकून दिले त्या श्रीमती सुमतीबाई फडके यांचे जीवनचरीत्र सर्वानाच प्रेरणादायी ठरेल. आज आयुष्याची पंचाहत्तरी गाठूनही त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे.पुण्याच्या प्रतिष्ठित एस्. पी. कॉलेज आणि टिळक बी. एड. कॉलेज यांतून सन्मानपूर्वक पदवी घेतल्यानंतर सुमतीबाइंनी शिक्षण हेच आपले कार्यक्षेत्र निश्चित केले. प्राचार्य सोनोपंत दांडेकर, श्री. म. माटे, के. ना. वाटवे, पु. ग. सहस्त्रबुध्दे इत्यादी दिग्गज बुध्दीवंतांकडून मिळालेली शिकवण आणि प्रा. नरहर कुरुंदकर, ग. प्र. प्रधान, साने गुरुजी, एस्. एम्., नानासाहेब गोरे यांच्या सामाजिक विचारांनी भारून राष्ट्रदलाच्या सच्च्या सेविकेचे व्रत त्यांनी आयुष्यभर स्वत:हून स्वीकारले आहे. विवाहबंधनात न अडकता आईची सेवा, सामाजिक संस्थांचे कार्य आणि मुलांवर चांगले संस्कार हेच त्यांनी आपले सर्वस्व मानले.


साधेपणा, नीटनेटकेपणा, इंग्रजी वाचनाची प्रचंड आवड, भाषांतर तसेच संस्थांच्या कार्याची रेखीव टिपणे ही त्यांची खास वैशिष्ट्ये सांगता येतील. पहाटे पाचला उठल्यापासून विविध इयत्तांतील मुलांच्या अभ्यासातील शंका सोडविणे, घरकाम, बागकाम, वाचन, गीतादर्शन, विज्ञानविषयक लेखांची टिपणे काढणे, वसंत बापट, शांता शेळके, सरोजिनी बाबर यांच्या कविता व श्री. म. माटे यांचे लेख वाचणे यात दिवस कसा निघून जातो ते कळत नाही. या वयाच्या लोकांचा सहसा देवाधर्मात वेळ जातो. पण सुमतीबाइंर्ना देवधर्म संस्कारांत कधीच रस वाटला नाही. सूर्य हा एकच देव त्या मानतात व सर्वांना शक्ती व प्रकाश देणे हीच त्याची पूजा अशी त्यांची श्रध्दा आहे. समतेसाठी व न्यायासाठी आंदोलनात कार्यरत राहावे असे त्यांना वाटते.मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, सर्वांनी सामाजिक जाणीव ठेवून व आपली जबाबदारी ओळखून व्यवस्थितपणे काम करावे यावर त्यांचा कटाक्ष असतो.

त्यांचे जीवन म्हणजे सांगलीतील एक ज्ञानदीपच आहे. त्यांचे कार्य असेच चालू राहो आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नवे कार्यकर्ते तयार होवोत ही शुभेच्छा !

No comments:

Post a Comment