Friday, December 11, 2020

भारतातील लोकशाही अबाधित राखून आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता

-
शत्रूशी समोरासमोर लढण्यापेक्षा त्याच्या गोटात शिरून त्याला नामोहरम करणे सोपे असते. देश आणि धर्म या दोन्ही आघाड्यांवर एकाचवेळी लढण्याऐवजी देशासाठी दादाभाई नवरोजींनी धर्म बदलला. व्यापार हे त्यांचे शक्तीस्थळ आहे हेओळखून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्वदेशी असोसिएशन काढली आणि इंग्लंडमध्ये जाऊन स्वदेशी उद्योग आणि व्यापार वाढविणे कंपनीच्या आणि ब्रिटिशांच्या कसे फायद्याचे आहे हे त्यांना पटवून दिले. येथील संस्थानांचे प्रश्न सोडविले त्यांना उद्योगवाढीस प्रवृत्त केले आणि स्वदेशी उद्योगाचे जाळे निर्माण करून आर्थिक स्वावलंबनाद्वारे अप्रत्यक्षपणे येथील धर्मांचे रक्षण केले. चीन, रशियाच्या डाव्या विचारसरणीसही लगाम घातला. 


टिळक, आगरकर यांनी इंग्रजी शिक्षणाच्या शाळा आणि कॉलेजेस सुरू करून त्यांना इंग्रज अधिका-यांची नावे दिली. पण उद्देश हा स्वकियांना व स्वधर्माला सशक्त आणि राजकीय दृष्ट्या जागृत करण्याचा होता.


होमरूल लीग द्वारे हिंदू- मुस्लीम एकी करून  कॉंग्रेसची स्थापना केली आणि  मर्यादित स्वदेशी स्वायत्ततेची मागणी केली.  महात्मा गांधींनी सुरू केलेल्या असहकार आणि स्वातंत्र्यलढ्यास या पार्श्वभूमीचा फार उयोग झाला.


सध्याच्या काळातही साम्यवादाचे आणि भांडवलशाहीचे जागतिक आव्हान स्वीकारून आपला भारत आत्मनिर्भर व येथील लोकशाही सुदृढ करण्याचे कठीण काम शासनाला करावे लागणार आहे  गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित, धार्मिक- निधर्मी सर्वांना बरोबर घेऊन हे आपल्याला साध्य करायचे आहे. यासाठी सर्व जनतेची त्यास सक्रीय साथ मिळण्याची आवश्यकता आहे. 


ज्ञानदीप फौंडेशनने आपल्या सर्व कार्याचे हेच उद्दीष्ट ठेवले आहे. - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

No comments:

Post a Comment