Friday, December 11, 2020

पुढे धावताना मागे पडलेल्यांचा विचार करा


आपण आतापर्यंत वर पाहून चढण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र मागे वळून पाहिल्याशिवाय आणि पायाखाली काय तुडविले यात आहे हे पाहिल्याशिवाय आपली प्रगती स्थायी व धोकारहित होणार नाही. विज्ञानाची प्रगती, धर्मांतर किंवा कम्युनिझम क्रांती हे आपण आपल्या धर्मावर आक्रमण समजून त्याला विरोध केला. पण कारणांच्या मुळाशी जाऊन उपाय केले नाहीत. 

दलित व गरीब यांच्या सांपत्तिक हिताची काळजी घेऊन जर आपण पुढील वाटचाल केली तर आपल्या प्रगतीचा वेग मंदावेल पण तो अधिक स्थायी आणि सर्व समाजाला एकत्र बांधणारा ठरेल. या साठी शहरातील झोपडपट्टीत राहणारे व ग्रामीण भागात शेती व छोट्या धंद्यांवर आपला चरितार्थ चालविणारे यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्व राजकीय व सामाजिक संस्थांनी प्रयत्न केले पाहिजेत. 

आपल्या नवसंशोधनाची दिशाही पाश्चात्य आधुनिक कल्पनांपेक्षा भारतीय व श्रम आणि कौशल्यावर आधारित छोट्या उद्योग व व्यवसायांच्या आधुनिकाकरणासाठी असावी  तेथे आर्थिक गुंतवणूक कशी वाढेल. परदेशस्थ भारतीयांचे यासाठी योगदान कशाप्रकारे घेता येईल याचाही साकल्याने विचार व्हवयास हवा. निसर्ग संतुलनाच्या कार्यापेक्षाही समाज समरसतेचे आव्हाल आज आपल्यापुढे आहे आणि त्यासाठी शासनाच्या कार्यात आपण  सक्रीय सहभागी होणे जरूर आहे.  असे मला वाटते.- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

No comments:

Post a Comment