Tuesday, October 2, 2018

ज्ञानदीप मंडळ योजनेचे पुनश्च हरि ओम.

२०१३ मध्ये कोल्हापूर येथे ज्ञानदीप मंडळ योजनेची सुरुवात केल्यानंतर कोरेगाव, अकोता, रत्नागरी अशा विविध ठिकाणांहून योजनेविषयी विचारणा करणेत आली. मात्र संगणक वापरण्याचे ज्ञान तेथील शिक्षकांना नसल्याने तसेच शाळांतील संगणक नादुरूस्त असल्याने याबाबतीत पुडे फारशी प्रगती होऊ शकली नाही.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने डिजिटल स्कूलची योजना सुरू करून संगणक खरेदीसाठी अनुदान मंजूर केले. तसेच शालेय अभ्यासक्रमात संगणक प्रशिक्षणाचा समावेश केला. त्यामुळे बहतुेक शाळांनी वेगळा संगणक विभाग सुरू केला. शैक्षणिक ध्वनी-चित्रफिती तसेच अभ्यासक्रमावर आधारित सॉफ्टवेअरचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू झाले. तरीदेखील संगणकाचा व विशेषकरून इंटरनेटचा वापर नव्या ज्ञानाच्या शोधासाठी व नवील ज्ञान निर्मितीसाठी न झाल्याने ञानदीप मंडळ योजनेची गरज लक्षात आली.

मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने  ज्ञानदीप फौंडेशनने पुन्हा याबाबतीत प्रयत्न करण्याचे ठरविले. संगणकावर मराठी टाईप करण्याचे प्रशिक्षण देण्यास प्राधान्य द्यावे या सांगतीच्या माजी जिल्हाधिकारी सौ. लीना मेहेंदळे यांनी सुचविल्यामुळे प्रथम शिक्षक व नंतर विद्यार्थी यांना असे प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले.

१ सप्टेंबर २०१८ रोजी महाराष्ट्र टेक्निकल एज्ज्युकेशन सोसायटीच्या पुणे शाखेत ज्ञानदीप इनोव्हेशन सेंटर सुरू केल्यानंतर सांगली येथे प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे ठरले.

५ सप्टेंबर २०१८ या शिक्षकदिनी सावरकर प्रतिष्ठानच्या प्रज्ञा प्रशाळेत पहिले ज्ञानदीप मंडळ सुरू करण्यात आले. १९८५ साली ज्ञानदीपच्या संचालिका कै. सौ. शुभांगी रानडे यांनी  येथेच  संगणक प्रशिक्षणाचा एक महिन्याचा वर्ग घेतला होता. ज्ञानदीपतर्फे एक प्रश्नपेटी शाळेस देण्यात आली.



६ सप्टेंबर २०१८ रोजी महाराष्ट्र टेक्निकल एज्ज्युकेशन सोसायटीच्या शाळेत ज्ञानदीप मंडळ सुरू करण्यात आले.


यानंतर लगेचच ८ सप्टेंबर २०१८ रोजी पलूस येथील पंडित विष्णु दिगंबर पलुसकर शाळेत ज्ञानदीप मंडळाची स्थापना करण्यात आली.  आता मुख्य गरज आहे ती या शाळांतील शिक्षकांना संगणकाची माहिती करून देऊन मराठी टायपिंग शिकविण्याची.


१० सप्टेंबर २०१८ रोजी मला अमेरिकेला यावे लागले. संबंधित शिक्षकांशी नेटवरून संपर्क साधून मी हे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे.  सांगलीतही असे शिक्षण देऊ शकतील अशा  शिक्षकांचा गट करण्याची गरज आहे. पाहू    त्यात कितपत यश येते ते. 
यावेळी मुले मराठीतून संगणकावर आपले लेख टाइप करू लागतील व ते लेख वेबसाईटच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचतील तेव्हा आपोआपच या योजनेला नवे बाळसे येईल. 

No comments:

Post a Comment