Sunday, July 12, 2009

जलशक्ति व पवन ऊर्जा

पावसाचे पाणी साठविण्यासाठी नदीवर उगमाजवळ धरणे बांधली जातात. उंचावर साठविलेले पाणी खाली सोडताना पाण्यातील स्थितिज उर्जेचे गतिज उर्जेत रूपांतर होते. या उर्जेचे टर्बाईन व विद्युतजनित्र बसवून विद्युतशक्तीत रूपांतर केले जाते. ही वीज इतर कोणत्याही पर्यायांपेक्षा स्वस्त पडते. महाराष्ट्रातील कोयना धरण हे याचे उत्तम उदाहरण आहे.
समुद्रातील लाटांपासून वीजनिर्मिती -


पवन ऊर्जा -

खनिज स्वरूपाच्या ऊर्जेवर पर्याय शोधताना साहजिकच आपले लक्ष न संपणाऱ्या ऊर्जासाधनांकडे जाते. पवनऊर्जा हे एक असेच साधन आहे. पृथ्वीवरील वातावरणातील हवेच्या हालचालीमुळे आपल्याला पवन ऊर्जा मिळते. शिडांची जहाजे चालविणे, पवनचक्की व्दारे पाणी उपसणे आणि पिठाची जाती चालविणे अशासारखी पवन ऊर्जेचे उपयोग प्रचलित होते. आधुनिक तंत्रज्ञान वापरून पवनचक्कीव्दारें मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करणे आता शक्य झाले आहे.
पवनऊर्जा वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते. व तिची क्षमता वेगाच्या धन प्रमाणात वाढते. साधारणपणे सागरी किनारपट्टी व डोंगराळ प्रदेशात वाऱ्याचा वेग चांगला असतो. पवन जनित्राव्दारे वीज निर्मिती करण्यासाठी १५ कि.मी. पेक्षा अधिक वेगाचे वारे लागते. ते अशा ठिकाणी सहज मिळते. पाणी उपसण्यासाठी १० कि. मी. पेक्षा अधिक वेगाने वाहणारे वारे लागते. अशा ठिकाणी शोधून तिथे पवनचक्या लावता येतात.
भारताच्या अपारंपारिक ऊर्जास्त्रोत विभागाने भारतामध्ये पवनमळे उभारले आहेत. महाराष्ट्नत देवगड येथील पवनमळयात १० पवनजनित्रे १९८६ साली उभारली आहेत. आणि त्यातून मिळणारी वीज महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या ग्रीडमध्ये दिली जाते. पवनजनित्रामध्ये मुख्यत्वे पवनचक्की, मुख्य कणा, गीअर पेटी,, जनित्र, ब्रेकची व्यवस्था, पवनचक्की वाऱ्याच्या दिशेला फिरण्याची व्यवस्था व कंट्नेल व्यवस्था हे मुख्य भाग आहेत.


देवगड येथील पवनमळयात १० पवनजनित्रे ३ रांगामध्ये बसवली आहेत. दोन जनित्रांमध्ये किमान पवनचक्कीच्या व्यासाच्या चौपट इतके अंतर ठेवावे लागते. ही रचना वाऱ्याच्या दिशेवर अवलंबून आहे. याची विद्युत क्षमता ५५० किलोवॅट इतकी आहे आणि वर्षाला सुमारे ८ ते १० लाख युनिट इतकी वीज निर्मिती यातून होते.
पवनमळे उभे करण्यासाठी डोंगरमाथ्यावरील जागा निवडावी. तेथील वाऱ्याचा वेग चांगला असावा व शक्यतो हा वेग वार्षिक सरासरी ताशी १२ ते १५ कि. मी. असावा. मात्र भारतात बऱ्याच ठिकाणी वाऱ्याचा सरासरी वेग ताशी ५ ते ८ कि. मी. असूनही पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत. शासनाने दिलेल्या आर्थिक सवलतींमुळे हे शक्य झाले आहे व यामुळे पवनाउर्जा निर्मितीस प्रोत्साहन मिळाले आहे. सुझलान कंपनीमार्फत महाराष्ट्रात असे पवनमळे उभारले आहेत. पवनजनित्रे व ती उभारण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री नेण्यासाठी चांगल्या रस्त्याची सोय असावी लागते. पवनचक्क्यांमुळे पाऊसमानात घट होते या समजुतीने, तसेच जमीन हस्तांतरण आणि रस्त्यांची दुरवस्था या मुद्यांवरून स्थानिक पातळीवर अशा प्रकल्पांना विरोध होत आहे. त्यावे योग्य निराकरण होण्याची आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment